थबकते सूर्यतेजही त्रिवेणीत सुस्नात होण्यासाठी
त्या गावची माती असते भाग्यवती जिथे-
मिळतात तीन जिल्ह्यांच्या सीमारेषा
काळीच्या कुशीत वावरतो एक श्याम
सोबतीने मातीत मळणारी राधा जोपासते असे व्रत
सिंधुसरितेने धावावे खळाळत तसे होते खेळत
एक निरागस बाल्य कर्तृत्वाच्या कळसासाठी !
भेटावे लागते उगवत्याला कृष्णवर्णी मेघांना
पराक्रमाला अटळ असते संकटाची झटापट
ज्ञानसाधनेसाठी कराव्या लागतात डोळ्यांच्या वाती
मगच ते उजळू शकते शाळेतील तट्यांच्या भिंती.
बसावेत महावृक्षाच्या सावलीत वाटसरू-
आस्वाद घेत पाथेयाचा. पोचावा तळामुळापर्यंत,
बोधीवृक्षाचा गारवा...खुली व्हावीत, अवघ्यांसाठी -
खळाळणारी कारंजी, घटनापुरूषाने करावे सहजस्फूर्त कौतुक.
वर्हाडाचे मार्दव फुलवणारा कल्पवृक्ष !...हे दृश्य
ऒठंगून उभे आहेत साक्षीला वर्तमान भूत भविष्य !
-केशव मेश्राम
No comments:
Post a Comment