tag:blogger.com,1999:blog-89398216822141815842024-03-12T10:55:24.193-07:00शिक्षण महर्षी,कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख(२७ डिसेंबर १८९८ - १० एप्रिल १९६५)संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.comBlogger134125tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-60460742373305372592022-01-14T23:52:00.001-08:002022-01-14T23:53:28.436-08:00डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावरील चित्रपट : ज्ञानगंगेचा भगीरथ : पटकथा,संवाद, गीते : डॉ.श्रीकृष्ण राऊत<p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/-0Ue6sPyxt8" width="320" youtube-src-id="-0Ue6sPyxt8"></iframe></div><br /> <p></p>संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-64550845621131721752021-05-08T04:23:00.001-07:002021-05-08T04:23:02.111-07:00आरक्षण आणि डॉ.पंजाबराव देशमुख<p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen="" class="BLOG_video_class" height="266" src="https://www.youtube.com/embed/iLen0Onz5_Q" width="320" youtube-src-id="iLen0Onz5_Q"></iframe></div><br /> <p></p>संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-13815068404472385462014-12-29T06:49:00.002-08:002015-12-26T21:02:26.242-08:00ज्ञानाचे गाणे <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: center;">
<br /></div>
<div style="text-align: center;">
<br /></div>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8uv8JT3mrJjgCEwRSSwrHOJPRZX5GJcun_f_SpzsU_4VNKAZugFzDN5vi-ln-Tz6Q_svSO5zjQAJOt-A3w-k-PlnLbVo01lQM3RhVUPA1hDrKbA0diLGsB0f7ema-IzxUkY7pp2ZzatY/s1600-h/bhaoo.4.jpg" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"><img alt="" border="0" id="BLOGGER_PHOTO_ID_5419928366984730674" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8uv8JT3mrJjgCEwRSSwrHOJPRZX5GJcun_f_SpzsU_4VNKAZugFzDN5vi-ln-Tz6Q_svSO5zjQAJOt-A3w-k-PlnLbVo01lQM3RhVUPA1hDrKbA0diLGsB0f7ema-IzxUkY7pp2ZzatY/s400/bhaoo.4.jpg" style="display: block; height: 400px; margin: 0px auto 10px; text-align: center; width: 287px;" /></a><span style="background-color: white; color: #333333; font-family: Georgia, Utopia, 'Palatino Linotype', Palatino, serif; font-size: 21.3333339691162px; line-height: 39.4986686706543px; text-align: center;"> (२७ डिसेंबर १८९८ - १० एप्रिल १९६५)</span><br />
<div class="MsoNormal" style="mso-layout-grid-align: none; text-autospace: none; text-indent: .5in;">
<div style="text-align: center;">
<span style="background-color: white; color: #333333; font-family: Georgia, Utopia, 'Palatino Linotype', Palatino, serif; font-size: 21.3333339691162px; line-height: 39.4986686706543px;"><br /></span></div>
<div style="text-align: center;">
<span style="background-color: white; color: #333333; font-family: Georgia, Utopia, 'Palatino Linotype', Palatino, serif; font-size: 21.3333339691162px; line-height: 39.4986686706543px;"><br /></span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">तू ज्ञानाचे गाणे भाऊ, तू सूर्याची भाषा;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">दिले मृतांना संजीवन तू, केल्या दूर निराशा.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">शेतीच्या दारात आणली तू ज्ञानाची गंगा;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">माती मधुनी तूच फुलविल्या शास्त्राच्या फुलबागा;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">तूच पेरल्या मनात अमुच्या नव्या सुगंधी आशा.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">सात सागरापल्याड केले मंथन वेदांताचे;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">तूच काढिले शोधून मोती धर्माच्या उगमाचे;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">तुझी लेखणी वेद पोचवी दूरदूरच्या देशा.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">सातपुड्याचा उंच कडा तू, तू पूर्णा माई;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">तू मजुरांचा महादेव गा, तू दलितांची आई;</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">छत्रपतीच्या ज्ञानपोईचा केला तूच गणेशा..</span></span></div>
<div class="MsoNormal" style="mso-layout-grid-align: none; text-autospace: none; text-indent: .5in;">
</div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><span class="Apple-style-span" style="font-size: x-large;">-डॉ. श्रीकृष्ण राऊत</span></span></div>
<div class="MsoNormal" style="text-align: center; text-indent: 0.5in;">
<span class="Apple-style-span" style="color: #9933ff; font-family: DV-TTSurekh;"><br /></span></div>
</div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-27612970920417489192014-12-21T08:01:00.001-08:002014-12-27T20:25:05.634-08:00डॉ. पंजाबराव देशमुख आणि घटना समिती__य. दि. फडके<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
महाराष्ट्रातील सुप्रसिद्घ विचारवंत, वक्ते, लेखक स्व. य. दि. फडके यांचा प्रस्तुत लेख संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या मुद्रा महाराष्ट्राची या संदर्भग्रंथासाठी मागविला होता. सदर लेख लिहित असतांना स्व. य. दि. फडके हे अतिशय आजारी होते. परंतु शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विषयी त्यांच्या मनात असलेली आदराची भावना आणि भाऊसाहेबांचे कार्य यामुळे त्यांनी सदर लेख लिहिला. हा लेख लिहित असतांनाच त्यांचे दु:खद निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हा अखेरचा लेख ठरला. महाराष्ट्रातील एका साक्षेपी विचारवंताने डॉ. भाऊसाहेबांच्या घटना समितीतील कार्यावर लिहिलेला प्रस्तुत अभ्यासपूर्ण लेख शिवसंस्था वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. - संपादक</div>
<div style="text-align: justify;">
__________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भारतीय संविधानसभा 1946 च्या डिसेंबरमध्ये अस्तित्वात आली. प्रौढ मतदान पद्घतीनुसार जनतेने निवडलेल्या प्रतिनिधंनी भारताचे संविधान तयार करावे अशा आशयाचा ठराव 1934 साली काँग्रेसने पारित केला असला, तरी प्रत्यक्षत: प्रौढ मतदान पद्घतीनुसार लोकप्रतिनिधींची निवड 1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या प्रौढ मतदान पद्घतीनुसार करण्यात आली. तोपर्यंत 1935 च्या कायद्याने दिलेल्या मर्यादित मताधिकारानुसार निवडण्यात आलेल्या विधीमंडळांच्या सदस्यांनी, अप्रत्यक्ष रित्या निवडलेल्या प्रतिनिधींना संविधानसभेचे सदस्य म्हणून संविधानाची जडणघडण करण्याची संधी मिळाली. डॉ. पंजाबराव देशमुख यांची काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रांत वर्हाडातून निवड करण्यात आली. 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 चा जवळजवळ तीन वर्षांच्या कालावधीत पंजाबरावांनी संविधानसीोच्या वादविवादात भाग घेतला. बहुसंख्य सदस्य काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे त्यांना पक्षशिस्तीची बंधने पाळावी लागत असत. 25 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान सभेत केलेल्या संस्मरणीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘जर सर्व सदस्यांनी पक्षशिस्तीचे नियम काटेकोरपणे पाळले असते तर संविधानसभेचे कामकाज फारच कंटाळवाणे झाले असते. पक्षशिस्त कडक असती तर संविधानसभेचे रुपांतर होयबांच्या मेळाव्यात झाले असते. सुदैवाने काही सदस्य बंडखोर निघाले. त्यांच्यामध्ये ह. वि. कामथ, डॉ. पंजाबराव देशमुख, रुस्तम के. सिध्वा, प्रा. शिब्बनलाल सक्सेना आणि पंडित ठाकूरदास भार्गव होते. त्यांच्याबरोबरच मला प्रा. के. टी. शहा आणि पंडित हृदयनाथ कुंझरु यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांनी उपस्थित केलेले बरेचसे मुद्दे विचारप्रणालीविषयी होते. त्यांनी केलेल्या सूचना स्वीकारण्यास मी तयार झालो नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या सूचनांचे मूल्य कमी होत नाही. त्या सर्वांचा मी ऋणी आहे. ते नसते तर संविधानामागची तत्त्वे स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली नसती. तांत्रिकरित्या संविधान पारित करुन घेण्यापेक्षाही ते जास्त महत्त्वाचे होते.’ (वसंत मून (संपादक) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँड स्पीचेस : खंड 13, 1994; पृष्ठ 1209) डॉ. आंबेडकर कालवश झाल्यानंतरच्या पन्नास वर्षांमध्ये त्यांच्या भक्तांनी त्यांना सुटाबुटातला देव बनवून त्यांच्याविषयी काही मिथके जनमानसात रुजवली. बाबासाहेब हे एकटेच भारतीय संविधानाचे शिल्पकार असल्याचा दावा करण्यात येऊ लागला. खुद्दे बाबासाहेबांनी संविधान सभेतील </div>
<div style="text-align: justify;">
अखेरच्या भाषणात संविधान निर्मितीत ज्यांचा मोठा वाटा होता त्या सर्वांचा नावानिशी उल्लेख करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख मागासलेले वर्ग आणि आदिवासी तसेच शेतकरी यांचे कैवारी होते. संविधानसभेत ते कसा मार्मिक विनोद करुन निर्भीडपणे टीका करीत याचा एक नमुना मध्यप्रांत-वर्हाडातून संविधानसभेत निवडून गेलेले आचार्य ग. त्र्यं. धर्माधिकारी यांनी 14 सप्टेंबर 1949 रोजी त्यांचे चिरंजीव चंदूराजा (म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी) यांना लिहिलेल्या खाजगी पत्रात दिलेला आहे. </div>
<div style="text-align: justify;">
‘आदिवासी व मागासलेले वर्ग (आजच्या रुढ भाषेत ओबीसी) यांच्या विषयीच्या कलमावर भाषण करताना डॉ. पंजाबराव देशमुख यांनी घटनेच्या भाषेवर मोठी बहारीची टीका केली. ते म्हणाले, ‘या घटनेत यद्यपि-तथापि, किंतु-परंतु जरी असले तरी पण इत्यादी मुरड घालणार्या शब्दप्रयोगांचा इतका भरणा आहे की जे सुरुवातीला म्हटलेले असते त्याच्या अगदी उलट शेवटल्या वाक्यात म्हटले असल्याचे आढळून येते. आपण एखाद्याला म्हणावे, ‘तू पुरुष आहेस हे मी जाहीर करतो तू जरी पुरूष असलास तरी तुला लुगडे नेसण्याची मोकळीक राहील. यद्यपि तू लुगडे नेसलेला असलास तथापि तुला गांधीटोपी घालण्याची मुभा राहील आणि इतकेही करुन तुला स्वत:ला स्त्रीदेखील म्हणवून घेता येईल. महाराज ! या घटनेची भाषा अशा थाटाची आहे.’ ज्यांना कायदेशीर भाषेच्या खाचाखोचा, कावे व वळसे फारसे कळत नाहीत व आवडतही नाहीत, त्यांना अर्थात या वर्णनाने गुदगुल्या झाल्या. त्यातील मार्मिक विनोद सगळ्यांनाच आवडला.’ (दादा धर्माधिकारी, ‘आपल्या गणराज्याची घडण’ दुसरी आवृत्ती, मार्च 1999, पृ. 199-200) भारताच्या संविधान सभेत वकिलांचा आणि बॅरिस्टरांचा फार मोठा भरणा होता. याखेरीज पी. के. सेन, बक्षी टेकचंद यांच्यासारखे इंग्रजी राजवटीत उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेले सदस्य होते. तसेच बाळासाहेब खेर हे सॉलिसिटरही होते. संविधानसभेचे अध्यक्ष राजेंद्रप्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यापूर्वी वकिलीच्या व्यवसायात नावलौकिक कमावला होता. जवाहरलाल नेहरूंनी वकिलीचा व्यवसाय केला नसला तरी ते बॅरिस्टर होऊन मायदेशी परतले होते. संविधानसभेतील वादविवादात भाग घेताना थोडक्या वेळात आपले म्हणणे स्पष्ट शब्दांत मांडावे लागत असे. बाकलण्याची हौस असलेले अनेक सदस्य आधीच आपल्या नावांच्या चिठ्या अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना पाठवत असत. वक्त्यांच्या लांबलचक याद्यांच्या मार्याला कसे तोंड द्यावे असा प्रश्न राजेंद्रप्रसादांना पडत असे. 24 जुलै, 1947 रोजी चर्चेसाठी दिलेला एक तास उलटून गेला तरी यादीतील तीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नव्हती. तेव्हा पंजाबरावांनी अध्यक्षांना सुचना केली, ‘आधी चिठ्ठया पाठवण्याची पद्घत बंद करावी. त्याऐवजी अध्यक्षांचे जो लक्ष वेधून घेईल त्याला बोलण्याची संधी द्यावी.’ पंजाबरावांची ती सूचना राजेंद्रप्रसादांनी स्वीकारली. ते म्हणाले, ‘यापुढे मी कोणाचीही चिठी स्वीकारणार नाही. ज्याच्यावर माझी नजर जाईल त्याला बोलण्याची परवानगी देईल.’ (कॉन्स्टिट्यूअंट असेंब्ली डिबेटस (सीएडी), खंड 4, 24 जुलै, 1947 : पृ. 802 यापुढे कंसात जेथे नुसती तारीख व पृष्ठक्रमांक दिलेले असतील ते या वादविवादांच्या अधिकृत वृत्तातील आहेत हे वाचकांनी लक्षात ठेवावे.</div>
<div style="text-align: justify;">
13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरुंनी संविधानाच्या उद्दिष्टांबाबत ठराव मांडला. संविधान सभेच्या कामकाजावर मुस्लिम लीगने बहिष्कार घातला होता. 560 हून अधिक संस्थानांचे प्रतिनिधी तेव्हा संविधानसभेत नव्हते. मुस्लीम लीग आणि संस्थांनांचे प्रतिनिधी संविधानसभेच्या कामकाजात सहभागी होईपर्यंत संविधान तयार करण्याचे काम स्थगित करावे अशी दुरुस्ती उदारमतवादी नेते बॅ. मु. रा. जयकर यांनी 16 डिसेंबर 1946 ला सुचवली. तिला सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत वगैरे काँग्रेजनांनी विरोध केला. 21 जानेवारी 1947 रोजी जयकरांनी दुरुस्तीसूचना मागे घेत असल्याचे जाहीर करण्याऐवजी जयकरांनी आपण दुरुस्तीसुचना मागे घेतल्याचे जाहीर करुन घ्घ्नंतर निवेदन करताना आपण काही नवीन विचार मांडणार आहोत.’ असे जयकर म्हणाले. त्या विधानाला गोविंद वल्लभ पंत आणि रुस्तम के. सिध्वा यांनी तांत्रिक आक्षेप घेतले. जयकरांसारख्या वयोवृद्घ कायदेपंडितांचे बोलणे ऐकण्यासही बहुसंख्य काँग्रेस सदस्य तयार नसल्याचे पाहून पंजाबरावांनी अध्यक्षांना उद्देशून म्हटले, घ्घ्सन्माननीय सदस्यांना त्यांचे निवेदन पुरे करु द्यावे. आपण दुरुस्तीसूचना मागे घेत आहोत एवढे एकच वाक्य उच्चारले म्हणून त्यांना आणखी बोलण्यास प्रतिबंध करणे योगय नाही. त्यांना जे काही म्हणावयाचे आहे ते ऐकण्यास आम्ही तयार आहोत.’ (21 जानेवारी, 1947; पृ. 309) अध्यक्ष राजेंद्रप्रसादांनी पंत व सिध्दा यांचे आक्षेप ग्राह्य धरून जयकरांना पुढे बोलू दिले नाही.</div>
<div style="text-align: justify;">
संविधान सभेने वल्लभभाई पटेलांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मूलभूत अधिकारांविषयीच्या समितीच्या अंतरिम अहवालात नागरिकांना समतेचा अधिकार याचा अशी शिफारस केली होती. तिचे दोन खंड (क्लॉजेस किंवा पोटकलमे) होते. त्यातल्या पहिल्या खंडात 97 शब्दांचे एकच वाक्य होते तर दुसर्या खंडात 74 शब्दांचे एकच लांबलचक वाक्य होते. केवळ धर्म, वंश, जात किंवा लिंग यांच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव करण्यास पहिल्या खंडाने मनाई करण्यात आली होती. दुसर्या खंडात हॉटेल, रेस्टॉरंटसकट व्यापारी स्वरुपाची आस्थापने, विहिरी, तलाव, रस्ते वगैरे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही अशी तरतुद करण्यात आली होती. डॉ. पंजाबराव देशमुख बॅरिस्टर होऊन 1926 साली विलायतेतून मायदेशी परतले असले तरी कायद्यातील लांबलचक वाक्ये, निष्कारण तपशील देऊन केलेला विस्तार वगैरेचे त्यांना वावडे होते. भेदभावास प्रतिबंध करणार्या तरतुदीतील फक्त पहिला खंड ठेवावा आणि दुसरा खंड वगळावा असे मत चर्चेत व्यक्त करून पंजाबराव म्हणाले, ‘आपण फक्त मूलभूत अधिकारांपुरत्या तरतुदी मर्यादित कराव्यात आपण येथे न्यायविचारणीय (जस्टिशिएबल) मूलभूत अधिकारांविषयी तरतुदी करीत आहोत. अशा तरतुदींमध्ये जेथे सर्वांना प्रवेश करता येईल. अशा ठिकाणांची तपशीलवार यादी समाविष्ट करून भरताह करणे अनुचित ठरेल.’ अन्य सदस्यांनी दुसरा खंड वगळण्यासंबंधीची पंजाबरावांची सूचना स्वीकारली तर नाहीच, उलट काही सदस्यांनी शाळा, वसतिगृहे, मंदिरे तसेच अन्य पूजास्थाने वगैरे शब्दांची त्यात भर घालावी असे सुचवले. (29 एप्रिल, 1947 पृ. 427-429) परिणामत: डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या 315 कलमी संविधानाच्या मसुद्यातील नवव्या कलमात दोन्ही खंड एकत्र करून समाविष्ट करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेल्या भारताच्या 315 कलमी संविधानातील पंधराव्या कलमातील दुसर्या खंडामध्ये 69 शब्दांचे एकच वाक्य असून, त्यात अनेक ठिकाणांचा उल्लेख केलेला आढळतो. गेल्या जवळजवळ 60 वर्षामध्ये पंधराव्या कलमाचा विस्तार कमी होण्याऐवजी वाढला असून, त्यात आता पाच खंड आहेत. 2005 साली पाचव्या खंडाची भर टाकण्यात आली. त्यात 82 शब्दांचे मालगाडीसारखे लांबलचक एकच वाक्य आहे.</div>
<div style="text-align: justify;">
पंजाबरावांची घटनेशी संबंधित काही प्रश्नांविषयी वेगळी मते संविधानसभेतील बहुसंख्य सभासदांना पटत नव्हती, तरीही संविधानाच्या मसुद्यात दुरुस्त्या सुचवून ते ती मांडत असत. त्यांच्या दुरुस्ती सुचना बहुतेक वेळा फेटाळल्या जात असत. कधी अन्य सदस्याने त्यांच्या सूचनेशी मिळतीजुळती दुसरी सूचना सुचवली असेल तर ते आ पली दुरुस्तीसूचना स्वत:च मागे घेत असत. एखाद्या सदस्याने मांडलेल्या दुरुस्तीसूचनेशी ते सहमत असले की ती जणू आपलीच दुरूस्तीसूचना असल्यासारखी तिचे हिरिरीने समर्थन करीत असत. ओरिसातून निवडून आलेले सदस्य लोकनाथ मिश्र यांनी संविधानाच्या मसुद्यातील 91 व्या कलमात दुरुस्ती सुचवली तेव्हा पंजाबरावांनी ती उचलून धरली. त्यांचे हे भाषण ह. वि. कामथ यांना इतके आवडले की त्यावर अधिक काही बोलण्याची गरज नाही अशी हरिभाऊ कामथांनी प्रशंसा केली. (20 मे, 1949; पृ. 194). प्रांताच्या घटनेचे प्रारूप कोणत्या तत्त्वांवर आधारलेले असावे हा विषय चर्चिला जात असताना उपराज्यपालांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढे आला. निष्कारण चर्चा टाळावी या हेतूने गोविंद वल्लभ पंतांनी दुरूस्ती सुचवताच पंजाबरावांनी आपली दुरुस्ती सूचना पंतांच्या सुचनेशी मिळतीजुळती असल्यामुळे मागे घेतली (16 जुलै, 1947; पृ. 610-611).</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
राष्ट्रध्वजाविषयीची पंजाबरावांची दुरुस्तीसूचना : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
राष्ट्रध्वजाविषयी अशोकचक्रांकित तिरंगी राष्ट्रध्वज संविधानसभेत सादर करताना जवाहरलाल नेहरूंच्या भावना उंचबळून आल्या होत्या. देशाच्या तिरंगी झेंड्यावर चरख्याचे चित्र का नाही हे विशद करतांना त्यांनी तांत्रिक अडचणी हळुवार तसेच आर्जवी भाषेत सांगितल्या. त्यानंतर भाषण करतांना पंजाबराव म्हणाले, घ्घ्काँग्रेस पक्षाच्या झेंड्यावर चरख्याचे जे चित्र असते तेच रितंगी राष्ट्रध्वजावर असावे यासाठी मी दुरुस्ती सुचवली होती. चरखा हे अहिंसेचे प्रतीक आहे. तसेच महात्मा गांधींच्या नावाशी चरख्याचा अतूट संबंध आहे; पण या सदनाची अशोकचक्रांकित तिरंगी राष्ट्रध्वज स्वीकारण्याची तयारी असल्यामुळे मी माझी दुरुस्तीसूचना मांडू इच्छित नाही. मात्र माझ्या सुचनेत स्वीकारार्ह असे बरेच काही होते असे मला अजूनही वाटते.’ (22 जुलै, 1947, पृ. 742-743) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदीविषयीची पंजाबरावांची मते : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
काँग्रेस पक्षाने त्यांना संविधानसभेचे सदस्य म्हणून निवडून दिले असले तरी नेहरू, पटेल, राजाजी या काँग्रेसश्रेष्ठींनाही पसंत नसलेली मते ते एखाद्या एकांड्या शिलेदाराप्रमाणे बेधडक व्यक्त करत असत आणि अनेक विवाद्य मुद्यांवर दुरुस्तीसूचना पाठवून चर्चा घडवून आणत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मसुदा तपासणार्या समितीने 5 आणि 6 क्रमांकाची सुधारित कलमे 1949 च्या ऑगस्टमध्ये संविधानसभेत सादर केली. त्याबरोबरच काही नवी कलमेही मांडली : 1. ज्या दिवशी संविधान अंमलात येईल त्या दिवशी भारताचे अधिवासी (डोमिसाइल)असलेल्या आणि भारतात जन्मलेल्या व्यक्ती भारतीय प्रजासत्ताकाच्या नागरिक बनतील. 2. भारतात ज्यांचा जन्म झाला पण ज्या व्यक्ती अनेक वर्षांपासून येथील अधिवासी आहेत अशा व्यक्तींना मग त्या भारतातील पोर्तुगीजांच्या किंवा फ्रेंचाच्या वसाहतीत राहणार्या असोत अगर भारताबाहेर जन्मलेले पण अनेक वर्षे भारताचे रहिवासी असलेले इराणी असोत, त्यांना भारतीय नागरिक होता येईल. 3. भारताचे रहिवासी असूनही फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींना किंवा 4. पाकिस्तानात राहणार्या पण फाळणीनंतर भारतात आलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिक होता येईल. 5. ज्या व्यक्तींचा किंवा त्यांचा मातापित्यांचा जन्म भारतात झाला असेल पण ज्यांचे वास्तव्य परदेशांमध्ये असेल त्यांनाही भारतीय नागरिकत्व दिले जाईल. डॉ. आंबेडकरांनी सुधारित कलमांमध्ये सुचवलेल्या कलमांवर पंजाबरावांनी कडक टीका केली. ते म्हणाले, `नव्या पाचव्या कलमानुसार व्यक्तीच्या अधिवासाला प्रथम स्थान देण्यात आले आहे. अधिवासी व्यक्ती भारतात जन्मलेली असली तरी पुरेसे आहे. तिच्या मातापित्याशी असलेला संबंध महत्त्वाचा नाही, एखादे परदेशी दांपत्य विमानाने प्रवास करीत असेल आणि ते विमान काही तासांसाठी मुंबई विमानतळावर थांबलेले असताना त्या दांपत्यांपैकी करोदर महिला विमानातच प्रसूत होऊन तिने अपत्याला जन्म दिला, तर केवळ जन्म भारतात झाला या कारणामुळे ते अपत्य भारताचे नागरिक बनेल. भारताचे नागरिकत्व इतक्या स्वस्तात व सहजासहजी मिळेल अशी तरतूद करू नये.’ सामान्यत: किमान पाच वर्षे भारतात राहिलेल्या व्यक्तीस भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद पंजाबरावांना बिलकूल आवडली नव्हती. अशा व्यक्तीच्या मातापित्याचे राष्ट्रीयत्व किंवा त्यांचा देश कोणता याचा जसा उल्लेख कलमात नव्हता, तसाच कोणत्या हेतून पाच वर्षे व्यक्ती भारतात राहत होती याची सखोल चौकशी करण्याची पंजाबरावांना गरज वाटत होती. भारताच्या स्वातंत्र्याला घातपात करण्याच्या उद्देशाने हेरगिरीसारख्या पंचमस्तंभी (फिक्स कॉलमिस्ट) कारवाया करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती भारतात राहण्याची शक्यता पंजाबरावांनी बोलून दाखवली. म्हणून त्यांनी पाच वर्षांच्या वास्तव्याच्या अटीऐवजी किमान बारा वर्षांच्या वास्तव्याची अट असावी असे सुचवले. (अन्य कोणत्याही देशाचा नागरिक नसलेल्या प्रत्येक हिंदूला व शिखाला भारतीय नागरिकत्व हक्काने मिळाले पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. (11 ऑगस्ट, 1949; पृ. 355-356). पंजाबरावांच्या या शेवटच्या सूचनेचा गर्भितार्थ लक्षात घेतला तर भारतात जन्मलेल्या मुस्लीम किंवा ख्रिस्ती व्यक्तीस हक्काने भारतीय नागरिकत्व देण्यास पंजाबराव तयार नव्हते. त्यांच्या दृष्टीने भारतात जन्मलेल्या मुस्लिमांची आणि ख्रिस्ती लोकांची निष्ठा संशयास्पद होती. फाळणीनंतरच्या रक्तपातामुळे भारतातील मुस्लिमांच्या भारतावरील निष्ठेची पंजाबरावांना खात्री वाटत नव्हती. भारतीय ख्रिश्चनांचा समाज, त्यातील काही व्यक्तींचा अपवाद वगळता परक्या इंग्रज राज्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता, हे शल्यही पंजाबरावांच्या मनाला खुपत होते.</div>
<div style="text-align: justify;">
पंजाबराव एकराज्य पद्घतीचे (युनिटरी स्टेट) पाठीराखे फाळणीच्या वेळच्या आणि त्यानंतरच्या रक्तरंजित राजकारणाच्या सावटाखाली भारतीय संविधानाची निर्मिती होत होती हे विसरून चालणार नाही. संविधान सभेचे बहुसंख्य सदस्य भारताने संघराज्याची (फेडरल स्टेट) संरचना स्वीकारावी या मताचे पुरस्कर्ते होते. भारताने अमेरिकेप्रमाणे संघराज्य स्वीकारू नये एवढेच नव्हे तर राज्यसंघही (कॉन्फेडरेशन) बनू नये असे पंजाबरावांचे ठाम मत होते. त्यांना भारताने एकराज्य शासन पद्घती (युनिटरी स्टेट) व्हावे असे वाटत होते. युद्घकाळात एकराज्य आणि शांततेच्या काळात संघराज्य हे डॉ. आंबेडकरांनी वर्णिलेले भारतीय संविधानाचे स्वरूपही पंजाबरावांना समाधानकारक वाटत नव्हते. मसुद्यात ठिकठिकाणी वापरलेला फेडरल हा शब्द वगळण्यात आला आणि त्याऐवजी संघशासन (युनियन गवहर्नमेंट) असा शब्दप्रयोग संविधानाला अंतिम रूप देताना वापरण्यात आला तरी पंजाबराव संतुष्ट नव्हते. संघराज्यातील संरचनेचा भर युनियन वर असतो तर एकराज्य शासनपद्घतीचा भर युनिटी वर असतो. या महत्त्वाच्या फरकाकडे पंजाबराव लक्ष वेधत असत. त्यांनी वेळोवेळी एकच ठेका धरला होता तो म्हणजे, एकराज्य पद्घतीच भारताला अनुरूप आहे. बहुसंख्य सदस्यांना मान्य नसलेले हे मत मांडण्यामागची त्यांची चिकाटी व सातत्य लक्षात घेऊन अखेर डॉ. राजेंद्रप्रसादांनी पंजाबरावांना विस्ताने मत मांडण्याची संधी दिली. खरे म्हणजे 30 मे 1949 रोजी संविधानसभेत राज्यपालासंबंधी आणि प्रांतिक स्वायत्ततेविषयी चर्चा चालु होती. व्रजेश्वरवर प्रसाद या सदस्याने प्रत्येक प्रांतात वेगळे विधानमंडळ आणि राज्य असण्याची गरज नाही असे मत मांडले. त्या मताला दुजोरा देण्याच्या निमित्ताने पंजाबरावांनी केलेले भाषण संविधान सभेसमोरच्या विषयाशी थेट संबंध असलेले नव्हते, तर तो प्रकट व मुक्त चिंतनाचा एक नमुना होता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पंजाबरावांचे प्रकट व मुक्त चिंतन :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भारतीय संविधानाने एकराज्य पद्घती स्वीकारावी या आशयाचा ठराव आपण काही काळापूर्वी संविधानसभेत मांडला होता याची सदस्यांना आठवण करून देऊन पंजाबराव म्हणाले, जागतिक राजकारणाची तेव्हाची स्थिती लक्षात घेता भारताने जागतिक शांतता राखण्यात महत्वाची व निर्णाय भूमिका बजावली पाहिजे. त्यापेक्षाही भारत सुसंघटित, एकजिनसी व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले पाहिजे. आपण तयार केलेल्या संविधानाची पायाभरणी दिल्लीत झालेली नसून, ती ब्रिटनमध्ये करण्यात आली आहे. आपले हे संविधान आणि त्यामागची लक्षणे परकी असून, भारतीय जनतेच्या प्रकृतीला मानवण्यासारखी नाहीत. संविधानाचा मसुदा म्हणजे 1935 च्या कायद्याचे निव्वळ प्रतिरूप (रिप्रॉडक्शन) आहे. आता आपल्या मार्गात संस्थाने आडवी येणार नाहीत. यापुढे मुस्लीम लीगच्या हटवादीपणाचा अडथळाही राहिलेला नाही. प्रांतांमध्ये राजकीय अस्थिरता आहे. प्रांताप्रांतामध्ये सहकार्य नाही तसेच प्रांतिक सरकारे केंद्रीय सरकारकडून सतत आर्थिक साहाय्य मागत असतात.</div>
<div style="text-align: justify;">
‘सध्या संबंध देश भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नामुळे प्रक्षुब्ध झाला आहे. त्या प्रश्नावर विचार करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात आल्या. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच वाईट झाली. जोपर्यंत प्रांत अस्तित्वात राहावे असे आपल्याला वाटत राहील तोपर्यंत भाषावार प्रांत आपणास यावेच लागतील. आपल्या नेत्यांनी त्याविरुद्घ आपले सर्व वजन खर्च केले तर अल्प कालावधीपुरता हा प्रश्न लांबणीवर टाकता येईल; पण भाषावार प्रांत निश्चितच निर्माण करावे लागतील आणि जरी माझे मित्र के. एम. मुन्शी यांचा मुंबईचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करण्यास विरोध असला तरी त्यांना त्यास प्रतिबंध करणे शक्य होणार नाही. या सर्व अडचणींवर मात करण्याचा एकच उपाय मला सुचतो, तो म्हणजे प्रांतांची स्वाधीनता हिरावून घेण्याचा ! प्रांत अस्तित्वात आहेत तोपर्यंत प्रांताप्रांतामधील भांडणे आणि मत्सर संपुष्टात येणार नाहीत. जेव्हा केंद्रात एकच कायदा असेल तेव्हाच प्रांताप्रांतामधले हेवेदावे व तंटे नाहीसे होतील... आज जरी आपण एकराज्य पद्घतीचा माझा प्रस्ताव स्वीकारला नाही तरी पंधरा वर्षांनी तो आपणास स्वीकारावा लागेल; पण तेव्हा फार उशीर झालेला असेल.’ (30 मे, 1949; पृ. 499-420) तेव्हा विधानसभेचे सदस्य असलेले आचार्य धर्माधिकारी यांनी लिहिले आहे, घ्घ्फेडरल पद्घती का नको, युनिटरीच का पाहिजे याचे त्यांनी मोठे सोपपत्तिक व तर्कशुद्घ विवेचन केले होते. ते भाषण इतके परिणामकारक झाले की अध्यक्षांना ते अप्रस्तुत असल्याचे भान बर्याच उशिरा आले. समर्थनपर भाषण करण्याचा मोह मला अनावर झाला पण अध्यक्षांनी आता आपण विषयांतराला परवानगी देणारे नाही असे निक्षून सांगितले. पंजाबरावांच्या भाषणातील भाषावाढीच्या भागाखेरीज एक एक वाक्य मला मान्य होते... भाषावार प्रांत व्हायचेच असतील तर प्रांतांना जिल्ह्यांचेच स्वरूप आलेले बरे. असे मलाही वाटते, पण आता ते कोण ऐकणार?’ (दादा धर्माधिकारी : उपरोक्त पृ. 156-157) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील राष्ट्रपतीविषयीच्या तरतुदींबद्दलची पंजाबरावांची मते : </div>
<div style="text-align: justify;">
सध्याच्या भारतीय संविधानातील 87 क्रमांकाच्या कलमानुसार लोकसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर तसेच दर वर्षाच्या आरंभ भरणार्या सत्राच्या सुरुवातीस संसदेच्या दोन्ही सदनांतील सदस्यांना उद्देशून भाषण करण्याचा आणि सत्र बोलावण्यामागील कारणे सांगण्याचा राष्ट्रपतीस अधिकार दिलेला आहे. डॉ. आंबेडकरांच्या मसुद्यात राष्ट्रपतींनी संसदेच्या पावसाळी, हिवाळी तसेच अर्थसंकल्पीय सत्राच्या सुरुवातीस भाषण करावे अशी तरतूद केलेली होती. त्यावर टीका करताना पंजाबराव म्हणाले, घ्घ्जेव्हा जेव्हा संसदेचे सत्र सुरु होईल तेव्हा तेव्हा राष्ट्रपतींनी भाषण करावे अशी सक्ती करणे उचित नाही तसेच आवश्यकही नाही. इंग्लंडच्या मुकुटधारी राजावर किंवा राणीवरही अशी सक्ती केली जात नाही. राष्ट्रपतीच्या भाषणावर किती वेळ चर्चा करावी याबद्दलही सक्ती करण्याची गरज नाही.’ पंजाबरावांच्या या सूचना 1951 सालच्या पहिल्या घटनादुरुस्ती कायद्याने स्वीकारल्या. (18 मे, 1949; पृ. 110) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संसदसदस्यांचे विशेषाधिकार व उन्मुक्ती (इम्युनिटीज) : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. आंबेडकरांच्या मसुद्यातील 25 व 86 क्रमांकांच्या कलमांमध्ये संसदसदस्यांचे विशेषाधिकार आणि उन्मुक्ती यांच्याबद्दल तरतुदी करण्यात आल्या होत्या. सध्याच्या संविधानात त्या एकत्रित स्वरूपात 105 व 194 या क्रमांकांच्या कलमात त्या सुधारित स्वरूपात आढळतात. मसुद्यातील तिसर्या पोटकलमानुसार जोपर्यंत संसद कायदा करून सदस्यांच्या व संसदीय समित्यांच्या विशेषाधिकरांच्या निश्चित व्याख्या करत नाही तोपर्यंत त्यांचे विशेषाधिकार मोयम किंवा संदिग्ध असू नयेत, तर त्यांची निश्चित व्याख्या केलेली असावी, असे पंजाबरावांचे मत होते. घ्घ्विशेषत: ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांच्या विशेषाधिकारांसारखे असावेत.’ या शब्दसमूहाला त्यांनी तीव्र विरोध केला. (19 मे, 1949; पृ. 147-148). पण त्यांचे हे मत संविधानसभेतील बहुसंख्य सदस्यांना ग्राह्य वाटले नाही. 26 जानेवारी 1950 ते 1976 पर्यंत 105 (3) व 194 (3) या पोटकलमांमध्ये ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांना जे विशेषाधिकार 26 जानेवारी 1950 रोजी होते तेच भारतीय संसदसदस्यांना असतील ही संदिग्ध तरतूद कायम होती. आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींनी संसदेचा रबरी शिक्क्यासारखा उपयोग करून 42 वी घटनादुरुस्ती पारित करून घेतली. ती 18 डिसेंबर 1976 रोजी अंमलात आली. त्यात पुढील दुरुस्त्या करण्यात आल्या. 1. विधानमंडळांचे विशेषाधिकार नमूद करण्यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज नाही. 2. प्रत्येक सदनाने विकसित केलेले विशेषाधिकार त्यांच्या सदस्यांना वापरता येतील; ते न्यायपालिकेच्या अधिकारक्षेत्रात येणार नाहीत. 3. संविधानातील ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्ससंबंधीचे सर्व उल्लेख गाळून टाकण्यात आले. मात्र आजतागायत विशेषाधिकारांची यादी निश्चित करण्यात आलेली नसल्यामुळे ते पूर्वी होते तसेच संदिग्ध आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
संविधानातील कलमांमध्ये शक्य तितक्या कमी शब्दांमध्ये तरतुदी कराव्यात असा पंजाबराव सामान्यत: आग्रह धरीत असले, तरी मसुद्यातील 92 क्रमांकाच्या कलमासारख्या एखाद्या कलमान्वये अनेक खंड असले आणि त्यात लांबलचक वाक्ये असली तरी त्यांच्या आशयाचे महत्तव लक्षात घेऊन ते मसुद्यात होते तसेच पारित करण्यास पंजाबराव पाठिंबा देत असत. (19 मे, 1949; पृ. 141) संसदसदस्यांचे वेतन किती असावे हे ठरवण्याचा अधिकार संघटनेला असावा आणि त्यासाठी संसदेने वेळोवेळी कायदा करावा ही या मसुद्यातील तरतूद पंजाबरावांना मान्य होती. संसद सदस्यांना पुरेसे वेतन व भत्ते दिल्यास त्यांना अन्य मार्गाने पैसे मिळवण्याचा मोह होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केलेले आढळते. (20 मे, 1949; पृ. 170-171) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 91 व्या कलमाबद्दलचे मतभेद : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 91 क्रमांकाच्या कलमात पुढील तरतुद करण्यात आली होती. संसदेच्या दोन्ही सदनांनी पारित केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवावे आणि त्या विधेयकाला आपली संमती आहे की नाही व नसल्यास त्यावर सही न करता आपण ते रोखून धरणार आहोत याबद्दल संसदेन् ो विधेयक पाठवल्यानंतर जास्तीत जास्त सहा आठवड्यांच्या कालावधीत राष्ट्रपतीने निर्णय घ्यावा. या तरतुदीला खुद्द डॉ. आंबेडकरांनीच दुरुस्ती सुचवली. जास्तीत जास्त सहा आठवड्यांच्या कालावधीत ही शब्दयोजना वगळून शक्य तितक्या लवकर असे शब्द वापरावेत असे डॉ. आंबेडकरांनी सुचवले. पंजाबरावांना जास्तीत जास्त सहा आठवड्यांचा कालावधी ही आंबेडकरांनी आधी घातलेली निश्चित कालमर्यादा मान्य होती. शक्य तितक्या लवकर ही शब्दयोजना संदिग्ध होती. या मोयम शब्दयोजनेचे ह. वि. कामथ यांनीही वाभाडे काढले. तरीही शक्य तितक्या लवकर हे शब्द कायम ठेवण्यात आले आणि 2008 साल उजाडले तरी ते सध्याच्या संविधानातील 115 व्या क्रमांकाच्या कलमात आढळतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
राष्ट्रपतींचा वटहुकूम म्हणजेच अध्यादेश काढण्याचा अधिकार : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 102 व 187 क्रमांकांच्या कलमांनुसार (सध्याच्या संविधानातील 123 व 213 वे कलम) संसदेचे किंवा राज्य विधानमंडळाचे सत्र सुरु नसताना राष्ट्रपतीस तसेच राज्यपालास अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देण्यात आला होता. अध्यादेशाचा परिणाम कायद्यासारखाच असतो. मात्र संसदेचे सत्र सुरू झाल्यानंतर सहा आठवड्यानंतर तो आपोआप व्यपगत (लॅप्स) होतो. त्या मुदतीत संसदेच्या दोन्ही सदनांना तो नापसंत असल्याचा ठराव पारित करता येतो किंवा राष्ट्रपतीही अध्यादेश मागे घेऊ शकतो. अध्यादेश जारी करण्याच्या या अधिकाराचा दुरुपयोग केला जाईल असे वाटल्यामुळे हरिभाऊ कामथ, हृदयनाथ कुंझरू, के. टी. शहा, सरदार हुकमसिंग वगैरे सदस्यांनी या कलमात दुरुस्त्या सुचवल्या. पंजाबरावांनी मात्र राष्ट्रपतीस देण्यात आलेल्या अध्यादेश जारी करण्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले आणि दुरुस्त्या सुचवणार्या टीकारांचा समाचार घेतला. संविधानातील कलमे इतकी चांगली आहेत की, त्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यत नाही असे त्यांनी ठासून सांगितले. (23 मे, 1949; पृ. 201-211). पंजाबरावांचे हे भाकित नंतरच्या 58 वर्षांच्या इतिहासाने चुकीने ठरवले आहे. बिहार राज्यात अध्यादेश जारी करण्याच्या अधिकाराचा इतका दुरुपयोग करण्यात आला की तेथील अध्यादेशांच्या राज्याला आव्हान देणारी याचिका प्रा. डी. सी. वढवा यांनी सर्वोच्च न्यायालयास सादर केली आणि सर्वोच्च न्यायालयाने तेच तेच अध्यादेश पुन:प्रख्यापिता (रिप्रॉमुलगे) करण्याच्या पद्घतीवर कोरडे ओढले.</div>
<div style="text-align: justify;">
कार्यपालिका (एक्झिक्युटिव्ह) न्यायपालिकेपासून अलग करणे आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य : सध्याच्या भारतीय संविधानातील 50 व्या कलमानुसार कार्यपालिका व न्यायपालिका परस्परापासून अलग करणे हे राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून नमुद करण्यात आले आहे, तसेच न्यायपालिकेचे स्वातंत्र्यही तत्त्व म्हणून गृहीत धरण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याची हमी देणारे कलम जगातल्या कोणज्याही संविधानात आढळत नसल्याचे सांगून डॉ. पंजाबराव देशमुख म्हणाले, घ्घ्न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी निवडीची पद्घत असणे आवश्यक आहे. तीन कार्यपालिकेचा हस्तक्षेप असता कामा नये. न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून सहजासहजी दूर हटवता येऊ नये. माझ्या मते संविधानाच्या मसुद्यात न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे सगळे कलम समाविष्ट करण्याची गरज नाही.’ (23 मे 1949, पृ. 224-225)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
