- किनारा न ज्याला अशा सागराची
कथावी कशी सांग संवेदना
उरीं रे उराच्या किती सांगतांना
तरीही असंख्यात त्या वेदना!
नव्हे अंत ज्याला असे अंतराल
कुठे सांग विश्वात उपमान त्या
कशी वैखरी ही अभिधा कशी ती
कुठूनी कथा युक्त सांगेल ह्या!
होतीच ती वेदना प्राचिन्
पुन्हा आस्तिकाचिच घडली कथा
कथा ही ‘सनातन’ घडावी ‘वथे’ चि
गड्या, भारताची जुनी ही व्यथा !
अशा या व्यथेची पुन्हा हो न वृत्ति
इतिहास साक्षी ! उभा ठाकला
अरे, आवृत्ति ही कधीहि न होईल्
अशी द्यावायाला हमि जागला !
‘बहूता जनांच्या’ म्हणूनि सरीता
इथे संगमि साधण्या पुर्णता
खरे सांगतो त्या कृत्यकृत्य झाल्या
निसर्गातहि ना अशी पुर्तता !
तये घेतली मृत्तिका गा करात
जिला कोणताहि न आकार होता
निराकारीता ही परब्रह्म साक्ष
अम्हि साक्ष ! - आम्हास आकार येता
असा हात पाठीवरी ठेवलेला
स्मरे, स्वर्गीचे अमृत प्राशिलो
तयातुन उमेदि अशा निर्मिल्या कि
पुन्हा वातले,‘शीवनेरी’स आलो !
सलीलातली लाट त्या सागराची
अशी उंच की -‘देवतात्म्यापरि’
उभे न्हात गेलो, - शुचित्वापदाला
अम्हि पोचलो ‘मुक्त’ आत्म्यापरि !
शिडें शुभ्र-नौका-अशी वेगळीच
किनारा बघाया - हवे ते दिले
अरे, ‘दृष्टि कोलंबसि’ जे न देखे
असे विश्व तेथे अम्हि पाहिले !
तसा एकट्याचा लढा पाहिला मी
‘शिखंडी’ हि ते पुर्ण अभ्यासिले
अगा, मी ‘सुपुत्रा’ विराटा घरीच्या
महाभारती जे न - ते पाहिले !
असा हा ऋषि जो वरी शांत होता
जयाच्या वडाग्नि असे अंतरी
परि अग्निचे काष्ठ भक्षून झाला
तपस्वीच जो दिक् सीमांचा अरि !
अशा दिक् सीमांचा अरिला प्रणामी
ऋणाचे ऋषीच्या इथे काज आहे
उद्या ? “ काल आहे अनंतावधीचा”
महाराष्ट्र हा येथ सत्यार्थ राहे !
बघाना तया ‘छत्रपती’ लाहि आज
अनंतावधीने मिळे न्याय न्याय
तसा “सागरा” शिवविस्तारकर्त्या
अजिं वा उद्या न्यायचि न्याय न्याय !
-भाऊ भालेराव
No comments:
Post a Comment