महालेखापरीक्षकांसंबंधीची मसुद्यातील 124 ते 127 क्रमांकांची कलमे :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 125 ते 127 क्रमांकांच्या कलमांमध्ये (सध्याच्या संविधानातील 148 ते 159 क्रमांकांची कलमे) भारताच्या महालेखापरीक्षकाची कार्ये व अधिकार यासंबंधी तरतुदी करण्यात आल्या होत्या. महालेखापरीक्षकास केवळ केंद्र व राज्य सरकारांचा जमाखर्च तपासण्यापुरताच अधिकार न देता स्वायत्त महामंडळांसारख्या संस्थांचे हिशेब तपासण्याचे अधिकार असावेत अशा आशयाची दुरुस्ती पंडित हृदयनाथ कुंझरुंनी सुचवली होती. त्यावर भाष्य करताना डॉ. पंजाबराव म्हणाले, ‘अशी दुरुस्ती करण्याची गरज नाही.’ (30 मे 1949, पृ. 413) मसुद्यात डॉ. आंबेडकरांनी केलेली तरतुद पुरेशी व्यापक असल्याचे पंजाबरावांचे मत होते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 131 क्रमांकांच्या कलमात राज्यपालाची कार्ये व अधिकार यासंबंधी केलेल्या तरतुदी :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
राज्यपाल पदासंबंधीच्या 131 व्या कलमाबद्दल संविधानासभेने अधिक वेळ सविस्तर चर्चा करावी असे डॉ. पंजाबरावांनी सुचवले. कारण संविधानसभेतील आरंभीच्या चर्चेत प्रौढमत अधिकारपद्घतीनुसार राज्यपालाला लोकांनी निवडून द्यावे असे मत स्वीकारण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या मसुद्यातील 131 व्या कलमात लोकांनी राज्यपालास निवडून द्यावे या तरतुदीबरोबर राष्ट्रपतीचे राज्यपालांची नियुक्ती करावी असा पर्यायही दिला होता. बी. एन. राव यांनी सादर केलेला संविधानाचा पहिला मसुदा तपासून सुधारित मसुदा सादर करण्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती नेमली होती. या समितीतील काही सदस्य राष्ट्रपतींनी राज्यपालांची नेमणूक करावी हा पर्याय स्वीकारण्यास अनुकूल होते. लोकांनी निवडून दिलेला राज्यपाल आणि देशाचा पंतप्रधान यांच्यामध्ये संघर्ष झाला तर प्रशासन कमकुवत होईल असे काही सदस्यांना वाटत होते. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँड स्पीचेस, खंड 13, 1994 पृ. 161 वरील तळटीप) पंजाबराव एकराज्य पद्घतीचे कट्टर पुरस्कर्ते आणि प्रांताऐवजी जिल्हे हवेत असा आग्रह धरणारे असल्यामुळे राज्यपालास लोकांनी निवडून द्यावे या सूचनेस त्यांनी विरोध करणे त्यांच्या भूमिकेशी सुसंगत होते. जोपर्यंत प्रांत अस्तित्वात आहेत तोपर्यंत राज्यपालास नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतीस द्यावा, एवढेच नव्हे तर राष्ट्रपतीस जोपर्यंत राज्यपालाचे काम समाधानकारक वाटेल तोपर्यंतच राज्यपालास त्याच्या पदावर राहता येईल. (ड्युरिंग द प्लेझर ऑफ द प्रेसिडेंट) अशी तरतुद करण्याची सूचना पंजाबरावांनी केली. (30 मे, 1949, पृ. 433-434) सध्याच्या संविधानातील 156 व्या कलमातील पहिले पोटकलम पुढीलप्रमाणे आहे. घ्घ्द गर्व्हनर शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेझर ऑफ द प्रेसिडेंट’ राज्यपालास निवृत्तिवेतन द्यावे या प्रा. के. टी. शहा यांच्या दुरुस्तीसूचनेस पंजाबरावांनी विरोध केला. (31 मे 1949, पृ. 483) राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्यपालाच्या अध्यक्षतेखाली व्हावी हे पंजाबरावांचे मत संसदीय लोकशाहीशी विसंगत होते. (31 मे, 1949 पृ. 491) म्हणून संविधानसभेने ते स्वीकारले नाही. कारण संसदीय लोकशाहीत राज्यपाल हा केवळ घटनात्मक प्रमुख असतो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 144 क्रमांकाचे कलम : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. आंबेडकरांच्या मसुद्यातील 144 व्या कलमाच्या (सध्याच्या संविधानातील 164 क्रमांकाचे कलम) पहिल्या पोटकलमात बिहार, मध्यप्रदेश आणि ओरिसा या प्रांतांमध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी खास मंत्री नेमावा आणि त्यानेच अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठीही काम करावे अशी तरतूद करण्यात आली होती. बिहारमधील आदिवासी नेते जयपालसिंग यांनी वर उल्लेखिलेल्या तीन प्रांतांच्या यादीत बाँबे या शब्दाची भर घालावी अशी दुरुस्ती सुचवली. तिला डॉ. पंजाबरावांनी दुजोरा लिदा पण संविधानसभेने ती स्वीकारली नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 147 क्रमांकाच्या कलमात (सध्याच्या संविधानातील 167 वे कलम) मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये नमूद करण्यात आली होती. 1. राज्याच्या प्रशासनासंबंधी तसेच संकल्पित विधेयकासंबंधी मंत्रिपरिषदेने घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्याने राज्यपालास कळवा वे. 2. यासंबंधी राज्यपालाने अधिक माहिती मागितल्यास मुख्यमंत्र्याने ती दिली पाहिजे. 3. एखाद्या प्रश्नाबाबत मंत्र्याने निर्णय घेतला असेल पण मंत्रिपरिषदेने करावा असे राज्यपालाने सांगितल्यास मुख्यमंत्र्याने तो विषय मंत्रिपरिषदेसमोर ठेवावा. या कलमाविषयी बोलताना हरिभाऊ कामथ म्हणाले, घ्घ्राज्यपालाने प्रशासनाबाबत माहिती मागवणे म्हणजे घोड्यासमोर गाडी ठेवणे टरेल. राज्यपालास कोणती माहिती द्यावयाची आणि कोणती नाही हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यास असला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याबाबतचे कलम गाळावे.’ पंजाबरावांनी मात्र या कलमातील तरतुदींचे समर्थन केले (2 जून 1949, पृ. 534-535) भारतीय संविधानाच्या 167 व्या कलमात मुख्यंत्र्यांची कर्तव्ये जशी मसुद्यात नमूद केली होती तशीच दिलेली आढळतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पंजाबरावांनी व्यापार्यांवर केलेली टीका : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. आंबेडकरांच्या मसुद्यात 170 ए या नव्या कलमाची भर घालावी अशी प्रा. के. टी. शहा यांनी दुरुस्ती सुचवली. भूमिपुत्र नसलेलया व्यापार्यांविरुद्घ एखाद्या राज्यात भेदभाव करण्यात आला तर ते व्यापारी ज्या राज्यातून आले त्या राज्याला त्या व्यापार्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी अशी तरतूद प्रा. शहांनी सुचवली होती. याविषयी बोलतांना पंजाबरावांनी शेतकर्यांना लुबाडणार्या आणि मालात भेसळ करणार्या व्यापार्यांवर आणि व्याजखोर सावकारांवर कैवार्यांना जातिवादी म्हणणार्यांचे त्यांनी वाभाडे काढले. प्रा. शहांना व्यापारी व उद्योगपतींचे संरक्षण करावयाचे आहे. असा पंजाबरावांनी सरळ आरोप केला. शेतकर्यांना फसवून त्यांची हजारो एकर जमीन महाराष्ट्रात सावकारांनी घशात घातल्याच्या वस्तुस्थितीकडे त्यांनी संविधानसभेचे लक्ष वेधले. कोणाही नागरिकाला भारतात कोठेही जाऊन जमीन विकत घेण्याचा किंवा संपत्ती मिळवण्याचा संविधानाने दिलेल्या अनिर्बंध आणि मूलभूत अधिकारावर बंधने घालण्याचा राज्य सरकारला अधिकार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. व्यापारी तसेच व्याजखोर सावकारांना त्यांनी समाजाचे शत्रू म्हटले आहे. पंजाबरावांनी केलेल्या टीकेच्या भडिमारानंतर प्रा. शहांनी आपली दुरुस्तीसूचना मागे घेतली. (3 जून 1949, पृ. 587-588)</div>
<div style="text-align: justify;">
वित्तीय कामकाज पद्घतीबाबतच्या मसुद्यातील 90 क्रमांकाच्या कलमातील तरतुदींचे विवरण करताना डॉ. आंबेडकरांनी कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया (भारताचा एकत्रित निधी), कंटिजन्सी फंड ऑॅफ इंडिया (भारताचा आकस्मिता निधी), व्होट ऑन अकाऊंट (लेखानुदान) या नव्या संकल्पनांचा अर्थ विशद केला. या संबंधी बोलताना पंजाबरावांनी आपण आजवर न ऐकलेल्या व्होट ऑन क्रेडिट या संकल्पनेचा उल्लेख केला. ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सने रुढ केलेल्या वित्तीय कामकाजपद्घतीने आपण निष्कारण अनुकरण करीत आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले. (8 जून 1949, 727-729) पंजाबरावांची ही टीका संविधान सभेने मान्य केली नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संविधानाच्या मसुद्यावरील पंजाबरावांची टीका :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ह. वि. कामथ आणि प्रा. के. टी. शहा हे संविधान सभेच्या सुरुवातीपासूनच ते अंतिम मसुदा तयार होईपर्यंत कामकाजात जसा सातत्याने भाग घेत असत, तसा पंजाबरावांनी घेतलेला दिसत नाही. ते अधूनमधून चर्चेत सहभागी होत असत. 5 नोव्हेंबर 1948 रोजी संविधानाच्या मसुद्यावर टीका करताना डॉ. पंजाबराव देशमुख म्हणाले, ‘सध्याच्या प्रशासनात चपखल बसेल असा हा मसुदा डॉ. आंबेडकरांनी तयार केला आहे. त्यामुळे त्यात मौलिक असे काही नाही. त्यात उत्साह वाटावा असे काही नाही. प्रांत, त्यांचे गर्व्हनर आणि त्यांचे प्रशासन यांना मुळीच धक्का लागलेला नाही. 1935 च्या हिंदुस्थान सरकारसंबंधीचा कायदा आणि हा संविधानाचा मसुदा या दोहोंमध्ये विशेष असा कोणताच फरक दिसत नाही. अमेरिकेच्या संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांची वेळोवेळी अर्थ उकल करताना तेथील सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत अधिकारांना मर्यादा घातल्या, तशाच डॉ. आंबेडकरांनी मसुद्यातील मूलभूत अधिकारविषयक कलमांत पुरंतुके (प्रोव्हिज) समाविष्ट करून घातल्या आहेत. व्यक्तिश: मला हे मूलभूत अधिकार आवडत नाहीत. कारण त्यांतील आवश्यक ते 1935 च्या कायद्यात दिलेले आहेत. उदाहरणार्थ, भाषणस्वातंत्र्य आणि संघटना स्थापण्याचे व त्या चालवण्याचे स्वातंत्र्य हेच मूलभूत अधिकार काँग्रेस स्वातंत्र्यासाठी लढा देत असताना परकीयांनी पायदळी तुडवले. संविधानाच्या मसुद्यात त्यांनी निर्बंध घालावयास नको होते, तसेच त्यांची क्रमवार मांडणी करावयास नको होती. निदान त्यातील काही मूलभूत अधिकार आपल्या प्रगतीच्या मार्गातले अडथळे बनतील. उदाहरणार्थ, एखाद्याला आवडलेल्या ठिकाणी राहण्याचे स्वातंत्र्य आणि मालमत्ता संपादन करण्याचा व ती विकण्याचा मूलभूत अधिकार या मूलभूत अधिकारांची व्याख्या करून त्यामुळे संसदेचे सार्वभौमत्व हिरावून का घेतले जात आहे आणि त्यावर अतिक्रमण का केले जात आहे? एवढे निर्बंध घातलेल्या अधिकारांना मूलभूतही म्हणता येत नाही आणि हक्कही म्हणता येत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
घ्घ्राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे समर्थन करणे खुद्द डॉ. आंबेडकरांना इतके अवघड झाले की या तत्त्वांचा समावेश संविधानाच्या संहितेत न करता एखाद्या अनुसूचीत करता आला असता तर बरे झाले असते, अशी त्यांनी स्वत:च कबुली दिली आहे. माझ्या मते ही मार्गदर्शक तत्त्वे मुळीच मूलभूत नाहीत. त्यांना संविधानात स्थान देणे योग्य नाही. त्यांची यादी वाचताना निवडणुकीचा जाहीरनामा वाचतो आहोत की काय असे वाटते. सर्व खनिज संपत्ती तसेच उद्योग सरकारच्या मालकीचे आहेत. कोणाला दुसर्याचे शोषण करू दिले जाणार नाही अशा तरतुदी केल्या असत्या तर त्यांना खर्या अर्थाने मार्गदर्शक तत्त्वे म्हणता आले असते.’ </div>
<div style="text-align: justify;">
‘आपला देश शेतकर्यांचा देश आहे. शेतकर्यांना आणि मजुरांना सत्तेत मोठा वाटा मिळायला हवा आणि सरकारवरही त्यांचे वर्चस्व असले पाहिजे. आपणच पृथ्वीतलावरील या सर्वात मोठ्या राष्ट्राचे मालक आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण करावयास हवी.’ (5 नोव्हेंबर, 1948, पृ. 250-252) डॉ. पंजाबराव देशमुख सहसा लांबलचक भाषणे करत नसत. अपवाद म्हणून त्यांनी केलेल्या मोजक्या विस्तृत भाषणांपैकी 5 नोव्हेंबर 1948 चे हे भाषण होते. त्या दिवसानंतर 8 जानेवारी 1949 पर्यंत संविधानसभेच्या कामकाजात त्यांनी भाषण केलेले किंवा दुरुस्ती सुचवल्याचे दिसत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
आचार्य दादा धर्माधिकारींनी चिरंजीव चंद्रशेखर यांना 3 जुलै 1948 रोजी धाडलेल्या पत्रात लिहिले आहे, घ्घ्डॉ. पंजाबराव अलीकडे चर्चेत बराच भाग घेतात. मला वाटते, डॉ. आंबेडकरांच्या खालोखाल विवेचनाची स्पष्टता त्यांच्या भाषणात असते. आंबेडकरांच्या प्रतिपादनात विदग्धता असते तर पंजाबरावांचे प्रतिपादन सुबोध असते आणि त्यांची भाषा सोपी व व्याकरणशुद्घ असते. एखाद्या कुशल वकिलाप्रमाणे ते आपले मुद्दे थोडक्यात, सडेतोडपणाने, स्पष्टपणाने व सोप्या, शुद्घ भाषेत मांडतात. त्या मानाने (म्हणजे यतिराज हा ह. वि. कामथांच्या तुलनेने) पंजाबराव सर्वच माफक व बेताचे असते, पण आपले मुद्दे मांडण्याचे त्यांचे कौशल्य अधिक तर्कसंगत वाटते.’ (दादा धर्माधिकारी : उपरोक्त; पृ. 161-162)</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. आंबेडकरांनी सुचवलेला नवा एक्स ए भाग : व्यापार, वाणिज्य आणि राज्याराज्यामधील व्यवहार यासंबंधी मसुद्याने अनिर्बंध स्वातंत्र्य दिलेले नव्हते. संसदेला तसेच राज्य विधान मंडळांना कायदा करून मुक्त व्यापाराला मर्यादा घालण्याचा अधिकार दिलेला होता; पण त्यासंबंधीच्या तरतुदी मसुद्यात विखुरलेल्या असल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी 274 ए ते 274 ई पर्यंतच्या कलमांमध्ये (सध्याच्या संविधानातील तेराव्या भागातील कलम क्रमांक 301 ते 305) त्या एकत्रित केलेल्या होत्या. त्या तरतुदींची भाषा क्लिष्ट तर होतीच, शिवाय त्यात परंतुकांचा (प्रोव्हिज) सढळ वापर करण्यात आल्यामुळे त्यांचा सामान्य माणसाला अर्थबोध होत नसे. त्यात त्यात असे असले तरी (नॉट विथस्टँडिंग) या शब्दांचा वापर दोनशे वेळा केल्याचे आढळताच डॉ. पंजाबरावांनी विनोदी बुद्घीचा वापर करून मसुदा तयार करणार्यांना हसण्याचा विषय बनवले. मुळात इंटरकोर्स या इंग्रजी शब्दाचे दोन अर्थ होतात. 1. संभोग आणि 2. व्यवहार. या दोन्ही अर्थाची गल्लत होऊ नये म्हणून पंजाबरावांनी इंटर पुढे संयोगचिन्ह (हायफन) काढून मग कोर्स शब्द लिहावा असे सुचवले. संविधानात सभेतील सदस्यांनी त्यांचे हे म्हणणे गंभीरपणे घेतले नाही. (8 सप्टेंबर, 1949; पृ. 1132) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 234 ए हे कलम : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
रेल्वेमार्गाचे आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासंबंधी केंद्र शासनाला राज्यसरकारांना निर्देश देण्याचा अधिकार नव्या कलमाने दिलेला होता. केवळ रेल्वेच्या मालमत्तेचा या कलमात का उल्लेख केला आहे, या पंजाबरावांच्या प्रश्नाला डॉ. आंबेडकरांनी बिनतोड उत्तर दिले. ते म्हणाले, घ्घ्रेल्वे पोलिस हे राज्य सरकारांच्या अधिकारित क्षेत्रात येतात, कारण पोलीस हा विषय संग्रसुचीत (युनियन लिस्ट) येत नसून राज्यसूचीत येतो. रेल्वेच्या मालमत्तेच्या रक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे लागते, कारण त्याच्याशी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निगडित असतो.’ (सप्टेंबर 1949, पृ. 1186).</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील खाजगी मालमत्तेसंबंधीचे वादग्रस्त 24 वे कलम : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हे कलम वादग्रस्त ठरले होते. त्यावर अनेकदा चर्चा झाली होती. सत्ताधारी काँग्रेस पक्षात तीन मतप्रवाह होते. सार्वजनिक हितासाठी सरकारने व्यक्तींची स्थावर व जंगम मालमत्ता संपादन केली तर कोणत्या तत्त्वाच्या आधारे सरकारने नुकसानभरपाई रक्कम निश्चित करावी हे ठरवण्याचा अधिकार सरकारला असल्याचे पंतप्रधान नेहरूंचे मत होते. नुकसानभरपाईची बाजारभावाने देण्यास सरदार पटेल अनुकूल होते. पंडित गोविंद वल्लभ पंतांनी नेहरू आणि पटेल यांच्या दोन टोकांच्या भूमिकांमधला मार्ग सुचवला होता. तो म्हणजे समन्वयाची (इक्विटेबल) आणि वाजवी नुकसानभरपाई देण्याचा. ही पार्श्र्वभूमी लक्षात घेऊन डॉ. पंजाबरावांनी 10 सप्टेंबर 1949 रोजी खुद्द पंतप्रधान नेहरूंनी मांडलेल्या प्रस्तावावर व्यक्त केलेली मते विचारात घ्यावयास हवीत. डॉ. पंजाबराव म्हणाले, ‘24 वे कलम खाजगी मालमत्तेचे धड रक्षणही करत नाही किंवा ती जप्त करण्याचा सरकारला अधिकारही देत नाही. देशातली सर्व जमीन, खाणी व तत्सम नैसर्गिक साधनसंपत्ती खाजगी व्यक्तीच्या मालकीची राहू न देता ती सरकारच्या मालकीची असावी असा लोकमताचा कल वाढतो आहे. आपण याबाबत सावध दृष्टिकोण स्वीकारावा असे मला वाटते. लवकरच किंवा कालांतराने भारतात खाजगी मालकीची जमीन अस्तित्वात असणार नाही असा माझा विश्वास आहे.’ (प्रत्यक्षात पंजाबरावांचे भाकीत इतिहासाने चुकीचे ठरवले असून, भारतातील काही खाजगी मालमत्ताधारक अब्जाधीश झाले असल्याचे 2008 साली दिसते.) ‘खाजगी मालमत्तेचे रक्षण करावयाचे की याबद्दलचा मूलभूत अधिकार रद्द करावयाचा याबद्दल माझ्या समाजवादी मित्रांच्या कल्पनाही स्पष्ट नाहीत. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
24 व्या कलमातील पहिले पोटकलम पुढीलप्रमाणे आहे : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
‘कायद्याचा प्राधिकार असल्याखेरीज कोणाही व्यक्तीची खाजगी मालमत्ता हिरावून घेता येणार नाही.’ जवाहरलाल नेहरूंच्या प्रस्तावातील 2 ते 6 क्रमांकांची पोटकलमे स्वीकारू नयेत. त्याऐवजी पुढील एका वाक्याची भर घालावी : ‘संसदेला वेळोवेळी कायदा करून मालमत्ताविषयक अधिकार निश्चित करण्याची मुभा असावी.’ प्रा. के. टी. शहा आणि हरिभाऊ कामथ यांनी ‘मालमत्ता चोर्या करून, दरोडे घालून, लोकांना फसवून संपादन केलेली असते.’ हे फ्रेंच विचारवंताचे मत उद्धृत केले होते. त्याचा डॉ. पंजाबरावांनी उल्लेख केला तरी ते मालमत्तेच्या अधिकाराकडे नैतिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहत नव्हते. 1949 साली भारताला आर्थिक पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत होते. अशा स्थितीत भांडवलदारांची आणि प्रचंड मालमत्ता असलेल्या व्यक्तींची मनधरणी करण्याखेरीज गत्यंतर नव्हते असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले. ‘वर्हाड प्रांतातील दोन-तृतीयांशाहून अधिक जमीन सावकारांच्या मालकीची होती. जमिनीचे फेरवाटप करण्यासंबंधी वाढता दबाव येत राहील. अशा स्थितीत खाजगी मालमत्ते-विषयीचे तपशिलवार वर्णन करण्याची कामगिरी संसदेवर सोपवणे अधिक चांगले ठरेल असे मला वाटते. धार्मिक कारणासाठी स्थापन झालेल्या विश्वस्त संस्थांच्या मालकीच्या मालमत्तेचे संपादन करताना नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नचा उद्भवत नाही. राष्ट्रहितासाठी त्यांच्या मालमत्तेचा लवकरात लवकर उपयोग करणे हितकारक ठरेल.’ (10 सप्टेंबर 1949 ; पृ. 1230-1232)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील भारतातील तरतुदींवरील चर्चा : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मसुद्यातील 14 ए या भागात भाषांविषयीच्या तरतुदी आहेत. त्यावर तीन दिवस चाललेल्या चर्चेने संविधान-सभेतील वादविवादांच्या वृत्तांतातील 72 पाने व्यापलेली आहेत. राष्ट्रभाषा कोणती असावी? देवनागरी लिपी स्वीकारावी काय? इंग्रजीचे स्थान काय राहील? उच्च व सर्वोच्च न्यायालयातील कामकाज इंग्रजीतून चालवावे काय? यासारख्या प्रश्नांवर विशेषत: दक्षिण भारतातील सदस्यांची मते उत्तर भारतातील हिंदी भाषक प्रांतातून निवडून आलेल्या सदस्यांच्या मतापेक्षा वेगळी होती. सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी उभयपक्षी तडजोड घडवून आणणे आवश्यक होते. मसुदा-समितीच्या सदस्यांनीही एकमताने सूत्र (फार्म्यूला) सुचवले नव्हते. आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले संख्यांक (न्युमेरल्स) भारताने स्वीकारावेत का? की देवनागरी लिपीमुळे आणि संस्कृत भाषेमुळे रुढ झालेले संख्यांक स्वीकारावेत? याबद्दल कडाक्याची चर्चा झाली. पुरुषोत्तमदास टंडन हे आंतरराष्ट्रीय संख्यांक स्वीकारू नयेत या मताचे पुरस्कर्ते होते. आपल्या या मताला केवळ हिंदी भाषक प्रांतांचाच पाठिंबा नसून बंगाल, महाराष्ट्र यासारख्या अहिंदी प्रदेशांचा विरोध नसल्याचे टंडनजींनी सांगताच शंकरराव देव, हेमचंद्र खांडेकर या सदस्यांनी महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय संख्यांक स्वीकारण्यास विरोध असल्याचे सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख म्हणाले, घ्घ्मीही महाराष्ट्रीय आहे आणि महाराष्ट्रीय हे आंतरराष्ट्रीय संख्यांक स्वीकारणार नाहीत.’ (14 सप्टेंबर 1949; पृ. 1447) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संविधानाचे हिंदीत तसेच अन्य प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचा प्रश्न : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
17 सप्टेंबर 1949 रोजी क. मा. मुन्शी यांनी 26 जानेवारी 1950 पूर्वी संविधनाचे हिंदीत तसेच अन्य प्रमुख भारतीय भाषांमध्ये भाषांतर करवून घेऊन ती भाषांतरे प्रकाशीत करावीत असा ठराव मांडला. त्यावर बोलताना डॉ. पंजाबराव म्हणाले, ‘ही जबाबदार भारताच्या राष्ट्रपतीवर सोपवण्यापेक्षा सभेच्या अध्यक्षावर सोपवावी.’खरे म्हणजे मुन्शींना संविधानसभेचे अध्यक्ष अभिप्रेत होते. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आल्यावर भारताच्या राष्ट्रपतींचा अंमल सुरू होणार होता. आपण संविधासभेचे अध्यक्षपद आणि राष्ट्रपतिपद यांची गल्लत केल्याचे लक्षात येताच पंजाबरावांनी तात्काळ चुक दुरुस्त केली. संविधानाचे भाषांतर करताना मुख्यत: संस्कृत भाषेचा आधार घ्यावा आणि इंग्रजीतील संविधानामधल्या कळींच्या संज्ञांसाठी नवे शब्द बनवणे अशक्य असल्यास त्यासाठीही संस्कृत भाषेचाच आश्रय घ्यावा असे पंजाबरावांनी सुचवले. पंधरा वर्षानंतर हिंदी हीच अधिकृतरित्या सरकाराचीही भाषा होईल. उच्च न्यायालयांसकट सर्व न्यायालयांचे कामकाज हिंदीतून व्हावे आणि त्यात संविधानाची इंग्रजी संहिता प्रमाण न मानता तिचे हिंदी भाषांतर प्रमाण मानावे, अशा महत्त्वाच्या सूचना पंजाबरावांनी केल्या (17 सप्टेंबर 1949; पृ. 1623-1924)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संविधान तयार करण्यात होणार्या विलंबाबद्दलची पत्रकारांची टीका :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संविधानसभेचे कामकाज अडीच वर्षे चालले असूनही ते काम पुरे झालेले नाही आणि त्यासाठी फार खर्च केला जात आहे, अशी टीका वृत्तपत्रे करीत होती. ही टीका भांडवलदारांच्या मालकीच्या वृत्तपत्रांतील अडाणी पत्रकार करीत असल्याचे पंजाबरावांनी मत व्यक्त केले : ‘आपण संविधान तयार करण्यासाठी जेवढा वेळ खर्च करावयास हवा होता तेवढा वेळ दिलेला नसल्यामुळे संविधानात दोष राहिले आहेत. ते काढून टाकण्यासाठी मांडलेल्या दुरुस्तीसूचना साध्या बहुमताने पारित झाल्या तरी पुरेसे समजावे.’ (17 सप्टेंबर, 1949; 1644-16) (अपूर्ण लेख)</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
- य. दि. फडके, महाराष्ट्रातील सुप्रसिद्घ विचारवंत व साहित्यिक मुंबई</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-34225624254994196732014-12-21T07:56:00.001-08:002014-12-27T20:27:04.967-08:00भाऊसाहेबांना आम्ही समजून घेतले पाहिजे - अॅड. अरूणभाऊ शेळके -मुलाखत__प्रा. कुमार बोबडे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच उभा ठाकलेला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचा गंभीर प्रश्न. यशस्वीपणे त्याची सोडवणूक. इतकेच नव्हे तर नवीन अकरा वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळणे. वैद्यकीय महाविद्यालयाचा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या दिशेने प्रवास सुरु होणे. संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासात्मक व गुणात्मक परिवर्तन घडून येणे. गेल्या चार वर्षात 95 कोटींची कामे करुन विविध शाळा-महाविद्यालयांचे स्वरूप बदलणे. अकोला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्ता व संशोधन वाढून आर्थिक स्थिती मजबूत होणे. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुद्रा महाराष्ट्राची हा संदर्भग्रंथ प्रसिद्घ करून एक बौद्घिक संपदा सर्व महाराष्ट्राला उपलब्ध करून देणे. सिंहावलोकन परिषदेचे आयोजन करून विदर्भ व अमरावती विभागाच्या शिक्षण, कृषी, आरोग्य, सिंचन अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणणे. संस्थेला एक गुणात्मक व विकासात्मक चेहरा प्राप्त करुन दिल्याबद्दल इंडियन लिडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवांकित होणे. संस्थेचा या कार्यासाठी महाराष्ट्र निर्माता पुरस्काराने सन्मान होणे, या सार्या पार्श्वभूमिवर भाऊसाहेब, संस्था आणि विकास या मुद्यांवर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुणभाऊ शेळके यांचेशी ही मनमोकळी बातचित.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या महामानवाने हिमालयासारखे उत्तुंग कार्य करून ठेवले. तो एक विशिष्ट ध्येय घेऊन पेटलेला माणूस होता. त्यांचं ज्ञान, उद्दिष्ट आणि त्यांची दूरदृष्टी ही थक्क करणारी आहे. ‘माझ्या नंतरच्या सातपिढ्या मॅट्रीक झाल्या तरी माझं काम झालं.’ असं ते म्हणायचे. त्यांच्या पुण्याईने या संस्थेतल्या दुसर्या तिसर्या पिढ्याच उच्चशिक्षित झाल्या. आज आपल्याजवळ गुणवंतांची कमी नाही पण भाऊसाहेबांची त्याग, समर्पणाची भावना अंगी बाळगण्यासाठी आम्ही भाऊसाहेबांना समजून घेतलं पाहिजे असे विचार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुणभाऊ शेळके यांनी व्यक्त केले.</div>
<div style="text-align: justify;">
अॅड. अरुणभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनात ‘शिवसंस्था’ हे संस्थेचे त्रैमासिक सुरु होत असून त्यानिमित्त त्यांनी एका अनौपचारिक गप्पात आपले मन मोकळे केले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : आपण भाऊसाहेबांना प्रथम कधी पाहिले?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : आठव्या वर्गात असताना त्यावेळी मी रामतीर्थला शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा वाढता जोर. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला वेगळाच रंग आलेला. बाबासाहेब सांगळूदकर संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते. आणि केरळचे माजी राज्यपाल मा. रा. सु. गवई हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यामुळे दर्यापूर तालुक्यात वेगळीच धुम होती. अशातच लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले भाऊसाहेब रामतिर्थला प्रचारा आले. माझे वडील बाबासाहेब सांगळूदकरांच्या गटाचे. त्यामुळे तेही गवईच्या प्रचारात. पण भाऊसाहेब गावात आले त्यावेळी राजकारण आणि मैत्री यातला फरक माझ्या लक्षात आला. बाबासाहेब सांगळूदकर आणि माझे वडील निवणुकीत भाऊसाहेबांच्या विरोधात होते पण त्यांचे प्रेम मात्र भाऊसाहेबांसोबत होते. आजचे राजकारण आणि तेव्हाचे राजकारण यात प्रचंड फरक झाला असून राजकारणात प्रेमाची भावनाच संपली आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : भाऊसाहेबांच्या मोठेपणाची जाणीव केव्हा झाली?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : भाऊसाहेबांच्या शाळेत नोकरीला लागलो तेव्हा विज्ञान शाखेत पदवी संपादन केल्यानंतर गणिताचा शिक्षक म्हणून मी 1969 मध्ये श्री शिवाजी हायस्कूल स्टेशन ब्रँचला रुजू झालो. भाऊसाहेबांनी झोपडपट्टीसारख्या वस्तीत उभारलेली ही तटट्यांची शाळा हळूहळू पक्क्या इमारतीत रूपांतरीत होत होती आणि हे सारे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून घडत होते. यातूनच भाऊसाहेबांचे मोठेपण कळले. मग मीही जीव ओतून कामाला लागलो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : भाऊसाहेबां व्यतिरिक्त आणखी कोणाच्या व्यक्तित्वाचा प्रभाव आपल्यावर पडला?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : अर्थातच गाडगेबाबांचा. गाडगेबाबांचं मला खूप आकर्षण होतं. पगार न घेता ते गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन लोकांना समाजशिक्षण देतात, मग आपण का नाही. नियमित शाळेत शिकविण्या व्यतिरिक्त मी नापास विद्यार्थ्यांची एक विशेष बॅच तयार केली आणि त्यांना गणित शिकवू लागलो. जे विद्यार्थी आधी नापास झाले होते. ते डिस्टींक्शन घेऊन उत्तीर्ण झाले. गाडगेबाबा म्हणायचे, घ्घ्भाऊसाहेबांनी बॅरिस्टरी न करता तटटयाची शाळा काढून स्वत:ला समाजाच्या शिक्षणासाठी वाहून घेतले, तुम्हीही काही करा.’ खरे तर गाडगेबाबांमुळेच भाऊसाहेब आपल्याला अधिक कळले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : म्हणजे भाऊसाहेब आणि गाडगेबाबा खर्या अर्थाने मूल्यशिक्षण देत होते, पण ते आजच्या शिक्षणात आहे काय?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : भाऊसाहेब व गाडगेबाबा जे मूल्यशिक्षण देत होते, ते आजच्या शिक्षणात अजिबात नाही. आज पुस्तकातून मूल्यशिक्षणाचे धडे देण्यात येतात, पण कृतीतून नाही. त्यामुळे ते मूल्यहीन ठरते. गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्त्व कळले होते. मूल्यशिक्षणाची एक दशसूत्रीच त्यांनी समाजाल दिली. विदेशातून बॅरिस्टरची पदवी घेऊन आलेले भाऊसाहेब खोर्याने पैसा कमवू शकले असते पण वकिली न करता ते बहूजन शेतकरी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत फिरू लागले. शाळा उभारण्यासाठी झोळी हातात घेतली. सामाजिक मूल्यांची प्रत्यक्ष कृतीतून रूजवणूक केली. समाजाला असे शिक्षण देण्यासाठी पुन्हा गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भाऊसाहेबांपर्यंत जायला पाहिजे. आपण केवळ त्यांचे नाव विद्यापीठाला देतो. विचार मात्र देत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : संस्थेने आज बरीच प्रगती केली आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पण संस्थेचा अपेक्षित विकास झाला, असे वाटते काय?</div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : विकास झाला नाही असे नाही विकास झाला शेवटी अधिकाधिक विकास व्हावा असे प्रत्येकालाच वाटत असते. मी 1992 मध्ये संस्थेत पदाधिकारी हो तो. त्यावेळी सर्व जिल्ह्यात अभियांत्रीकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मी दिला होता. तो मंजूर झाला असता तर संस्था कुठल्या कुठे गेली असती. मेडिकलचा पैसा मेडिकलमध्येच लावता असता तर वीस वर्षात हे महाविद्यालय खूप पुढे गेले असते आणि यातून संस्थेचा अधिक विकास झाला असता. आजही विकासाला व विस्ताराला खूप मोठा वाव आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : भाऊसाहेबांच्या स्वप्नपूर्तीबद्दल काय ?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : खेर तर हा खूप गंभीर प्रश्न आहे. भाऊसाहेबांच्या स्वप्नांची पूर्ती झाली नाही असे नाही. कारण भाऊसाहेबांनी संस्थेची उभारणीच त्यादृष्टीने केली होती. कास्तकार शिकला पाहिजे, असे भाऊसाहेबांचे स्वप्न होते. आज शेतकर्यांची मुले मोठ्या प्रमाणावर शिक्षित झाली आहेत आणि होत आहेत. शिक्षण खेड्यापर्यंत पोहोचले. आज जिल्ह्याची जी मोठी साक्षरता आहे त्याची मुळे भाऊसाहेबांच्या कृतीत आहे. शेतकरी व्यापारात फार मोठी मजल मारू शकला नसला तरी तो लहान-मोठ्या व्यापारात आला आहे. गावाच्या आर्थिक विकासात तो सहभागी झाला आहे. कृषी विद्यापीठाचे व कृषी महाविद्यालयाचे संशोधन गावोगावी पोहचत आहे. सिंचनाची फारशी उपलब्धता नसली तरी अधिक उत्पादनासाठी शेतकरी नव नवीन बियाण्यांचा व तंत्रज्ञानाचा उपयोग घेतो आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सुरू झाल्या आहेत. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाची सवो ही ग्रामीण भागात पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : गेल्या चार वर्षात संस्थेत बराच विकास झाला आहे. तेव्हा या विकासाबद्दल आपण समाधानी आहात काय?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : म्हणजे विकास झाला आहे हे आपण मान्य करता. निश्चित विकास झाला आहेच पण त्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतो आहोत त्या प्रयत्नांचा रिझल्ट मात्र आपल्या अपेक्षे इतका मिळत नाही. अर्थात हे होतच असते जे मिळते त्यापेक्षा आपण अधिक अपेक्षा करीत असतो. प्रेम, सहानुभूती आणि नि:स्वार्थ भावनेने संस्था चालली पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. धाक, दपटशा या मार्गांपेक्षा हा मार्ग चांगला आहे. संस्थेचं अध्यक्षपद हे विक्रमादित्याचं सिंहासन आहे. भाऊसाहेब, ओशो, गाडगेबाबा आणि सत्येदवबाबा यांच्या विचारातून ते सांभाळण्याचं बळ आपल्याला मिळालं आहे. त्यामुळे संकटांची आणि आव्हानांची भीती वाटत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : संस्थेच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी आपल्या काही योजना?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : भरपूर योजना आहेत. काळ बदलला आहे. येणार्या काळाच्या बदलाची पावले आजच दिसू लागली आहेत. अशावेळी भाऊसाहेबांच्या समर्पित भावनेविषयी नितांत आदर ठेवत आपल्याला पुढे जावे लागणार आहे. यासाठी अनेक उपक्रम सुरु करावे लागतील. नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि व्यवसाय प्रबंधन महाविद्यालय सुरु करणे, आय. ए. एस. ऍकेडमीची स्थापना करणे, पोलीस आणि मिल्ट्री ट्रेनिंग सेंटर सुरू करणे, आदि प्रस्ताव आहेत. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने अनेक उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आपल्या कार्यपद्घतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रश्न : संस्थेचे कार्य समाजापर्यंत पोहाचावे, शिक्षण विषयक जनजागृती व्हावी म्हणून भाऊसाहेबांनी 'शिवाजी' पत्रिका सुरू केली होती. आता 'शिवसंस्था' या नावाने आपण त्रैमासिक सुरू करता आहात. या त्रैमासिकाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उत्तर : हे त्रैमासिक खर्या अर्थाने भाऊसाहेबांच्या विचारांची मुखपत्रिका ठरावी. समाजाला वैचारिक व कृतिशील विचार यातून मिळावे. शिक्षण कृषी क्षेत्रातील नवनव्या संशोधनाची व प्रयोगाची ओळख व्हावी. विशेष म्हणजे भाऊसाहेबांच्या विचारांना ती पूर्णपणे वाहिलेली असावी. हे विचार घरोघरी पोहचविण्याचे कार्य 'शिवसंस्था' या त्रैमासिकाने केले तर हा उपक्रम सार्थ ठरेल.</div>
<div style="text-align: justify;">
__________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
- प्रा. कुमार बोबडे, विभागप्रमुख, जनसंवाद विभाग, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-31946784384205165282014-12-21T07:53:00.003-08:002014-12-27T20:27:54.025-08:00कृतिशील व्यक्तिमत्त्व___प्रा. डी. एम. कानडजे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
पापळ गावी श्यामराव बापू आणि राधाबाई यांचे पोटी दिनांक 27 डिसेंबर 1998 रोजी एक विदर्भरत्न जन्माला आले, ते म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख. काबाडकष्ट करून प्रसंगी अर्धपोटी व उपाशी रहाून पंजाबरावाचे प्राथमिक शिक्षण त्यांचे आई-वडिलांनी पापळ येथेच पूर्ण केले. मुलानं खूप शिकावं, मोठं व्हावं आणि आईवडिलांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे देशाचे पांग फेडावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांचे आईवडील उराशी बाळगून होते.</div>
<div style="text-align: justify;">
राधाबाईने फाटका संसार नेटका करून अत्यंत काटकसरीने पंजाबचे माध्यमिक शिक्षण कारंजा लाड येथे पूर्ण केले. विशेष करून त्यांनी पंजाबरावांच्या प्रकृतीची आणि शिक्षणाची काळजी घेतली. त्यांचेवर सुसंस्कार केले. डॉ. पंजाबराव देशमुख एक तीव्र संवेदनशील व्यक्तिमत्व होते. गरिबांविषयी त्यांचे मनात कणव होती. याची प्रचिती खालील उदाहरणावरून येते. एकदा प्राथमिक शाळेत शिकताना त्यांचा वर्गमित्र सोबत होता. ते दोघेजण रस्त्याने पायी चालत शाळेत जात होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मित्राच्या अंगात सदरा नव्हता, त्याच्या अंगाला चटके बसत होते. ही गोष्ट पंजाबरावांना लगेच खटकली. त्यांचे संवेदनशील मन एकदम गहिवरून आले. त्यांनी स्वत:च्या अंगातील सदरा काढून त्या गरीब मित्राला दिला. त्या गरीब मित्राला देवदर्शन झाल्यासारखे वाटले.</div>
<div style="text-align: justify;">
पंजाबरावांचे आईवडील देखील सात्विक, प्रेमळ, संवेदनशील, सहिष्णू, परोपकारी आणि वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. शुद्घ बिजापोटी ! फळे रसाळ गोमटी ! या उक्ती प्रमाणे त्यांचे जिवितकार्य ठरले. ते इतिहासात अमर ठरले आहे. कितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी चालेल; परंतु पंजाबरावाचे उच्च शिक्षण थांबवायचे नाही, ही जिद्द आई-वडिल मनाशी बाळगून होते. त्या दिशेने वाटचाल करून स्वत:ची शेती गहाण ठेवून 21 ऑगस्ट 1920 रोजी पंजाबरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना केले. पंजाबरावांनी उच्च शिक्षण घेत असताना विविध शिष्यवृत्त्यांचा अभ्यास केला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांना आर्थिक मदतीशिवाय पर्याय नव्हता. व्हॅन्स डनलॉप संस्कृत स्कॉलरशीप मिळविण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यात त्यांना यश प्राप्त झाले. यावेळी त्यांना कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्राची आठवण झाली. कमवा आणि शिका हा विद्यार्थ्यांसाठी दिलेला संदेश होता. यातून होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. शिष्यवृत्ती प्राप्तीचा आनंद अवर्णनीय आणि अविस्मरणीय होता. तेथील वृत्तपत्रांनी या घटनेची नोंद घेऊन पंजाबरावांचा यथोचित सन्मान केला. हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नव्हता तर तो भारताचा सन्मान होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये असे वाटते.</div>
<div style="text-align: justify;">
इंग्लंडला शिक्षण घेत असताना पंजाबरावांनी तेथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विशेष करून कृषीक्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास केला. महत्वाच्या नोंदी घेऊन अनुभवांची गाठोडी मोठी केली. विलायतेमधील ऐश्वर्य संपन्न जीवन जर भारतात आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे त्यांचे मत बनले. तेथील सुशिक्षित शेतकर्यांचे जीवन जवळून अनुभवले ते प्रत्यक्ष भारतात केव्हा साकार करता येईल याची वाट पाहू लागले. एडीनबर्ग विश्वविद्यालयात पंजाबरावांचा नावलौकिक होता, खरोखरच पंजाबरावांच्या बुद्घीची धार तेज होती. बॅरिस्टर अॅट लॉ ही पदवी त्यांनी संपादित केली. वैदिक धर्माचा वाङमयातील उदय आणि विकास या विषयावर त्यांनी पीएच. डी. संपादन केली. इ.स. 1926 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख मायदेशी परतले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि मायदेशाची सेवा ह्या दोन प्रेरणा मायदेशी परतताना सोबत आणल्या होत्या. भारतात त्या प्रत्यक्ष कृतीत आणावयाच्या होत्या. भारतात येऊन ऐश्वर्यसंपन्न जीवन जगायचे नाही, तर समाजाची सेवा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी धडपडायचे आणि शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यात झोपडीपर्यंत पोचविणे आपले आद्यकर्तव्य आहे, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.</div>
<div style="text-align: justify;">
केंब्रीजला असताना त्यांची गाठ एकदा सुभाषचंद्र बोस यांचेशी पडली, तेव्हा ते आय.सी. एस. ची परीक्षा देत होते. सुभाषचंद्र बोसांनी घरी पाठविण्यासाठी लिहलेले पत्र डॉ. पंजाबरावांना वाचायल मिळाले. पत्रातील मजकूर असा होता- मी आय. सी. एस. पदवीचा उपयोग मान-सन्मान आणि पैसा कमविण्यासाठी करणार नाही तर माझ्या मयभूला स्वतंत्र करण्यासाठी करेन. या विचाराने भाऊसाहेब प्रभावित झाले आणि त्याचवेळी खर्या अर्थाने समाजक्रांतीची मुहूर्तमेढ राजर्षी शाहू महाराजांनी रोवली. पुढे हेच कार्य नेटाने चालविण्याचे व्रत डॉ. पंजाबराव देशमुखांनी घेतले. पंजाबराव अवघे सत्तावीस वर्षांचे असताना त्यांना तत्वज्ञानाचे महापंडित ही उपाधी प्राप्त झाली. खरोखरच डॉ. पंजाबराव देशमुख हे एक कृतिशील समाजसुधारक होते. </div>
<div style="text-align: justify;">
भारतात आल्यानंतर वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्याचे प्रथम कार्य हाती घेतले. त्यासाठी वकिली सुरू करून पैसे मिळविले. बहुजनांना त्यांनी कमी खर्चात न्याय मिळवून दिला. मी जरी बॅरिस्टर झालो असतो तरी माझा एकट्याचा काय उपयोग? माझेसारखे अनेक बॅरिस्टर तयार झाले पाहिजेत. माझा विलायतेचा अनुभव हेच सांगतो की, आपल्या रक्ताचा एकेक थेंब, एकेक करण बहुजनांच्या अभ्युदयाकरीता खर्ची करीत रहा. ज्ञानयज्ञ अखंड चालू दे. विद्यामृतानेच विद्यार्थ्यात आणि विशेष करून विदर्भात नवचैतन्य निर्माण होईल. असे त्यांनी हेरले होते.</div>
<div style="text-align: justify;">
महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा अनेक समाजसुधारकांनी शिक्षणालाच विशेष प्राधान्य दिले होते. या सर्वांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विचारसरणींचा पगडा डॉ. पंजाबराव देशमुखांवर पडला होता. इकडे बुलडाणा जिल्ह्यात दलितमित्र, समाजभूषण पंढरीनाथ पाटीलांनी समाजकार्याला वाहून घेतले होते. तसेच आनंदराव मेघे, श्यामरावजी गुंड, आप्पासाहेब देशमुख आणि लक्ष्मणराव भटकर या आणि अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजात जनजागृती करण्याचा विडा उचलला होता. पंढरीनाथ पाटलांनी डॉ. पंजाबराव देशमुखांना सहकार्य करण्याचे कबूल केले. डॉ. पंजाबरावांनी शिक्षणाची विशेष जबाबदारी पंढरीनाथ पाटलांवर टाकली आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारली. त्यावेळी विदर्भात बोटांवर मोजता येतील एवढ्या कमी शाळा होत्या. अशा शाळेत केवळ गर्भश्रीमंत आणि भांडवलदारांचीच मुले शाळेत जात असत. तालुक्याच्या ठिकाणीच शाळा असल्यामुळे गोरगरीबांच्या आणि मागासलेल्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा अशा मुलांच्या शिक्षणासाठी सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुखांनी अमरावती येथे श्रद्घानंद छात्रालय स्थापन केले. या कामासाठी त्यांना आबासाहेब खेडेकर, नानासाहेब मोहोड, मारोतराव कदम, दलपतसिंग चव्हाण आदी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.</div>
<div style="text-align: justify;">
श्रद्घानंद छात्रालयात सर्व जाती-धर्मांची मुले एकत्र येऊन शिक्षण घेतात, जेवतात, हे पाहून संत गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुखांची तोंड भरून स्तुती केली आणि त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. अमरावती येथे त्यांनी आणखी एक शाळा स्थापन के ली, ती म्हणजे श्री शिवाजी मराठा हायस्कूल होय. त्यामुळे बहूजनांच्या मुलांना शिकण्याची अधिकच सोय झाली. तिलाच अनेकजण तट्टा हायस्कूल म्हणून निवू लागले. तिला समाजकंटकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. पंजाबरावांनी त्याकडे विशेष लक्ष देऊन तिचे संरक्षण केले. तिचे 1 जुलै 1932 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती असे नामकरण केले. या ज्ञानगंगेचा उगम अमरावती येथे झाला असला तरी ती ज्ञानगंगा तिच्या वैशिष्ट्याने वाहत जाऊन मोठी झाली. आज ती विशाल वटवृक्षासारखी फोफावली आहे.</div>
<div style="text-align: justify;">
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा उद्देश फार मोठा असल्यामुळे तिच्यात छोट्यामोठ्या शिक्षण संस्था नदीसारख्या येऊन मिळाल्यात. बेरार एज्युकेशन संस्था या शिवगंगेत सामील झाली. अनेक कार्यकर्ते नि:स्वार्थी भावनेने आणि त्यागी वृत्तीने संस्थेच्या विकासासाठी झटू लागलेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले होते की, डॉ. पंजाबरावांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा वृक्ष लावून तो सर्वदूर फोफावला त्याची मधुरफळे गोरगरीबांच्या सर्वजातीधर्माच्या मुलांना प्राप्त करून दिलीत. हे कार्य फार मोलाचे आहे. त्यास तोड नाही.</div>
<div style="text-align: justify;">
शाळेला इमारत नाही, पुरेसा पैसा उपलब्ध नाही, ब्रिटीश सरकार मदत करीत नाही. अशा वेळी पुढे कसे जायचे? याबाबतीत भाऊसाहेब सतत विचार करीत असे. त्यातून मार्ग शोधीत, अशा वेळी संस्थेसाठी मित्रांकडून आणि शत्रूंकडून देखील पैसा मिळवित असे. प्रसंगी स्वत:चा बंगला गहाण ठेवून संस्थेच्या कामात खंड पडू दिला नाही. अमरावती येथे एक भव्य इमारत उभी केली. निजामापासून दोन लाख रूपये देणगी मिळविली. रंकापासून रावांपर्यंत, अधिकार्यापासून शिपायापर्यंत मदत घेतली. परंतु शिक्षणाच्या आणि इमारतीच्या कार्यात रूकावट येऊ दिली नाही. श्री शिवाजी शिक्षण संस्था उभारणीत अण्णासाहेब पडोळे, बाबासाहेब धारफळकर, मामासाहेब लोंढे, डॉ. आबासाहेब खेडेकर, बी. एम. देशमुख, कानफाडे गुरुजी, पंढरीनाथ पाटील अशा मोठमोठ्या व्यक्तींचे योगदान आहे.</div>
<div style="text-align: justify;">
गुणग्राहकता, संघटन कौशल्य, गोरगरिबांविषयी आत्मीयता आणि नि:स्वार्थ सेवाभावी वृत्ती ही डॉ. पंजाबराव देशमुखांची गुणविशेष होय. शिवाजी शिक्षण संस्थेचा आज आढावा घेतला तर या संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, अध्यापक आणि कृषी महाविद्यालये, कला, वाणिज्य, विज्ञान, शारीरिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण व विधी महाविद्यालय अशा एकूण 277 शिक्षण संस्था आज कार्यरत आहेत. शिक्षणाच्या समाजिकरणात या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. बुलडाणा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यात या संस्थेच्या सर्व शिक्षण संस्था नावलौकिक मिळवत असून सामान्यजनांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी अत्यल्प दरात उपलब्ध करून देत आहेत ही एक अभिमानाची बाब आहे.</div>
<div style="text-align: justify;">
27 डिसेंबर रोजी कर्मवरी, शिक्षणमहर्षी, कृषिरत्न आणि बहुजनांचे कैवारी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला आहे. त्यांचे चरणी विनम्र अभिवादन !</div>
<div style="text-align: justify;">
________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
प्रा. डी. एम. कानडजे, श्री शिवाजी महाविद्यालय, चिखली, जि. बुलडाणा फोन 8275231874</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-86959213788108240872014-12-21T07:50:00.002-08:002014-12-27T20:28:21.827-08:00बहुजनांचा भाग्यविधाता__प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आयुष्याच्या क्षितिजावरती मावळणारा सूर्य जर उद्याची पहाट घेऊन उगवणारा असेल तर त्याच्या पहिल्याच किरणा मला श्री शिवाजी संस्थेच्या उत्कर्षाचा सोनेरी उष:काल दिसतो. सूर्याचं तेजही फिकं पडाव असं स्वयंप्रकाशित, क्रांतिकारी, परिवर्तनशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख. वैभवशाली, समृद्घ कृषीप्रधान देशाचे स्वप्न पाहणार्या लोकनेत्याचं विचारसामर्थ्य शब्दबद्घ करणं शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारे, सामान्या माणसाला सकारात्मक प्रेरणा देणारे, शेतकर्याला बळ देणारे, चिंतनशील, निरपेक्ष नेतृत्व, मातीशी इमान राखणारं दातृत्व, भूमीपुत्रात चैतन्य निर्माण करणार कर्तृत्व पाहिलं की अभिमानाने मान ताठ होते. नि:स्वार्थ लोकसेवेमुळे विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या या महामानवाच्या कार्यकर्तत्वाचा सुगंध प्रत्येकाच्या अंतरंगात चंदनाप्रमाणे दरवळत आहे. समाजसेवेची बाग फुलवण्याचे सामर्थ्य त्यांच्या कार्यात आहे. आज विकासाचं बीज याच महामानवाच्या विचारानं मशागत केलेल्या जमिनीत पेरलं आहे.</div>
<div style="text-align: justify;">
सामाजिक जाणिवेची धग उराला लागली की मनुष्य माणूस होतो आणि आपली सामाजिक जबाबदारी ओळखून समाजकल्याणासाठी सिद्घ होतो. त्याचे जगणे व्यक्ती आणि कुटुंबाच्या पलिकडे जाते. म्हणूनच भाऊसाहेबांचे विचार आजही क्रांतिकारी वाटतात. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्थित्यंतरे झाली. सुधारणा झाल्या. मध्यवर्हाड प्रांतामध्ये 1930-33 कालखंडात भाऊसाहेबांनी मांडलेले कर्जलवाद बील, देवस्थान संपत्ती बिल, शेतकर्यांचा चौदा कलमी कार्यक्रम ठराव लोकसभेत पारित करून अंमलात आणले असते तर हे तीनही मार्ग अज्ञान, बेकारी, निरक्षरता, भ्रष्टाचार, शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी होते. कृषीप्रधान भारत देशाला महासत्ता बनवण्याचा दुर्दम्य आशावाद भाऊसाहेबांच्या कार्याचं वेगळेपणं सांगतो.</div>
<div style="text-align: justify;">
ह्याच विचारांची आणि कृतीची आज गरज आहे. कारण संविधानात्मक लाभान्वित शोषित व शासकवर्गाला जनकल्याणाची जाणीव, जबाबदारीचा विसर पडलेला दिसतो. लोकशाहीचा वापर स्व-विकासासाठी होत असल्याने, नेतृत्वाच्या भावनेला गळफास लावल्या जात आहे. भारतात संविधान लागू होऊन सहा दशकांपेक्षा जास्त काळ लोटला परंतु आजही अधोगती, अवनतीने समाज जीर्ण होतोय, जातीयवाद पोसला जातोय. भ्रष्टाचार राखला जातोय, शेतकरी मारल्या जातोय, गरीब गाडल्या जातोय. गरीब-श्रीमंतीची दरी वाढलीय म्हणून पुन्हा तुम्हा-आम्हाला अखंड निद्रेतून चाललेल्या प्रवासात खंडित करण्याची ताकद भाऊसाहेबांच्या विचारात आहे.</div>
<div style="text-align: justify;">
बहुजन समाजाच्या उत्थानाची जाणीव व बांधीलकी असल्याने त्यांनी संघटनात्मक, संस्थात्मक पातळीवर लोकजागृती व लोक चळवळ उभारली. समर्पित भावनेने धेय्याकडे झेपावत कार्य पूर्णत्वास नेले. यामुळे भाऊसाहेबांच्या प्रतिनिधित्वाची भावना, जाणीव व संकल्प आजही प्रभावीपणे कार्यरत राहून जिवंत आहेत. म्हणूनच जयंतीदिनाचे औचित्य साधून जनकल्याणाच्या प्रेरणेने भाऊसाहेबांच्या कार्याचं पुन:स्मरण करणं शिवपरिवार आपलं कर्तव्य समजतो.</div>
<div style="text-align: justify;">
शिक्षणाने क्रांती होते, नव्या जगात झेपावण्याच सामर्थ्य निर्माण होतं. स्वत:चं जग घडवता येतं असा विश्र्वास सर्व स्तरावर रुजवणारे भाऊसाहेब ह्या भूमीचे शिक्षणमहर्षी आणि कृषिरत्न ठरले. बालवयापासून संघर्षमय आयुष्य जगलेल्या, दु:ख-दारिद्र्याने गांजलेल्या, कर्जाच्या भाराखाली वाकलेल्या, अज्ञानात खितपत पडलेल्या दीन दुबळ्या माणसांच्या मोडलेल्या कण्याला त्यांनी ताकद दिली. विषमतेची, अज्ञानाची कारणे शोधली. अंत:शक्तीचा संपूर्ण आविष्कार करण्यासाठी अपार कष्ट घेतले. शिक्षणसेवेच्या माध्यमातून अंत:करणावर संस्कार करणारा माणुसकीचा धर्म दिला. परिस्थितीपुढे न झुकता जागतिक पटलावर वशाची मोहोर उमटविली. भाऊसाहेबांच्या वाटचालीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा, साधलेल्या परिणामांचा लेखाजोखा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासात्मक वाटचालीतून प्रत्ययाला येत आहे. कालचे भाऊसाहेब आजचे चिरंजीव, यशवंत, आदर्श आहेत. त्यांचे नि:स्वार्थ कार्य आज वैभवाने डोलत आहे.</div>
<div style="text-align: justify;">
मानसशास्त्राच्या प्रणेत्यांपैकी एक असणार्या विल्यम जेम्स यांनी म्हटलयं ‘माझ्या पिढीची सर्वात मोठी क्रांती म्हणजे माणसाला मनोवृत्ती बदलून आयुष्यात बदल घडवता येतो याची समज येणं.’ अशा विचारांनी प्रेरित होऊन सत्ता, संपत्ती, पद, समाजमान्यता यापैकी कसलेही पाठबळ नसताना महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक पातळीवर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी क्षेत्रात स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. विदर्भाच्या कुशीत वसलेल्या कर्मभूमीत पापळसारख्या छोट्या खेड्यातला भाऊ, भारतीय समाजकारण, राजकारणातला, घ्भाऊसाहेबङ झाला. शोषित, पीडित, दलित, रुढीग्रस्त समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्यभर झटला. प्रत्येक शेतकर्याच्या घरात सामर्थ्यशाली माणूस निर्माण करण्याची दुर्दम्य आकांक्षा मनी बाळगून श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. नवी उमेद दिली. बदल घडवून आणण्याची संधी दिली. संधी अधिक कर्तृत्व म्णजे गुणवत्ता असते. संधी मिळाल्यानंतर कर्तृत्व गाजवले पाहिजे यात मुळीच शंका नाही. पण ज्यांना संधीच मिळत नाही, त्यांनी कर्तृत्व कसे गाजवावे? हे जाणल्यामुळे समाजप्रबोधनातून विदर्भात विकासाचे मार्ग विस्तृत होऊ लागले. शेकडो वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्घा वाईट चालीरितींना फाटा देऊन सर्वांना समान पातळीवर आणून समाजक्रांती घडवून आणली.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे आयुष्य एक खडतर प्रवास ज्यामध्ये कधी उत्तुंग शिखरे तर कधी खोलदर्या तरी अपयश पचवण्याची ताकद ठेवून यश मिळवण्याची चिकाटी, कौशल्य अनुकरणीय आहे. चाकोरीबाहेर पडून समाजकल्याणासाठी अनेक अडथळे पार करीत गुण माणसांना एकत्र आणून सहकार, शिक्षण, शेती आणि शेतकरी या क्षेत्रात खंबीरपणे कार्य केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, भारत कृषक समाज नवी दिल्ली ह्या संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष म्हणून कृषक नेता पालनहार ठरला. ही गरुड भरारी क्रियाशील कर्तृत्व ठरले. अखंड परिश्रम, घरावर तुळशीपत्र स्व-सुखाच्या समिधा समर्पित करणारे जीवन बहुजनांचे उद्घारक ठरले.</div>
<div style="text-align: justify;">
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रुपानं भाऊसाहेबांनी शिक्षणाचं शस्त्र हाती दिलं आणि प्रगतीचे अशोकचक्र वेगाने फिरू लागले. बौद्घिक, वैचारिक खतपाणी घालून मेंदूची शेती केली. नव्या पिढीला आकार दिला. विकासाची बाग फुलवली. अविवेकाचं, असहकाराचं, अनितीचं तण उपटलं. समतेने निराधारांना आश्रय दिला. साहित्यिक म्हणून लेखनातून राष्ट्रकार्य केले. संशोधनवृत्तीने समाजाच्या घरसत्या नीतिमूल्यांबद्दल परखडपणे विचार मांडले. सांस्कृतिक मूल्ये जोपासली. उभ्या आयुष्याची शिदोरी गरिबांच्या चरणी समर्पित केली. क्रांतीसूर्याप्रमाणे आपल्या कार्याची प्रखरता अधिक तेजोमय झाली. वर्हाडच्या भूमीत शिक्षणाची बीजे पेरली. शैक्षणिक विकासासाठी राजर्षी शाहू महाराज, हैदराबादचा निजाम, प्रिन्स ऑफ बेरार, मध्यप्रदेशचे प्रशासक हेन्री गीरफिल्ड इ. अनेक दानशूर व्यक्तिंकडून आर्थिक सहकार्य मिळवले.</div>
<div style="text-align: justify;">
श्री शिवाजी शिक्षण संस्थेस अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यापैकी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, विद्यमान राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नावे विशेषत्वाने नमूद कराविशी वाटते.</div>
<div style="text-align: justify;">
पंडित जवाहरलाल नेहरू भाऊसाहेबांच्या वक्तव्याबद्दल विचार करीत, कारण मुलभूत हक्काच्या मसुद्यावरील त्यांचे भाषण चिंतन करण्यासारखे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊसाहेबांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. घटना समितीत समारोपाच्या वेळी दिलेल्या भाषणात गौरव करताना ते म्हणाले, ‘डॉ. पंजाबराव देशमुखांसारखे टीकाकार घटना समितीत नसते तर घटना समिती केवळ मुक्या बहिर्यांची झाली असती. तो एक कळसुत्री देखावा ठरला असता, आणि आज जे घटनेला स्वरूप प्राप्त झाले ते झाले नसते.’ </div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जीवनपट उलगडतांना आपणच कुठंतरी कमी पडतोय ही जाणीव मनात उमटते. कळतं पण वळत नाही. धावतो सवयीनं, जगण्यासाठी, स्वत:साठी, जिंकण्यासाठी पण आतला प्रेरक आवाज ऐकू येत नाही. भाऊसाहेबांसारखी स्वप्न उघड्या डोळ्यांना पडत नाही, पंख असून बळ येत नाही, आकाश आपलं पण झेप घेत नाही. भाऊसाहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं करत नाही...</div>
<div style="text-align: justify;">
मग उगवतो 27 डिसेंबर. जन्मदिन... नैराश्येच्या अंधारात उत्कर्षाचा दिवा बनून. सोनेरी किरणांनी ही विदर्भभूमी पुन्हा उजळते. भाऊसाहेबांची पावलं जिथं रुजली ती माती जगण्याचा धर्म सांगते, यशाचे मर्म जाणते. पुन्हा शिवपरिवाराचं अखंडीत रूप आपलं वाटू लागतं. एकजुटीनं आव्हाने पेलण्यास मनगटात बळ येतं. पावलांची गती वाढते, विझलेले दिप उजळतात, लढण्याच बळ येतं पुन्हा भाऊसाहेब भेटतात. नव्या जाणिवा फुलतात प्रचंड त्यागातून मिळवलेलं भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखणं समजतं. समाजव्यवस्थेत, सामाजिक ज्ञान लक्षात घेऊन, समाजपरिवर्तनाची कामगिरी उमगते ध्येय असेल तर कष्टाला पर्याय नाही हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सक्सेसचा पासवर्ड सापडतो. कितीही संकट आली तरी नाऊमेद व्हायचं नाही हा धागा गवसतो.</div>
<div style="text-align: justify;">
सारं जग सक्सेस फ्रेंडली वाटू लागतं आजवर कुणी विचारलं नाही पण उद्या कधी विचारलच... तुम्हारे पास क्या है?... तर ! भाऊसाहेबांनी दिलेल्या स्वप्नांशिवाय खरंच आपल्याकडे काय आहे? संत तुकोबाराय म्हणतात, </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
चंदनाच्या वासे । तरु चंदन जाले स्पर्शे॥ </div>
<div style="text-align: justify;">
अशा नवसृष्टीच्या भाग्यविधात्यास मानाचा मुजरा </div>
<div style="text-align: justify;">
________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
- डॉ. स्मिता देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-21963088810070716112014-12-21T07:48:00.001-08:002014-12-27T20:29:13.546-08:00कृषिरत्नाकडून भारतरत्नाकडे !__प्राचार्य सुधाकार मोहोड<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
भारतातील अग्रगण्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती 2008 मध्ये आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे. 1931-32 साली अमरावती येथे श्री शिवसंस्थेची स्थापना झाली. संस्थेचे स्थापना वर्ष म्हणजे क्रांतिज्योति सावित्रीबाई यांची जन्मशताब्दीची क्रांतिप्रभा जोतीराव, सावित्रीबाई म्हणजे भारतीय शिक्षणक्रांतीचे क्रांतिदूत. आज शिवसंस्था आपल्या अमृत महोत्सवाकडून नजीकच्या शताब्दीकडे वाटचाल करण्याच्या भव्य योजना राबवण्याची तयारी करत क्रांतिबळ संघटित करत आहे. संस्था संस्थान न बनता आपले चिरंजीवित्व प्राप्त करणार ! </div>
<div style="text-align: justify;">
शिवसंस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी समाजपरिवर्तन, व्यवस्थापरिवर्तन आणि मूल्यपरिवर्तन करण्यासाठी शिवसंस्था स्थापन केली. कृषिरत्न डॉ. भाऊसाहेब आपल्या जीवनकार्यातून भारतरत्नाकडे जाणार ! आजच्या 107 कोटींच्या भारतात किमान शंभर भारतरत्न हवेत. विविध क्षेत्रांतून मानवता क्रांती करणारे ग्रामीण धुरंधर भारतरत्न पदवी द्बारे का सन्मानित करू नयेत? 1901 पासून नोबेल पुरस्कार द्बारे जसे जागतिक स्तरावरील प्रज्ञावंत गौरवान्वित करण्यात आले तसे भारतातही आसेतु हिमाचल शिक्षण, सहकार, कायदा, कृषी आदी क्षेत्रांत अद्बितीय कार्यकर्ते भारतरत्न द्बारे समाजापुढे का आणू नयेत? खंडप्राय भारतात स्वातंत्र्यानंतर कुठल्याच क्षेत्रात विषमता दिसू नये हे 21 वे शतक.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
युगप्रवाह । युगप्रज्ञा । :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
युगपुरुषांना आपल्या आधीचे युगपुरुष जाणून घेऊनच आपल्या नंतरचे युगपुरुष आणि वारसदार यांच्या विचारांची, संस्था-संघटनांची चिरंजीवी रचना निर्माण करावी लागते. हाच वैश्विक संस्कृति-सभ्यतांच्या उदयास्तांचा निष्कर्ष आणि सारांश आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख आदींनी युगतत्व ओळखूनच आपले वारसदार लढाऊ आणि संघटित बनवलेत. त्यांच्या अष्टपैलू, कार्यातून निद्रिस्त समाजाचे डोळे उघडलेत. ज्ञानविज्ञान नेत्रांद्बारे समाजाचे बहिरंग आणि अंतरंग ढवळून काढले. क्रांतिकारी नवयुगाची नांदी त्यांना घातली. एकोणविसाव्या शतकातील भारतीय आणि जागतिक समाज यांत खूप अंतर आहे. माणसांना आणि व्यवस्थेला नवपैलू पडले. मानसिकता बदलली.</div>
<div style="text-align: justify;">
कृषिरत्न डॉ. पंजाबरावांनी सुधारक (Reformer) क्रांतिकारक (Revolution) आणि बंडखोर (Rebel) अशा तीन भूमिकांतून आपले जीवनकार्य उभारले. शिक्षणमहर्षि डॉ. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व, कार्यकर्तृत्व आणि क्रांति तत्वज्ञान यांतून साकारले. क्रांतीनंतर प्रतिक्रांति असे युगचक्र सतत सुरू राहते ! म्हणून क्रांती कधी संपत नाही. नवनव्या वास्तवाला समजून घेत नवनव्या मार्गांनी युगक्रांतिचक्र पुढे पुढे न्यावे लागते. क्रांतीला विश्रांती नसते ! ज्ञानविज्ञानाला झोप नसते ! थांबला तो संपला ! जागला तो तरला ! शोषक संघटनांना आणि साम्राज्यांना अमरत्व नसते ! इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळलाच ! गुलामगिरी संपली आणि स्वातंत्र्याचा सूर्योदय घडला. उदवास्तांची कारणे असतातच. आज भारताची 107 कोटी लोकसंख्या आणि जगाची 650 कोटी जनसंख्या विश्वक्रांतीची व विश्वशांतीची भुकेली आहे. भाकरीला ज्ञानाची आणि ज्ञानाला भाकरीची भूक असतेच ! मानवी मने, मेंदू आणि मनगटे प्रज्ञा, प्रतिभा, पराक्रमाद्बारे समाजभूक मिटवण्यासाठीच क्रांतिध्वजा हाती येतात. मानवी समाज एक विचित्र दिग्विजयी रसायन आहे ! उत्पत्ती, स्थिती आणि लय, हा युगनियम आहे ! सृजन आणि संहार, विकास आणि विनाश, जीवन आणि मरण यांना सामोरे जातच जननेतृत्वाला आपले जीवनकार्य चिरंजीवी करण्यासाठी मार्ग शोधावे लागतात. औद्योगिक क्रांती, राज्यक्रांती, कम्युनिस्ट क्रांती, दोन विश्वयुद्घे अभ्यासूनच विश्वस्वातंत्र्याच्या चळवळी आणि आंदोलने साकारली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संस्था आणि संस्थापक : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एकोणिसाव्या शतकात जागतिक व्यवस्था-परिवर्तनाच्या तीन महान घटना घडल्या. अ. साम्यवादाचा 1848 जाहीरनामा (कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) कार्ल मार्क्स, ब. पुणे येथील दलित मुलींची शाळा (1848) महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा शैक्षणिक जाहीरनामा आणि मॉस्को येथील आपल्या फार्म मध्ये लिओ टॉलस्टॉय युद्घ आणि शांती (वॉर ऍन्ड पीस) ग्रंथाचा (कादंबरी) महान लेखन याने उघडलेले फार्म स्कूल (1849) जगातील शेतकर्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उघडलेली पहिली शाळा : शेतकरी शिक्षणाचा जाहीरनामा । या तीन जाहीरनाम्यांनी आधुनिक युगातील भांडवलशाही आणि ब्राम्हणशाही यांच्या गुलामगिरीतून जगाला सोडवणारी जनआंदोलने आणि चळवळी संपूर्ण जगामध्ये सुरू झाल्या. जोपर्यंत शेतकर्यांच्या मुलांना, दलित मुलींना आणि किसान-कामगारांना शिकवले जात नाही तोपर्यंत त्यांनी चौफेर गुलामगिरी, असह्य दारिद्र्य आणि अमानुष सनातनी मूल्यवस्था ढासळून नवे युग निर्माण होणार नाही, याची जाणीव जगाला झाली. साम्यवादाचे जगाला किंटरगार्टन शिक्षणप्रणाली आणि आर्थिक सामाजिक नियोजन या दोन देणग्या दिल्या. उपरोक्त तीनही जाहीरनाम्यांचा निष्कर्ष आणि सारांश म्हणजे शेतकरी, कामगार, दलित, स्त्रीवर्ग शिक्षणाविना स्वातंत्र्य, समृद्घी, समता उपभोगु शकत नाहीत. मार्क्स, फुले, टॉलस्टॉय यांनी जागतिक स्तरावरील दलित वर्गाला ओळखून शतपैलू स्वातंत्र्याचा क्रांतिमार्ग जगापुढे ठेवला. या क्रांतिसंस्था, हे क्रांति-उत्क्रांतीचे संस्थापक विचार-आचार-प्रचार घेऊन विसाव्या शतकात आले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विसावे शतक-दोन महायुद्घे:</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विसाव्या शतकातील दोन विश्वमहायुद्घांनी जगाला क्रांतीची समरभूमी बनवून क्रांतिदीक्षा दिली. विसावे शतक संपूर्ण जगासाठी स्वातंत्र्याचे शतक बनले. ब्रिटिश साम्राज्यासह सर्व लहानमोठी साम्राज्ये जगातील नकाशातून नष्ट झाली. स्वतंत्र राष्ट्रे उदयाला आली. डॉ. पंजाबरावांच्या तारुण्यात भारतात आणि इंग्लंडमध्ये नवनवी मन्वंतरे साकारायला लागली. दास्य, दारिद्र्य, अस्पृश्यता, शोषण, काळे-गोरे, स्त्री-पुरूष सर्वांनाच स्वातंत्र्य, समृद्घी, समता हवी होती. सर्वांनीच शस्त्रे आणि शास्त्रे हाती घेतली ! बंदुका, बॉम्ब, ग्रंथ, लेखण्या, खडू-फळा, कला आणि शास्त्रे समाजाची शस्त्र बनली. विसावे शतक नरसंहारातून नवसृजनाकडे वळले. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबरावांनी लंडनमध्ये लोकशाहीचा आणि लोकसमृद्घीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. ज्ञानविज्ञान घेऊन लोकशिक्षणासाठी भारतीय रणांगणात उतरला ! संस्कृत पंडित क्रांतिपंडित बनला. संस्कृत पंडितांची ही ज्ञानविज्ञान-क्रांती सनातनी महापंडित उघड्या डोळ्यांनी पाहत होते ! पंजाबरावांचे सूर्यतेज परंपरावाद्यांच्या डोळ्यात मावत नव्हते. प्रतिक्रांतीचे महापंडित भारतात ठायी ठायी विरोधाला उभे झाले ! स्वजनांच्या लढाईसाठीच डॉ. पंजाबराव प्रतिज्ञाबद्घ बनले. पेशवाईचे अवशेष थरथरायला लागले ! वेद वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास (The Origin and Development of Religion in Vedic Literature) गाईडच्या आदेशाने अपूर्ण ग्रंथालाच D. Phil पदवी प्रदान करण्यात आली. जगातील विविध धर्मांमधील व्याख्यांचा उहापोह करीत ऑक्सफोर्ड-पंडित डॉ. पंजाबरावांनी आपली धर्माची व्याख्या पा.क्र. 18 वर मांडली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
A Religion is a social institution, having a set of principles, doctrines, beliefs and practices and certain more or less imperative rules of conduct which are in accordance with those principles, doctrines and beliefs and which aims at furtherin human happiness. समाजकल्याण म्हणजेच सुखमय, प्रगतीशील धर्मजीवन.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पंजाबराव भारतात परतले : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1925 साली डॉ. पंजाबराव मायदेशी परतले. देशाचे दुश्मन खटला विनामूल्य चालवून दिनकरराव जवळकरांवा पूर्ण यश मिळवून दिले. 1926 साली श्रद्घानंद वसतिगृहातील मुलांनी भरीव योगदान दिले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री. वा. मो. दादासाहेब काळमेघ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष (कै.) हे याच श्रद्घानंद वसतिगृहातून शिकले. विविध क्षेत्रातील मान्यवरांची निर्मिती येथेच झाली. डॉ. पंजाबराव was moving fast व्यायाम शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात व्यायाम शिक्षकाची नेमणूक करण्याबाबत पंजाबरावांनीच खेळक्रांती घडवली. खेळांना (Sports) शिक्षणाचा अविभाज्य आणि अटळ भाग भाऊंनी मानला. मराठा शिक्षण संस्थेची स्थापना करून या मार्शल रेस ला भाऊसाहेबांनी (सोशल रेस) विशाल रणभूमीवर उतरवले. अस्पृश्यता निवारणात आणि चातुवर्ण्य विरोधात हा सेनानी अग्रेसर बनला. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. सब के लिए खुला है मंदीर यह हमारा ही राष्ट्रसंत ग्रामगीतकार तुकडोजी महाराजांची हाक त्यांनी पूर्वीच ऐकली ! ग्रामनाथासाठीच वर्हाड शेतकरी संघाची स्थापना केली. 26 नोव्हेंबर 1927 ला सुवर्ण समाजातील कु. विमल वैद्य, मुंबई या सुविद्य युवतीशी प्रार्थना समाजाच्या पद्घतीने आंतरजातीय विवाह केला. Dearest Vimal म्हणून आपल्या जीवनात त्यांनी विमलाबाईशी पत्रव्यवहार केला! विमलाबाई विवाहानंतर बी. ए. एल. एल. बी. झाल्यात. बॅरिस्टर होऊन इंग्लंडहून परतल्यावर राणीछाप रुपयांनी भरलेली पोती घेऊन अनेक धनिकांनी आपल्या कुटुंबातील मुलींशी भाऊसाहेबांनी विवाह करावा म्हणून विनवण्या केल्या. तत्पूर्वी शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यासाठी त्यांना कुणी कपर्दिकही दिली नाही ! डॉ. भाऊसाहेबांनी धनाढ्यांना नकार दिला ! स्वत:वर कर्जाचा डोंगर असताना त्यांनी विमलबाईंना दिलेले अभिवचन पूर्ण केले. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर विमलाबाई संसद सदस्य बनल्या. चाळीस हजार रुपयांचे कर्ज असलेल्या बॅरिस्टरांची मी धर्मपत्नी बनले ! जगाला हेही कळू द्या - माझे पती जीवनावर जनसेवेतूनच सर्वोत्तम ईश्वर सेवा करीत होते. जगाला सत्य कळू द्या. आम्ही सुखी होतो. डॉ. पंजाबरावांशिवाय त्या काळात वर्हाडात काय होते ! I have no regrets, Barister Balister! -विमलबाई</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
तीन संस्था ! तीन संस्थापक !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सातार्याची रयत शिक्षण संस्था, अमरावतीची श्री शिवाजी शिक्षण संस्था (1931-32) आणि औरंगाबादची पीपल्स एज्युकेशन सोसायटी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात राजकीय स्वातंत्र्यासोबतच भारताचे शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक स्वराज्यासाठी राष्ट्रनेत्यांनी निर्माण केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीनही संस्थापक आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ होते. राजर्षि शाहू महाराजांनी तीनही संस्थापकांना स्फूती देऊन पुढे आणले. कर्मवीर भाऊराव, राजर्षि शाहू महाराजांच्या वसतिगृहातच कोल्हापूरला तयार झाले. डॉ. आंबेडकरांना शाहू महाराजांनी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून विदेशात पाठवले. आणि खामगावच्या अ. भा. मराठा शिक्षण परिषदेच्या (1920) छत्रपती शाहूंच्या विचारांनी तरुण पंजाबराव भारून गेले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वोत्कृष्ट क्रांतिग्रंथ म्हणजे राजर्षि शाहू महाराजांचे जीवनचरित्र ! अभ्यासकांच्या मते जगात 2500 वर्षात तीनच राजर्षि Philosopher Kings दिसतात. जगाचे व बुद्घ धर्माचे राजर्षि गौतम बुद्घ, भारताचे मानवतानिष्ठ राजर्षि शाहू महाराज आणि तुर्कस्थानचे राजर्षि केमाल पाशा.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. भाऊसाहेबांनी विसाव्या शतकात अवतीर्ण झालेल्या तीनही शिक्षणसंस्थांचे कार्य पाहिले. आपल्या शिक्षणसंस्थेचा शंभर वर्षांचा आराखडा द्रष्टेपणाने त्यांनी आखला आणि अतिशय वेगवान विकासप्रक्रिया राबवली. आपल्या जीवनानंतर समाजाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेला एकविसाव्या शतकात नेऊन श्री शिवसंस्थेचा शताब्दी महोत्सव गाजवावा ! उपरोक्त तीनही संस्थांनी महाराष्ट्रात आणि भारतात शेकडो शिक्षणसंस्था निर्माण केल्या. इडा जावो (ब्राह्मणीझमजावो), पीडा जावो (भांडवलीशाही-सावकारशाहीला शोषणमुक्त दीक्षा मिळो) आणि भारतात बळीराजाचे राज्य येवो. अशी भावीकालातील लोकशाही भारताची लोकभावना तीनही शिक्षणसंस्थांनी आणि संस्थापकांनी सन्मानित केली. तुकारामाची इंद्रायणीत बुडवलेली अभंगगाथा या तीन क्रांतिकारी संस्थांनी वर काढून ग्रामिणांच्या-ग्रामनाथाच्या मन-मेंदू-मस्तकात पेरली. आं. रा. शिक्षणमहर्षि डॉ. भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दीनंतर येणार श्री शिवसंस्थेची शताब्दी.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
राष्ट्रपिता ! राष्ट्रसंत ! भारतीय सॉक्रेटिस !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
जिजामाता आणि शिवबा जगतगुरु तुकारामाच्या कीर्तनाला जात ! तसेच राष्ट्रनिर्माता डॉ. पंजाबराव ग्रामगीता करार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या मोझरी आश्रमात जाऊन त्यांचेशी चर्चा करीत. श्री गाडगेबाबांच्या कीर्तनातही भाऊसाहेब तल्लीनतेने या भारतीय सॉक्रेटिसचे मानवतेचे तत्वज्ञान ऐकत ! राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रामनाथाला अर्पण केली. डॉ. पंजाबरावांनी कृषक क्रांती ग्रामनाथाला समर्पित केली. कम्युनिस्ट मॉक ऑफ इंडिया, फुले विद्यापीठाचा कुलगुरू श्री गाडगेबाबा महाराष्ट्रातील तीनही शिक्षणसंस्थांना भेट देत, तीनही संस्थापकांशी चर्चा करत आणि वसतिगृहांना ताटे, वाट्या कपडे पोचत. विद्यामंदिरांनाच गाडगेबाबा वंदन करत ! त्यांचे शेवटचे कीर्तन (मुंबई) अमृतवाणी म्हणून पुस्तक रुपाने प्रसिद्घ आहे. हा सॉक्रेटिस भारतीय समाजाला ज्ञानविज्ञान, मानवता समजून सांगता होता ! साधुरूपाने धर्मक्रांती, शिक्षणक्रांती, अर्थक्रांती, सांस्कृतिक क्रांती करणारे गांधी, गाडगेबाबा, तुकडोजी, पंजाबराव समकालीन क्रांतिकारक होते. यांच्या आश्रमांना डॉ. पंजाबराव सवड काढून भेट देत. भारतात त्यांनी साधुक्रांतीही घडवली !</div>
<div style="text-align: justify;">
राष्ट्रनिर्मात्यांचे मूल्यमापन !</div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्यांची सेवा करणे सोपे आहे. त्यासाठी सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवी आहेत. हे तीनही गुण अंगीकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारतात या युगातला एकमेव असावा, ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवनयज्ञ चेतवला.</div>
<div style="text-align: justify;">
-राष्ट्रपिता महात्मा गांधी</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बॅ. पंजाबराव देशमुखादी टीकाकार घटना समितीत नसते तर घटना केवळ मुक्या-बहिर्यांचीच ठरली असती. ती केवळ कळसूत्री देखावा ठरला असता.’ -डॉ. आंबेडकर (घटना समितीतील समारोपीय भाषण)</div>
<div style="text-align: justify;">
It may be your interest to be our massters, But how it can be ours to be your slaves?</div>
<div style="text-align: justify;">
Thuisides</div>
<div style="text-align: justify;">
समाजशास्त्र, मानवशास्त्र राबवत डॉ. पंजाबराव समस्या सोडवित होते !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
श्री शिवाजी लोकविद्यापीठ: </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
‘अत्यंत उच्च श्रेणीच्या विद्बानांची मालिका आपल्या देशात नेहमीच तयार होत आली आहे. पण त्यामुळेच कोट्यावधी देशवासीयांची शैक्षणिक किंवा बौद्घिक पातळी मात्र उंचावली नाही... इतर विद्यापीठांना महामानव निर्माण करण्याकरता सर्व शक्ती व पैसा वेचू द्या. माझे विद्यापीठ मात्र अज्ञान, दारिद्र्य कुचंबण व घृणास्पद अवस्था यांच्या काळ्याकुट्ट अंधकारात चाचपडत पडलेल्या कोट्यावधी स्त्रीपुरुषांमधून समाजसेवक व देशभक्त निर्माण करण्याकरता झटत राहील.’ (लोकविद्यापीठासंबंधीचा प्रबंध, डॉ. पंजाबराव)</div>
<div style="text-align: justify;">
शतपैलू शिक्षणक्रांती-उत्क्रांतीसाठी भारतातील श्री शिवाजी लोकविद्यापीठ-भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ-साकार झाले. 30 डिसेंबर, 1950 रोजी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी श्री शिवाजी लोकविद्यापीठाचे उद्घाटन केले. सर्वांना शिक्षण, सर्वांना संधी ही लोकक्रांती, हे ध्येय होते. डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे पहिल्यांदा अमरावतील या निमित्ताने आगमन झाले. घ्घ्या श्री शिवाजी विद्यापीठाचे कार्य एखाद्या अक्षय वटासारखे सतत वाढते राहणार आहे. स्वतंत्र भारताला अशाच प्रकारच्या संस्थांची नितातंत आवश्यकता आहे. उद्घाटनाशी माझा संबंध येऊ शकला याबद्दल मला फार आनंद वाटला. मी ही संस्था व तिच्या सर्व शाखा यांना पूर्ण सुयश चिंतितो.’ राष्ट्रपती भवनाला शेतकरी भवन बनवणारे डॉ. राजेंद्रप्रसाद आणि कृषिप्रधान भारताला कृषकक्रांतीची शिक्षा-दीक्षा देणारे कृषिरत्न डॉ. भाऊसाहेब दोघेही लोकशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ होते. दोघांचे एकत्र येणे यात लोकस्वातंत्र्याची तळमळ होती. यानंतर 25 वर्षांनी स्वतंत्र भारतात मुक्त विद्यापीठाची चळवळ सुरु झाली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ केंद्रीय स्तरावर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मुंबई महाराष्ट्र स्तरावर निर्माण होऊन संपूर्ण भारतात मुक्त विद्यापीठे साकारली. शिक्षणमहर्षि डॉ. भाऊसाहेबांनी विसाव्या शतकातून लोकशिक्षणाला द्रष्टेपणातून एकविसाव्या शतकात पोचवले. सरकारच्या आधी समाजाला अज्ञानातून मुक्त केले.’ आपल्या परंपरागत, परंपराप्रिय व कालविंगत शिक्षण पद्घतीमुळेच आपल्यात मतभेद व विसंवाद निर्माण झाला आहे. निर्भय व आशावादी स्त्रीपुरुष, लोककला, अत्युच्च ध्येये, नीतिमत्ता असलेले लोक आपणास हवे आहेत. निरक्षरता व अज्ञान अंधश्रद्घा व भेकडपणा, अनीतिमत्ता व चारित्र्यहीनता यांतून मुक्त व्हायला हवे. जनसाधारणास सर्व सोयी श्री शिवाजी लोकविद्यापीठाद्बारा उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.’ - शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव देशमुख जिथे तिथे अविद्या तिथे तिथे उभा हा संघर्षाला । हिंदवी शैक्षणिक स्वराज्य आणले ।</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सहकारी आरे डेअरी मुंबई</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भारतातील सर्वात मोठी आणि सर्वोत्तम आरे डेअरी मुंबईच्या निसर्गरम्य क्षेत्रात सहकारी तत्वावर डॉ. भाऊसाहेबांनी सुरु केली. जागतिक दर्जाची आरे डेअरी जगात आणि भारतात गाजली. भारताच्या प्रत्येक राज्यात सहकारी क्षेत्रात दूध डेअरींची स्पर्धा लागली आणि पाच वर्षातच भारतातील दूधक्रांती आसेतु हिमाचल पोचली. दूधाचे विविध पदार्थ भारतीयांना मिळू लागले. धवलक्रांती खेड्यापाडृयातही पोचली. शेती आणि डेअरी हे जोडधंदे शेतीला उत्पादक बनवू शेतकर्यांना उत्पन्न वाढीचे तंत्र बनले. नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढली. 1960 साली अन्नधान्याबाबत भारत स्वयंपूर्ण बनला. सहकारी क्षेत्र, सहकारी बँकादी क्षेत्रापर्यंत विकसित झाले. पंचवार्षिक योजनांचा भाग बनले. राष्ट्रीय स्तरावरील सहकार क्षेत्र जागतिक स्तरापर्यंत पोचले. सहकार क्रांतीविना कृषकक्रांती निर्माण होऊ शकत नाही. कृषिरत्न डॉ. पंजाबरावांनी द्रष्टेपणाने ओळखूनच आपली पावले टाकलीत ! 1961 ला इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ कलकत्त्याच्या. भारत कृषक समाजाच्या अधिवेशनासाठी भारतात आल्या. तेव्हा महाराणी एलिझाबेथ यांची राहण्याची व्यवस्था कोठे करावी ही समस्या भारत सरकारपुढे निर्माण झाली. एलिझाबेथ महाराणीला निसर्गरम्य परिसरात राहण्याची सवय होती. डॉ. भाऊसाहेबांनी त्यांची राहण्याची समस्या सोडवली. मुंबई आरे डेअरीत भारतातील सर्वोत्तम न्युझिलंड होस्टेल्स निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीं युक्तींनी सजलेले होते. तेथे एलिझाबेथ महाराणी मुक्कामाला राहिल्या आणि डॉ. भाऊसाहेबांना त्यांनी धन्यवाद दिले ! सत्यम्शिवम्सुंदरम्हा क्रांतिमार्ग बॅ. पंजाबरावांनी जीवनभर स्वीकारला ! जय जवान, जय किसान ! </div>
<div style="text-align: justify;">
To be or not to be चे क्षण नव्हते !</div>
<div style="text-align: justify;">
Co-operation is must ! We are not prepared to sacrifie freedom and equally in the pursuit of wealth. To us the manner of producing is as much important as the product itself. Further, there is the very material consideration that all do not participate in work and, therefore, in wealth, those who are left out will constitute a social threat which might well prove the ruin of all... to an agriculture producer,... co-operation is a necesity... </div>
<div style="text-align: justify;">
- Dr. P. S. Deshmukhs Circular Letters, Volume No. XXVII, dated 5th Nov. 1955</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबरावांनी एकट्याच्याच पराक्रमाने दिल्ली जिंकली ! भाऊसाहेबांचा एकमेव चिरंजीव अनंतकुमार (बाळ)1946 ला सतराव्या वर्षी मुंबई विद्यापीठातून फर्स्ट क्लास फर्स्ट आला. Electricity Magnetism विषयात त्याला 75 (पंचाहत्तर) पैकी 77 (सत्त्याहत्तर) मार्क्स 77/75 मिळालेत देवास वरून भाऊसाहेबांचे उत्तर आले. Thope that examinees agree with you... डॉ. भाऊसाहेबांनाही अपूर्ण प्रबंधालाच त्यांच्या गाईडच्या सल्ल्याने D. Phil पदवी मिळाली. अंनतकुमारला रँग्लर मध्ये ट्रीपॉस पदवी प्राप्त झाली. श्रीमती विमलाबाई विदर्भातील प्रथम बी. ए. एलएल. बी. वकिलीणबाई ! अशी ही शिवकुटुंबाची गुणवत्ता !</div>
<div style="text-align: justify;">
MASS EDUCATION : I feel very angry whenever I find some leaders try to discourage education, because they say the standards have fallen... let the urban people withdraw their darling sons and daughters because the educational standards are not upto their expectations. For us any demand education is better than no education.</div>
<div style="text-align: justify;">
From Selected Speeches of Dr. P. S. Deshmukh (Page 296-97)</div>
<div style="text-align: justify;">
आपल्या जीवनात शिक्षणमहर्षि भाऊसाहेबांनी हजारो विद्यार्थ्यांना विकसित देशातील नावाजलेल्या विद्यापीठात सरकारी खर्चाने उच्च शिक्षणासाठी पाठवले. आज जगात त्यांचे वारसदार कीर्तिमान आहेत. विश्व कृषी प्रदर्शन, नवी दिल्ली (1959-60)</div>
<div style="text-align: justify;">
दिल्लीत मथुरा रोडला लागून शंभर एकर भूमीवर जगातील पहिले विश्व कृषि प्रदर्शन (World Agriculture Fair) भरले होते. केंद्रीय कृषि राज्यमंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांचे हे कृषिरत्न होते ! 11 डिसेंबर 1959 ते 29 फेब्रुवारी 1960 असे एकूण 92 दिवस हे प्रदर्शन सुरू होते. 35 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या. उद्घाटन भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे हस्ते झाले. उपासमारीतून मुक्तता आणि जागतिक कृषी प्रदर्शनी स्मारक व कृषक कल्याण निधीची निर्मिती यातून घडली. डिसेंबर 1963 ला एक ट्रस्ट रजिस्टर करवून घेतला बॅ. पंजाबरावांनी !</div>
<div style="text-align: justify;">
पंतप्रधान नेहरु आपल्या भाषणात म्हणाले I have to address three President today. Dr. Rajandra Parasad, the Presidnet of India, the President of America D. W. Isonhower and the President of Indian Farmers forum Dr. P. S. Deshmukh. The particular occassion for this World Agriculture Fair is of vital importance to us. It represents so many things for which we stand and for which we crave. It represents the basic industry of Indian agriculture...</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. आयसेन होवर यांनी प्रदर्शनाची, शिस्तीची प्रशंसा केली. आपण आपली सध्याची जबाबदारी संपली की परत शेतावर जाऊन शेती करणार. कृषक समाजाने कृषि प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी आपणास बोलवल्याबद्दल भारत कृषक समाजाने आपला बहुमान केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.</div>
<div style="text-align: justify;">
भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या राष्ट्रगीतांनी समारंभास सुरुवात केली. विविध देशांचे मंडप प्रदर्शनात उभारले गेले. रशियन पॅव्हेलियन भव्य होता. रशियन प्रधानमंत्री श्री ख्रुश्चेव येऊन गेले. डॉ. राजेंद्र प्रसाद उद्घाटपर भाषणात म्हणाले भारतीय शेतकर्यांनी परंपरागत कृषिपद्घतीचा त्याग करावा नि आपल्या अन्न विषयक गरजांची पूर्तता होण्याकरता अद्यावत शास्त्रीय ज्ञान व पद्घती यांचा अवलंब करून कृषि व्यवसायाचे आधुनिकीकरण करावे. जगापासून शिकावे प्रगत व्हावे.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. भाऊसाहेबांनी जगातील कृषिसंशोधन, तंत्रशास्त्र, यांत्रिकीकरण आणि कृषिमाल गुणवत्ता भारतातील शेतकरी वर्गापर्यंत या विश्व कृषि विज्ञान निष्ठा, प्रयत्नवाद शिकवला. शेतकरी क्रांतीतूनच कृषिक्रांती आणि ग्रामक्रांती करण्यासाठी विश्वज्ञान कृषक वर्गापर्यंत आणले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
तीन संत ! तीन विद्यापीठे !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अरे तीर्थक्षेत्रात देवधर्म काही नाही. डॉ. पंजाबरावाच्या मागे जा. तोच तुमचा पांडुरंग आहे. तुम्हाला शिकवलं आणि योग्य मार्गाला लावी. त्यांच्या विद्या मंदिरात जाऊन राष्ट्रकार्याला लागा ! बुवाबाजीच्या मागे धावू नका ! पंजाबराव म्हणजे तुकोबा ! - सत्यशोधक श्री गाडगेबाबा</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख कठीण परिस्थितीशी झगडलेत. मानवतेच्या विशाल दृष्टिकोणातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेने विराट विश्वरूप धारण केले. दिल्लीला विश्व कृषि प्रदर्शन भरवले. दिल्लीला त्यांना भेटण्याचा सहज योग आला. कितीतरी बॅरिस्टर्स खाटेवर पडून आपल्या जीवनातील दु:खद प्रसंग सांगताना मी पाहिले-ऐकलेत ! पण या वीर व निर्भय बॅ. पंजाबरावांचे सारेच जीवन वेगळे ! मला एकदा ते म्हणाले, महाराज, आपल्या मोझरीच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना गीते मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना म्हणायला सांगणार आहे. मला काही भजने बरी वाटतात. ती मुलांना हितकारक प्रेरणा देणारी आहेत.’ राष्ट्रसंत ग्रामगीताकार श्री तुकडोजी</div>
<div style="text-align: justify;">
‘ज्याला तुम्ही अतिशुद्र समजता त्याला मी वेद बोलायला शिकवीन. बहुजन समाज सुशिक्षित झालाच पाहिजे. सारा भारत आणि सारे जग त्यांना समजले तरच समाजपरिवर्तन घडवेल. समाजच क्रांती करतो.’ - डॉ. पंजाबराव देशमुख</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आज अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अमरावती येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अशी तीन आधुनिक संतांची तीन विद्यापीठे साकारलीत !</div>
<div style="text-align: justify;">
I do not believe in a religion or God which cannot wipe the widows tears or bring a peace of bread to orphans mouth. -स्वामी विवेकानंद</div>
<div style="text-align: justify;">
उपरोक्त व्याख्येतून डॉ. पंजाबराव Father of Orphans ठरतात. श्रद्घानंद अनाथालय, नागपूर आणि श्रद्घानंद वसतिगृह अमरावती येथील कार्यातून हाच साक्षात्कार होतो. डॉ. पंजाबरावांचे कुटुंब विशाल होते. ते विश्वकुटुंबवादी होते ! धर्मक्रांती, ज्ञानक्रांती, अर्थक्रांतिवादी होते ! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बहुजनवादी डॉ. पंजाबराव !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबरावांच्या विद्बत्ताप्रत्तुर, शास्त्रशुद्घ प्रबंधाकडे समाजाने डोळेझाक केली. धर्म म्हणजे अनंताविषयी तळमळ. अनंताची ओळख घडवणारी मनोवृत्ती-मॅक्समुलर. धर्म हा सामाजिक व नैतिक आहे. - हर्टलँड. धर्म हा सरळ उत्क्रांतिक्रमाचे फळ आहे. असे डॉ. भाऊसाहेबांनी मानले. पुरोहित वर्गाचे महत्त्व वाढताना मांत्रिक विद्येला अग्रमान मिळाला आणि भारताची धार्मिक व सामाजिक अवनती सुरु झाली. वैदिक धर्म म्हणजे मंत्रविद्या, पुरोहिती कसब (Priest Craft) आणि बलिदान वैदिक भारतीयांच्या अधोगतीचा पहिला टप्पा ऋग्वेदातून आढळतो. यजुर्वेदामधील अवस्था आणि अथर्ववेद व ब्राम्हण अधोगतीची परिसीमा ! मंत्रविद्येच्या सामर्थ्यापुढे ईश्वर वाकलाच पाहिजे.</div>
<div style="text-align: justify;">
अथर्ववेद. ब्राम्हणीझमची खरी सुरुवात ऋग्वेदापासून झाली. डॉ. पंजाबराव थोर संशोधक होते.</div>
<div style="text-align: justify;">
- प्रा. कु. ल. महाले</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख (कदम) यांचे वडील शामराव बापू देशमुख हे एक नावाजलेले उत्कृष्ट शेतकरी होते. पंजाबरावांची पापळ म्हणूनच सर्वजण पापळला ओळखत. सर्व मुलांमध्ये पंजाबराव उठून दिसत. माझा जन्म पापळचाच (1983). मी पंजाबरावापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा. पोवाड्यात पापळ म्हणजे शाहिरी नगरी!’ </div>
<div style="text-align: justify;">
-डॉ. य. खु. देशपांडे, एम. ए. एल. एल. बी., डी. लिट., शारदाश्रम, यवतमाळ</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
‘डॉ. भाऊसाहेब अनुकरणीय व्यक्तिमत्व होते. मुंबईहून विवाह करून ते अमरावतीला आले तेव्हा भाऊसाहेब, त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी विमलाबाई आणि मी एकाच डब्यातून अमरावतीला उतरलो. नवीन थाटलेल्या संसारासाठी एका बगलेत प्रायमरचा स्टोव्ह आणि हाती काही घरगुती लागणारे सामान येऊन बाजारातून येताना मी त्यांना पाहिले आहे. देशहितकारी त्यांच्या अफाट कार्याकडे मी जीवनभर पाहत होतो.’ </div>
<div style="text-align: justify;">
- बाबासाहेब खापर्डे, राजकमल चौक, अमरावती </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. भाऊसाहेबांचे राजकारण ! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, पोलादी गृहमंत्री आणि महान संघटक, सातार्याचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांनी सातार्यात एकमेव स्वत:चे सरकार (प्रती सरकार) स्थापन केले... विरोधकांनी पत्री सरकार म्हणून क्रांतिसिंहाचे अवमूल्यन केले. सरदार पटेल आणि डॉ. पंजाबरावांनी उपेंद्र मंडळाद्बारे भारतातील सर्व संस्थानिकांनी भारतीय लोकशाहीत विलीन होण्याबाबत महाप्रयत्न केले. हैद्राबाद संस्थानातील रझाकारांची दहशती समस्या पोलादी गृहमंत्र्यांनी कठोरपणे सोडवली ! मेजर जनरल जगन्नाथराव भोसले (आझाद हिंद सेना) यांची केस लाल किल्ल्यात बॅ. पंजाबरावांनीच चालवली. नेहरू मंत्रीमंडळातील कॅप्टन शहानवाझ खान रेल्वे मंत्री भाऊसाहेबांचे मित्र होते. नेताजींशी तर पंजाबरावांचे लंडनमध्ये दैनंदिन चर्चासत्र सुरू राही ! या डॉ. पंजाबरावाच्या राजकीय संबंधामुळे राजकारणात त्यांना योग्य स्थान मिळाले नाही. असामान्य कर्तृत्वाचे आणि पंतप्रधानाच्या योग्यतेचे व्यक्तिमत्व यामुळेही गांधीजींनंतर डॉ. पंजाबरावांकडे भयभीत नजरेने राजकारणी बघत होते ! राजकारण भाऊसाहेबांचे साधन होते. साध्य नव् हते. समाजकारण, कृषककारण, शिक्षणकारण ही त्यांची साध्ये होती. राजकारणाला साध्य मानणार्यांनी त्यांना दूर लोटले ! डॉ. पंजाबराव अजरामर झाले !</div>
<div style="text-align: justify;">
Dr. Deshmukh has a distinguished service to his lasting credit as an administrator and educationist and above all as an unbending patriot. - K. Kamaraj (1964)</div>
<div style="text-align: justify;">
Dr. P. S. Deshmukhs splendid record of work in the field of education, agriculture and co-operation is India treasure. Dr. Deshmukh has great qualities of leadership and he displayas them with vision, energy and enthusiasm.</div>
<div style="text-align: justify;">
- Dr. C. D. Deshumukh(1964)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भारतरत्न म्हणून गौरवावे !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुखांना एकविसाव्या शतकात तरी भारतरत्न (मरणोपरांत) देऊन गौरवावे. भारतीय शेतकरी वर्गाची ही मागणी आहे. शेतकरी वर्गाच्या समृद्घीचे राष्ट्रीय धोरण राबवणे यातच लोकशाही भारताचे संवर्धन होईल. भारतीय संविधानाला समाजवादी दिशा देण्यात बॅ. पंजाबरावांचे भरीव योगदान आहे. भारतरत्न पदवीला धार्मिक, सांस्कृतिक केंद्रीकरणाकडून समाजवादी प्रजासत्ताक विकेंद्रीकरणाकडे आणावे ! 107 कोटींचा भारत आणि 60 कोटी मतदार 75 कोटी शेतकर्यांसह या भारतरत्न क्रांतीची वाट पाहत आहेत ! कृषिरत्नाकडून भारतरत्नाकडे डॉ. पंजाबरावांना नेऊन क्रांतिन्याय द्यावा ! या शांततापूर्ण मागणीकडे शेतकरी भारताच्या सरकारने प्रेमपूर्वक लक्ष द्यावे सत्यमेव जयते !</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
प्रा. सुधाकर मोहोड, से. नि. प्राध्यापक, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपुर तथा संस्था आजीवन सदस्य</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-76004242858073778842014-12-21T07:45:00.003-08:002014-12-27T20:29:43.854-08:00डॉ. भाऊसाहेबांना अभिप्रेत सहकार__अॅड. अरविंद तिडके<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
भारतातील गरीब, पिडित, शेतमजूर व शेतकरी यांच्या उत्थानाकरिता सहकार हा प्रभावी उपाय ठरू शकतो असे ठाम मत स्व. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे होते. सर्व प्रगतीच्या क्षेत्रामध्ये सहकाराची व्याप्ती नियोजनपूर्वक वाढविली पाहिजे अशी आग्रही भूमिका स्व. भाऊसाहेबांची होती आणि त्या नुरूप नियोजनामध्ये त्याचा अंतर्भाव सुद्घा करून घेतला. 1957-58 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख भारताचे केंद्रीय सहकार मंत्री असताना सहकाराला गती देण्याचे दृष्टीय पातळींवर अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले. सर्वात प्रथम कृषी मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतीला आवश्यक सुधारीत खते, बियाणे, औषधी, अवजारे मिळण्याकरीता राष्ट्रीय कृषि सहकारी खरेदी विक्री संघाची त्यांनी स्थापना केली त्यामुळे संपुर्ण देशामध्ये तालुकास्तरापर्यंत सहकाराचे जाळे निर्माण झाले. स्व. भाऊसाहेबांनी भारतीय कृषक सहकारी अधिकोषाची स्थापना केली आणि आज संपूर्ण भारतामध्ये सहकारी बँकींगचे जाळे विस्तारित झालेले आहे.</div>
<div style="text-align: justify;">
भारतातील सर्वसाधारण गरीब, पिडित, शेतमजूर व शेतकर्यांपर्यंत सहकार पोहचविण्याकरिता भाऊसाहेबांनी स्थापना केलेल्या भारत कृषक समाजातर्फे खास कार्यक्रम राबविला जातो. आज अन्नधान्याचे बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला. त्याला मुख्य कारण म्हणजे स्व. भाऊसाहेबांनी केंद्रीय कृषि व सहकार मंत्री असताना निश्चित केलेले, प्रभावीपणे राबविलेले कृषि व सहकार धोरण हे होय.</div>
<div style="text-align: justify;">
सहकार क्षेत्रातील कार्यकर्ता हा प्रामाणिक, समर्पित व संस्कारित असावा असे स्व. भाऊसाहेबांनी आग्रही प्रतिपादन असायचे. स्व. भाऊसाहेब म्हणाले, ‘राष्ट्राला तातडीने अधिकाधिक चांगलया राजकारण्यापेक्षा खर्या सहकारी कार्यकर्त्यांची व दुरदृष्टीधारकांची गरज आहे.’ </div>
<div style="text-align: justify;">
आजच्या जागतिकीकरणाअंतर्गत स्पर्धेच्या काळात प्रभावी पर्याय म्हणून सहकाराला टिकून राहावयाचे असल्यास स्व. भाऊसाहेबांच्या विचारावर आधारित त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
आपल्या देशातील गरीब व पीडित लोकांच्या उत्थानाकरिता आणि कृषी व ग्रामीण विकासाकरिता आर्थिक धोरणामध्ये सहकार या माध्यमाचा स्वीकार करण्यात आला. त्या अनुरूप देशाच्या नियोजनामध्ये सहकाराला प्राधान्य देण्यात आले. देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना वर आणण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण व कृषी विकास साधण्याच्या दृष्टीने सहकार क्षत्राने एक प्रभावी माध्यम म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. अनेक दोष-गुणांसह सहकाराचे भारतीय आर्थिक क्षेत्रामध्ये असलेले महत्वाचे स्थान सर्वमान्य आहे. सहकार तत्त्वज्ञानामध्ये लोकशाही व समाजवादी साधलेला आहे. सहकारामध्ये भांडवलशाही पुरस्कृत आत्मकेंद्रित एकाधिकारशाहीला स्थान नाही असे भाऊसाहेब मानायचे.</div>
<div style="text-align: justify;">
नवीन खुल्या आर्थिक धोरणाचा देशाच्या आर्थिक क्षेत्रावर परिणाम होणे असे अपरिहार्य तसेच सहकार क्षेत्रावर सुद्घा अटळ आहे. शिथिलीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण या आर्थिक धोरणांचा देशाच्या सार्वजनिक, खाजगी क्षेत्रांसोबतच सहकारी क्षेत्रावर सुद्घा मुलगामी परिणाम होत आहे. जगातील कोणताही देश आणि कोणतेही क्षेत्र याला अपवाद राहू शकत नाही. नियंत्रित आर्थिक व्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे, संरक्षक व्यवस्थेकडून बाजारपेठेतील मागणीप्रमाणे विकसित होणार्या अर्थव्यवस्थेत स्थित्यंतरे होत आहेत. या बदलत्या परिस्थितीमधून अनेक प्रश्न आणि आव्हाने उभी राहणार आहेत आणि त्याला सामोरे जाण्याकरिता नवीन दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
सहकारी क्षेत्र या देशातील दारिद्र्य रेषेखालील 60 टक्के पिडित लोकांशी आणि जवळपास 20 टक्के मध्यमवर्गांशी निगडित असल्याने नव्या खुल्या आर्थिक धोरणाचे सहकारी क्षेत्रावर होणारे परिणाम व आयातांची दखल संबंधित सर्वांनी गांभीर्याने घेणे काळाची गरज आहे. अन्यथा लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदानातून प्राप्त भारतीय स्वातंत्र्य धोक्यात येईल. विकास-प्रगती जेव्हा बाजारपेठी व्यवस्थेशी जोडली जाते. त्यावेळी धोरण करणार्यांनी 75 टक्के लोकांशी संबंधित सहकारी क्षेत्राचा वेगळ विचार प्राधान्याने करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रात कार्य करणार्या नेत्यांनी, पदाधिकार्यांनी, अधिकारी व कर्मचार्यांनी आणि सभासदांनी शासनाची वाट न बघता, नवीन संकल्पित धोरण निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. अशी दूरदृष्टी डॉ. भाऊसाहेबांनी सहकाराला दिली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सहकाराची सद्यस्थिती :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सहकारी चळवळीने अनेकविध क्षेत्रामध्ये प्रगतीचा फार मोठा टप्पा गाठलेला आहे. सहकारी क्षेत्र जसे दुर्बल व पिडितांचे आधारस्थान राहिले आहे. तसेच ते मध्यम वर्गियांचेही आश्रयस्थान बनलेले आहे. तसेच मानवी गरजा भागविण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता हे उच्चवर्गीयांना सुद्घा साहाय्यभूत ठरलेले आहे. कृषी पतपुरवठा, कृषी, ग्रामीण व नागरी सहकारी बँका, दुग्ध संकलन पुरवठा व प्रक्रिया सहकारी संस्था, छोटी व मोठी (सुपरबाजार) ग्राहक भांडार, गृह निर्माण सहकारी संस्था, पणन संस्था, साखर व खत कारखाने, केंद्रीय व राज्यस्तरीय शिखर संस्था, प्रशिक्षण-व्यवस्थापन-संशोधन सहकारी संस्था अशा सर्वस्तरावरील मानवी समाज समृद्घ होण्याच्या दृष्टीने सहकार क्षेत्राची व्याप्ती ही इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा व्यापक आहे, यात कोणाचेही दुमत असणे शक्य नाही. सहकारी क्षेत्राद्बारे उपलब्ध झालेल्या सेवांमुळे मानवी जीवन आणखी सुकर झालेले आहे. भारतातील आघाडीवरील राज्यांमध्ये सहकार हा सर्वस्तरावर पोहचलेला आपणास दिसेल. जी राज्ये माघारलेली/मागासलेली आहेत, कारण तेथे सहकार हा दुबळा आहे. असे चित्र आपणांस पाहावयास मिळेल. सहकारी संस्थांनी अनेकविध क्षेत्रातील व्याप्ती मान्य करीत असतानाच सहकारी संस्थांची संख्यात्मक वाढ झालेली दि सते, पण गुणात्मक वाढीबाबत, काही अपवाद वगळल्यास मात्र कमालीचा निरूत्साह आढळून येते. डॉ. भाऊसाहेबांना अभिप्रेत सहकार येण्यासाठी त्यात समर्पित नेतृत्वाची गरज आहे.</div>
<div style="text-align: justify;">
नव्या अर्थरचनेमध्ये टिकण्याच्या दृष्टीने, सहकारी संस्थांची आजची जी अवस्था व व्यवस्था आहे, त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. हा बदल सहकारी मूल्ये अबाधित राखून करावयाचा आहे. खुल्या आर्थिक धोरणामुळे निर्माण होणार्या स्पर्धामय परिस्थितीमध्ये सहकारी चळवळ सक्षमतेने उभी राहण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संघटनेकडून सखोल विचार विनिमयानंतर, सहकाराची नवीन सात तत्वे पुनर्निर्धारित करण्यात आली. भारतीय घटनेतील बंधुता, स्वातंत्र्य आणि समानता या मूलतत्त्वांवर आधारित असलेली जुनी मूलतत्वे कायम ठेवण्यात आली. खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत सक्षमतेने उभे राहण्याकरिता सहकारी संस्था ह्या स्वायत्त आणि स्वावलंबी संघटना असल्या पाहिजेत. त्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापनाचा स्वीकार केला पाहिजे आणि संस्थेचा कारभार, व्यवसाय सहकारी मूल्यांच्या व मूलतत्वांच्या आधारावर सतत अर्थक्षम राखला पाहिजे. तसेच सामाजिक उत्तरदायित्व मान्य करून समाजहित पाळण्यात दक्ष राहून समाजाच्या चिरंतन विकासासोबतच संस्थेचा चिरंजीव विकास साध्य करणे आवश्यक आहे. याकरिता स्वायत्तता आणि स्वातंत्र्य व समुदायाप्रति निष्ठा अशा दोन नवीन मूलतत्वांना मान्यता देण्यात आली आणि त्यांचा समर्थपणे पुरस्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरून जगातील संपूर्ण सहकारी चळवळीला एक आगळा वेगळा संदेश प्राप्त झाला. या पार्श्र्वभूमीकेमधून सहकारी संस्थांनी आपले धोरण निर्धारित करून वाटचाल केली तर या स्पर्धेच्या युगात सुद्घा टिकाव धरू शकेल, यात शंका नाही.</div>
<div style="text-align: justify;">
शासन अनेक आर्थिक समस्येने ग्रासलेले असल्यामुळे सहकारी संस्थांना मिळणारे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता मावळलेली आहे. विदेशी भांडवली साहाय्य असणार्या संस्थांशी जोरदार स्पर्धा करावी लागणार आहे. शासकीय संरक्षणाविना स्पर्धेला सामोरे जावे लागणार असल्यामुळे सहकारी संस्थांना आपल्या धोरणात त्यानुरूप बदल करावा लागणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव, अयोग्य वित्तीय व्यवस्थापन, अनावश्यक मनुष्यबळ विस्तार, अकार्यक्षम विपण व्यवस्था अशा अनेक कारणांमुळे बर्याच सहकारी संस्था तोट्यात आहेत. नव्या अर्थरचनेत भक्कम आर्थिक क्षमतेवर उभे राहण्याकरिता सहकारी संस्थांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
शासन अनेक आर्थिक समस्येने ग्रासलेले असल्यामुळे सहकारी संस्थांना मिळणारे आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता मावळलेली आहे. विदेशी भांडवली साहाय्य असणार्या संस्थांशी जोरदार स्पर्धा करावी लागणार आहे. शासकीय संरक्षणाविना स्पर्धेला सामोरे जावे लागणार असल्यामुळे सहकारी संस्थांना आपल्या धोरणात त्यानुरुप बदल करावा लागणार आहे. व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव, अयोग्य वित्तीय व्यवस्थापन, अनावश्यक मनुष्यबळ विस्तार, अकार्यक्षम विपणन व्यवस्था अशा अनेक कारणांमुळे बर्याच सहकारी संस्था तोट्यात आहेत. नव्या अर्थरचनेत भक्कम आर्थिक क्षमतेवर उभे राहण्याकरिता सहकारी संस्थांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
सहकारी संस्थांचा व्यवहार हा सक्षम पातळीच्यावर नेहमी असणे आवश्यक आहे. याकरिता निश्चित धोरण आखून त्याची अंमलबजावणी आणि आवश्यकतेनुसार पुनर्विलोकन करणे गरजेचे आहे. त्यानुसार नवीन व्यवसाय क्षेत्रांमध्ये प्रवेश, जुन्या व्यवसायांचा विस्तार करणे आवश्यक आहे. एखाद्या सहकारी संस्थेला व्यवसाय वृद्घीस वाव नसल्यास दुसर्या सक्षम संस्थेत विलीन होण्याकरिता निर्णय घेणे योग्य राहील. संस्थेचे पुनर्गठन हे अपरिहार्य होणार आहे. सहकारी संस्थांनी उपलब्ध साधनसामुग्रीचा पर्याप्त व काटकसरीने वापर करण्याचे धोरण अवलंबिले पाहिजे. अनावश्यक व अनुत्पादक खर्च टाळून उत्पादन क्षमतेत वाढ करणे व कमीत कमी उत्पादन खर्चाची मर्यादा गाठून सेवा व वस्तूंच्या स्पर्धात्मक किंमती ठेवण्यामध्ये यशस्वी होणे सुद्घा गरजेचे आहे.</div>
<div style="text-align: justify;">
संगणकीकरणाचा टप्प्या-टप्प्याने अवलंब करून कार्यात/सेवेत अचुकता, तत्परता, पर्याप्त उत्पादकता साधणे आवश्यक आहे. कर्मचार्यांकरिता सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. अधिकारी/पदाधिकारी यांना सुद्घा प्रशिक्षणाकरिता पाठवून धोरण निश्चिती व अंमलबजावणीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वृद्घिंगत करावा. उच्चस्तरीय व्यवस्थापनात व्यवस्थापकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींची नियुक्ती करावी. वेतन, भत्ते व व्यवस्थापकीय खर्चाचा संस्थेच्या नफ्याशी व उत्पादकांशी संबंध प्रस्थापित संस्थांना आर्थिक शिस्तीशिवाय पर्याय नाही. या देशातील दुर्बल-पीडित, शेतकरी व मध्यमवर्गीयांचे आधारस्थान असलेली सहकार चळवळ ही लोकांची चळ असल्यामुळे एक सर्वमान्य लोकाभिमुख पर्याय म्हणून समाजापुढे उभी राहील यात शंका नाही.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी सहकारी तत्त्वातून समाजाच्या अंतिम घटकाचे सामूहिक कल्याण झाले पाहिजे असा दृष्टिकोन ठेवला. आजच्या बदलत्या परिस्थितीतही डॉ. भाऊसाहेबांचे विचार अनुकरणीय आहेत. त्या काळात सहकाराचे तत्त्व त्यांनी केवळ सांगितलेच नाही तर अखिल भारतीय स्तरावर ताड-माड गुळ सहकारी संघापासून तो मधुमक्षिका पालन सहकारी संघापर्यंत अनेक संस्था स्थापन केल्या. देशाचे सहकारमंत्री असताना अनेक दुरदृष्टीचे निर्णय घेऊन सहकारी तत्त्वाला त्यांनी बळ दिले. त्यातून समाजाला बळ प्राप्त झाले. अशा अनेक या महामानवाला माझे विनम्र अभिवादन.</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
अॅड. अरविंद तिडके, माजी संचालक, दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, अकोला </div>
<div style="text-align: justify;">
माजी कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती भ्रमणध्वनी 9422808070</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-14933610410855802312014-12-21T07:43:00.002-08:002014-12-27T20:30:34.576-08:00कृषी पंढरीचे दैवत__प्राचार्य डॉ.देवानंद अतकरे/प्रा.डॉ.पंजाब पुंडकर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
कृषिप्रधान देश म्हणून भारताची स्वतंत्र ओळख आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा कणा आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा हा कृषीचा आहे. असे आम्ही मोठ्या गौरवाने सांगतो. परंतु आज कृषी व कृषकांची शोकांतिका आमच्यासमोर चिंतनाचा विषय आहे.</div>
<div style="text-align: justify;">
गेल्या दशकात विदर्भ, मराठवाड्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांनी उच्चां गाठला. काल परवाच दूरदर्शनवर आलेली बातमी जीवाला चटका लावून गेली. गेल्या पाच दिवसात विदर्भात बावीस शेतकर्यांच्या आत्महत्या. भारतीय शेतकर्यांचे दु:ख, त्यांचे आर्थिक हाल यातून हे सत्र कधी थांबणार? या त्याच्या अधोगतीला कोण जबाबदार? मूळात शेतकरी आत्महत्या का करतो? शेती तोट्यात जाते. हे एवढे एकमेव कारण त्याला असू शकत नाही. आजपर्यंत पूर्वजांनीही पारंपारिक पद्घतीने शेती केली. त्यांच्यावर ही वेळ कधीच आली नव्हती. मग आजच ही वेळ का यावी ? याची उत्तरे शोधून त्यावर अंमलबजावणी करण्याची गरज आमच्यावर आलेली आहे. नाहीतर पुढील पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही. शासनकत्यांनी सुद्घा याला शासन जबाबदार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊ नये. जेव्हा देशावर नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकटे येतात तेव्हा हाच जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या कापसाच्या बंडीवर पाच-पन्नास रूपयाची मदतनिधी देश सावरायला देतो, हे विसरता कामा नये. शेतकर्यांच्या उत्पादित मालाला योग्य किंमत मिळत नाही, व्यापार्याकडून त्याचे शोषण होते, वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे झालेत, सत तची नापिकी, वाढती महागाई, वाढणारा कर्जाचा बोजा, विजेचे भारनियमन, सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न, पारंपारिक व्यवसायाचा अस्त, खते-किटकनाशकांचा वाढता वापर, कौटुंबिक कलह, हुंड्या सारख्या प्रथा, खाजगीकरण, उदारीकरण, वाढते शहरीकरण, मुक्त अर्थव्यवस्था इत्यादी समस्यांमुळे ग्रामीण शेतकरी अंधाराच्या खाईत पडलेला आहे. त्याला प्रकाशाच्या किरणांची साथ हवी आहे. तो कृषी पंढरीचे वारकरी पांडुरंगरूपी कृषिमहर्षी डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्य व विचारानुसार चालणार्या पांथस्थाची वाटत पाहत आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्यांचे अपार दु:ख दारिद्र्य भाऊसाहेबांनी जवळून अनुभवले, अज्ञान, दारिद्र्य व्यसनांनी वेढलेल्या या समाजाला मुक्तीचा मार्ग त्यांनी सुचविला. आज त्या मार्गाची नितांत गरज आहे. भाऊसाहेबांना एकच ध्यास होता तो म्हणजे शेतकरी व शेती विकास, त्यासाठी त्यांनी विकासाचे प्रत्यक्ष कार्यक्रम शेतकर्यांना दिले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतकरी संघटन :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ग्रामीण लोकजीवनातील वेगवेगळ्या कारणांनी विखुरलेला शेतकरी हा एकसंघ करण्याचे कार्य सर्वप्रथम भाऊसाहेबांनी केले. त्यासाठी त्यांनी शेतकरी संघ स्थापन केला. आपल्याला आपला हक्क व न्याय मिळवून घ्यायचे असतील तर संघटित होणे गरजेचे आहे. हे भाऊसाहेबांनी शेतकर्यांना पटवून दिले. शेतकरी संघाविषयी भाऊसाहेबांची भूमिका स्पष्ट होती. शेतकरी मंच कुठल्याही पद्घतीने राजकीय असणार नाही. तर तो शेतकर्यांचेच प्रतिनिधित्व करणार. शेतकरी व मंच कुणा मूठभर मोठ्या शेतकर्यांच्या हाती राहू नये. तसेच तो केवळ मागण्या करणारी व मतभेदांना महत्त्व देणारीही संघटना होऊ नये तर ती स्वत:वर श्र्िवासणारी, शेतकर्यांना मदत देणारी एक सहकारी संघटना व्हावी. अशी त्यांची शेतकरी संघामागील भूमिका होती. दुर्दैवाने आज अशी ध्येय, धोरण असणारी शेतकर्यांची संघटना व संघटक नाही, परंतु असे असणे गरजेचे आहे. संघटन शक्तीशिवाय अर्थात नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मात्र तेवढेच खरे आहे. याच दरम्यान भाऊसाहेबांनी ग्रामीण भागात शेतकरी समाज निर्व्यसनी व बलशाली करण्यासाठी भारत सेवक दल स्थापन केला. शेतकर्यांच्या कल्याणाकरिता जेवढे करता येतील तेवढे प्रयोग भाऊसाहेबांनी केले. त्यातील उत्तम उदाहरण भारत कृषक समाजाचे देता येईल. भारत कृषक समाज निर्मितीमागील उद्देश असा होता की, शेतकर्यांना आधुनिक पद्घतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देणे, शेतीच्या नवनवीन प्रयोगाची माहिती देणे, कृषी प्रदर्शनी, चर्चासत्रे, संमेलने, समारंभ आयोजित करणे, राज्यातील तसेच परेदशातील शेतकर्यांना परस्पर भेटीगाठी द्बारे एकमेकांना कृषी ज्ञानाची देवाणघेवाण करता यावी. भाऊसाहेबांनी शेतकर्यांच्या उद्घारासाठी अनेक योजना राबविल्यात उदा. राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ, कृषक सहकारी अधिकोष, आफ्रो आशिया ग्रामीण पुनर्रचना संघटना, कृषी सहाय्यक संघटना, अखिल भारतीय ताडगुळ महासंघ, कृषी उत्पादकांच्या माध्यमातून त्यांनी कृषी व्यवसायाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य अलौकिक स्वरूपाचे आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बुडती हे जन देखवेना डोळा :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे भाऊसाहेब इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतलेत तेव्हा अनेक चाणाक्ष संस्थानिकांचा डोळा त्यांच्या बुद्घिमत्तेवर होता. नोकरीकरिता त्यांना निमंत्रणे आलीत. ती त्यांनी विनम्रपणे नाकारली. भाऊसाहेबांच्या डोळ्यासमोर अठराविश्र्वे दारिद्र्यात जीवन जगणारा ग्रामीण शेतकरी-कष्टकरी समाज होता. त्याच्या उन्नतीकरीता आपण झटलो पाहिजे. याच जगाच्या पोशिंद्याच्या दु:खाला वाचा फोडण्याचे भाऊसाहेबांनी मनोमन ठरविले. सत्ता हे प्रब ोधनाचे साधन आहे. साध्य नाही. याची जाणीव भाऊसाहेबांना होती. अमरावती जिल्हा कौंसिलचे अध्यक्ष असताना त्यांनी जनतेच्या हिताची बरीच कामे केली.</div>
<div style="text-align: justify;">
महात्मा ज्योतिबांनी शोधलेल्या ग्रामीण लोकजीवनाच्या दारिद्र्याचे मूळ कारण अविद्या आहे ती नाहिशी करण्याचा ध्यास भाऊसाहेबांनी घेतला. या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण ठराव केलेत. गावागावात शाळा त्यांनी उघडल्यात. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. यामागील त्यांचा उद्देश असा, भारतात गरीब शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, आणि तो निरक्षर पर्यायाने अज्ञानी आहे. त्यामुळे तो पारंपारिक शेती करतो. त्याला आधुनिक शेती-तंत्रज्ञान विषयक ज्ञान मिळावे, पुरक व्यवसायाचे महत्त्व पटावे. यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. शिक्षणामुळे त्याला चांगल्या वाईटाचा विचार करता येईल. यातून शेती व्यवस्थेत आणि शेतकर्यांच्या परिस्थितीमध्ये निश्चितच बदल होईल, यासाठी भाऊसाहेबांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. आजही कृषी तंत्रज्ञान, व्यवसाय-कौशल्य, लघु-कुटीर उद्योग निर्मितीबाबत व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
जागतिक कृषी प्रदर्शनी : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतीतून शेतकर्याला चांगला आर्थिक लाभ झाला तरच शेतकर्यांची सर्वांगीण उन्नती होऊ शकते. शेतकर्यांच्या सर्व दु:खाचे मुळ हे आर्थिक आहे. हे भाऊसाहेब ओळखून होते. त्यासाठी पारंपारिक शेती व्यवसायात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. हे येथील शेतकर्यांना पटवून देण्यासाठी भाऊसाहेबांनी दिल्लीला जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले. तेथे भारतीय शेतकर्यांना अधिक उत्पन्न देणार्या बियाण्यांची ओळख झाली. नव्या नव्या तंत्रज्ञानाची व संकरित वाणांची ओळख पटली. भाऊसाहेबांना हेच अपेक्षित होते. केंद्रिय कृषी मंत्री असताना भाऊसाहेबांनी अनेक शेतकर्यांना विदेशात कृषी व तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी पाठविले. अनेकांना त्यांनी बिजोत्पादनासाठी प्रोत्साहित केले. संकरित बियाणे येथे निर्माण होऊ लागले. पण आज दुर्दैवाने स्वत:च्या स्वार्थापायी देशी विदेशी कंपन्या येथील शेतकर्यांची लूट करीत आहेत. बदलते हवामान, ओला, कोरडा दुष्काळ इत्यादी कारणांमुळे अनेक कंपन्यांचे संकरित वाण जमिनीत पेरलेले उगवत नाही. दोनदा-तिनदा पेरणी करण्याची वेळ शेतकर्यावर येते. त्यातून येणारा कर्जबाजारीपणा, त्यातून निर्माण होणारी विमनस्कता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे केवळ आमच्या स्वार्थीवृत्तीमुळे झाले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सावकार व बँक कचाट्यातून सुटका :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1932-33 ला भाऊसाहेबांनी आणलेल्या कर्ज-लवाद कायद्यामुळे शेतकर्यांनी सावकाराकडून घेतलेल्या कर्जापोटी गहाण ठेवलेल्या शेतकर्यांच्या जमिनी शेठ सावकाराला घशात जात होत्या, त्या जमिनी या कायद्यामुळे वाचविता आल्यात. या कायद्याच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी शेतकर्यांची सुटका केली. हे अनंत उपकार शेतकरी कधीच विसरू शकणार नाही. असाच एक निर्णय भाऊसाहेबांनी 1912 च्या सुमारास स्थापन झालेल्या अमरावती सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. या संस्थेत घेतला अल्पमुदतीच्या कर्जाला दीर्घ मुदतीच्या कर्जात परिवर्तीत करून काही काळ शेतकर्यांना बँक जप्तीपासून अभय दिले. असे निर्णय येणार्या अधिकार्यांची, नेत्यांची आज गरज आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतमालाचा उत्पादित मूल्य सिद्घांत : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा. अशी आग्रही भूमिका भाऊसाहेबांची होती. कारखानदार जसा आपल्या उत्पादनाची किंमत स्वत: ठरवितो. तोच न्याय शेतकर्यालाही असावा. संपत्ती करारावरील विधेयकावर भाषण करताना भाऊसाहेबांनी शेतकर्याच्या मालाला योग्यभाव मिळावा यासाठी केलेले अर्थशास्त्रीय विवेचन पुढीलप्रमाणे आहे - शेतकर्यांनी उत्पन्न केलेल्या वस्तूचे जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते म्हणून शेतकर्याच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे हाच चलनवाढ रोखण्याचा मार्ग आहे, असे बेजबाबदार विधान काही जबाबदार व्यक्ती करताना आढळतात. पण ते योग्य नाही. वास्तविक भारतीय शेतकरी पूर्वी कधीही नव्हता इतका आज दरिद्री झाला आहे. त्याच्या हाती जो काही पैसा येतो तो सर्व अत्यावश्यक जीवन उपयोगी वस्तू खरेदी करण्यावर खर्च होऊन जातो. पुष्कळदा तर त्याला आपल्या कुटुंबाच्या सर्वसाधारण गरजा देखील भागविता येत नाही. उलट ज्यांची संख्या संपूर्ण देशात दोन हजारापेक्षाही कमी आहे अशा नवकोट नारायणाच्या हातात देशातील शेकडा 75 टक्क्यापेक्षाही अधिक संपत्ती आहे. खरे पाहता त्यांच्यामुळे देशात चलनवाढ निर्माण झाली आहे. ही अफाट संपत्ती या मुठभर लोकांच्या हातात जनतेची अधिक पिळवणूक करण्याकरिता राहू न देता जर देशाच्या औद्योगिक विकासाचे उपयोगात आणली तरी देशाची अधिक प्रगती साधून लोककल्याण होऊ शकेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अर्थशास्त्राच्या अंगाने भाऊसाहेबांनी शेतकर्यांच्या विकासाचा मूलमंत्र मांडला आहे. यातून भाऊसाहेबांचा शेती विकासाचा ध्यास दिसून येतो. आज अशा लोकनेत्याची वानवा आहे. शेतकर्याची सेवा करणे सोपे आहे. पण त्यासाठी सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवी आहेत. हे तीनही गुण अंगिकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारतात या युगातला एकमेव माणूस असावा. ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवनयज्ञ चेतविला. महात्मा गांधीजींनी सार्थ शब्दात भाऊसाहेबांचा गुणगौरव केला आहे. भाऊसाहेब म्हणजे विचार आणि विवेक यांच्या समृद्घ व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जीवनकार्याचे कृषी, शिक्षण आणि सहकार हे तीन पैलू होते. या तीनही पैलूत ग्रामीण शेतकरी, कष्टकर्यांचा विकास दडलेला आहे. हे भाऊसाहेबांना ज्ञात होते. त्यासाठीच ते आजन्म चंदनासारखे झिजलेत...</div>
<div style="text-align: justify;">
केवळ आमच्यासाठी, फक्त आमच्यासाठी</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संदर्भग्रंथ - </div>
<div style="text-align: justify;">
1. लोकमहर्षी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई</div>
<div style="text-align: justify;">
2. डॉ. पंजाबराव देशमुख जीवन कार्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, अम.</div>
<div style="text-align: justify;">
3. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विविध दर्शन (संपा.) श्री नागपुरे, श्री मोहोड, श्री कदम</div>
<div style="text-align: justify;">
________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
प्राचार्य डॉ. देवानंद अतकरे / प्रा. डॉ. पंजाब पुंडकर, महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरूड</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-63484757714723291362014-12-21T07:40:00.003-08:002014-12-27T21:00:49.035-08:00संस्था स्थापनेची पार्श्वभूमी व भाऊसाहेबांचे योगदान__एस. बी. उमाळे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठा परिषदेचे 1917 साली खामगाव येथे अधिवेशन संपन्न झाले. त्या काळात बेरार एज्युकेशन सोसायटीचे एक हायस्कूल व एक होस्टेल एवढाच विस्तार होता. अकुशल व दुरदृष्टिहीन नेतृत्वामुळे ते हायस्कूल बंद पडायच्या स्थितीत आले. तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख वर्हाड प्रांताचे कृषी व शिक्षण मंत्री होते. त्यांनी हायस्कूलला दत्तक घेऊन जीवदान दिले ते शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज संस्थेचे पहिले आश्रयदाते म्हणून संस्थेला त्यांच्या प्रति आजही आदर आहे. वरील अधिवेशनात त्यांच्या प्रेरणेने शिक्षणाविषयी जनतेत आस्था निर्माण झाली. त्यांनी या कामासाठी स्वत: दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली. इतरांनी ही या परिषदेत 25 हजार रुपयाच्या देणग्या जाहीर केल्या. बराच निधी उभा झाला. विदर्भातील बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी एक हायस्कूल काढावे अशी कल्पना या परिषदेत पुढे मांडण्यात आली. दर्यापुरचे श्री माधवराव देशमुख आणि आसेगाव चे श्री यशवंत रायभान पाटील (वाटाणे) या दोघांनी पुढाकार घेतला. यापैकी पहिले असिस्टंट कलेक्टर व दुसरे तहसिलदार पदावर कार्यरत होते. त्या दोघांनी विदर्भ मराठा शिक्षण मंडळ ही संस्था काढली व कायद्याप्रमाणे रजिस्टर करून घेतली. या मंडळामार्फत निवडक गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठा वसतीगृहे काढणे इत्यादी उपक्रम सुरू केले. वर्धा येथील 1921 मध्ये व चिखली येथे 1922 मध्ये मराठा वसतीगृहे सुरु केलीत.</div>
<div style="text-align: justify;">
या काळात विदर्भ प्रदेशात सत्यशोधक समाज आणि ब्राम्हणेतर पक्षाने बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या प्रसाराची प्रचंड मोहीम हाती घेतली. ब्राम्हणेत्तर पक्षाचा प्रभाव अधिक असल्यामुळे 1924 च्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन श्रीमती सरोजीनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होताच अखिल भारतीय ब्राह्मणेतर काँग्रेसचे अधिवेशन श्री रामस्वामी मुदलीयार यांचे अध्यक्षतेखाली फक्त एक दिवसाचे अंतराने एकाच वेळी संपन्न झाले. विदर्भातील श्री नानासाहेब अमृतकर, पंढरीनाथ पाटील, श्री आनंदस्वामी या ब्राम्हणेतर प्रतिनिधींनी ब्राम्हणेतर काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे घेऊन या अधिवेशनात आपले एक मराठा हायस्कूल उघडावे व त्यासाठी खामगाव येथील मराठा शिक्षण परिषदेत गोळा झालेला निधी हायस्कूलसाठी मिळावा अशी मागणी श्री माधवराव देशमुख व श्री यशवंतराव रायभान पाटील या दोघांनी सन 1925 च्या जुलै महिन्यात अमरावती येथे विदर्भातील बहुजन समाजाचे मराठा हायस्कूल सुरू केले.</div>
<div style="text-align: justify;">
डिसेंबर 1925 मध्ये अमरावती येथे अखिल भारतीय ब्राम्हणेतर काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरविल्या गेले. मद्रासचे मुख्यमंत्री पानगलचे राजेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली झाले. अखिल भारतीय ब्राम्हणेतर सामाजिक परिषदेचे अधिवेशन कोल्हापुरचे छत्रपती राजाराम यांचे अध्यक्षतेखाली झाले. या दोन परिषदा मोठ्या धुमधडाक्याने जंगी स्वरूपात पार पडल्या. सर्व विभाग व खात्याकडून याच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले गेले परंतु मराठा हायस्कूलने मात्र नाताळच्या सुट्या न घेता शाळा सुरू ठेवून दोन्ही परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. उलट पक्षी श्री छत्रपती राजाराम महाराजांनी देणगीची लालसा बाळगून हायस्कूलला भेट द्यावी अशी हायस्कूलच्या चालकानी विनंती केली. छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्या या विचित्र व असभ्य वर्तणुकीच्या चालकांना स्पष्ट नकार दिला. परिणामी या चालकांबद्दल जनतेत सुद्घा चिड आली. त्यामुळे या हायस्कूलला लोकाश्रय मिळू शकला नाही. थोड्याच वर्षात हे हायस्कूल डबघाईस आले, नाईलाजाने विदर्भ शिक्षण मंडळाने आमच्या जवळचा खामाव परिषदेत मिळालेला निधी संपलेला आहे सबब हे मराठा हायस्कूल आम्ही बंद करीत आहोत असे जाहिर केले.</div>
<div style="text-align: justify;">
त्यावेळी पर्याय म्हणून या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी 1931 साली मराठा हायस्कूलचे संचालन आपल्या हाती घेतले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे नामाभिधान करून तिला कायद्याने रजिस्टर केले. अमरावतीतील हीच आजची ब. उ. उ. मा. शाळा होय. या संस्थेचे 16-10-32 ते 9-4-33 पर्यंत अे. डब्ल्यू पाटील अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 10-4-33 ते 13-3-37 पर्यंत रावबहादूर तुकाराम कोल्हे संस्थेच्या अध्यक्ष पदावर होते. त्या काळात हरी आबाजी येवले मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळत होते.</div>
<div style="text-align: justify;">
1935 च्या उन्हाळ्यात या हायस्कूलचा दशवार्षिक महोत्सव अमरावती येथील इर्विन रूग्णालयाच्या पूर्वेस असलेल्या तत्कालिन मराठा हायस्कूलच्या पटांगणात मोठ्या इतमानाने व थाटाने पार पडला. डॉ. पंजाबराव देशमुखांसह विदर्भातील मान्यवर मंडळी व पूर्वीचे संचालक सुद्घा या प्रस् ांगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालिन कमिश्नर हेन्री ग्रीनफिल्ड (आय. सी. एस.) हे अध्यक्षस्थान होते. या हायस्कूलची भरभराट व्हावी या पोटतिडकीने डॉ. पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील, रावबहादूर, कोरडे व रामव देशमुख यांनी आपल्या भाषणातून इच्छा व्यक्त केली. जनतेत एक नवा उत्साह उत्पन्न झाला.</div>
<div style="text-align: justify;">
परंतु देशात आर्थिक मंदीमुळे या हायस्कूलसाठी नवा फंड गोळा होऊ शकला नाही. शिक्षकांना हे हायस्कूल चालविणे फार कठीण होऊ लागले. परिणामी बंद पडण्याच्या स्थितीत आले. अशा स्थितीत वयोवृद्घ नेते व श्री काशीराम बापू देशमुख, मोर्शीचे श्री शामराव यादवराव गुंड व पंढरीनाथ पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेची सुत्रे आपल्या हाती घ्यावीत असा आग्रह धरला. डॉ. भाऊसाहेबांनी लगेच त्या शिक्षण संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या संस्थेच्या आर्थिक चणचणीच्या काळात शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये भाऊसाहेब निर्वेतन तत्त्वावरील शिक्षक म्हणून गणित व इंग्रजी हे विषयक शिकवत असत. डॉ. पंजाबरावाच्या नेतृत्वाखाली संस्थेचा कायापालट होण्यास प्रारंभ झाला. श्री शिवाजी मराठा हायस्कूलची जबाबदारी श्री एस. व्ही. देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली. सिरसोचे राव बहादूर देशमुख हे त्यावेळी डेप्युटी सुपरिन्टेन्डेन्ट ऑफ पोलिस होते. इर्विन रुग्णालयाच्या पाठीमागे त्यांचा एक मोठा प्लॉट होता त्या प्लॉटवरच तटट्याच्या खोल्या बांधून मराठा हायस्कूल सुरू होते. त्याला तट्टा हायस्कूल म्हणत.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी जमेल तेथून, भटकंती करून निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. हैदराबादचे निजामाला इंग्रजांकडून दरसाल 35 लाख रुपयाचा विदर्भ विकासासाठी फंड मिळतो हे भाऊसाहेबांना ठाऊक होते. त्याकरिता प्रतिष्ठितांचे एक मंडळ 1938 ला हैदराबादला जाऊन आले. निजामाकडून देणगी मिळविण्याच्या मुद्यावर डॉ. भाऊसाहेबांवर संस्था परिवारात बरीच कुजबुज सुरु झाली. टिकाटिप्पणी पण खुप झाली. भाऊसाहेबांनी बोलणारांची चांगली कान उघाडणी केली व याचवेळी काशीराव देशमुख आणि शामराव गुंड यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी जबाबदारीच्या तत्वार आधारलेली नवी घटना तयार करण्याचा व डॉ. पंजाबराव भाऊसाहेबांना आजीव अध्यक्ष बनविण्याचा प्रस्ताव दोघांनी मिळून आमसभेत मंजुर करून घेतला. या शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवीन घटनेप्रमाणे डॉ. पंजाबराव 14-3-1937 ला आजीव अध्यक्ष बनले. श्री बापुसाहेब देशमुख उपाध्यक्ष आणि श्री एस. व्ही देशमुख यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. निजामाला एक मानपत्र देऊन विदर्भातील मागासवर्गीय लोकाच्या शिक्षण संस्थांना मदत देण्याची मागणी पुढे केली. परिणामी 20 हजार रूपयाची देणगी निजामसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दिली. पुढील हप्ता निजाम पुत्राच्या अमरावती भेटीत मिळू शकतो असे संकेत सुद्घा मिळाले. 1944 मध्ये निजाम पुत्राची (प्रिन्स ऑफ बेरार) अमरावती येथे संस्थेला भेट देण्याची तारीख प्रसिद्घ झाली. भाऊसाहेबांनी वर्हाड मध्यप्रांत मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन भेटीच्या तारखेच्या पहिल्या दिवशी मुद्दाम आयोजित केले. या प्रसंगी निजाम पुत्राकडून 38 हजार रुपयाची देणगी मिळाली. देणगीचा तिसरा हप्ता 2 लाख रूपयाचा देण्यात येईल अशी घोषणा सुद्घा केली. 1946 मध्ये निजामसाहेबांचे मुख्यमंत्री सर इस्माईल यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला भेट देऊन दोन लाख रूपयांची देणगी सुद्घा प्रदान केली. निजाम साहेबांच्या आर्थिक मदती इतकीच त्यावेळचे मध्यप्रदेश सरकारचे एक प्रशासक सर हेन्री ग्रीनफिल्ड यांनी संस्थेला लाखो रूपये किंमतीची 21 एकर सरकारी जमीन प्रथम अनुदान म्हणून दिली. त्यावरच श्री शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या इमारती उभ्या आहेत. अशाप्रकारे दात्यांच्या दातृत्वामुळे संस्था भरभराटीस येत आहे.</div>
<div style="text-align: justify;">
जुलै 1931 च्या श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्थापने पाठोपाठ अमरावती येथे 1947 मध्ये शिवाजी मराठा हायस्कूल, स्टेशन ब्रँच ही शिक्षणापासून वंचित असलेल्या जनतेसाठी धनराज गल्ली (हमालपुरा) मध्ये व कस्तुरबा कन्या शाळा 1-4-52 मध्ये चिचफैल परिसरात सुरु करण्यात आल्या. अतिशय बिकट परिस्थितीत संस्थेची व शाळा महाविद्यालयाची सुरुवात झाली आहे. भाऊसाहेबांच्या पुण्याईने संस्था पुढे वाढत गेली.</div>
<div style="text-align: justify;">
आज संस्थेच्या एकूण विविध भागात 73 माध्यमिक शाळा अस्तित्वात आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
एस. बी. उमाळे, झेप, गाडगेनगर, अमरावती</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-4199656073074237282014-12-21T07:36:00.002-08:002022-01-14T23:56:21.993-08:00संस्था स्थापनेची पार्श्वभूमी व भाऊसाहेबांचे योगदान__एस. बी. उमाळे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठा परिषदेचे 1917 साली खामगाव येथे अधिवेशन संपन्न झाले. त्या काळात बेरार एज्युकेशन सोसायटीचे एक हायस्कूल व एक होस्टेल एवढाच विस्तार होता. अकुशल व दुरदृष्टिहीन नेतृत्वामुळे ते हायस्कूल बंद पडायच्या स्थितीत आले. तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख वर्हाड प्रांताचे कृषी व शिक्षण मंत्री होते. त्यांनी हायस्कूलला दत्तक घेऊन जीवदान दिले ते शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज संस्थेचे पहिले आश्रयदाते म्हणून संस्थेला त्यांच्या प्रति आजही आदर आहे. वरील अधिवेशनात त्यांच्या प्रेरणेने शिक्षणाविषयी जनतेत आस्था निर्माण झाली. त्यांनी या कामासाठी स्वत: दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली. इतरांनी ही या परिषदेत 25 हजार रुपयाच्या देणग्या जाहीर केल्या. बराच निधी उभा झाला. विदर्भातील बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी एक हायस्कूल काढावे अशी कल्पना या परिषदेत पुढे मांडण्यात आली. दर्यापुरचे श्री माधवराव देशमुख आणि आसेगाव चे श्री यशवंत रायभान पाटील (वाटाणे) या दोघांनी पुढाकार घेतला. यापैकी पहिले असिस्टंट कलेक्टर व दुसरे तहसिलदार पदावर कार्यरत होते. त्या दोघांनी विदर्भ मराठा शिक्षण मंडळ ही संस्था काढली व कायद्याप्रमाणे रजिस्टर करून घेतली. या मंडळामार्फत निवडक गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठा वसतीगृहे काढणे इत्यादी उपक्रम सुरू केले. वर्धा येथील 1921 मध्ये व चिखली येथे 1922 मध्ये मराठा वसतीगृहे सुरु केलीत.</div>
<div style="text-align: justify;">
या काळात विदर्भ प्रदेशात सत्यशोधक समाज आणि ब्राम्हणेतर पक्षाने बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या प्रसाराची प्रचंड मोहीम हाती घेतली. ब्राम्हणेत्तर पक्षाचा प्रभाव अधिक असल्यामुळे 1924 च्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन श्रीमती सरोजीनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होताच अखिल भारतीय ब्राह्मणेतर काँग्रेसचे अधिवेशन श्री रामस्वामी मुदलीयार यांचे अध्यक्षतेखाली फक्त एक दिवसाचे अंतराने एकाच वेळी संपन्न झाले. विदर्भातील श्री नानासाहेब अमृतकर, पंढरीनाथ पाटील, श्री आनंदस्वामी या ब्राम्हणेतर प्रतिनिधींनी ब्राम्हणेतर काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे घेऊन या अधिवेशनात आपले एक मराठा हायस्कूल उघडावे व त्यासाठी खामगाव येथील मराठा शिक्षण परिषदेत गोळा झालेला निधी हायस्कूलसाठी मिळावा अशी मागणी श्री माधवराव देशमुख व श्री यशवंतराव रायभान पाटील या दोघांनी सन 1925 च्या जुलै महिन्यात अमरावती येथे विदर्भातील बहुजन समाजाचे मराठा हायस्कूल सुरू केले.</div>
<div style="text-align: justify;">
डिसेंबर 1925 मध्ये अमरावती येथे अखिल भारतीय ब्राम्हणेतर काँग्रेसचे दुसरे अधिवेशन भरविल्या गेले. मद्रासचे मुख्यमंत्री पानगलचे राजेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली झाले. अखिल भारतीय ब्राम्हणेतर सामाजिक परिषदेचे अधिवेशन कोल्हापुरचे छत्रपती राजाराम यांचे अध्यक्षतेखाली झाले. या दोन परिषदा मोठ्या धुमधडाक्याने जंगी स्वरूपात पार पडल्या. सर्व विभाग व खात्याकडून याच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले गेले परंतु मराठा हायस्कूलने मात्र नाताळच्या सुट्या न घेता शाळा सुरू ठेवून दोन्ही परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. उलट पक्षी श्री छत्रपती राजाराम महाराजांनी देणगीची लालसा बाळगून हायस्कूलला भेट द्यावी अशी हायस्कूलच्या चालकानी विनंती केली. छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्या या विचित्र व असभ्य वर्तणुकीच्या चालकांना स्पष्ट नकार दिला. परिणामी या चालकांबद्दल जनतेत सुद्घा चिड आली. त्यामुळे या हायस्कूलला लोकाश्रय मिळू शकला नाही. थोड्याच वर्षात हे हायस्कूल डबघाईस आले, नाईलाजाने विदर्भ शिक्षण मंडळाने आमच्या जवळचा खामाव परिषदेत मिळालेला निधी संपलेला आहे सबब हे मराठा हायस्कूल आम्ही बंद करीत आहोत असे जाहिर केले.</div>
<div style="text-align: justify;">
त्यावेळी पर्याय म्हणून या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी 1931 साली मराठा हायस्कूलचे संचालन आपल्या हाती घेतले. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे नामाभिधान करून तिला कायद्याने रजिस्टर केले. अमरावतीतील हीच आजची ब. उ. उ. मा. शाळा होय. या संस्थेचे 16-10-32 ते 9-4-33 पर्यंत अे. डब्ल्यू पाटील अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 10-4-33 ते 13-3-37 पर्यंत रावबहादूर तुकाराम कोल्हे संस्थेच्या अध्यक्ष पदावर होते. त्या काळात हरी आबाजी येवले मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळत होते.</div>
<div style="text-align: justify;">
1935 च्या उन्हाळ्यात या हायस्कूलचा दशवार्षिक महोत्सव अमरावती येथील इर्विन रूग्णालयाच्या पूर्वेस असलेल्या तत्कालिन मराठा हायस्कूलच्या पटांगणात मोठ्या इतमानाने व थाटाने पार पडला. डॉ. पंजाबराव देशमुखांसह विदर्भातील मान्यवर मंडळी व पूर्वीचे संचालक सुद्घा या प्रस् ांगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालिन कमिश्नर हेन्री ग्रीनफिल्ड (आय. सी. एस.) हे अध्यक्षस्थान होते. या हायस्कूलची भरभराट व्हावी या पोटतिडकीने डॉ. पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील, रावबहादूर, कोरडे व रामव देशमुख यांनी आपल्या भाषणातून इच्छा व्यक्त केली. जनतेत एक नवा उत्साह उत्पन्न झाला.</div>
<div style="text-align: justify;">
परंतु देशात आर्थिक मंदीमुळे या हायस्कूलसाठी नवा फंड गोळा होऊ शकला नाही. शिक्षकांना हे हायस्कूल चालविणे फार कठीण होऊ लागले. परिणामी बंद पडण्याच्या स्थितीत आले. अशा स्थितीत वयोवृद्घ नेते व श्री काशीराम बापू देशमुख, मोर्शीचे श्री शामराव यादवराव गुंड व पंढरीनाथ पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेची सुत्रे आपल्या हाती घ्यावीत असा आग्रह धरला. डॉ. भाऊसाहेबांनी लगेच त्या शिक्षण संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या संस्थेच्या आर्थिक चणचणीच्या काळात शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये भाऊसाहेब निर्वेतन तत्त्वावरील शिक्षक म्हणून गणित व इंग्रजी हे विषयक शिकवत असत. डॉ. पंजाबरावाच्या नेतृत्वाखाली संस्थेचा कायापालट होण्यास प्रारंभ झाला. श्री शिवाजी मराठा हायस्कूलची जबाबदारी श्री एस. व्ही. देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली. सिरसोचे राव बहादूर देशमुख हे त्यावेळी डेप्युटी सुपरिन्टेन्डेन्ट ऑफ पोलिस होते. इर्विन रुग्णालयाच्या पाठीमागे त्यांचा एक मोठा प्लॉट होता त्या प्लॉटवरच तटट्याच्या खोल्या बांधून मराठा हायस्कूल सुरू होते. त्याला तट्टा हायस्कूल म्हणत.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी जमेल तेथून, भटकंती करून निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. हैदराबादचे निजामाला इंग्रजांकडून दरसाल 35 लाख रुपयाचा विदर्भ विकासासाठी फंड मिळतो हे भाऊसाहेबांना ठाऊक होते. त्याकरिता प्रतिष्ठितांचे एक मंडळ 1938 ला हैदराबादला जाऊन आले. निजामाकडून देणगी मिळविण्याच्या मुद्यावर डॉ. भाऊसाहेबांवर संस्था परिवारात बरीच कुजबुज सुरु झाली. टिकाटिप्पणी पण खुप झाली. भाऊसाहेबांनी बोलणारांची चांगली कान उघाडणी केली व याचवेळी काशीराव देशमुख आणि शामराव गुंड यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी जबाबदारीच्या तत्वार आधारलेली नवी घटना तयार करण्याचा व डॉ. पंजाबराव भाऊसाहेबांना आजीव अध्यक्ष बनविण्याचा प्रस्ताव दोघांनी मिळून आमसभेत मंजुर करून घेतला. या शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवीन घटनेप्रमाणे डॉ. पंजाबराव 14-3-1937 ला आजीव अध्यक्ष बनले. श्री बापुसाहेब देशमुख उपाध्यक्ष आणि श्री एस. व्ही देशमुख यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. निजामाला एक मानपत्र देऊन विदर्भातील मागासवर्गीय लोकाच्या शिक्षण संस्थांना मदत देण्याची मागणी पुढे केली. परिणामी 20 हजार रूपयाची देणगी निजामसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला दिली. पुढील हप्ता निजाम पुत्राच्या अमरावती भेटीत मिळू शकतो असे संकेत सुद्घा मिळाले. 1944 मध्ये निजाम पुत्राची (प्रिन्स ऑफ बेरार) अमरावती येथे संस्थेला भेट देण्याची तारीख प्रसिद्घ झाली. भाऊसाहेबांनी वर्हाड मध्यप्रांत मराठा शिक्षण परिषदेचे अधिवेशन भेटीच्या तारखेच्या पहिल्या दिवशी मुद्दाम आयोजित केले. या प्रसंगी निजाम पुत्राकडून 38 हजार रुपयाची देणगी मिळाली. देणगीचा तिसरा हप्ता 2 लाख रूपयाचा देण्यात येईल अशी घोषणा सुद्घा केली. 1946 मध्ये निजामसाहेबांचे मुख्यमंत्री सर इस्माईल यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला भेट देऊन दोन लाख रूपयांची देणगी सुद्घा प्रदान केली. निजाम साहेबांच्या आर्थिक मदती इतकीच त्यावेळचे मध्यप्रदेश सरकारचे एक प्रशासक सर हेन्री ग्रीनफिल्ड यांनी संस्थेला लाखो रूपये किंमतीची 21 एकर सरकारी जमीन प्रथम अनुदान म्हणून दिली. त्यावरच श्री शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या इमारती उभ्या आहेत. अशाप्रकारे दात्यांच्या दातृत्वामुळे संस्था भरभराटीस येत आहे.</div>
<div style="text-align: justify;">
जुलै 1931 च्या श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्थापने पाठोपाठ अमरावती येथे 1947 मध्ये शिवाजी मराठा हायस्कूल, स्टेशन ब्रँच ही शिक्षणापासून वंचित असलेल्या जनतेसाठी धनराज गल्ली (हमालपुरा) मध्ये व कस्तुरबा कन्या शाळा 1-4-52 मध्ये चिचफैल परिसरात सुरु करण्यात आल्या. अतिशय बिकट परिस्थितीत संस्थेची व शाळा महाविद्यालयाची सुरुवात झाली आहे. भाऊसाहेबांच्या पुण्याईने संस्था पुढे वाढत गेली.</div>
<div style="text-align: justify;">
आज संस्थेच्या एकूण विविध भागात 73 माध्यमिक शाळा अस्तित्वात आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
एस. बी. उमाळे, झेप, गाडगेनगर, अमरावती</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-47269047698766696032014-12-21T07:34:00.001-08:002014-12-27T21:02:12.104-08:00आमचे शक्तीस्थळ__प्राचार्य श्री. एम. एम. लांजेवार<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे प्रथम दर्शन : </div>
<div style="text-align: justify;">
साधारण 1948 च्या जुलैचा दुसरा सप्ताह. प्राचार्याच्या चेंबरमध्ये भाऊसाहेबांनी मला पाचारण केल्याची वार्ता चपरशाने दिली. भितभित आत प्रवेश केला आणि डॉ पंजाबराव शामराव या लोकोत्तर महामानवाचे प्रथम दर्शन घडले. पित्याच्या मायेने, आपुलकीने त्यांनी आस्थेने माझी विचारणा केली. खासदार या नात्याने पू. भाऊसाहेब दिल्लीत कामात व्यग्र व व्यस्त असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत दि. 15-6-48 ला शिवाजी कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. ज्वालाप्रसाद आणि उपप्राचार्य एन. सी. देशमुख यांनी माझी त्या महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या प्राध्यापक पदासाठी मुलाखत घेतली. माझी निवड झाल्याचे आणि ताबडतोब रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानुसार 20-6-1948 रोजी मी प्राध्यापक पदावर रुजू झालो. पू. भाऊसाहेबांचे अमरावतील आगमन झाल्यावर नवनियुक्त प्राध्यापकांची विचारणा करण्याकरिता ते महाविद्यालयात आले होते. त्यांनी काही औपचारिक प्रश्न मला विचारले, मी शिकवित असलेले विषय, त्यात येणार्या अडचणी यांची चौकशी करून मला कसलाही त्रास होत तर नाही ना, राहण्याची व खाण्याची सोय कशी केली अशी चौकशी केली. मी दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले. माझ्या नियुक्तीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. आशीर्वादपर शुभेच्छाही दिल्या. त्यांचे कर्तृत्व, भारदस्त व्यक्तिमत्व आणि राहणीतील साधेपणा यांच्यामुळे मा. भाऊसाहेबांपुढे आदराने माझी मान आपोआप झुकली आणि प्रसन्न मनाने मी त्यांचा निरोप घेतला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीची स्थापना :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ही शिक्षण संस्था व तिच्या अंतर्गत शिवाजी कॉलेज यांच्या स्थापनेमागे बराच इतिहास आहे. त्या काळी भारतीय शेतकरी ऋणाच्या ओझ्याखाली आकंठ बुडाला होता. शेतकरी ऋणातून जन्मास येणे, ऋणातच सारे जीवन जगतो व मरतोही ऋणातच अशी वास्तुस्थिती होती. भाऊसाहेब स्वत: कास्तकाराचा पुत्र असल्यामुळे शेतकर्यांचे अज्ञान, फलस्वरूप दैन्यावस्था, सावकारांकडून होणारी पिळवणूक (आजही या परिस्थतीत फारसा फरक पडलेला नाही. आर्थिक विवंचना, निसर्गावर अवलंबून असणार्या शेतातील अनिश्चित पिकामुळे उपासमार यांच्या दडपणाखाली हताश होऊन दरवर्षी शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या अत्यंत बोलक्या आहेत.) त्यांना प्रकर्षाने जाणवली. शेतकर्यांना दु:खाच्या खाईतून बाहेर काढावयाचे असल्यास त्यांचे अज्ञान दूर करणे व त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मा. भाऊसाहेबांनी ओळखले. त्यातूनच त्यांच्या प्रयत्नाने 1932 साली श्री शिवाजी शिक्षण संस्था जन्माला आली. येथेच भाऊसाहेबांच्या द्रष्टेपणाचे, दूरदृष्टीचे दर्शन घडते.</div>
<div style="text-align: justify;">
त्याकाळी शिक्षणाचा एकाधिकार हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या उच्चभ्रू लोकांकडेच होता. त्याला तडा दिला आणि त्यांचे स्वामित्व संपुष्टात आणले ते भाऊ साहेबांनीच. या संस्थेच्या अंतर्गत शेकडो शैक्षणिक संस्था काढून बहुजनसमाज व मागासवर्गीय यांच्यासाठी शिक्षणाची दारे उघडून ज्ञानगंगा खेडोपाडी घरोघरी पोहचविणारे ते आधुनिक भगिरथ आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांतीचे प्रवर्तक ठरले. विद्या परम्दैवतम्या सत्याचा स्वीकार करून आजन्म सरस्वतीची पूजा केली. हजारो नव्हे लाखो बहुजन समाज व कृषिपुत्रांच्या जीवनाला योग्य वळण लावण्याच्या उद्देशाने त्यांच्यातील अज्ञानरुपी अंध:काराचे निर्मूलन करण्यासाठी जीवनाचे रान केले. जीवापाड अथक कष्ट उपसले. खर्या अर्थाने ते शेतकर्यांचे कैवारी, वाली आणि त्राता बनले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अमरावतीच्या शिवाजी कॉलेजची स्थापना :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणानंतर भाऊसाहेबांनी आपला मोर्चा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळविला. बहुजन समाज, मागासवर्गीय आणि कृषिपुत्रांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी अमरावतीला कला महाविद्यालय काढण्याचा निर्णय घेतला. अमरावती विभागात महाविद्यालय सुरु करण्यासाठी सतत प्रयत्न करून नागपूर विद्यापीठाकडे खेटे घातले. मात्र विद्यापीठातील धुरंधरांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही पण भाऊसाहेब कच्च्या मनाचे किंवा दिलाचे नव्हतेच. एखादे कार्य हाती घेतले की, ते तडीस नेण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. विद्यापीठाच्या भूमिकेला पर्याय व नागपूर विद्यापीठाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापूरचे राजाराम महाराज आणि हैद्राबादचे निजाम यांच्याशी संपर्क साधला आणि हैद्राबाद संस्थानातील कोणत्याही विद्यापीठाशी आपले महाविद्यालय संलग्नीकरण करावयाचा आपला मानस जाहीर केला. निजामांनी यासाठी संस्थेला देणगी जाहीर केली. भाऊसाहेबांच्या निर्धारापुढे नागपूर विद्यापीठ झुकले, त्यांचे डोळे उघडले आणि शेवळी 1946-47 या वर्षी शिवाजी महाविद्यालयाच्या स्थापनेला आणि तेथे कला विभाग सुरू करावयाला परवानगी दिली. 1947-48 सत्रात वाणिज्य शाखा प्रारंभ करावयासही मान्यता मिळाली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
लोकविद्यापीठाची स्थापना :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या महत्वाकांक्षांच्या गरूड झेपेला आकाश हीच मर्यादा होती. त्यांनी लोकविद्यापीठ स्थापनेचे स्वप्न साकारले ते 1952 साली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या शुभहस्ते लोकविद्यापीठाचे उद्घाटन झाले. राष्ट्रपतींची अमरावती भेट ही तेथील जनतेकरीता एक पर्वणीच ! हा ऐतिहासिक भव्य दिव्य सोहळा अमरावतीकरांसाठी पहिलाच असे त्याकाळचे ज्येष्ठ नागरीक म्हणत. या लोकविद्यापीठाचे एकमेव अपत्य म्हणजे जनता कॉलेजची स्थापना. श्री मामासाहेब लोंढे, संस्थेचे सचिव या रुरल इन्स्टिट्युटचे संस्थापक प्राचार्य बनले. केंद्रीय शासनाद्बारे संचालित भारतात अशीच एक संस्था अस्तित्वात असल्याचे भाऊसाहेबांच्या निदर्शनास आले. त्या संस्थेसारखेच अनुदान अमरावतीच्या रुरल इन्स्टिट्यूटला मिळावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यात ते यशस्वीही झाले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
श्री शिवाजी शिक्षण संस्थेची रजत जयंती :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1957-58 या साली श्री शिवाजी शिक्षण संस्थेची रजत जयंती. रौप्य महोत्सव साजरा करण्याकरिता मा. भाऊसाहेब आणि त्यांचे सहकारी यांनी कंबर कसली. कृषिमंत्री भाऊसाहेब यांच्या विनंतीनुसार तत्कालीन उपराश्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते या सोहळ्याचे नेत्रदीपक औचित्य साधून शिवाजी कॉलेज (कॉमर्स) चे माजी विद्यार्थी धैर्यशील वाघ यांनी शिवाजी हे नाटक बसविले. या नाटकाचे विशेष आणि वैशिष्ट्य म्हणजे वाघांनी शिवाजी महाराजांच्या वेषात आपली भूमिका वास्तववादी बनविण्याकरिता घोड्यावर स्वार होऊनच टाळ्यांच्या गडगडात रंगमंचावर प्रवेश केला. या ऐतिहासिक प्रसंगामुळे उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. उपर्निदिष्ट दोन्ही सोहळे भव्य दिव्य, नेत्रदिपक स्वरूपात यशस्वी रितीने पार पाडल्यामुळे भाऊसाहेबांच्या अतुलनीय संघटन चातुर्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच होईल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे राजकारण :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
देशाच्या राजकारणात ते सक्रीय भाग घेत असले तरी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था व तिच्या अंतर्गत असलेल्या सार्या संस्थांना आपल्या राजकारणापासून अलिप्तच ठेवले. तसा शिक्षकवर्ग व कर्मचारी यांच्या त्यांचा संपर्क क्वचितच यायचा. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक निवडणूका यशस्वीपणे लढविल्या. मात्र कोणत्याही कर्मचार्यांकडून कसल्याही कामाची अपेक्षा ठेवली नाही. स्वत:च्या कामासाठी त्यांचा वापर करणे तर दूरच !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्यांच्या आप्तांना शिक्षण शुल्कात सवलत :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1937-38 साली भंडार्याच्या शासकीय मन्रो हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना मला कास्तकाराचा पाल्य म्हणून शैक्षणिक शुल्कात एक तृतीयांश सवलत मिळाली व माझे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा लाभ मिळतच गेला. शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना या सवलतीचे रहस्य कळले आणि तिचे सर्वश्रेष् अष्टपैलू (नव्हे अनेक पैलू) असलेल्या भाऊसाहेबांकडेच जाते हे उमगले. 1930 साली ते बटलर मंत्रिमंडळात शिक्षण, कृषी व सहकार या विभागांचे मंत्री असताना शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासाचे, जीवनाचे ब्रीद असलेल्या भाऊसाहेबांनी कास्तकर्यांच्या पाल्यांना ही सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मंत्री म्हणून या तिन्ही विभागांचा त्रिवेणीसंगम त्यांच्या जीवनात अप्रत्यक्षरित्या घडून आला. त्यांची जीवनशैली, त्यांचे ध्येय, साध्य, त्यांचे कार्यक्षेत्र बनले आणि जीवनाचे सार्थ करण्याकरिता त्रिवेणी संगमात स्वत:ला आकंठ बुडवून ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी उहापोह जीवापाड कष्ट केले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेशी नाते :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब म्हणजे संस्था व संस्था म्हणजे भाऊसाहेब हे अद्बितीय, अतूट नाते निगडित झाले होते. ही संस्था म्हणजे भाऊसाहेबांचे जीवन की प्राण होते असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. संस्थेचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या जीवनाचे जणू एकमेव ध्येय त्यासाठी त्यांनी आपले जीवनच पणाला लावले होते. असे असतानाही खासदार, भारतीय घटना समितीचे सदस्य, केंद्रीय कृषिमंत्री, कृषी व सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचे अध्यक्षपद, आंतरराष्ट्रीय समित्यांचे सदस्यत्व, अध्यक्षपद इत्यादी नात्याने आपल्या कार्यात दुर्लक्ष होऊ दिले नाही. मात्र सोसायटीचे हित जोपासण्याची एकही संधी वाया जाऊ दिली नाही, कसूर केले नाही. यासंबंधीच्या काही ज्वलंत उदाहरणांचा उल्लेख करणे अस्थानी ठरणारा नाही.</div>
<div style="text-align: justify;">
एकाएकी द्बितीय महायुद्घाची सांगता झाली, भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात सैनिकांसाठी विदेशांत निर्यात करावयाच्या कित्येक लोकोपयोगी वस्तूंचा साठा पडून होता. त्याची विल्हेवाट लावण्याकरीता वेळोवेळी केंद्रीय सरकार दिल्लीत त्या वस्तूंचा लिलाव करी. या संधीचा फायदा घेऊन भाऊसाहेबांनी सतरंज्या, कार्पेट, तंबू, बूट अशा अनेक वस्तू अल्पमोलात आपल्या पदरी पाडून घेतल्या आणि कमी किंमतीत त्या सर्व कर्मचार्यांना आणि आजीव सभासदांना उपलब्ध करून दिल्या. संस्थेत, खिशात काही रकमेची भरही पडली. स्वार्थाबरोबर परमार्थ ! मी स्वत: बूट खरेदी केले असल्यामुळे ही घटना माझ्या स्मरणात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीने वापरलेल्या दोन बुई गाड्या कवडीमोलाने भाऊसाहेबांना लाभल्या. त्यापैकी एक संस्थेच्या वापरासाठी तर दुसरी शिवाजी कॉलेजच्या प्राचार्यासाठी प्रदान करण्यात आल्या. शिवाजी कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य श्री वनमाळी आणि संस्थेचे खजिनदार श्री. एस. व्ही. देशमुख यांच्यात बेबनाव झाल्यामुळे ती गाडी कॉलेजकडून काढून घेतली. त्या वर्षी स्नेहसंमेलनाची संपूर्ण जबाबदारी माझ्या कडे असल्यामुळे रात्री नाटकासारख्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थीनींना रात्री त्यांच्या घरून आणणे व कार्यक्रमानंतर पोहचवून देणे याकरिता गाडीची गरज भासल्याने माझ्या विनंतीवरून श्री. एस. व्ही. देशमुखांनी ती काही दिवसांकरिता माझ्या स्वाधीन केली होती.</div>
<div style="text-align: justify;">
एखाद्या संस्थेच्या कर्मचार्यांना पगार थकला, पैसा उभारण्यासाठी भाऊसाहेबांकडे फार सोपा 1. मार्ग म्हणजे स्वत:चा बंगला गहाण टाकणे हा होता. वर उल्लेखिलेले विषय अती लहान पण त्यांचा आशय फार महान ! हे सत्य लक्षात घेणे गरजेचे आहे. सोसायटीत व त्यांच्यात कायम स्वरूपाचे सामंजस्य होते, कार्यकारिणीची त्यांच्यावर अतूट श्रद्घा होती. काही महत्त्वाचे निर्णय तत्क्षणी घेण्यात त्यांना हातखंडा होता, काही कार्यकारिणी विश्र्वासात घेऊन तर कधी तिचा विरोध पत्करून ! पण अशा निर्णयाबाबत पश्चात्ताप करण्याची पाळी त्यांच्यावर कधीच आली नाही हे त्रिवार सत्य ! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संत गाडगेबाबा भाऊसाहेबांबद्दल आपुलकी :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींचे साधन होते सत्याग्रह. समाजोन्नतीसाठी डॉ. पंजाबरावांचे साधन होते. शिक्षण तर समाजोद्घारासाठी संत गाडगेबाबांचे साधन होते. झाडू, बाबांच्या कार्याबद्दल भाऊंना श्रद्घापूर्वक आदर होता तर शिक्षण कृषी व सहकार क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्या भाऊसाहेबांबद्दल बाबांच्या हृदयात अपार प्रेम, माया ममता होती. 1952 साली पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात भाऊसाहेबांना कृषिमंत्री नियुक्त केले. काही दिवसानंतर भाऊसाहेबांचे अमरावतीत प्रथम आगमन होणार होते. अमरावती जिल्ह्याच्या सीमेत पदार्पण करताच त्यांचे स्वागत करण्यासाठी सोसायटीची जेष्ठ मंडळी, काँग्रेस कार्यकर्ते आणि बरेचसे नागरिक तिकडे रवाना झाले होते तर सोसायटीच्या पटांगणावर त्यांचा स्वागत व सत्कार समारंभ होणार त्या पटांगणाची झाडून साफसफाई करणे, दगड धोंडे उचलणे या कार्यात गाडगेबाबा मग्न होते. भाऊसाहेबांबद्दलची आपुलकी, आनंद व्यक्त करण्यासाठी गाडगेबाबांनी आपल्या जिव्हाळ्याचा उपक्रम हाती घेतला. भाऊसाहेबांच्या आगमनाप्रित्यर्थ सोसायटीचे सदस्य, शिक्षण प्रेमी, त्यांचे चाहते आणि शाळा कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी तुफान गर्दी केली होती. मी देखील हा हृद्य सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होतोच.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
घनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यापदी माझी नियुक्ती :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
चौदा वर्षाचा वनवास संपुष्टात आल्यानंतर नागपूर विद्यापीठाने पहिल्यांदाच शिवाजी कॉलेज विद्यापीठ परीक्षांचे केंद्र म्हणून नियुक्त केले. केंद्राधिकारी म्हणून जबाबदारी प्राचार्य एन. सी. देशमुखांवर आली आणि प्रमुख पर्यवेक्षक म्हणून ती त्यांनी माझ्यावर टाकली. आम्हा उभयतांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे परीक्षा यशस्वीरित्या पार पडणे होय. 1960 साली जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आटोपल्यावर भाऊसाहेबांच्या अमरावतीतील वात्सल्याचे औचित्य साधून प्राचार्य देशमुखांनी प्राध्यापकांच्या सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात भाऊसाहेब आनंदाने सहभागी झाले. अन्य खाद्यपदार्थांसोबतच झुणकाभाकर व मिरचीचा ठेचा हा भाऊसाहेबांचा आवडता मेनू आवर्जून ठेवला होता. केंद्रीय मंत्र्याच्या मोठेपणाचा आव, संस्थेचे आजीव अध्यक्ष, शिक्षण, कृषी व सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान कर्तृत्व यांचा तोर नाही. नक्षा नाही, घमेंड व अहंकाराचा तर नामोनिशाण नाही, स्वामी-सेवक ही भावना नाही, उलट सारे सहकारीच या भावनेनेच हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून भाऊसाहेब प्रत्येक टेबलापाशी जाऊन प्रत्येक प्राध्यापकाच्या विषयाची व सेवाकालाची आस्थेने चौकशी करीत होते. अर्थात माझीही विचारपूस झालीच. यावर्षी सोसायटी दोन नवीन महाविद्यालय ांची स्थापना व घनवटे नॅशनल कॉलेजमध्ये वाणिज्य व विज्ञान शाखा सुरू करणार असल्यामुळे आणि विद्यमान प्राचार्यांचा सेवाकाल समाप्त झाल्यामुळे मुलाखतीचा हा आगळा वेगळा प्रकार असल्याचे मला जाणवले.</div>
<div style="text-align: justify;">
घनवटे नॅशनल कॉलेजमधील गैरप्रकार, अराजकता आणि दैन्यावस्था यांच्या तक्रारींची शहानिशा करण्याकरिता माझी व शिवाजी कॉलेज जेष्ठ प्रमुख लिपिक श्री दौलतराव गोळे यांच्या चौकशी समितीचे गठन करून ताबडतोब अहवाल सादर करण्याचा आदेश भाऊसाहेबांनी काढला तद्नुसार आम्ही उभयता दि. 12-6-1960 ला महाविद्यालयात प्रवेश केला. प्रथम तत्कालीन प्राचार्य डॉ. लोंढे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. स्वत:च्या सहकार्याबद्दल आपली असमर्थता दर्शवून त्यांनी हात झटकले व मुख्य लिपिक पोनीकरच सर्व माहिती देतील असे सांगितले. पोनीकरांकडून मिळालेल्या कॅशबुक व खातेवही चाळताना रोकड पुस्तकात मागील काही महिन्यांच्या नोंदीच नव्हत्या आणि खातेवही तर रामभरोसे ! कॉलेजच्या गव्हर्निंग वॉर्डाच्या सभांचा अहवाल लिहिणे ही जबाबदारी सचिव या नात्याने प्राचार्यांची. या महत्वाच्या रजिस्टरचे अवलोकन करताना आढळले की काही अहवालांवर अध्यक्षांच्या सह्याच घेण्यात आल्या नव्हत्या तर अशा काही अहवालांवर सचिवांच्या सह्यांचा पत्ताच नव्हता. शितावरून भाताची परीक्षा या वाक्प्रचारानुसार एकंदर मवाळग्रंथी कारभाराची प्रचिती आली आणि भाऊसाहेबांकडे आलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्घ झाले. तरी पोनीकरांना एक संधी देण्याकरिता आवश्यक माहिती, कागदपत्रे, रजिस्टर्स यांची एक जंत्री श्री गोळेंनी तयार करून पोनीकराकडे सोपविली. पण यातून काही निष्पन्न होणार नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ असल्यामुळे मी आणि श्री गोळे यांनी भाऊसाहेबांना सादर करावयाच्या अहवालाचा मसूदा तयार करण्याचे काम हाती घेतले. दोन दिवसात पोनीकरकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या मसुद्याला पूर्णरूप दिले. त्यात आम्हाला आढळलेला कॉलेजचा अनागोंदी भेंगळ कारभार, प्रशासनाच्या उणिवा, त्रुटी यांची सत्यस्थिती यासंबधीचा सावळा गोंधळ एकंदर हलाखीची परिस्थिती, कर्मचार्यांच्या खोलीचे छत पडलेले, झुकलेल्या भिंतींना लावलेले बल्ल्याचे तणाव, जिर्ण झालेली इमारत इत्यादींचा अंतर्भाव असलेला साद्यंत अहवाल दि. 14 जून 1960 ला श्रीमंत दादासाहेब घनवटे यांच्या बंगल्यावर भरण्यात येणार्या कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीच्या सभेला प्रारंभ होण्यापूर्वी भाऊसाहेबांना सादर केला. तो वाचून ते सून्न झाले. धक्कादायक अहवाल वाचून उपस्थित असलेले श्री. बाबुराव घनवटे आणि कॉलेजचे खजिनदार यांची ही मती गुंग झाली. भाऊसाहेबांचा निरोप येऊन मी माझ्या गावी तुमसरला जाण्याच्या तयारीत असतांनाच श्री गोळे यांनी माझी प्राचार्य म्हणून आणि त्यांनी रजिस्ट्रार म्हणून भाऊसाहेबांनी नियुक्ती केल्याचा आश्चर्याचा व आनंदाचा धक्का देणारी सुखद वार्ता मला सांगितली. नियुक्तीचे पत्र ते दिल्लीतून लवकरच पाठवतील असेही त्यांनी सांगितले. आम्हाला जास्त वाट पहावी लागली नाही. तीन-चार दिवसातच नियुक्तीचे पत्र मिळाले. त्यांच्या आदेशानुसार प्राचार्य एन. सी. देशमुखांनी शिवाजी कॉलेजमधील पदांतून आमची त्वरीत मुक्तता केली आणि 20 जून 1960 रोजी आम्ही उभयता बाडबिस्तरा घेऊन नागपूरला पोहोचलो. प्राचार्य डॉ. लोंढे व पोनीकर यांच्याकडून चार्ज (चार्ज घेण्यासारखे तरी काही नव्हतेच!) घेतला. डॉ. लोंढे यांची वयाची 60 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे निवृत्तीचा काळ लोटलेला होताच.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
नॅशनल कॉलेजला भाऊसाहेबांची नवसंजीवनी दिलेले </div>
<div style="text-align: justify;">
घनवटे नॅशनल कॉलेज :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कोणत्याही महाविद्यालयाला न लाभलेला न भुतो न भविष्यति असा आगळा वेगळा इतिहास या कॉलेजला आहे, या ऐतिहासिक महाविद्यालयाची स्थापना डॉ. डी. जी. लोंढे यांनी वर्धेत 1935 साली करून ते त्या कला महाविद्यालयाचे स्वत: प्राचार्य बनले. वर्धेचे कोणी एक वासुदेवराव नावाच्या सद्गृहस्थाने कॉलेजला देणगी देण्याचे जाहीर केल्यामुळे त्या कॉलेजला वासुदेवराव आर्टस्कॉलेज असे नामांकन करण्यात आले. वर्धेत एकमेव कॉलेज असल्यामुळे चालू राहिले. मात्र 1940-41 मध्ये कॉमर्स कॉलेजची स्थापना झाल्यावर या कॉलेजला शह बसला. ते कॉमर्स कॉलेज पुढे तग न धरू शकल्यामुळे डॉ. लोंढे यांनी ते कॉलेज नागपूरला हलविले. स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीचे ते वर्ष असल्यामुळे व ते ज्या इमारतीत भरणार होते ती टिळक विद्यालयाची वास्तू असून 1920 च्या काँग्रेसनगर येथील अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या काळात तेथे महात्मा गांधींचे वास्तव्य असल्यामुळे कॉलेजचे नॅशनल कॉलेज असे दुसर्यांदा नामकरण केले. स्थलांतराने नॅशनल कॉलेजच्या हलाखीच्या स्थितीत विशेष फरक पडलाच नाही. उलट 1947 साली ते डबघाईला आले. आर्थिक गर्तेत आकंठ बुडाले. विद्यार्थ्यांच्या संख्येने निच्चांक गाठला. ती 20-22 पर्यंत घसरली. तत्कालीन मॅनेजमेंटने कॉलेजला आर्थिक सहाय्य देण्यास नकार दिला. कर्मधर्मसंयोगाने एखाद्या विद्यार्थ्यांने फी भरली की चपराशी आणि बाबूंसाठी तो दिवाळी दसराच ! एकूण परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दृश्य डॉ. लोंढे उघड्या डोळ्यांनी पाहू शकले नाही. शेवटचा उपाय म्हणून ते भाऊसाहेबांना शरण गेले. कॉलेजच्या दयनीय स्थितीचे यथार्थ चित्र त्यांनी भाऊसाहेबांपुढे उभे केले. काका वाचा या धर्तीवर भाऊसाहेब वाचवा. अशी आग्रही विनवणी केली. दयानिधी भाऊसाहेबांच्या मनात दया निर्माण झाली पण सोसायटीच्या सदस्यांनी विरोध करून हे मस्त मढे विनाकारण गळ्यात बांधून घेऊ नये असे सुचविले. तरी भाऊसाहेबांनी डॉ. लोंढेंना अभयदान दिले. कारण भाऊसाहेबांच्या नजरेत त्या कॉलेजच्या उद्घाराचे, उन्नतीचे आणि उत्कर्षाचे चित्र दिसत होते. या निर्णयावरून त्यांच्या विलक्षण दूरदृष्टीची व द्रष्टेपणाची प्रचिती कालांतराने सर्वांच्या नजरेस आली. (1967 मध्ये कॉलेजने उच्चांक गाठला, विद्यार्थी संख्या 2650 च्या आसपास) श्री शिवाजी संस्थेने या कॉलेजची सर्व जबाबदारी स्वीकारल्याचे समजताच प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या मनात स्थैर्यत्वाची भावना निर्माण झाली. 1949 मध्ये भाऊसाहेबांनी श्रीमंत दादासाहेब घनवटेकडून पन्नास हजार रुपयांची देणगी मिळवून दिली. सर्वांच्या पगाराच्या थकीत बाकीचे शोधन करण्यात आले. नॅशनल कॉलेजचे पुन्हा नामकरण करून ते घनवटे नॅशनल कॉलेज असे ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संख्येत सतत भर पडत गेली. आर्थिक परिस्थिती सुधारली व प्रवेश घेण्याचा सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे घनवटे नॅशनल कॉलेज या चित्रात आमुलाग्र परिवर्तन घडून आले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मा. भाऊसाहेबांशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्राचार्यपदी रुजू झाल्यानंतरचा एक प्रसंग- कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीची सभा. अध्यक्ष भाऊसाहेब दिल्लीत आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे उपाध्यक्ष डॉ. भावे यांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्या दरम्यान त्यांनी मला तुमची प्राचार्यपदी नियुक्ती निवड समितीच्या शिफारशीनुसार रीतसर झाली काय? असा प्रश्न केला. माझ्या नकारात्मक उत्तरानंतर जाहिरात देण्याचा निर्णय कार्यकारिणीत घेण्यात आला. श्री गोळे यांनी ही घटना भाऊसाहेबांच्या कानावर घातली. त्यांनी या निर्णयाला विरोध न दर्शविता सारे रितसरच होऊ द्या असा सल्ला दिला. मात्र ही घटनाही कॉलेजचे खजिनदार श्री मारुतराव घनवटे यांच्या कानावर घातली त्यांनी माझ्या समक्षच डॉ. भावे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि गेल्यावर्षी केलेल्या जाहिरातीतून काहीच निष्पन्न झाले नसल्याची आठवण दिली आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लांजेवारांनाच आपली कर्तबगारी सिद्घ करण्यासाठी संधी द्यावी असे सुचविले. अशा रीतीने त्या प्रकरणावर पडदा पडला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
याच वर्षादरम्यानची दुसरी घटना :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रसंग होता अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचा व तिच्या वितरणाचा. शासनाकडून शिष्यवृत्तीची रक्कम व शिष्यवृत्तीधारकांची यादी मिळाली. त्यात एक महत्त्वाचे काम कोणाच्याही अभ्यासक्रमात खंड पडलेला नसावा. असे होते त्याचा अर्थ तो विद्यार्थी 1960 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा असाच नियम होता. तरी खंड पडलेल्यांना शिष्यवृत्ती देण्यास नकार देणार्या लिपिकाच्या तक्रारी घेऊन लाभार्थी मला भेटू लागले. अनेक कारण सबबी पुढे करून 1960 च्या परीक्षेला बसलोच नव्हतो असे सांगू लागले. त्यांच्या सबबी ऐकून माझे कान किटले. मी संबंधित लिपिकाला विद्यापीठात जाऊन सत्यता पाहण्याचे सुचविले. त्याने एक दोन दिवसांतच खंड पडलेल्या सुमारे 50 विद्यार्थ्यांची यादीच आणली. मी अनुसूचित जातीविरुद्घ असल्याचे त्यांचे पुढारी बोलू लागले. त्यांचे शिष्टमंडळ माझ्या निवासस्थानी मला भेटले. त्यांना मी निक्षून सांगितले की, काहीही होवो मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. त्यावर याचा परिणाम चांगला होणार नाही. अशी धमकी द्यावयाला ते विसरले नाहीत. पण त्याला मी भीक घातली नाही. थोड्याच दिवसात माझ्या जिवाला धोका असलेले पत्र मिळाले. मी ही घटना भाऊसाहेबांच्या कानावर घातली त्यांनी पोलिस विभागाकडून संरक्षण मागण्याचा सल्ला दिला पण तशी पाळी आलीच नाही. माझ्या निर्भीड व दृढ निर्णयाचे फलस्वरूप तदनंतर कोणीही माझ्या वाटेला गेला नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांची घारीसदृश दृष्टी : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब या महामेरूच्या अष्ट-नव्हे अनंत पैलूंचे एक ज्वलंत उदाहरण ! घार कुठेही असली तरी तिची नजर आपल्या पिल्यावरच असते. कोठेही असली तरी भाऊसाहेबांचे लक्ष घनवटे नॅशनल कॉलेजवरच ! प्रसंग होता. क्रिकेटचा अंतिम सामना. मागील दोन वर्षात घनवटे नॅशनल कॉलेजचे क्रिकेटचे अजिंक्य पद गाठून ढाल आणली होती. ते तिसरे वर्ष. यावर्षी अजिंक्य पद मिळाले तर विद्यापीठाची ढाल कायमची कॉलेजची होणार होती. आणि कॉलेज यांच्या यशचिंतनाचा टेलिग्राम भाऊसाहेबांनी दिल्लीवरून पाठविला होता ! बारीकसारीक गोष्टींकडे त्यांचे लक्ष असायचे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
रात्री बांधकामाची पाहणी :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1960-61 या वर्षात घनवटे नॅशनल कॉलेजमध्ये वाणिज्य आणि विज्ञान या दोन विद्याशाखा नव्यानेच सुरू केल्या होत्या. नवीन परिसरातील इमारतीच्या विद्यमान पाच खोल्यांमध्ये वर्ग आणि प्रायोगिक शाळा यांची सोय केली होती. पुढच्या वर्षापासून वर्गाची व प्रयोग शाळांची गरज वाढतच जाणार असणार म्हणून पहिला माळा बांधण्याचे काम सुरू केले. भाऊसाहेबांचे दिल्लीवरून येणारे विमान व परतणारे सुद्घा रात्रीच असायचे. ते नागपूरवरून अमरावतीला किंवा तेथून दिल्लीला जाताना नागपूरला आल्यानंतर कॉलेजला न विसरता भेट देत. वेळ रात्रीची, खोल्यांचे काम चालू असल्यामुळे बांधकामाचे सर्व साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले. तरी ते डोळ्यांखालून घातल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. त्यामुळे त्यांची सोय व्हावी म्हणून आम्ही त्यांच्या आगमनाप्रसंगी पेट्रोमॅक्सची व्यवस्था करीत असू. ते आमचे कौतुक करीत. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन लाभे. येथे नमुद करावयाचे आहे की, त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्र्वास होता. माझ्या कामात ते कधीही हस्तक्षेप करीत नसत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये हेच माझ्या जीवनाचे ध्येय बनले. उद्दिष्ट ठरले. त्यांचा आशीर्वाद, विश्वास, कौतुक व प्रेरणा यामुळे मी माझ्या जीवनात यशाचे शिखर गाठू शकलो. एकेका उच्च पदावर सक्षम काम करण्याचे बळ मिळाले. सर्वांचा पाया रचला गेला. माझ्या गत जीवनाचे सिंहावलोकन करताना माझ्या भावी आयुष्याच्या जडणघडणीत भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. असे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्राध्यापक मिसर यांचे प्रकरण : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मला वाटते ते 1961-62 किंवा त्याच्या पुढचे वर्ष असावे. श्री मिसर यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती. थोड्या दिवसातच त्यांच्या अकार्यक्षमतेच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. मी प्रत्यक्ष हजर राहून त्यांच्या शिकविण्याच्या शैलीची शहानिशा केली. त्यांना माझ्या चेंबरमध्ये बोलावून त्यांच्याबाबतच्या तक्रारी खर्या असल्यामुळे त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा, अन्यथा हकालपट्टी करावी लागेल असे बजावले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी राजीनामा सादर केला आणि त्यांच्या समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र द्यावे अशी विनंती केली. त्यांच्या भावी आयुष्याचा खेळखंडोबा होऊ नये म्हणून मी तशा आशयाचे प्रमाणपत्र दिले. भाऊसाहेब नागपूरला आल्याचे समजताच मिसर त्यांना भेटले आणि सक्षमतेचे प्रमाणपत्र असतानाही प्राचार्याने मला काढून टाकले अशी तक्रार केली. पाहतो असे सांगून भाऊसाहेबांनी त्यांची बोळवण केली. मी त्यांना भेटलो असताना हे काय प्रकरण आहे अशी विचारणा केली. मी सत्यस्थितीचे कथन केल्यावर भाऊसाहेबांचे समाधान झाले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
नागपूर विद्यापीठाच्या निवडणूकीत भाऊसाहेबांचा पराजय : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1961 साली न्यायमूर्ती बडकस यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाल संपल्यावर झालेल्या रिक्त पदाच्या निवडणुकीत डॉ. भाऊसाहेब कोलते यांचा पराभव करून न्यायमूर्ती कोतवाल निवडून आले. 1963 ची एक अत्यंत दु:खद घटना ! बहुजन समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी दुर्घटना ! यावर्षी न्यायमूर्ती कोतवाल यांची मुंबईला बदली झाल्यामुळे त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा राजीनामा दिला. त्या रिक्त पदासाठी डॉ. पंजाबराव यांनी निवडणूक लढवावी अशी माजी न्यायमूर्ती आणि भूतपूर्व कुलगूरू डॉ. मंगलमूर्ती यांनी मनधरणी करून भाऊसाहेबांचा होकार मिळविला आणि उमेदवारी अर्ज भरला. मात्र निवडणूकीच्या धामधुमीच्या काळात भाऊसाहेब नागपूरला येऊ शकले नाही. उलट 8-10 दिवस उरले असता रोज येथे भरलेल्या इंटरनॅशनल फुड ऑर्गनायजेशनला भारताचे कृषिमंत्री म्हणून उपस्थित राहणे गरजेचे होते. दि. 5-12-1963 त्यसांचे रोमवरून एक पत्र मला मिळाले. निवडणुका असल्यास (Election Fixed) आणि नसल्यास (Election cancelled) असा केबल त्यांनी दिलेल्या लंडनच्या पत्त्यावर पाठविण्यास सांगितले.</div>
<div style="text-align: justify;">
यावरून हे स्पष्ट होते की, त्या तारखेपर्यंत निवडणुकीत पूर्ण विसर त्यांना पडला होता. त्या पत्रात निर्देश केल्याप्रमाणे लंडनवरून निघून दि. 10 ला मुंबईला व 19 तारखेला दिल्लीत लोकसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहणे दि. 12 ला रात्री नागपूरला पोहोचणे त्याच दिवशी अमरावतीला जाऊन रात्री नागपूरला परत येणे असा त्यांचा व्यस्त कार्यक्रम होता. निवडणूक जेमतेम 3-4 दिवसांवर येऊन पोहचली होती. नागपूरला पोहोचल्यावर एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता ते प्रथम माजी कुलगुरू न्यायमूर्ती बडकस यांनात्यांच्या निवासस्थानी भेटले. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा चालली. तेथून बाहेर पडतांना त्यांची चर्चा पाहून प्रतिकूल परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव झाला असल्याचे आम्हाला जाणवले. न्यायमुर्ती मंगलमूर्ती, आम्ही अनेक कार्यकर्ते यांच्याशीही त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. नागपूरकर व बाहेरील सर्व समर्थकांनी यथाशक्ती केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून, सार्यांची निराशा होऊन ते खचून जाऊ नये याचे भान राखून पळपुटेपणाचा मार्ग न अवलंबिता भाऊसाहेबांनी आपली उमेदवारी परत न घेण्याचा निर्धार जाहीर केला. पराभवाच्या छायेत असल्याची संपूर्ण कल्पना त्यांना आली असतानाही त्यांनी स्वत:चे मनोधैर्य खचू दिले नाही. </div>
<div style="text-align: justify;">
दरम्यान न्यायमूर्ती मंगलमूर्ती प्रचाराची धूरा सांभाळीत जोरदार प्रयत्न करीत होते. त्यांच्या सोबत आम्ही उपस्थित राहत असू. मी श्री गोळे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव संस्थेशी निगडित संबंध असलेले तसेच भाऊसाहेबांचे चाहते आपापल्या शक्तीनुसार प्रचाराची पराकाष्ठा करीत होते. मतदार (विद्यापीठ कोर्टाचे सदस्य) यांना गाठून भाऊसाहेबांना मतदान करण्याची विनंती करीत होतो. मात्र अनुकूलता दर्शविणारी थोडे आणि प्रतिकूल स्वर असलेले बरेच असल्याने आमच्या प्रत्ययास येत होते. आशेचा किरण दिसत नव्हता. निवडणुकीचा दिवस उजाडला. उच्चभ्रू मतदारांचा भाऊसाहेबांचे प्रतिनिधी डॉ. देव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट चित्र प्रकर्षाने जाणवत होते. मतदानासाठी महाराष्ट्र राज्याचे काही मंत्रीही उपस्थित होते, पण मतदारांवर त्यांचा प्रभाव पडलाच नाही. शेवटी निराशाच पदरी पडली. डॉ. पंजाबराव देशमुखांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि चाहत्यांचे दु:ख त्यांना पाहवेना. पराजयाचे खापर आमच्या माथी मारुन मोकळे होण्यापेक्षा स्वत:चे दु:ख, निराशा पचवून त्यांनी आम्हा सर्वांचे सांत्वनच केले. त्यांच्या थोर मनाची आणि भव्यदिव्य अंत:करणाची प्रचिती आली. साक्ष पटली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
माझ्या डोळ्यावरील रक्तस्त्राव :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या पराभवामुळे झालेली निराशा आणि दु:ख त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर 1963 ला झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे परिश्रम आणि दडपण यांचा परिणाम माझे रक्तदाब वाढण्यात झाला आणि त्याचे पर्यवसन माझ्या एका डोळ्यावरील रक्तस्त्रावात झाले. डॉ. जोशी, नेत्रतज्ज्ञ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचे प्रमुख सुप्रसिद्घ डॉ. ईश्वरचंद्र यांच्या एका महिन्याच्या अथक परिश्रमाने डोळ्यावर आलेले रक्त हळूहळू ओसरले. श्रीमंत दादासाहेब घनवटे यांच्या गौरवाच्या कार्यक्रमातील माझी अनुपस्थिती भाऊसाहेबांच्या लक्षात आली आणि मी अंथरुणाला खिळलेला असल्याचे समजल्यावर रात्री मला भेटण्याकरिता ते माझ्या निवासस्थानी आले. यापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पायर्या चढण्याची मनाई केली असली तरी त्याची तमा न बाळगता ते जिना चढून वर आले, माझी आस्थापूर्वक चौकशी केली आणि लवकर दुरूस्त होण्याचे आशीर्वाद दिले. अनेक इंजेक्शन आणि औषधोपचार यांनी होणार्या लाभापेक्षा त्यांची भेटच माझ्या सुधारणेच्या दृष्टीने मौल्यवान व अधिक प्रभावशाली ठरेल असे सांगून त्याबद्दल अंथरुणावर पडूनच हात जोडून मी त्यांचे आभार मानले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
श्रीमंत दादासाहेब घनवटे यांचा गौरव :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सोसायटीचे नॅशनल कॉलेजची जबाबदारी स्वीकारली हे या कॉलेज करिता टर्निंग पॉईंट होते. तर दादासाहेबांनी रु. 50,000 ची देणगी या कॉलेजच्या उद्याचे दार खोलणेच ठरले. ही जाणीव आणि घनवटेंनी चालविलेल्या शिवराज लिथो वर्क्सने महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही मानाचे स्थान मिळविणे, ज्याचा पाया स्वत:चा घाम गाळून, कष्ट उपसून चिकाटीने, जिद्दीने रचला होता. अशा श्रीमंत दादासाहेब घनवटे यांच्या चित्रकलेचा गौरव करण्याचा निर्णय भाऊसाहेबांनी घेतला. 1964 च्या प्रारंभी घनवटे रंगमंदिरात केंद्रीय मंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते चित्ररत्न ही पदवी बहाल करण्यात आली आणि अशारितीने सोसायटीने चित्ररत्न दादासाहेबांच्या ऋणातून मुक्त होण्याचा उपक्रम नेत्रदीपक समारंभाची यशस्वी सांगता करून पार पाडला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विदर्भ अशासकीय महाविद्यालयांचे संघटन :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1962-63 मधली एक घटना. आतापावेतो विदर्भातील महाविद्यालयांना शिक्षणाबाबत दिल्या जाणार्या अनुदानाचे धोरण औदार्याचे आणि कॉलेजेसना पोषक व विकासासाठी अनुकूल असे; पण 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनुदानाचे धोरण लागू झाले. ते प्रतिकुल किंवा बाधक असे नव्हते पण कंजूषपणाचे अवश्य होते. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्रगतीला आळा बसण्याचा धोका निर्माण झाला होता. हे संकट लक्षात घेऊन भाऊसाहेबांनी वरील संघटन स्थापण्याचा निर्णय घेतला, संघटनेची घटना तयार केली. तिचे हे स्वत: अध्यक्ष झाले तर मला त्यांनी सचिव बनविले. संघटनेच्या घटनेनुसार सभासद झालेल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व त्याचे प्राचार्य आणि अध्यक्ष हे करणार होते. ही संघटना 1978 पर्यंत कार्यरत होती. महाविद्यालयांचे प्रश्न त्यांच्या अडचणी आर्थिक संकट शासनाच्या नजरेस पत्र व्यवहार करणे शिक्षण मंत्र्यांशी बोलणे आणि शिष्टमंडळाद्बारे भेट घेऊन अनुदानाच्या धोरणाबद्दल किंवा त्याशी निगडित विषयांबाबत चर्चा करीत. या काळात महाविद्यालयांचे अनेक प्रश्न निकाली काढण्याचे मोलाचे कार्य करण्यात संघटनेला काही प्रमाणात यश मिळत होते. संघटना म्हणजे महाविद्यालयांचे मार्गदर्शकच बनले होते. हे भाऊसाहेबांच्या द्रष्टेपणाचे एक जिवंत उदाहरणच होते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भंडारा शहरात महाविद्यालय काढण्यात पुढाकार :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1964 च्या प्रारंभी एक दिवस भाऊसाहेब कॉलेजमध्ये आले. मी आणि गोळे उपस्थित होतो. त्या दिवशी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता. कॉलेजच्या आर्थिक व शैक्षणिक स्थितीविषयी चर्चा चालू असताना त्यांनी अचानक तुमच्या भंडारा जिल्ह्यात एखादे कॉलेज आहे काय? अशी मला पृच्छा केली. माझ्या नकारात्मक उत्तरामुळे त्यांनी 1964-65 सत्रापासून भंडार्यात कला वाणिज्य महाविद्यालय काढण्याचा मनोदय व्यक्त केला. स्मरणशक्तीचे ते महामेरु. त्यांच्या सूचनेप्रमाणे संस्थेने विद्यापीठाकडे रितसर अर्ज करून भाऊसाहेबांच्या मनोदयाला मूर्त स्वरूप दिले. प्राध्यापक ब्राह्मणकर हे भंडारा जिल्ह्याचे असल्यामुळे त्या कॉलेजचे भावी प्राचार्य म्हणून इमारतीचा शोध घेण्याच्या कामाला लावले. गणपतराव पांडे यांच्या ऐतिहासिक वाड्याचा अर्धा भाग भाड्याने घेतला. तशी भाडे चिठ्ठीही लिहून झाली. कालांतराने विद्यापीठाने चौकशी समिती गठीत केली. वाड्याची जागा दाखवून ती इमारत पुरेशी होईल असे समितीने मान्य केले. आवश्यक शिक्षक व कर्मचारी वर्गांची नियुक्ती, ग्रंथालयाची स्थापना, पुस्तके व फर्निचर यासाठी आवश्यक त्या रकमेची उपलब्धता यांचे आम्ही आश्वासन दिले. मात्र समिती सदस्यांच्या मनात सोसायटीबद्दलचा आकस प्रकर्षाने जाणवत होता. आमची भीती खरी ठरली. आधी मळस मग पायारे असा निर्धार करून चौकशी समिती आली होती. याची प्रचिती लवकरच आली. वाड्याच्या प्रवेशद्बारावर आम्ही निरपेक्ष हेतूने श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय असा फलक लावला होता. विद्यापीठाच्या परवानगी वाचून असा फलक लावलाच कसा असे खुसपट काढले. आक्षेप घेतला आणि या क्षुल्लक फुसक्या सबबीवर सोसयटीचा अर्ज फेटाळून लावला, दरम्यान शिवाजी सोसायटी भंडार्याला कॉलेज काढीत आहे ही वार्ता कळल्यामुळे (की कळविल्यामुळे) मनोहरभाई पटेल यांच्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीने ही अर्ज केला. या आखाड्यात नासिकराव तिरपुडे यांच्या युगांतर सोसायटीने उडी घेतली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या साम्राज्य शाहीला शह देण्याकरिता गोंदिया शिक्षण संस्थेला (अपेक्षेप्रमाणे) मान्यता दिली गेली. त्यानंतर भाऊसाहेब नागपुरला आले असता वरील घडामोडी त्यांच्या कानावर घातल्या. त्यांच ही प्रतिक्रिया ‘आपल्या पुढाकारामुळे भंडार्याला कॉलेज तर मिळाले’ अशी व्यक्त करून आपले समाधान प्रकट केले. अपयशात ही यश मानणारा हा मानवतेचा महामानव !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे अपुरे स्वप्न : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1960 मध्ये सुरु केलेल्या विज्ञान शाखेचे रूपांतर स्वतंत्र महाविद्यालयात करणे हे भाऊसाहेबांचे स्वप्न होते. ते साकार करण्याकरिता त्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे 1964 च्या ऑगस्टमध्ये श्री एल. डी. देशमुखांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करणे हे होय. पुढचे पाऊल म्हणजे घनवटे नॅशनल कॉलेजचे विभाजन करून विज्ञान शाखेचे स्वतंत्र विज्ञान महाविद्यालय परिवर्तन करावयास परवानगी मिळावी म्हणून विद्यापीठे आणि शासनाकडे अर्ज करणे. हे सर्व संस्थेने केले. एल. डी. देशमुख रुजू झाल्यानंतर पुढचे पाऊल मी, श्री गोळे व एल. डी. देशमुखांनी चर्चेच्या द्बारे उचलले. प्रथम प्राध्यापकांची विभागणी अर्थातच विज्ञान शाखेचे प्राध्यापक वेगळे असल्यामुळे तो प्रश्न आपोआप सुटला. फक्त एक इंग्रजीचा व एक मराठीचा प्राध्यापक घनवटे महाविद्यालयातून विज्ञान महाविद्यालयाकडे स्थानांतरीत करण्याचा तो आमच्या विचाराअंती निश्चित झाला. विज्ञान शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी तिकडेच वळते करण्यात आले. एल. डी. देशमुखांकडे प्रशासनीय व शैक्षणिक व्यवहार सांभाळावयाचे असून आर्थिक विभाग घनवटे नॅशनल कॉलेजकडे राहिला. तोपर्यंत सायंसचे वर्ग व प्रयोगशाळा यांचे स्थलांतर त्या इमारतीत करण्यात आले होते. प्राचार्य देशमुखांना प्रशासनीय कार्य करण्यासाठी घनवटे नॅशनल कॉलेजमधून आवश्यक कर्मचारी वर्ग वळता करण्यात आला. अशा रितीने स्वतंत्र महाविद्यालयाचे अस्तित्व उदयास आले होते. मात्र प्रतिक्षा होती ती प्रथम विद्यापीठ व नंतर शासनाच्या मान्यतेची. ही मान्यता 1967 मध्ये मिळाली आणि 1967-68 सत्रापासून शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची रीतसर स्थापना झाली. मात्र ते भाऊसाहेबांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही कारण मान्यता मिळण्याकरिता लालफितीचा वेळकाढूपणा मायावी कारभार ! तरी भाऊसाहेबांच्या आत्म्याला समाधान खचितच लाभले असणार !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे अंतिम दर्शन : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
1965 वर्षाच्या प्रारंभीची घटना. माझे मित्र श्री. बी. पी. हजारे आणि श्री गोवर्धनदास अग्रवाल यांच्या एका अशिलाची विक्रीकरासंबंधीची केस ग्वाल्हेरच्या कार्यालयात होती. पक्षकाराची कारं होती. हजारे यांनी मला त्यांच्या सोबत येण्याचा आग्रह धरला त्यांच्या अट्टाहासामुळे मी पण त्याच्यासोबत निघालो. ग्वाल्हेर येथील काम आटोपल्यावर दिल्लीला जाण्याचे ठरले. दिल्लीच्या मुक्कामात हजारे, अग्रवाल आणि मी भाऊसाहेबांना भेटण्याकरिता त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. भाऊसाहेबांचे दरवाजे सर्वांसाठी खुले होतेच. त्याक्षणी आम्हाला त्यांचे दर्शन घडले. कॉलेजसंबंधी चर्चा चालू असतानाच त्यांनी मला आदेश दिला की, कॉलेजसाठी एक गाडी घेण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करावी. त्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेतला. पण माझ्या मनात क्षणभरही आले नाही की हे त्यांचे अंतिम दर्शन ठरणार ! पण नियतीच्या मनात वेगळेच होते !</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानसूर्य मावळला : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आम्ही पहाटे झोपेत असतानाच भाऊसाहेबांच्या स्वर्गवासाची दु:खद वार्ता कळली. मन सुन्न झालेले. मात्र त्या बातमीवर विश्वासच बसेना. माझ्या डोळ्यांपुढे तत्पूर्वी घडलेला एक असाच प्रसंग उभा राहिला. प्रसंग होता वार्षिक स्नेहसंमेलनातील मराठी नाटक. नाटक ऐन रंगात आले होते. एका चपराशाने भाऊसाहेब वारल्याचा फोन आल्याचे मला गुपचुच सांगितले. सोबत असलेल्या श्री गोळे व श्री एल. डी. देशमुख यांनाही मी ती वार्ता कळविली. नाटकाचा खेळखंडोबा होऊ नये म्हणून कोणालाही संशय येऊ नये याची खबरदारी घेत आम्ही माझ्या चेंबरमध्ये जमलो. गोळेंनी स्थानिक वृत्तपत्रांच्या कार्यालयांशी संपर्क साधनू भाऊसाहेबांसंबंधी काही बातमी आहे काय अशी पृच्छा केल्यावर त्यांनी तसे नसल्याचे सांगितले. अमरावतीशी संपर्क साधला. तेथेही असे काही नसल्याचे कळले. ही अफवा, खोडसाळपणा आणि रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न असल्याचे शहानिशा केल्यानंतर आमच्या लक्षात आले. आमचा जीव भांड्यात पडला. मंडपात आल्यावर नाटक निर्विघ्नपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता मिळालेली बातमी देखील खोटी ठरावी अशी परमेश्वराशी प्रार्थना करीत असतानाच श्री गोळे व त्यापाठोपाठ सोसायटीतून भाऊसाहेबांचे निधन झाल्याचे कळले. मानवतेचा महामेरू ढासळला. शेतकर्यांचा कैवारी आता लोप पावला. ज्ञानसूर्य शिक्षणमहर्षी, त्यांच्या चाहत्यांना दु:खाच्या खाईत लोटून अंतर्धान पावले, शिक्षण क्षेत्रातील हिरा हरपला, कृषिरत्न झाकाळले, हजारोंचा पोशिंदा व लाखोंचा शिरोमणी निखळला. सहकारक्षेत्र पोरके झाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर आणि संलग्नित संस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे कलेवर अमरावतीला आणण्याचे सर्वप्रथम फोल ठरले. मा. यशवंतराव चव्हाण आणि निकटवर्तींनी सुद्घा तसा प्रयत्न केला. पण विमलबाईंनी त्यांना भीक घातली नाही. शेवटी त्यांचा अंत्यसंस्कार दिल्लीतच करण्यात आला.</div>
<div style="text-align: justify;">
तो रामनवमीचा दिवस, 10 एप्रिल 1965. दिवसभर त्यांची प्रकृती उत्तम होती. रात्री त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यांना दिल्लीतील विलिंग्डन हॉस्पीटलमध्ये भरती केले. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी तेथील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण भाऊसाहेबांना आलेल्या हृदयाच्या जबरदस्त झटक्याने त्यांना जीवनदान देण्यात ते अयशस्वी ठरले आणि रात्री साडेअकरा वाजता त्यांचे देहावसान झाले. भाऊसाहेबांचा अस्थिकलश आणण्याकरिता गेलेले सोसायटीचे सचिव श्री मामासाहेब लोंढे यांनी परतल्यावर वरील हकिकत सांगितली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अस्थींचे विसर्जन :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या अस्थींचा कलश घनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रतीक्षागृहात त्यांच्या चाहत्यांच्या, शिक्षण प्रेमींच्या दर्शनासाठी ठेवला होता. प्रात:काळी नागपूरच्या सार्या वर्तमानपत्रातून ही बातमी प्रसारित झाली असल्यामुळे फार मोठ्या संख्येने लोक अस्थिकलश घेऊन आम्ही अमरावतीसाठी प्रस्थान केले. एक गाडी अस्थिकलशाच्या आगमनाची बातमी जाहीर करीत पुढे जात होती. अमरावती मार्गावरील त्यातील ग्रामस्थ सडकेच्या कडेला उभे राहून आदरांजली वाहत होते.</div>
<div style="text-align: justify;">
अस्थिंचे अमरावतीला आगमन होताच रुरल इन्स्टिट्यूटमध्ये जमलेल्या हजारो चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला. अनेकांनी ते दृश्य सहन न होऊन हंबरडे फोडले. एकच आकांत माजला, रडारड झाली तिला सीमाच नव्हती. ते हृदद्रावक दृश्य पाषाणालाही पाझर फोडणारे होते. आपल्या घरातील आपला सगासोयराच दगावला या जाणिवेने सर्वांना अपरंपार दु:ख झाल्यामुळे ते हमसून हमसून रडत होते. त्या दृश्याचे वर्णन करणे शक्ती बाहेरचे होते.</div>
<div style="text-align: justify;">
रात्र झाली. अस्थी विसर्जनाच्या यात्रेला प्रारंभ झाला. लाऊडस्पिकरने ही वार्ता शहरात प्रसारित केली होती. विशेषत: ज्या मार्गाने तिचे प्रस्थान होते त्या रस्त्याच्या कडेला यात्रा जसजशी पुढे सरकू लागली तसतशी सहभागी होणार्यांची संख्या वाढू लागली. मार्गाच्या कडेला उभे असलेल्या लहान थोर स्त्री पुरुषांनी रांगच लावली होती. आदरांजली वाहण्याकरिता पुष्पवृष्टी झाली. अश्रूंच्या महापूरात अस्थिंचे विसर्जन झाले. अमरावतीच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेच्या पटांगणावर श्रद्घांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची अफाट गर्दी लोटली होती. अभूतपूर्व असा तो देखावा होता.</div>
<div style="text-align: justify;">
एक ऐतिहासिक महापुरुष काळाच्या पडद्याआड झाल. त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन !</div>
<div style="text-align: justify;">
________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
प्राचार्य श्री एम. एस. लांजेवार, माजी कुलगुरू, नागपूर विद्यापीठ, निवृत्त महाविद्यालयीन पीठासनाधिकारी 115 अ, रामदास पेठ, नागपूर</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-69992824723633701482014-12-21T07:30:00.004-08:002014-12-27T21:03:18.412-08:00संविधान निर्माणातील एक शिल्पकार__प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
भारतासाठी संविधान तयार करून या देशाच्या राजकीय भवितव्याचा आराखडा आखण्यासाठी एक संविधान सभा असावी आणि ती जनतेने निवडलेली असावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1934 मध्ये जाहीर करून 1937 च्या फैजपूर (जि. जळगांव) अधिवेशनात काँग्रेसने संविधान सभेच्या मागणीचा पुरस्कार करणारा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर केला. परिणामत: ब्रिटीश सरकारने 1944 मध्ये नेमलेल्या कॅबिनेट मिशनने संविधान सभेची मागणी मंजूर केली.</div>
<div style="text-align: justify;">
कॅबिनेट मिशन योजनेनुसार 389 सदस्यांची एक संविधान सभा स्थापन करावयाची होती. यामध्ये 4 सदस्य चीफ कमिशनर असलेल्या प्रांताचे होते. 385 सदस्यांपैकी 292 सदस्य ब्रिटीश प्रांतातून आणि 93 सदस्य संस्थांतून निवडावयाचे होते. जुलै 1946 मध्ये संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. 385 पैकी 211 जागा काँग्रेसने जिंकल्या. 73 मुस्लिम लिगला मिळाल्या. ब्रिटीश संस्थानाच्या 93 जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. मध्य प्रांतातून (सीपी ऍण्ड बेरार) संविधानसभेत 17 प्रतिनिधी निवडून द्यावयाचे होते. या 17 सदस्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख, ब्रिजलाल बियाणी आणि लक्ष्मणराव भटकर यांचा समावेश होता. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बुलडाणा येथील पं. दिनकरशास्त्री कानडे यांचा पराभव करून संविधानसभेची निवडणूक जिंकली. 1947 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याद्बारे हिंदुस्थानचे विभाजन करण्यात आल्यानंतर पाकिस्तानसाठी स्वतंत्र संविधानसभा स्थापन करण्यात आली. यामुळे भारताच्या संविधानसभेत एकूण 299 सदस्य राहिले. यामध्ये 9 महिला सदस्याही होत्या. या 299 सदस्यांमध्ये अर्थात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या चतुरस्त्र बुद्घिमत्तेला, कायद्याविषयक सखोल ज्ञानाला आणि प्रचंड कार्यक्षमतेला संविधानसभेच्या रूपाने अधिक विशाल व व्यापक कार्यक्षेत्र उपलब्ध झाले. बहुजन समाजाचा हा पाठीराखा भाऊ संविधानसभेत असल्याशिवाय त्यांच्या हितसंबंधांचे योग्य रक्षण होणार नाही असेच नियतील वाटले असावे. म्हणूनच भाऊसाहेबांची संविधानसभेवर निवड झाली.</div>
<div style="text-align: justify;">
संविधानसभेत भाऊसाहेबांनी 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडात भारताचे स्वतंत्र संविधान निर्माण करण्याच्या ऐतिहासिक कार्यात सक्रीय सहभाग घेतला. संविधान तयार करण्यासाठी एकूण 16 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. संविधान सभेची एकूण 11 अधिवेशने झाली. या 11 अधिवेशनात 165 दिवस कामकाज झाले. संविधानाचा आराखडा तयार करण्याचे काम 114 दिवस चालले. बिनतोड व सप्रमाण युक्तिवादाबद्दल त्यांनी संविधानसभेत लौकिक मिळविला. जगातील देशोदेशीच्या संविधानाचा सूक्ष्म अभ्यास, विधिशास्त्राचे सखोल ज्ञान, भारतातील बहुसंख्य जनतेच्या भवितव्याबद्दलच्या ठाम व तर्कशुद्घ कल्पना, अभ्यासूवृत्ती व इंग्रजी भाषेवरील असामान्य प्रभूत्व यामुळे संविधानसभेतील त्यांची भाषणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकली जात असत. वार्याला लाथा झाडण्यासाठी संदिग्ध व असंसदीय विधाने त्यांनी केली नाहीत. म्हणून त्यांच्या भाषणामुळे एक प्रकारचा दबदबा संविधान सभेत निर्माण झाला होता.</div>
<div style="text-align: justify;">
संविधानसभेत भाऊसाहेबांनी विविध विषयांवर आपली मूलगामी व विचारप्रवर्तक मते निर्भिडपणे मांडली. 17 फेब्रुवारी 1947 व 11 ऑगस्ट 1948 या दोन दिवशी भाऊसाहेबांनी संविधानसभेत जातिवाचक उल्लेख सरकारी कागदपत्रा ंतून गाळून टाकण्यासंबंधीच्या विधेयकावर अत्यंत परिणामकारक भाषण केले. जातीयवादाच्या उच्छेदासंबंधीची विधेयकातील तत्त्वे चांगली असली तरी भारतातील असंख्य जातीतील अनेकविध व भयंकर विषमता लक्षात घेता, या विधेयकाद्बारे उच्चवर्णीय जाती सोडून इतर जातीतील व्यक्तींचे नुकसानच होण्याची दाट शक्यता आहे. याची जाणीव भाऊसाहेबांना होती. म्हणून त्यांनी या विधेयकाला विरोध केला. या विधेयकावर बोलत असताना त्यांनी जातीभेदसमुळ नष्ट करण्याचे काही विधायक मार्गही सांगितले. शिक्षणाचा प्रसार हेच जातीयता नष्ट करण्याचे एकमेव प्रभावी साधन असून उच्चशिक्षण घेतलेले युवक व युवतीच जातीयवादाचा विषारी फणा चिरडून टाकणार आहेत, असे त्यांनी प्रतिपादन केले. जातीमूलक पंक्तिप्रपंच नागड्या स्वरूपात आपले हिडीस प्रदर्शन करीत असताना या विधेयकाद्बारे सर्वांना एका दावणीत गोवण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद व इतर मागासलेल्या जातींना अन्यायकारक आहे, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या या विचारप्रवर्तक भाषणामुळे सदर विधेयक सभागृहाने फेटाळले. यामुळे आज जातीच्या आधारावर ज्या समाजाला शिक्षणात, नोकर्यांत सवलती मिळत आहेत, त्यांचे श्रेय भाऊसाहेबांनाच जाते, हे मान्य करावे लागेल.</div>
<div style="text-align: justify;">
कृषीप्रधान भारतात शेती व शेतकरी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे भाऊसाहेबांनी 3 सप्टेंबर 1949 रोजी संविधानसभेत भाषण करताना सांगितले. सरकारच शेतकर्यांची अक्षम्य उपेक्षा करीत आहे, असा आरोप करताना, जे उपरोधिक शब्दात म्हणाले, ‘केवळ संख्याबळामुळे नव्हे तर श्रेष्ठतम कार्यामुळे या भारतवर्षात कृषकांना पूर्वीपासून प्राधान्य मिळत आले आहे. त्यामुळेच भारत कृषकांचा देश म्हणून सर्वत्र प्रसिद्घ आहे. व असा नित्य उद्घोषही केला जातो. हे कृषकच भारवर्षाचे खरेखुरे स्वामी आहेत. परंतु तरीसुद्घा त्यांच्या कल्याणाची कोणालाच आस्था नाही.’ कामगार वर्ग व शेतकरी वर्ग यांच्या परिस्थितीचे तुलनात्मक दर्शन घडवून डॉ. पंजाबराव म्हणाले, ‘ज्या प्रचंड मानवसमुहाच्या कृषकांच्या निढळाच्या घामावर आपण जगतो, उन्नती साधतो, त्यांच्याकरिता अजूनसुद्घा एकही कल्याण अधिकारी नेमला नाही, ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे.’ कामगार वर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय व कामगार कल्याण अधिकारी शासनाने नेमला. परंतु शेतकर्यांसाठी मात्र कल्याण अधिकारी नेमला नाही, याबद्दल भाऊसाहेबांनी खेद व्यक्त केला व शेतकर्यांच्या हिताकडे सभागृहाचे अगत्यपूर्वक कर्तव्यभावनेने लक्ष द्यावे, असे कळकळीचे आवाहन केले.</div>
<div style="text-align: justify;">
भारतातील धर्ममठ, देवस्थाने इत्यादी विश्वस्त संस्थांच्या कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न देता, सरकारने आपल्या ताब्यात घेऊन ती विकासकार्याकडे व जनकल्याणासाठी उपयोगात आणावी असे भाऊसाहेबांचे ठाम मत होते. यासंबंधी विधेयक 10 सप्टेंबर 1949 रोजी चर्चेकरिता आले. त्यावर भाषण करतांना त्यांनी वरील मत प्रदर्शित केले. लोकांनी धार्मिक भावनेने व श्रद्घेने दिलेले पैसे धार्मिक विश्वस्त मंडळाचे सदस्य स्वत:च्या स्वार्थासाठी वापरतात. असे दिसून येते. त्यापेक्षा हा निधी शिक्षणासारख्या कल्याणकारी कार्यावर खर्च करण्याकरिता सरकारने ताब्यात घेतला तर सर्वसामान्य जनता सरकारला दुवाच देईल, अशा प्रकारचे विचार भाऊसाहेबांनी 1935-36 मध्ये मध्यप्रांत वर्हाडच्या कायदेमंडळातही मांडले होते. आज अनेक मोठ्या देवस्थानाकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी अनेक देवस्थानातील विश्वस्त त्या संपत्तीचा स्वत:च्या स्वार्थाकरीता गैरवापर करीत आहे. म्हणून देवस्थानाचा निधी सरकारने ताब्यात घ्यावा, अशी अलीकडची सरकारची व समाजसुधारकांची भूमिका लक्षात घेता, भाऊसाहेबांचे विचार किती दूरदृष्टीचे होते, याची खात्री पटते.</div>
<div style="text-align: justify;">
8 एप्रिल, 1948 ला राष्ट्रीय सैनिक दलासंबंधी चर्चेला आलेल्या विधेयकावर भाषण करताना भाऊसाहेबांनी काही विधायक सूचना केल्या. लष्करी शिक्षण हे केवळ शाळा-कॉलेजातील मुलामुलींपुरते मर्यादित न ठेवता, राष्ट्रातील सर्व तरूण-तरूणींना देता येणे, हे स्वतंत्र भारतात अत्यंत आवश्यक आहे, असे भाऊसाहेबांचे मत होते. लष्करी शिक्षण फक्त लढण्याकरिताच द्यावयाचे नसून त्यामुळे तरूणांत अनुशासन, संघटन कौशल्य, राष्ट्रप्रेम इत्यादी गुण उत्पन्न होऊन चारित्र्यसंवर्धन होते. याबद्दल जनतेची खात्री पटली आहे, असे भाऊसाहेबांनी या विधेयकावर बोलताना प्रतिपादन केले. यावरून भाऊसाहेबांना भारतातील तरूण हा शिस्तप्रिय आणि राष्ट्रप्रेमी अपेक्षित होता.</div>
<div style="text-align: justify;">
भारतीय संविधान तयार झाल्यावर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानावरील समारोपीय भाषणात भाऊसाहेबांनी संविधानावरील आपली प्रतिक्रिया प्रभावीपणे व निर्भिडपणे मांडली. संविधानसभेने स्वतंत्र व सार्वभौम भारताला साजेशे संविधान अतिशय परिश्रमपूर्वक तयार केले. याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. पण त्याचबरोबर संविधानातील काही उणिवांवर अचूक बोट ठेवले. या संविधानात विशेषत: सामाजिक व धार्मिक बंधनांचा विचार झाला नाही. म्हणून त्यांना हे संविधान निराशाजनक वाटले. एक बलशाली व सुदृढ राष्ट्र निर्माण होण्याकरिता काही धार्मिक बंधाची आवश्यकता असते. हे बंध सर्व राष्ट्रांना व जनसमुदायांना उपकारक ठरले आहेत, असे भाऊसाहेबांचे मत होते. या संविधानात या बंधाचा अधिक्षेप केला गेला आहे, असे सांगून धर्मबंधाविषयी ते म्हणाले, ‘आपले संविधान धर्मनिरपेक्ष करण्याच्या अट्टाहासाखाली आपण हिंदू धर्माची पुसटशी छायादेखील प्रतिबिंबित होऊ दिली नाही. जरी आपण भारताला हिंदू राज्य म्हणून घोषित केले असते तरी आपले संविधान आपल्या हवे इतकेच, धर्मनिरपेक्ष राहिले असते. कारण जगाच्या पाठीवर हिंदू धर्माच्या इतके धार्मिकता निरपेक्ष स्वरूप दुसर्या कोणत्याही धर्माचे नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी निर्मिलेल्या व वाडवडिलांनी आचरून आपणापर्यंत पोहोचविलेल्या या धर्माचा उपयोग भावी भारत राष्ट्राच्या उभारणीकडे एकात्मतेकडे करून घ्यावयास हवा होता. परंतु दुर्दैवाने भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी भाऊसाहेबांच्या या विचारांकडे दुर्लक्ष करून भारताला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित केले असले तरी हिंदूराष्ट्राच्या संविधानाचे स्वरूप हे धर्मनिरपेक्षच राहिले असते हे येथे नमूद करावेसे वाटते.</div>
<div style="text-align: justify;">
या संविधानात इतर मागासलेल्या जातींच्या हितसंबंधाचा म्हणावा तितका विचार झालेला नाही. याबद्दल भाऊसाहेबांनी खेद व्यक्त केला. अनुसूचित जाती व जमाती यांच्यासारखीच दयनीय परिस्थिती इतर मागासलेल्या जातींची असल्यामुळे, त्या विशिष्ट जाती-जमातींना लाभलेल्या सवलती इतर मागासलेल्या जातींच्याही वाट्यास येऊन त्या आगामी कायद्यात व स्वीकारल्या जाणार्या धोरणात प्रतिबिंबित होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मंडल आयोगाच्या शिफारशीवरून इतर मागास जातींना ज्या काही सोयी-सवलती मिळाल्या, त्या रूपाने भाऊसाहेबांची ही आशा काही प्रमाणात पूर्ण झाली असे म्हणता येईल. अर्थात त्या विशिष्ट जाती-जमातींना जी संविधानात्मक संरक्षणे प्राप्त झाली. ती इतर मागासजातींना अजूनही प्राप्त झाली नाही, हे खेदाने म्हणावेसे वाटते. डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, अनंतशयनम अय्यंगार, एच. व्ही. कामथ, मिनू मसानी, एन. गोपालस्वामी अय्यंगार, प्रोफेसर रंगा, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के. एस. मुन्शी, बी. एन. राव., के. टी. शाह, एच. सी., मुखर्जी, टी. टी. कृष्ण म्मचारी, ठाकूरदास भार्गव, महावीर त्यागी, ब्रिजलाल बियाणी इत्यादी विद्बान व थोर सदस्य विधानसभेत होते. यापैकी बहुतेकांनी भाऊसाहेबांच्या वक्तव्याची व त्यांच्या जनहित दृष्टीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी तर घ्घ्हरिजनादी, पददलित जाती व्यतिरिक्त भारतात इतरही काही अत्यंत दुर्लक्षित असहाय व दलित अशा जाती आहेत. याची जाणीव संविधानसभेतील बहुसंख्य सदस्यांना डॉ. पंजाबरावांमुळे झाली. म्हणून त्यांच्याही प्रगतीकरिता संविधानात काही तरतुदी करून ठेवता आल्या.’ या आशयाचे उद्गार आपल्या समारोपीय भाषणात काढले. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी 11 वाजून 10 मिनिटांनी मोठ्या उत्साहाने संविधान सभेने संविधान मान्य केले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधानावर बैठक बोलाविण्यात आली. यावेळी 284 सदस्य हजर होते. अंतिम संविधानावर 284 सदस्यांनी स्वाक्षर्या केल्या. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांचीही स्वाक्षरी आहे. यावरून भाऊसाहेबांनी स्वतंत्र भारताच्या संविधाननिर्मितीत दिलेल्या महत्वपूर्ण आणि अमूल्य योगदानाची साक्ष पटते. संविधान निर्माण प्रक्रियेत 299 सदस्य असले तरी सक्रिय सहभाग घेऊन योगदान देणारे मोजकेच होते. अर्थातच डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब हे एक होते. संविधान निर्माण प्रक्रियेतील भाऊसाहेब हे एक शिल्पकार आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.</div>
<div style="text-align: justify;">
________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
- प्रा. डॉ. श्रीराम येरणकर, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-7061543337215627702014-12-21T07:28:00.000-08:002014-12-27T21:03:58.593-08:00मी पाहिलेले भाऊसाहेब!___श्री अशोकराव कोंडे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
माझा 70 प्रतिशत समाज ग्रामीण भागात राहतो. माझा भारत कृषिप्रधान आहे. माझा समाज कृषक असून तो कुणबी आहे व ह्या स्वतंत्र भारतात त्याची स्थिती अत्यंत शोषणीय आहे. मी कृषीमंत्री म्हणून ह्या 70 प्रतिशत भारतीयांचे नेतृत्व माझेकडे आहे. ह्या माझ्या ग्रामीण जनतेचे अज्ञान दूर झाल्याशिवाय त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नाही. जोपर्यंत ह्या समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे भगिरथ प्रयत्न होणार नाहीत. तो पर्यंत खर्या अर्थाने आम्ही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारल्याचा यज्ञ पूर्ण होणार नाही, असे वक्तव्य करणारे भाऊसाहेब शेतकरी शिक्षित झाला पाहिजे. त्यांची मुलं डॉक्टर, इंजीनियर झाली पाहिजेत. हे स्वप्न उराशी बाळगून बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात हात घालून भाऊसाहेब पुढे सरसावले व या भारताच्या मातीत स्वत:ला झोकून दिले.</div>
<div style="text-align: justify;">
समाजबांधवांनी किती तळमळ, त्यांच्याबद्दल असलेली कळकळ त्यांच्या प्रत्येक कृतीमधून दिसत होती. मी एका केवळ 500 ते 600 लोकसंख्या असलेल्या लहानशा खेड्यात एका सर्वसाधारण शेतकर्याच्या घरात जन्माला आलो. दुर्दैवाने वयाच्या 6-7 व्या वर्षीच आई व वडिलांपासून पोरका झालो. अत्यंत दरिद्री अवस्थेत वाढलो. इलीचपूर सारख्या गावांपासून 5 किलोमीटरव असलेल्या शहरात सिटी हायस्कूलमध्ये कसाबसा 1957 साली मॅट्रीक पास झालो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे कीर्तन ऐकणे हा त्यावेळेचा मनोरंजनाचा भाग होता. विजेचे दिवे, आकाशवाणी, बस वा रेल्वे प्रवास ह्या बाबी जादूटोणा वा चमत्कार वाटत होत्या. ह्या थोरामोठ्यांची कीर्तने ऐकून आपण शिकलो पाहिजे. हा ध्यास मनात भरला गेला होता. मॅट्रीक पास झालो परंतु आणखी पुढे शिकलो पाहिजे. भाऊसाहेब देशमुख नावाच्या एका महात्म्याने अमरावती शहरात ज्ञानपीठ उघडले आहे. ज्याला शिकायचे आहे त्याने खुशाल अमरावतीला जावे व पुढील शिक्षण घ्यावे असे सर्वत्र सांगितले जात होते नव्हे तशी दवंडीच पिटली जात होती.</div>
<div style="text-align: justify;">
इलीचपूर ते अमरावती बसने जायला पाच आणे तिकीट होती. गेल्या वर्षभरात (खाऊचे व जत्रेत खर्च करायला मिळालेले) जतन केलेले चार रुपये खिशात खुळखुळत होते. आपले पुढील शिक्षण होण्यास ते पुरेसे वाटले व मी उमरावतीची तिकीट काढली. मळलेला पांढरा सदरा व फाटलेली खाकी रंगाची हाफ पँट व त्यावर चढवलेला करदोडा, पायात चप्पल नाही, अशा अवस्थेत खिशात चार रुपयांची भक्कम पुंजी टाकून सरळ उमरावती गाठली. मोटार स्टँड वरून विचारत विचारत मला सायन्समध्ये अॅडमिशन घ्यायची आहे म्हणून किंग एडवर्ड कॉलेज, आताचे विदर्भ महाविद्यालय गाठले. चार आण्याचा फॉर्म घेतला व काऊंटरवर अॅडमिशन हवी म्हणून देशपांडे नावाच्या बाबु पुढे धरला. मॅट्रीकमध्ये हायर सेकंडक्लासमध्ये पास असून फिजिक्स व केमेस्ट्री ह्या दोन विषयांत प्राविण्य मिळविले आहे तेव्हा मला सायन्स फॅकल्टीला प्रवेश द्या असे ठणकावून सांगितले, परंतु देशपांडे बाबूने तिरस्काराच्या रुपात तितक्याच वेगाने झिडकारले. ‘काहून तिकडे तुमच्या त्या भाऊसाहेबांच्या कॉलेजात जावून का नाही तडफडला?’ अहो पण सर, शिवाजीमध्ये सायन्स नाही ना... तेव्हा, मग सांगाना तुमच्या भाऊसाहेबांना सायन्स उघडा म्हणून, आणि मी तर ऐकलं, त्या देशमुखांनी तुम्हा दळभद्रींसाठी यंदा सायन्स सुरू केला ! असे म्हणून फॉर्म माझे अंगावर भिरकावला मला वाटले देशपांडे बाबू खरं बोलत असावा. तो खोटं कशाला सांगेल? मी निमुटपणे शिवाजी कॉलेजकडे चालू लागलो. रस्त्यात एक सद्गृहस्थ भेटलेत. ते तेथे जवळच राहत असावेत. त्यांना शिवाजी कॉलेजचा पत्ता विचारला. त्यांनी माझा खेडूत अवतार बघून प्रेमळपणे वाट दाखविली, परिचय दिला, म्हणाले माझ नाव ढोरे गुरुजी. मी इथे समोरच राहतो. तुला गरज वाटली तर माझेकडे जरूर ये. कॉलेजला दौलतराव गोळे भेटतील त्यांना जाऊन भेट, ते तुला मदत करतील. मला खूप बरे वाटले. हुरूप आला. मी शिवाजी सायन्स कॉलेजच्या आवारात शिरताच थेट गोळे काकांकडे गेलो, मला सायन्य कॉलेजला अॅडमिशन हवी. मी गावाकडून आलो आहे. अरे पण आपल्याकडे केवळ आर्ट व कॉमर्स कॉलेज आहे. सायन्स नाही. मी ऐकायच्या तयारीत नव्हतो. नाही तुम्ही खोटं बोलत आहात मला देशपांडे बाबूंनी सांगितले आहे. मी त्यांना हकीकत विशद केली. गोळे काका बुचकळ्यात पडले. इतक्यात बाजुच्या प्राचार्य एन. सी. देशमुख ह्यांच्या दालनातून भाऊसाहेब व प्राचार्य बाहेर आले. त्यांना सामोरे जावू म्हणून रजिस्टार गोळे सुद्घा चटकन पुढे झाले. त्यांचे मागे मी उभाच होतो.</div>
<div style="text-align: justify;">
कोण हा पोरगा ? अॅडमिशन साठी आला असावा म्हणून भाऊसाहेबांनी विचारपुस केली. काय नाव तुझं? घेतली का अॅडमिशन? माझं नाव कोंडे, मला सायन्सला ऍडमिशन हवी; परंतु हे सर मला नाही म्हणतात. मी तक्रार केली, गोळे काकांनी माझी हकीकत भाऊसाहेबांना सांगितली. भाऊसाहेबांनी डोळ्यांच्या भुवया उंचावल्या. बाबू, खरंच आपल्याकडे सायन्स कक्ष नाही. पण आता यंदा मात्र तुला आर्ट किंवा कॉमर्सला प्री. युनी मध्ये ऍडमिशन घ्यावी लागेल. पुढील वर्षी तुला सायन्सला ऍडमिशन देऊ. जमेल ना? मी थोडा विचार करून ठीक आहे म्हणालो कारण माझेकडे दुसरा पर्यायच नव्हता व कॉमर्सला अॅडमिशन द्या म्हणालो. 10 रू भरून अॅडमिशन घेण्यास भाऊसाहेबांनी फर्माविले, परंतु भाऊसाहेब, माझे जवळ फक्त 3 रू. आहेत बाकीचे नंतर देईन म्हणालो. भाऊसाहेब थांबले, म्हणाले, शहाणा आहेस राहू दे तुझे 3 रु. तुझ्याजवळ भाऊसाहेबांनी खिशातून 10 रु. ची नोट काढली. गोळे काकांच्या हातात 10 रु. देत म्हणाले, याला अॅडमिशन द्या व फ्री शिपचा फॉर्म भरून घ्या आणि त्याची श्रद्घानंद होस्टेलवर निवासाची व्यवस्था करून द्या. असे बोलून भाऊसाहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व पुढे निघून गेले.</div>
<div style="text-align: justify;">
10 रु. मध्ये माझी अॅडमिशन झाली व श्रद्घानंद होस्टेल वर 15 रु. महिन्याला देऊन निवास व बोर्डींगची सोय होती. परंतु मला तेथेही पूर्ण सवलत देऊन व्यवस्था करण्यात आली. ह्या 10 रु. मध्ये शिवाजी कॉलेजमधून मी बी. कॉम. झालो 1959-60 मध्ये भाऊसाहेबांचा हीरक महोत्सव झाला. मी प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत होतो. रुरल इंस्टिट्युटच्या प्रत्येक कार्यक्रमास हटकून भाऊसाहेब हजर राहत. आम्हा मुलांच्या पाठीवर थाप मारत. कुणाच्या डोक्याला तर कुणाच्या खांद्याला स्पर्श करीत. त्यांचा प्रेमळ स्पर्श अजूनही अंगावर शहारे आणतो. भाऊसाहेबांचे स्विय सहायक कोंडे होते. त्यांना मी त्यांचाच कुणीतरी नातलग असावा म्हणून म्हणाले, काय रे कोंडे, अभ्यास वगैरे करतो ना? नाहीतर आमच्या कोंडेच नाव घालवशील? आणि हसुन पुढे निघून गेले. भाऊसाहेब मला ओळखतात म्हणून माझी नेहमी कॉलर ताठ असायची.</div>
<div style="text-align: justify;">
एकदा दिवाळीला सर्व विद्यार्थी आपआपल्या गावी निघून गेले होते. होस्टेलवर आम्ही केवळ 7-8 मुलं होतो. घरी कोण नव्हते. गावी जाण्याची ओढ नव्हती. आई बाप नसलेली अनाथ बालके आम्ही. होस्टेलवरच राहणं पसंत केले. परंतु अचानक निरोप आला, भाऊसाहेब होस्टेलकडे यायला निघाले. आम्ही 7-8 मुलं बाहेर आलो. आम्हाला दिवाळी असून भाऊसाहेब आल्याचे आश्चर्य वाटले. आम्हाला वडील भेटायला आल्याचा आनंद झाला. भाऊसाहेब आलेत भाऊसाहेबांच्या सोबत आणखी एक फेटा बांधलेले गोरेपान राजसिंह असे मित्र होते. त्यांचे नाव दाजीसाहेब पटवर्धन होते. दिवाळीसारख्या सणाला तुम्ही होस्टेलवर आहात म्हणून तुम्हाला भेटायला आम्ही आलो. तुमच्यासारखेच, आमच्या तपोवनला मुले, मुली आहेत. तुम्हाला कुणी नाही, परंतु त्यांना सर्व नातेवाईक आहेत, तरीही ते घरी जाऊ शकत नाहीत. कारण ते कुष्ठरोगी आहेत. ते बरे झाले आहेत तरीही अनाथ आहेत. त्यांना तुमची गरज आहे. त्या मुली तुम्हाला भाऊ म्हणून तुमची वाट बघत आहेत. तुम्ही तपोवनला या. शिवाजीराव पटवर्धन ऊर्फ दाजी साहेबांनी आमच्या पेक्षा दु:खी असलेल्या तपोवनातील मंडळीची व्यथा आम्हाला सांगितली. भाऊसाहेबांनी सुद्घा दुजोरा दिला. तेव्हा आम्हाला फारसं कळलं नाही. भावना समजल्या नाहीत. परंतु आज उलगडा होता आहे. कीती खोलवर विचार करीत होते हे महान महात्मे!</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांना जबरदस्त दुरदृष्टी होती. त्यांना सतत ग्रामीण शेतकरी व शेतमजुरांची काळजी सलत असावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहरात असणार्या शोषित कामगारांची नेहमी बाजू मांडत परंतु तितक्याच हिरीरीने शेतमजुरांचा प्रश्न भाऊसाहेब पुढे करीत (अर्न अँड लर्न) कमवा व शिका हे भाऊसाहेबांचे त्यवेळेच ब्रीद वाक्य. दिवसभर काम करणार्या गरीब मजुरांना शिकता आले पाहिजे. त्यांना रात्रीच्या शाळेत शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून जवाहर एज्युकेशन सोसायटी नागपूर ही त्यांचीच संकल्पना होती. जवाहर सोसायटीचे रात्र शाळा जन्माला आल्या. श्रीमंत्र घनवटे हे भाऊसाहेबांच्या प्रभावात होते. बाल मुकुंद अग्रवाल सारखे कार्यकर्ते भाऊसाहेबांच्या आदेशाची वाटच पाहत होते. मी त्यावेळी भाऊसाहेबांच्या कार्यास एक झपाटलेला तरूण होतो व त्यांच्याच मेहरबानीने एम. कॉम. शिकण्याकरिता नागपुरला गेलो असता ह्याच जवाहर नाईट हायस्कूलचा शिक्षक म्हणून लागलो होतो. मला आठवते, 1963-64 साल असावे. जवाहर एज्युकेशन सोसायटी धंतोली ह्या संस्थेच्या जवाहर नाईट स्कूल, सरस्वती नाईट हायस्कूल ह्या शाळांचे संयुक्त स्नेहसंमेलन होते. भाऊसाहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. मंचावर त्यावेळचे तरुण शिक्षणमंत्री श्री मधुकरराव चौधरी, आमदार आचार्य अत्रे, सौ. सुमतीदेवी घनवटे ही मंडळी उपस्थित होती. सोसायटीचे सचिव मोतीराम पावडे हे भाऊसाहेबांचे आवडते कार्यकर्ते होते. भाऊसाहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ह्या ग्रामीण भागातून पोटाची खळगी भरायला आलेल्या बाल मजुरांना, घरात काम करणार्या, मोलमजुरी करणार्या बायांना, मुलींना रात्रीच्या शाळा. ज्ञानदान करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करीत आहेत. त्या दारिद्र्य रेषेखालील, मजूर, कामगार ह्यांना ज्ञानगंगा खुली असली पाहिजे. शासनाने ह्या शाळांना मान्यता देणे अत्यंत जरूरीचे आहे. ह्या भारत देशात आज मोतीराम पावडे सारखे तरुण नि:स्वार्थी कार्यकर्ते हवे आहेत. एका जमीनदाराचा शिकलेला हा तरुण मुलगा, रात्रशाळा चालवून माझेच स्वप्न पूर्ण करण्याचा आटापिटा करीत आहे. मुक्त विद्यापीठाची कल्पना त्यावेळी भाऊसाहेबांच्या मनात घोळत असावी. भारताचा शेतकरी हा अन्नदाता आहे. तो सुखी असणे, समृद्घ असणे, सुशिक्षित असणे, त्याची मुलं त्याला आधुनिक शिक्षण घेतलेली, त्याला साह्यभूत अशी तंत्रज्ञ असलेली निर्माण झाली तरच हा भारत खर्या अर्थाने समृद्घ असा स्वतंत्र भारत म्हणता येईल व महात्मा गांधींच्या विचारांची आम्ही स्वप्नपूर्ती केली असे म्हणता येईल.</div>
<div style="text-align: justify;">
आम्ही परमेश्वर बघितला नाही. परंतु भाऊसाहेब देशमुख ह्यांना बघितले आहे. त्यांचे विचारधन आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवित आहे. जीवन समृद्घ व आनंदमय करीत आहे. आमच्यातला माणूस जागा करीत आहे. गाडगेबाबा व तुकडोजी महाराज म्हणतात त्या प्रमाणे, भाऊसाहेबांच्या प्रेरणेतून आम्ही आमच्यातला माणूस दाखविण्यास समर्थ ठरतो आहोत व परमेश्वर रुपाने भाऊसाहेब अनुभवतो आहोत व म्हणुनच त्यांच्याविषयी – </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
दिव्यत्वाची जेथे प्रचिती </div>
<div style="text-align: justify;">
तेथे कर माझे जुळती!</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
श्री शिवाजी, शिक्षण महाविद्यालय, अमरावती - श्री अशोकराव कोंडे, जनसंपर्क अधिकारी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-18477364033783578312014-12-21T07:25:00.000-08:002014-12-27T21:04:36.101-08:00सर्वंकष कर्तृत्वाचा महामेरू___डॉ. रवींद्र शोभणे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
काही माणसं एकट्यानं मोठी होतात, काही माणसांना समाज मोठं करतो, तर काही माणसांमुळं समाज मोठा होतो. ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या परंपरेत अभिमानानं ज्या नावाचा उल्लेख करावा लागतो ते नाव म्हणजे शिक्षणमहर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे होय. आपल्या कर्तृत्वाने हे नाव दिवसेंदिवस वाढत आहे. या नावाच्या प्रभेमुळे आणि कृपाप्रसादामुळे अनेकांच्या आयुष्याचं सोनं झालं. परंपरेनं आणि समाज चौकटीनं ज्या वर्गाला या व्यवस्थेत शिक्षणापासून वंचित राहावं लागलं, अशा बहुजनसमाजाच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा आणण्याचे भगिरथ प्रयत्न करणारे म्हणून, इथल्या शेतकर्यांच्या दैन्यावस्थेला नेमकेपणाने ओळखून त्यांचा स्तर सर्वार्थाने उंचावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आणि विवेकवादी दृष्टिकोनातून विचार करणारे समाजसुधारक म्हणून आजची पिढी भाऊसाहेबांकडे अतीव श्रद्घेनं आणि आदराने पाहते, हे घटित सामाजिक स्थित्यंतराच्या या प्रवासात अधिक मोलाचं आहे.</div>
<div style="text-align: justify;">
अमरावती जिल्ह्यातील पापळसारख्या एका खेडेगावात जन्मलेल्या भाऊसाहेबांनी स्थळाच्या आणि काळाच्या सीमा उल्लंघून शिक्षणासाठी जो संघर्ष केला, त्यातुनच त्यांच्या संघर्षशील व्यक्तिमत्वाला आकार प्राप्त झाला. त्या काळात खेड्यापाड्यातल्या मुलांना शिक्षणासाठी जे अथक परिश्रम करावे लागायचे, त्याचा अनुभव बालपणीच त्यांना आला होता. महात्मा जोतीराव फुल्यांनी शिक्षण ाचं महत्त्व - विद्येविना मती गेली. या वचनातून विषद केलं होतं, तोच वसा भाऊसाहेबांनी स्वीकारला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातला हा काळ खर्या अर्थाने प्रबोधनाचा आणि सामाजिक पुनर्रचनेचा काळ होता. एकीकडे ब्राह्मण समाजातील अनिष्ट रूढी-प्रथा-परंपराविरुद्घ लढणारे ब्राह्मण समाज सुधारक होते, इंग्रजी सत्तेविरुद्घ पेटून उठलेले सवर्णीय क्रांतिकारक होते, त्याच काळात अंत्यजांचा, बहुजन समाजाचा सर्वार्थाने विकास करण्यासाठी आपले आयुष्य झोकून देणारे बहुजन समाजातील थोर विभूती होत्या; त्यांचे अग्रणी म्हणून आपल्याला म. फुल्यांना हा मान द्यावा लागेल. इंग्रजी सत्तेची भारतात रुजलेली मुळं उखडून फेकून तिथे पुन्हा हिंदू राष्ट्र (चातुवर्ण्याधिष्ठित समाज) निर्माण करण्याचे काही बंडखोर प्रयत्न तत्काळी झाले. (1857 चे बंड), पण ते अपयशी झाले. कारण बंडखोरीची आणि नवराष्ट्राची या क्रांतिकारकांची दृष्टी इतिहासात रमणारी होती. त्यामुळे या बंडखोरीची साद भारतातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचू शकलीच नाही. ती साद घालण्यासाठी जो मार्ग अधिक प्रभावी होता, त्या शैक्षणिक क्रांतीचा महामार्ग तत्कालीन बहुजनसमाजातील समाजसुधारकांनी अवलंबिला, अक्षर शत्रू असलेल्या या समाजाला अक्षरांची ओळख करून दिली, त्यामुळेच या समाजाच्या मनीमानसी अस्मितेची भावना जागृत झाली. हे बीज महात्मा जोतीरावांनी लावले. त्यातूनच पुढे राजर्षि शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील (रयत शिक्षण संस्था, कोल्हापूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पीपल्स एज्युकेशन सोसायटी, औरंगाबाद) आणि डॉ. पंजाबराव देशमुख (श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) असे शिक्षण देणारे वटवृक्ष उभे राहिलेत. या तिन्ही शिक्षणमहर्षींची प्रेरणा आणि श्रद्घास्थान म. फुले होते हे यातूनच स्पष्ट होते.</div>
<div style="text-align: justify;">
योगायोग म्हणता येईल किंवा, जाणीवपूर्वकही केलेली कृती म्हणता येईल; पण भाऊसाहेबांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या घटनांचे साम्य म. फुलेंच्या लौकिक जीवनाशी नाते सांगणारे आहेत. त्यातील एक महत्वपूर्ण घटना म्हणजे म. फुलेंच्या जन्मशताब्दी वर्षात भाऊसाहेब विमलबाईंशी विवाहबद्घ झाले ती 26 नोव्हेंबर 1927 रोजी भाऊसाहेबांचा विवाह झाला होता आणि म. जोतीराव फुलेंची जन्मशताब्दी 28 नोव्हेंबर 1928 मध्ये संपन्न झाली होती. तसाच आणखी एक योगायोग म्हणजे 1831 हे सावित्रीबाई फुलेंचं जन्मवर्ष आणि 1931-32 या वर्षात भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची अमरावतीला स्थापना केली. आणखी एक योगायोगा शोधायचा तर म. फुलेंनी शिवाजी महाराजांवर तीस पानी पोवाडा लिहिला. शिवाजी महाराज हे म. जोतीराव फुलेंचे दैवत. भाऊसाहेबांनीही शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानले आणि आपल्या शिक्षणसंस्थेला त्यांचे नाव दिले. पश्चिम महाराष्ट्रात ज्या शिवाजी महाराजांची हयात गेली, त्यांचे कार्यकर्तृत्व फुलले, त्या प्रांतात त्यांच्या नावाने एवढे मोठे प्रतिष्ठान कुठे उभे राहिल्याचे दिसत नाही. याचाच अर्थ भाऊसाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या दिशांची आखणी करताना कुठेही प्रांतभेद वा सीमाभेद ठेवला नाही. उलट त्यांनी शिवाजी महाराजांचे मोठेपण, त्यांची दुरदृष्टी ओळखूनच आपल्या शिक्षणसंस्थेला त्यांचे नाव बहाल केले, हा भाऊसाहेबांचा द्रष्टेपणा तेवढाच महत्त्वाचा वाटतो.</div>
<div style="text-align: justify;">
शिक्षण, समाजकारण, राजकारण हे मराठी समाजाला उन्नत करणारे आणि प्रगतीच्या दिशा दाखविणारे क्षेत्रे भाऊसाहेबांच्या जिव्हाळ्याची क्षेत्रे होती. समाजकारणाला आणि शिक्षणाला खर्या अर्थाने बळ प्राप्त व्हायचे असेल तर राजकीय सत्ता हातात असणेही तेवढेच गरजेचे आहे, हेही त्यांनी ओळखले होते. त्यामुळेच ते 1931 पासूनच भारतीय राजका रणाच्या मध्यप्रवाहात सामील झाले. 1931 साली मध्यप्रांत वर्हाडच्या मंत्रीमंडळात सर्वात तरुण मंत्री म्हणून (वय वर्षे 33) ते सहभागी झाले. पुढे 1952 ते 1962 ही दहा वर्षे ते स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळात पहिले कृषिमंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकर्यांसाठी जे मोलाचे कार्य केले ते निश्चितच अपूर्व म्हणावे लागेल. विचारांची एवढी मोठी झेप आणि काळाच्या पुढे जाऊन निर्णय घेण्याची बौद्घिक कुवत असलेले भाऊसाहेब हे एकमेव कृषिमंत्री होते, असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरु नये. त्यांच्या विचारांना पुढे ठेवून नंतरच्या कृषिमंत्र्यांनी शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर आज होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या निश्चितच टळल्या असत्या.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांची बुद्घिमत्ता आणि प्रतिभा ही चतुरस्त्र होती. ते जसे कृषिपंडित होते, शिक्षणतज्ज्ञ होते, राजनीतिज्ञ होते, तसेच ते अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित आणि धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा वैचारिक आणि आधुनिकतेच्या अंगाने विचार करणारे धर्मज्ञही होते; The origin and Development of Religion in vedic literature (वैदिक वाङमयातील धर्माचा उदय आणि विकास) हा प्रबंध लिहून त्यांनी वैदिक वाङमयाचा आधार घेऊन धर्माची जी नव्याने मांडणी केली, ती किती महत्त्वपूर्ण आहे, ते प्रस्तुत प्रबंध वाचून जाणवते. त्यासंबंधी भाऊसाहेबांचा विचार पुढे ठेवता येईल.</div>
<div style="text-align: justify;">
A religion is a social institution, having a set of principles beliefs and practices and certain more or less imperative rules of conduct. Which are in accordance with those principles, doctrines and beliefs and with aims at furtherin human happiness. (Page No. 18 : The origion and Development of religion in Vedic literature.)</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी वैदिक धर्माचा विचार करताना तो बौद्घिक आणि तार्किक पातळीवर केला आहे. अंधश्रद्घेची आणि भाविकतेची पुटं बाजूला सारून धर्मासंबंधी असा विचार करणे सोपे नाही.</div>
<div style="text-align: justify;">
कायदेतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ म्हणूनही भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. भारतीय संविधानाच्या घटना समितीचे सदस्य म्हणून भाऊसाहेबांनी केलेले कार्यही अतिशय मोठे आहे. 1935 च्या कायद्याने दिलेल्या मर्यादित मताधिकारानुसार निवडण्यात आलेल्या विधानमंडळाच्या सदस्यांनी अप्रत्यक्षरित्या निवडलेल्या प्रतिनिधींना संविधानसभेचे सदस्य म्हणून संविधानाची जडणघडण करण्याची संधी मिळाली त्यानुसार डॉ. भाऊसाहेब देशमुख यांची काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रांत-वर्हाडातून निवड करण्यात आली. 9 डिसेंबर, 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या तीन वर्षांच्या काळात भाऊसाहेबांनी संविधानसभेच्या वादविवादात भाग घेतला. घटनेच्या प्रत्येक कलमाविषयी विचारविमर्श करताना, वादविवाद करताना भाऊसाहेबांचा दूरदर्शीपणा, व्यासंग आणि समाजाभिमुखता यांचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. म्हणूनच घ्घ्डॉ. पंजाबराव देशमुखादी टीकाकार घटना समितीत नसते तर घटना केवळ मुक्या-बहिर्यांचीच ठरली असती. तो केवळ एक कळसूत्री देखावा ठरला असता.’ बाबासाहेब आंबेडकरांचे हे विधान (घटना समितीतील समारोपीय भाषण) भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाची महत्ता पटवून द्यायला पुरेसे आहे.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ भाऊसाहेब देशमुख हे अर्थतज्ज्ञही होते. त्यांनी भारतीय शेतकर्यांच्या व भारतीय शेतीच्या संदर्भात वेळोवेळी जे विचार व्यक्त केले, त्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू अधिक प्रकर्षाने समोर येतो. भारत कृषक समाजाची स्थापना (1955), गोसंवर्धनाच्या संदर्भात भाऊसाहेबांनी 3 नोव्हेंबर 1954 रोजी आकाशवाणीवरून केलेले भाषण, मालमत्ता कराचे केलेले समर्थन (6 एप्रिल, 1948), गृहउद्योगासंबंधी त्यांनी घेतलेली भूमिका किंवा 4 फेब्रुवारी 1949 रोजी लोकसभेमध्ये अधिक धान्य ि पकवा या उपक्रमाच्या संदर्भात भाऊसाहेबांनी केलेले भाषण यातून त्यांचे विचार अधिक गंभीरपणे व्यक्त होतात. आर्थिक नियोजनाच्या संदर्भात भाऊसाहेबांनी नियोजनाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.</div>
<div style="text-align: justify;">
If planning requires anything, it requires the greatest amount of thinking, deliberations, discussions and then recommendations of constructive type.</div>
<div style="text-align: justify;">
आर्थिक स्तरांवरील प्रश्नांचा मागोवा घेताना भाऊसाहेबांच्या डोक्यात भारतीय गरीब शेतकरी आणि विपन्नावस्थेतील शेती हेच घटक प्रामुख्याने असायचे. भाऊसाहेबांच्या या कार्याचा गौरव खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पुढील शब्दांमधून केला आहे.</div>
<div style="text-align: justify;">
‘शेतकर्यांची सेवा करणे सोपे आहे त्यासाठी सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवी आहेत. हे तीनही गुण अंगीकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारताता या युगातला एकमेव असावा, ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवनयज्ञ चेतविला.’ </div>
<div style="text-align: justify;">
महात्मा गांधींच्या या विधानातून त्यांच्या कार्याचे मोठेपण आपल्याला प्रती होते. मोठी माणसे ही हिमनगासारखी असतात. त्यांचा आपल्याला प्रतीत होणारा जो मोठेपणा असतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक भाग हा अगोदर, अदृश्यच राहतो. डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचं मोठेपण हे या प्रकारचं आहे आणि म्हणूनच ते विसाव्या शतकातील थोर पुरुषांच्या मांदियाळीत अग्रक्रमाने उठून दिसतात.</div>
<div style="text-align: justify;">
__________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
-डॉ. रविंद्र शोभणे, मराठी विभाग प्रमुख, घनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-81810933693233316702014-12-21T07:22:00.003-08:002014-12-27T21:05:21.157-08:00कर्तृत्वाचा महामेरू - प्रा. डॉ. रमाकांत वि. ईटेवाड<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आमलांगी विदर्भ मातेच्या सकस कुशीतून अनेक नररत्नांनी जन्म घेतला. संत महंत, विचारवंत, समाजतज्ज्ञ, समाजसुधारक, राजकारणी, देशप्रेमी, कवी, लेखक, तत्त्वज्ञ, धर्मसंस्थापक इत्यादी सोपानदेव चौधरी आपल्या कवितेतून सांगतात </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
धुळाक्षरे पाटीवरी । जेव्हा धुळीतुनी आली ॥</div>
<div style="text-align: justify;">
तेव्हा विद्येची महती । मातीलाही समजली ॥</div>
<div style="text-align: justify;">
विदर्भाच्या मातीमाजी । अवतारे योगी ज्ञानी ॥</div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानवल्लीची लावणी । केली पंजाबरावांनी ॥</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
याच वैभवशाली परंपरा लाभलेल्या विदर्भ भूमीचे श्रीकृष्णालाही आकर्षण वाटावे एवढे पावित्र्य, मांगल्य, आत्मिकसौंदर्य, धार्मिक अधिष्ठान या भूमीला प्राप्त झालेले आहे. त्याच पवित्र अशा भूमीत एकेकाळी अज्ञानरुपी अंध:कारानी कहर माजविला होता. या अंध:कारातून मुक्त करण्याकरिता इथला प्रत्येक व्यक्ती एखाद्या तपस्वी, ज्ञानयोग्याच्या प्रतिक्षेत होता. काळाची गरज आणि सामान्यांची प्रतीक्षा बघून प्रत्यक्ष विधात्याने या भूमीचे ग्रहण सोडविण्याकरिता, पांग फेडण्याकरिता भाऊसाहेबांच्या जन्माची योजना केली असावी. कवी सुरेश भटांच्या कवितेनुसार </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे । </div>
<div style="text-align: justify;">
आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे ॥</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या भूमीचा कायापालट करण्याकरिता या भूमीचे थोर सुपुत्र, विश्वभूषण, कृषिरत्न, प्रखर राष्ट्रवादी, द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, शिवसंस्कृतीचे उपासक, बहुजनांचे कैवारी, भौमर्षी, शिक्षण महर्षी भाऊसाहेबांचा जन्म झाला असावा. तेव्हाच अभिवादनाकरिता राम शेवाळकरांनी आपल्या शब्दांची उधळण केली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शतकांचे साहून शाप । जी मने रापली होती ॥</div>
<div style="text-align: justify;">
आलास थेंब घेऊनी । तू अशा अभाग्यांसाठी ॥</div>
<div style="text-align: justify;">
थरकाप तमाचा करण्या । कोळसे पुन्हा धगधगले ॥</div>
<div style="text-align: justify;">
ज्वालांच्या रक्त फुलानी । तुज पहिले वंदन केले ॥</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या जन्माने पुलकित झालेल्या विदर्भमातेचे ऋण भाऊसाहेबांनी आपल्या कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्वाने फेडले याचे प्रत्यंतर म्हणजे भाऊसाहेबांनी आपल्या कृतार्थ हाताच्या पावन स्पर्शांनी स्थापित केलेल्या ज्ञानतीर्थांची म्हणजे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.</div>
<div style="text-align: justify;">
या संस्थेने अनेकांच्या जीवनाला आकार दिला. आधार दिला. अनेकांची स्वप्ने साकार केलीत, अनेकांच्या मृत आकांक्षांना संजीवनी देऊन पल्लवित केल्यात, अनेकांचे अश्रू पुसलेत आणि अनेकांच्या ओठावर हसू निर्माण केले, दीन-दु:खितांच्या वाट्याला आलेली दु:ख दूर केलीत.</div>
<div style="text-align: justify;">
मानवी जीवनाचे अंतिम ध्येय स्वाभीमानाने जगणे हे आहे. मूल्याधिष्ठित जीवन जगण्याकरिता आत्मविश्र्वास आणि आत्मनिर्भरतेची गरज असते. त्याकरिता ज्ञान आत्मसात करावे लागते. ज्ञान हे केवळ शिक्षणामुळेच मिळू शकते. जर माणूस शिकला नाही तर त्याचे व्यावहारिक नुकसान होतेच; परंतु सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक दृष्टीने देखील तो मागासलेला राहतो. त्यांच्या जीवनातील गडद अशा काळोखातील अंधार नष्ट करण्यासाठी ज्ञानरुपी प्रकाश किरणांचा उदय अत्यंत महत्त्वाचा असतो. हे या क्रांतिसूर्यांनी ओळखले आणि उघड्या-नागड्या बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि तशी शिवतीर्थाच्या निर्मितीतून व्यवस्थाही करुन दिली.</div>
<div style="text-align: justify;">
बजरंग सरोदे आपल्या कवितेत लिहितात</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भव्य दिव्य अन्खरे विदर्भी भाऊ तुम्ही जन्मले ।</div>
<div style="text-align: justify;">
म्हणूनी तुमचे आज पाहिजे गीत इथे गाईले ॥</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पापळसारख्या अतिदुर्गम भागात जन्माला आलेल्या भाऊसाहेबांना आपल्या शिक्षणासाठी अतिशय खडतर अशी पायपीट करावी लागली. पापळ-नांदगाव (खंडेश्वर), पुणे ते इंग्लंड पर्यंत केलेल्या शिक्षण प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सावकार, नातेवाईकांकडून कर्ज घ्यावे लागले. प्रसंगी शेती गहाण ठेवावी लागली. अतिदाहक असा अनुभव पुढील आयुष्यातील शैक्षणिक कार्यासाठी प्रेरक ठरला असावा त्यामुळेच त्यांनी गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना भरपूर मदत केली आणि सर्वांकरिता शिक्षणाचे दालन खुले करून दिले.</div>
<div style="text-align: justify;">
जगजीवनराम यांच्या सहकार्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता काका कालेलकरांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारच्या वतीने चौकशी समिती नेमून अदर बॅकवर्ड कास्टस ची शिष्यवृत्ती मंजूर करून घेतली आणि सरकारी नोकरीमध्ये देखील काही राखीव जागा मंजूर करून घेतल्यात. होतकरू विद्यार्थ्यांसह ज्ञानपीपासू, वृत्तीच्या ज्ञानी उपासकांचा देखील योग्यतेनुसार सन्मान केला. डॉ. वि. भि. कोलते आणि कुसुमावती देशपांडे या दोन्ही प्राध्यापकांच्या नेमणुकीच्या वेळी भाऊसाहेबांनी त्यांची योग् बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. डॉ. ज्वालाप्रसाद हे तत्वज्ञानाचे प्रसिद्घ चिंतक होते. श्री शिवाजी कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक केली. पुढे त्यांची लोकविद्यापीठाच्या कुलगुरुपदी भाऊसाहेबांच्या कृपेने नियुक्ती झाली.</div>
<div style="text-align: justify;">
अशाप्रकारे अनेक यथायोग्य व्यक्तींवर भाऊसाहेबांनी अनेक प्रसंगी उपकार केलेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील.</div>
<div style="text-align: justify;">
काळे नावाच्या विद्यार्थ्यांचा प्रसंग अतिशय बोलका आणि तेवढाच हृदयस्पर्शी आहे, या प्रसंगातून भाऊसाहेबांच्या विशाल अशा क्षमाशील हृदयाची प्रचिती येते.</div>
<div style="text-align: justify;">
जगद्गुरू तुकोबांच्या उक्तीनुसार दया क्षमा शांती तेथे देवाची वसती याचा प्रत्यक्ष अनुभव करून देणारा हा प्रसंग आहे.</div>
<div style="text-align: justify;">
काळे यांनी दिल्लीमध्ये शिकत असताना इतर मागासवर्गीयांकरिता मंजूर असलेली शिष्यवृत्ती मिळावी म्हणून भाऊसाहेबांची खोटी सही केली. लोंढे यांनी त्याला पोलिसात देण्याची धमकी दिली तेव्हा लोंढे यांना भाऊसाहेब म्हणाले, तुम्ही त्याला असे धमकावू नका भारतात अनेक लक्षाधीश विनाकारण लाखो रुपयांचे खोटे धंदे करतात वरून शहाजोग बनतात या मुलाने शिकण्यासाठी हा गुन्हा केला म्हणून काय पाप केले? या शिष्यवृत्तीशिवाय त्याला जर शिकताच आले नाही तर त्यात त्याचा काय दोष? जा बाळ निर्धास्तपणे जा, ती सही माझीच आहे, असे मी अधिकार्यांना सांगेन. यापुढे मात्र तू असे करू नकोस. गरीबांचा गुन्हा कोर्टात रचत नाही. या अभयदानातून भाऊसाहेबांची गरीबांप्रती असलेली अपार करूणा दिसून येते. त्यातून न्यायप्रिय, क्षमाशील तसेच कृपाळू भाऊसाहेब आपल्या समोर येतात. ते मधुर केचे यांच्या काव्यपंक्तीनुसार </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पंजाबराव नावाने तेजाग्नि जन्मले होते</div>
<div style="text-align: justify;">
जखमांच्या संगे अमुचे जोडले तयाने नाते</div>
<div style="text-align: justify;">
इंधनापरी तो जळला चंदनापरी तो झिजला</div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानाची टाके ठिणगी, अग्नी न अजूनही विझला</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कुठल्याही व्यक्तीचा, संस्थेचा देशाचा विकास त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञान, साहित्य, कला, प्रतिभा, प्रज्ञा यातील प्रगतीच्या आलेखावरून मोजायचा असतो. या भौतिक विकासासह लौकिक गरजांची पूर्तता झाल्याशिवाय कुठलाही माणूस ज्ञानसाधना कैवा कलास्वादाकडे वळतच नाही. मूल्यवान जीवन जगण्यासाठी त्याला सर्व प्रकारच्या शास्त शाखा आणि विद्येच्या ज्ञानाची जाणीव करून घेणे गरजेचे ठरते आणि गरज ही शोधाची जननी असते. या शोधप्रक्रियेतूनच सर्वस्पर्शी असा विकास साधता येतो.</div>
<div style="text-align: justify;">
भौतिक विकासासह आत्मिक विकासही साधता यावा, विज्ञान आणि आध्यात्म याचा सुरेख समन्वय साधूनच श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली असावी. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानीयाने उभारिले सरस्वतीचे मंदिर </div>
<div style="text-align: justify;">
बहुजनांसाठी तुच पुन्हा उघडले द्बार</div>
<div style="text-align: justify;">
ब्रह्मविद्येचा पिंपळ दारोदार फुलविला </div>
<div style="text-align: justify;">
वेद मुक्या ओठातून अमृताचा बोलविला</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हे विठ्ठल वाघांच्या कवितेतून जाणवते. भाऊसाहेबांचे जीवन म्हणजे अशा अपरिग्रही संन्यासाचे आहे.</div>
<div style="text-align: justify;">
खलील जिब्रानची महासागर नावाची एक रुपककथा वि. स. खांडेकरांनी काही साहित्यिकांवर लिहिलेली आहे.</div>
<div style="text-align: justify;">
खलील जिब्रानच्या या कथेत एक कवी आपल्या आत्म्यासह समुद्र किनार्यावर फिरायला जातो. तिथे त्याला अनेक व्यक्ती दिसतात. भोवतालच्या जगाचं जणू त्यांना भानच नसतं. त्यातील एक व्यक्ती समुद्र किनार्यावर लाटांसोबत येऊन पडलेल्या मृत माशांना आपल्या हातांनी अत्यंत हळूवारपणे उचलून त्यांना पुन्हा जीवनदान देण्याच्या हेतूने समुद्रात नेऊन सोडतो. हा त्या व्यक्तीचा कर्मयज्ञ तिथं अखंड चाललेला असतो. ती व्यक्ती म्हणजे भाऊसाहेब. पांढरी वस्त्र परिधान केलेला हा मुनी अविकसित जनसागराच्या किनार्यावर उभा राहून मृतांमध्ये प्राण ओतण्यासाठी जन्मभर धडपडला.</div>
<div style="text-align: justify;">
असा हा सच्चा मराठी माणूस कुणासमोर कधी वाकला नाही, कधी झुकला नाही, तो झुकला असेल, वाकला असेल पण स्वत:साठी कधीच नाही परंतु पददलित बहुजनांसाठी जन्मभरी मनस्वी तो धडपडला, व्याकुळला, रडला पण सर्व सामान्यांसाठी ते मधुकर वाकोडे यांच्या कवितेनुसार,</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
तुझ्या पावलो पावली उभे असे ज्ञानपीठ ।</div>
<div style="text-align: justify;">
नवा ज्ञानीया पाहता हर्षे पंढरीची वीट ॥</div>
<div style="text-align: justify;">
भावभोळ्या जीवा वाटे तुकयाचा अवतार ।</div>
<div style="text-align: justify;">
मुक्या ओठातून आता वेद काही निरंतर ॥</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी आपल्या जीवनात अनेक प्रसंग अनुभवलेले ते असे - चटणीसोबत भाकरीची चव चाखली आणि राज्योपभोगही घेतला. बैलगाडीतून, खटार्यातून भ्रमण केले आणि जगभर विमानातूनही फिरले. पं. नेहरू सारख्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि बंडू चपराशाच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पं. नेहरू प्रथमच अमेरिकेत गेले होते. इकडे घडना समितीच्या बैठकी सुरू होत्या. अमेरिकेत पत्रकारांनी पंडित नेहरूंना विचारले, तुमच्या मनात सध्या काय सुरू आहे. नेहरू म्हणाले, भारतात गेल्याबरोबर घटना समितीच्या बैठकीत डॉ. पंजाबराव आणि ह. वि. कामथ मला कसे आडवे प्रश्न विचारतील याचा मी सध्या विचार करीत आहे. म्हणजे जीवनात ते बुद्घीमत्तेची अशी उंच शिखरे गाठते झाले आणि त्याचवेळी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाने कारकुनीही पत्करते झाले. असा समतोल राखला.कधी संयम ढळू दिला नाही.</div>
<div style="text-align: justify;">
भारतातील तळागाळातील ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांना शिक्षणाचे दरवाजे बंद आहेत. ही वस्तुस्थिती भाऊसाहेबांना बेचैन करीत होती. यातूनच श्री शिवाजी लोकविद्यापीठाची कल्पना अस्तित्वात आली. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अशी ऋषीतुल्य माणसे जन्माला येतात. ती काळाची गरज असते.</div>
<div style="text-align: justify;">
ना. धों. महानोरांच्या काव्यपंक्तीनुसार, </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या नभाने या भुईला दान द्यावे । </div>
<div style="text-align: justify;">
आणि या मातीतुनी चैतन्य गावे ॥</div>
<div style="text-align: justify;">
कोणती पुण्ये अशी येती फळाला । </div>
<div style="text-align: justify;">
जोंधळ्यात चांदणे लखडून जावे ॥</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अशाप्रकारे भाऊसाहेबांनी या भूमीला प्रकाशमान करण्याकरिता बरेच योगदान दिले. समाजाच्या आत्मविश्वास जागविण्याकरिता शिक्षणाची प्रथम व्यवस्था केली. शेतकर्यांचा गेलेला स्वाभिमान परत मिळावा म्हणून कृषिविषयक अनेक योजना राबविल्यात. राष्ट्राचे कल्याण आणि भविष्य भूमी व जल संपत्तीच्या संवर्धनावर अवलंबून आहे. कृषकांचा विकास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास. कृषी ही औद्योगिकरणाचा आधार आणि आर्थिक विकासाचे भांडवल आहे असे मौलिक विचार सरकार दरबारी मांडलेत. शिक्षण, रोजगार, सामाजिक समता, आर्थिक समता या न्याय्य बाबींकडे भाऊसाहेबांनी आपले लक्ष्य केंद्रित केले आणि समाजाच्या मुख्य व्यंगावर अचूक बोट ठेवले. रक्तबंबाळ झालेल्या सामाजिकतेला आपल्या कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि दुरदृष्टीच्या माध्यमातून आपल्या पुरोगामी आचाराविचारांचा परिचय करून दिला. प्रवाहासोबत राहून तर कधी प्रवाहाच्या विरूद्घ जावून. कधीही आपल्या तात्विक अधिष्ठानाची पायमल्ली होऊ दिली नाही. सर्वस्पर्शी ज्ञान कौशल्यातून परदु:ख प्रवेश करणारे एक ऋषीतुल्य, उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या समोर येते. या संयमी, कल्पक, दयाळू, मायाळू, कृपाळू, क्षमाशील महर्षिला कोटी कोटी वंदन.</div>
<div style="text-align: justify;">
__________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
- प्रा. डॉ. रमाकांत वि. ईटेवाड, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-34957371870452447392014-12-21T07:20:00.003-08:002014-12-27T21:06:14.352-08:00कृषीवलांचा आश्रयदाता __प्रा.डॉ.नंदकिशोर चिखले/प्रा.डॉ.एन.डी.राऊत<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
कृषि प्रधान भारतात शेती व शेतकरी यांना प्रथम प्राधान्य द्यावे असे भाऊसाहेबांनी 3 सप्टेंबर 1949 ला घटना समितीत भाषण करताना सांगितलं. भारतीय कृषि व कृषक याबद्दल मला नितांत आदर वाटतो. मी शेतकर्याला सर्वश्रेष्ठ धननिर्माता समजतो, तो सर्वांचा पोशिंदा आहे म्हणून हा शेतकरी समाज मागे राहू नये व त्याचे कोणी शोषण करू नये यादृष्टीने प्रत्येक शेतकरी पुत्राने शेतकर्यांचा आथिर्क, शैक्षिक, बौद्घिक विकास करण्यासाठी संपर्क असले पाहिजे. असे विधान फक्त भाऊसाहेबांचेच होते.</div>
<div style="text-align: justify;">
पंजाब श्यामराव कदम (देशमुख) यांचा जन्म दि. 27 डिसेंबर 1898 ला शुक्रवारी गीताजयंतीच्या शुभ मुहूर्तावर झाला. या महामानवान शेतकर्यांच्या कर्तव्यासाठी पापळ ता. नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती या खेड्यात अवतार रुपाने जन्म घेतला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील शिक्षण पूर्ण करून 21 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईवरून बोटीने लंडन येथे केंब्रिज विद्यापीठातून बॅरिस्टर व एडिंबर्ग विद्यापीठात एम. ए. ऑनर्स, डी. फिल. या पदव्यांनी अलंकारित होऊन 15 जुलै, 1926 रोजी भारतात मायदेशी परत आले. वयाच्या सुरुवातीचा 28 वर्ष काळ बालपण व शिक्षणात व्यतीत झाल्यावर त्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दि. 9-4-1965 या दिवसापर्यंत सतत 38 वर्षे संपूर्ण भारत व जगभरात फिरले. गरीब देशापासून ते श्रीमंत देशापर्यंत स्वत:साठी सोने, हिरे, मोती, दागदागिने, उच्च प्रतीच्या शोभेच्या वस्तू यापैकी काहीही आणले नाही. त्यांनी त्या ऐवजी आपल्या शेतकर्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, यंत्रसामुग्री, पशुपक्ष्यांच्या सुधारित जाती या मौल्यवान वस्तू राष्ट्राला अर्पण केल्या.</div>
<div style="text-align: justify;">
विलायतेतून (लंड नवरून) अमरावतीला परत आल्यावर स्वत:वरचे कर्ज फेडण्यासाठी वकिली व्यवसाय सुरु केला व तो नायगावकरांचा खटला जिंकून, प्रतिष्ठा व पैसा मिळाला; परंतु भाऊसाहेबांच्या अंतर्मनाला शांती नव्हती, समाधान नव्हते म्हणून त्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर 1927 मध्ये वर्हाड शेतकरी संघाची स्थापना केली व या पक्षात सर्व जाती धर्माच्या शिक्षित व अशिक्षित तरुणांचा संघ उभा केला. त्यानंतरच्या काळात आतापर्यंत अशाप्रकारची संघटना कोणी काढू शकले नाही याचे कारण त्यांचे विचार संकुचित नव्हते. शेतकर्यांच्या कल्याणासाठी 1927 पासुन सुरू केलेले कार्य आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुरू राहिले. दि. 26-11-1927 ला भाऊसाहेबांचा विमलताईंशी शुभ विवाह झाल्यावर विमलताईंच्या सहवासाने शेतकरी संघाचे कार्य अधिक बहरले व त्यात महिलांचा समावेश झाला. भाऊसाहेबांच्या शरीरात बळीराजाचे रक्त बसल्याने त्यांनी राजकारणाचा उपयोग शेतकर्यांच्या भल्यासाठी केला. भाऊसाहेबांचे कृषिकार्य या विषयावर अनेक प्रबंध लिहिल्या जाऊ शकतात. एवढा मोठा दस्तऐवज उपलब्ध आहे.</div>
<div style="text-align: justify;">
सन 1928-29 मध्ये पंजाबातील शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तेथील संघटन करून शेतीची आणेवारी कमी केली. दि. 25-8-1932 ला कर्ज लवाद कायद्याचे सरकारी विधेयक सादर करून 26 जानेवारी 1933 ला आपल्या विद्बत्तेने मंजूर करून 78 हजार एकर शेती सावकारांच्या कर्जातून मुक्त केली व पिढ्यानपिढ्या सुरु असलेले शोषण बंद झाले व याच काळात डॉ. भाऊसाहेब ही असामान्य व्यक्ती आहे हे पंडित नेहरूजींच्या लक्षात आले.</div>
<div style="text-align: justify;">
कापसाच्या व्यवहारात शेतकर्यांची फसगत होऊ नये यासाठी त्यांनी शेतकरी, दलाल व व्यापारी यांच्या सहीने करारपत्रक तयार करून व्यवहारात पारदर्शकता आणली. दि. 30-1-1932 ला कॉटन मार्केट बिल सादर करून कापसाचे अचूक मोजमाप कसे करावे याबाबत स्पष्ट निर्देश दिले. त्यामध्ये शेतकर्याला प्रतिनिधित्व, कापसाला हमी भाव, शेतकर्यांसाठी निवास या सर्व बाबींचा समावेश केला.</div>
<div style="text-align: justify;">
सन 1934 मध्ये कॉटन मार्केट अमरावती येथे विदर्भ शेतकरी परिषद आयोजित केली व शेतकर्यांच्या समस्यांवर चर्चा व रूपरेषा ठरविली. याच काळात सेंट्रल प्रॉव्ही ऍन्ड बेरार या बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर या बँकेकडून सुमारे 4 लक्ष रुपयांचे कर्ज घेऊन लाखो रुपयांच्या शेतकर्यांच्या ठेवी परत केल्या व शेतकर्यांची अमरावती जिल्हा बँक वाचविली. शेतमालकांना कमी व्याजाची हप्ते ठरवून शेती परत केली.</div>
<div style="text-align: justify;">
सन 1952 मध्ये मा. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रथम केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शपथविधी झाल्यावर त्यांचे कार्य जागतिक स्तरावर सुरु झाले. त्या काळात भारतात तांदळाचे उत्पादन कमी असल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा होता, परंतु भाऊसाहेबांनी जपानी भात शेतीचे तंत्रज्ञान लागवडी बाबत पत्र 18-11-1952 ला राष्ट्रपतींना पाठविले व दि. 10 जानेवारी 1953 ला धान शेतीची जपानी पद्घत या विषयावर आकाशवाणीवर भाषण प्रसारित केले. धानाच्या रोपाची पूर्व लागवडी पासून मळणी पर्यंतच्या सर्व सूक्ष्म घटकांचा स्वत: अभ्यास करून कृषि शास्त्रज्ञांना लक्ष्य निर्धारित करून दिले व चमत्कार असा की 1954 मध्ये अतिरिक्त धानाचे काय करावे एवढे विक्रमी उत्पादन झाले. वास्तविक भारतात ग्रामोद्योग केंद्रात हे तंत्र पूर्वीपासून होते, परंतु त्यांचा प्रसार झाला नव्हता. भाऊसाहेबांनी स्वत: 100 धानाचे प्लॉट प्रत्यक्ष बघितले.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचा डॉक्टरेटचा प्रबंध ‘दि ओरिजिन अॅन्ड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर’ या इंग्रजी शीर्षकाअंतर्गत होता व त्यामध्ये संस्कृतमधील वेदांचे समीक्षण होते. कृषि शास्त्राची कोणतीही पदवी न घेता त्यांनी कृषि अर्थशास्त्र यात शेतमालाचे हमी भाव ठरविणे, कृषि हवामानशास्त्र यात पर्जन्यमान याबाबतचे अंदाज घेण्यास सांगितले. कृषि विस्तारशास्त्र, कृषि प्रदर्शनी, मेळावे व कृषि वार्तापत्र कसे लिहावे, मेळावे व प्रदर्शनी कशारितीने आयोजित कराव्यात याचे ज्ञान आम्हाला दिले.</div>
<div style="text-align: justify;">
पीकशास्त्रात कापूस, तूर, भुईमुग, तेलबिया, धान, उस याबाबतचे खत मात्रा, जमिनीचा प्रकार बियाण्यांची निवड हे शिकविले. उद्यानशास्त्रात, नारळ, काजू व आपल्या भागातील फळे तसेच वनंसवर्धनासाठी पाईन, देवदार या वृक्षांची लागवड व आधुनिक नर्सरीचे तंत्रज्ञान सांगितले. भाऊसाहेबांनंतर एकही कृषि विषयातील तज्ज्ञास किंवा मंत्र्यास हे कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य झाले नाही. मध्य प्रदेशातील देवास संस्थानात सारंगपूर साखर शेतकरी संस्था काढून क्रांती घडविली.</div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्यांच्या हितार्थ श्री शिवाजी लोकविद्यापीठाची 1951 मध्ये स्थापना करून 16 सप्टेंबर 1951 ला जनता कॉलेज प्रौढांना व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था काढली व तेथेच 1953 ला शेतीवर काम करू इच्छिणार्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यात आली.</div>
<div style="text-align: justify;">
दि. 12-8-1952 ला केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर ऑक्टोबर 1953 ला सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्यांची परिषद गुजरातमध्ये पोरबंदर येथे महात्मा गांधीजींच्या जन्मगावी घेतली व या परिषदेत सर्क्यूलर लेटर तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त बियाण्याचा वापर करणे या चुकीच्या पद्घतीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले.</div>
<div style="text-align: justify;">
राज्य स्तरावरील शेती व पशुसंवर्धनाबाबत घेतलेले महत्त्वाचे निर्णय, परिषदा, मेळावे याची माहिती प्रत्येक राज्याने दर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत पाठविण्यासंबंधी निर्देश दिले. या सर्क्यूलर लेटर्सची सुरुवात 2 ऑक्टोबर 1953 ला शुभ मुहूर्तावर केली. 1953 साली मधमाशीपालनाचे बंद झालेले कार्य नवीन उत्साहाचे संघटित करून मध गोळा करण्यासाठी आधुनिक यंत्राचा उपयोग करण्यास सांगितले. या यंत्रात मधाची गुणवत्ता उच्चप्रतीची होती. मधमाशीपालनाचा प्रचार करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळांकडून प्रदर्शनी भरविली. ताडापासून गुळ तयार करणे, निंबोळी तेलापासून साबू करण्याचा उद्योग, शिवाजी संस्थेच्या ग्रामोद्योग मंदिरात सुरु केला.</div>
<div style="text-align: justify;">
भारत कृषक समाजाची घटना तयार करून 7-2-1955 ला रजिस्टर्ड केली व 1-4-1955 ते 5-4-1955 कृषक समाजाचे अधिवेशन दिल्लीत तारकटोरा भागात झाले. 1955 साली लाखोसाठी अन्न या जागतिक संघटनेचे अध्यक्षपदाची सुत्रे मिस प्लॉरेन्स यांनी भाऊसाहेबांडे सोपविली व बंगाली चना व शेंगदाण्यापासून सकस आहार तयार करण्याची योजना आखली. 1956 मध्ये कलकत्त्याला आंतरराष्ट्रीय अन्न व कृषि संघटनेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून विवाह करण्यात आली. दि. 12-11-1956 ला अध्यक्षीय भाषणात जगातील अन्नधान्याची स्वयंपूर्णता करण्याबाबत मार्गदर्शन केले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतीस जोडधंदा पशुपालन : </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या शेतीस जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी व मेंढीपालन, वराहपालन हे व्यवसाय शेतकर्यांनी सुरु करण्यासाठी विदेशातून उत्तम प्रतीचे जनावरे व लेंगहार्न जातीची कोंबडी, जर्सी, होलेस्टीन गायी, मेरीनो मेंढी आयात केली. पापळ येथे शामराव बापुच्या घरी राधाबाई एका म्हशीच्या पालन पोषणातून दुधाची विक्री करून आर्थिक मदत संसारात करत असे हे भाऊसाहेबांना ज्ञात होते.</div>
<div style="text-align: justify;">
बारावी अखिल भारतीय पशुप्रदर्शनी बहादुरगड रोहतक हरियाणा येथे दि. 23 ते 28 मार्च 1954 च्या काळात आयोजित केली. अखिल भारतीय कुक्कुट प्रदर्शनी दि. 25 ते 27 मार्च 1954 आयोजित केली व 41000/- रु. बक्षिसे ठेवली. प्रथम राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी कलकत्ता येथे 8 जानेवारी 1961 ते मार्च 1961 आयोजित केली. या प्रदर्शनात रशिया, जापान, जर्मनी या देशांचा सहभाग होता. जगाती ल उत्कृष्ट कोबीचे बियाणे शेतकर्यांना बाजार भावापेक्षा कमी भावात उपलब्ध करून दिले. 14 जानेवारी ते 11 मार्च 1962 पर्यंत राष्ट्रीय कृषि प्रदर्शनीचे दुसरे अधिवेशन मद्रासला घेतले. कृषि प्रदर्शनीत शेतकर्यांना कमी भावात उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करणे याला त्यांचे प्रथम प्राधान्य राहायचे.</div>
<div style="text-align: justify;">
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जागतिक स्तरावरून भारताची कृषि संस्कृती व विदेशातील बलशाली राष्ट्रांचा सहभाग याबाबतचे सर्वात मोठे प्रदर्शन व गणमान्य व्यक्तींची हजेरी नंतर कोणासही शक्य झाली नाही. या कृषि प्रदर्शनाची घोषणा 27 जून 1958 रोजी केली. दिल्लीत 118 एकरावर विभागात असलेले प्रदर्शन भारत कृषक समाजाच्या संघटनेमार्फत 11 डिसेंबर 1959 ते 14-2-1960 पर्यंत एकूण 66 दिवसांचे प्रदर्शन झाले. जागतिक कृषि प्रदर्शनाच्या निमित्ताने जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांना निमंत्रणे गेली. देशविदेशतील असंख्य शेतकरी यांचे चर्चासत्र, तांत्रिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन थोडक्यात ही घटना अविस्मरणीय होती.</div>
<div style="text-align: justify;">
अमरावतीला भाऊसाहेबांच्या हीरक महोत्सवानिमित्त 15 दिवसांचे कृषि व पशुप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले व 26-12-1960 ला दोन लक्ष शेतकर्यांनी उपस्थिती दर्शविली होती.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी विदेशात होणारी गव्हाची शेती उदा. मेक्सिको, कॅनडा व तांदळासाठी फिलीपाईन्स, जपान, इंडोनेशिया, युगोस्लॉव्हिया या देशात भारतातील शास्त्रज्ञ व शेतकर्यांना पाठविले. भविष्यात भारतीय शेतीला मजुरांचे मनुष्यबळ सहजासहजी उपलब्ध होणार नाही, यासाठी त्यांनी त्या काळात शेतीचे यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, मळणी यंत्र, ओलितासाठी डिझेल पंप, ज्युट कापणीसाठी आधुनिक यंत्र, आधुनिक बैलगाड्या व सर्व प्रकारचे दुरुस्तीचे आधुनिक केंद्र स्थापन केले. देशात विविध प्रकारच्या जमिनी आहेत त्यात बराच मोठा भाग खार जमिनीचा असल्यामुळे अशा जमिनीचा विकास करण्यावर भर दिला. </div>
<div style="text-align: justify;">
भारतातील लोकांनी उपाशी मरु नये उपाशी लोकांना अन्न पुरविणे त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य ठरते यासाठी भारत सरकार, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलियातूनअब्जावधी रुपयांची धान्याची आयात करण्यात येत असे म्हणून डॉ. भाऊसाहेबांनी रोम येथील अन्न परिषदेत आवाहन केले की, हे अब्जावधी रुपये मला द्या मी अवघ्या पाच वर्षात देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करुन दाखवितो एवढा आत्मविश्वास त्यांच्यात होता. </div>
<div style="text-align: justify;">
दि. 9 एप्रिल 1965 ला शुक्रवारी लोकसभेत शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा केली व 10 एप्रिलची रात्र सुरु होताच आयुष्याचा प्रवास संपविला, पंरतु विदर्भातील शेतक-यांसाठी त्यांच्या हक्काचे श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय 1959 मध्ये सुरु करुन व ही सर्वस्वी जबाबदारी त्यांनी महाविद्यालयाच्या अध्यापक मंडळीवर सोपविली व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार हे महाविद्याल शेतक-यांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे. हीच या निमित्ताने भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण करतो.</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________________ </div>
<div style="text-align: justify;">
प्राचार्य, डॉ. नंदकिशोर चिखले, प्रा.डॉ. एन.डी राऊत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-70316774092552266772014-12-21T07:17:00.003-08:002014-12-27T21:07:00.184-08:00भाऊसाहेबांच्या सहवासात __श्री. प्रभाकर शेषराव महल्ले<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
27.12.2011 ला पूज्य भाऊसाहेबांची 114 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने काही आठवणी प्रकाशित करण्याचा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा मनोदय आहे, असे श्री अशोकराव कोंडे यांचेकडून मला कळवण्यात आले. ते सध्या संस्थेत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भाऊसाहेबांशी माझ्या आलेल्या संपर्कासंबंधी त्यांना कल्पना असल्यामुळे मी सुध्दा काही आठवणी मांडाव्यात अशी त्यांनी मला विनंतीवजा सूचना केली. त्याला अनुसरुन चार शब्द लिहित आहे. भाऊसाहेबांचे वैयक्तिक सचिवही एक कोंडेच होते हा योगायोग. </div>
<div style="text-align: justify;">
भाषावर प्रांतरचना 1956 ला होण्यापूर्वी आपला विदर्भ C.P & Berar (Central ProVinces Berar) या हिंदी व मराठी या व्दिभाषिक राज्यात समाविष्ट होता. मंत्री मंडळामध्ये व प्रत्येक कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचा-यांमध्ये हिंदी भाषिक लोकांचे प्राबल्य असे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास 1946 ते 1950 या काळात मी नागपूरच्या कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी असताना तेथे प्राचार्य व प्राध्यापक श्रीवास्तव, त्रिवेदी, दुबे, उपाध्याय असे हिंदी भाषिक किंवा वैद्य, जोगळेकर, जोशी असे मराठी भाषिक, पण बहुधा सर्वच ब्राम्हण वर्गातले होते. अपवाद म्हणून केवळ एक डेअरीचे प्राध्यापक एस.टी पाटील तेवढे अब्राम्हण-लेवा पाटील होते. त्यांना काम करताना होत असलेल्या त्रासाबद्दल तथा एक त-हेच्या छळाबद्दल त्यांना आम्ही वर्गात रडताना पाहिले आहे. </div>
<div style="text-align: justify;">
डॉ.भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेव्दारा वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये उघडून सामान्य मराठी भाषिकांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याची दूरदृष्टी ठेवली होती. हे वरील पार्श्वभूमींवर अवलोकन केल्यानंतरच्कळून येऊ शकेल. प्रांत पूनर्रचनंतर पुष्कळसे हिंदी भाषिक मध्यप्रदेशात गेल्यामुळे व अब्राम्हण वर्गातील लोक शिक्षणात पुढे येऊ लागल्यामुळे आज त्याच कृषिमहाविद्यालयात ते बहुसंख्येने कार्यरत आहेत. ही सगळी पू. भाऊसाहेबांची दूरदर्शीपणाची देण व कृपा. </div>
<div style="text-align: justify;">
कॉलेजचे शिक्षण एप्रिल 1950 ला संपल्यानंतर मी माझे खेडे गांवी दिघीला उन्हाळ्याची सुटी घालवत असताना त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन नाशिक येथे भरणार होते. माझे वडील काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते व दोनदा तुरंगवास भोगलेले स्वातंञ्यसंग्राम सैनिक असल्यामुळे माझीही ते अधिवेशन बघण्याची इच्छा झाली. श्री ओंकारराव महल्ले या काकांचे सोबत मी नाशिकला गेलो. तेथे संयोगवश मलकापूर भागातला माझा कॉलेज मित्र नामदेव तुकाराम बढे हा भेटला.अधिवेशनाला. उद्या आपण सोबतच जाऊ असे मी म्हटल्यानंतर त्याने सांगितले की दिल्लीच्या पूसा इन्स्टि्यूटच्या अॅडमिशनसाठी मला भाऊसाहेबांना भेटायचे आहे. त्याने भाऊसाहेबांच्या राहत्या ठिकाणाबद्दल पूर्ण चौकशी केलेली होती. आणि हा क्षण माझ्या आयुष्याला वळण देणारा ठरला. पूसा इन्स्टिटयूटचा फॉर्म मी सुद्घा भरलेला असल्यामुळे मी त्याला म्हणालो. अरे मी सुद्घा येतो तुझ्याबरोबर भाऊसाहेबांना भेटायला असे ठरवून दूसरे दिवशी सकाळी सुमारे 7.30ते 8 चे सुमारास आम्ही त्यांचे निवासस्थानी पोचलो. भाऊसाहेब त्यावेळी आतमध्ये सोफ्यावर बसून दाढी करत होते. चेह-यावर साबण लावलेला होता. तशाच परिस्थितीत आम्हाला बाहेर ताटकळत न ठेवता भेटीसाठी आतमधे बोलवले. कशाकरता आलात हे विचारल्यानंतर आम्ही सांगितले की दिल्लीच्या IARI मधे (Indian Agricultural Research Institute) मध्ये अॅडमिशन साठी आलो आहोत. अजूनपर्यंत आम्हाला मुलाखत पत्र आलेले नाही. आम्ही आजवर प्रतीक्षा करत होतो? त्यावर भाऊसाहेब म्हणाले अरे काल मुन्शी इथेच होता. त्याला सांगितले असते. पण काही हरकत नाही. मी गेल्यावर बघतो. श्री. के.एम. मुन्शी त्यावेळी कृषिमंत्री होते. मग त्यांनी आमची नावे विचारलीत. मी नाव सांगितले महल्ले ते ही राहील लक्षात, कारण माझेही तेच आहेत असे म्हणून त्यांनी माझे नाव ऐकल्याबरोबर एका क्षणात भाऊसाहेब म्हणाले, अरे तुला तर Backard Scolarship मिळाली आहे. पण त्याचा उपयोग व्हायला तुला अॅडमिशन मिळावला पाहिजे हे ऐकल्यानंतर भाऊसाहेबांना स्कॉलरशिप मिळवणा-या लोकांमधून माझे नाव कसे बरे लक्षात राहिले असेल?या विचाराने मला खूपच आश् चर्य वाटले. नंतर त्यांनी पदस्पर्श, नमस्कार करुन परत आलो. नंतर 8-10 दिवसातच आम्हाला मुलाखत पत्र आलेत व दोघांच्याही अॅडमिशन्सही झाल्यात. विद्यार्थी असला की एका ति-हाईताचेही काम भाऊसाहेब किती आपुलकीचे व तळमळीने करायचे हे सांगायला भाऊसाहेबांशी आमचा नाशिकला झालेल्या संवादाचा दाखला मी आजवर अनेकांना देत आलो आहे. कारण ही त-हा आणि शैली मला तरी इतरत्र कुठेही आढळलेली नाही. </div>
<div style="text-align: justify;">
पूसा या मूळ जागेहून स्थलांतरीत झालेली ही संस्था Associate IARI हा डिप्लोमा देत असे. इतरत्र डिप्लोमा म्हणजे M.Sc. डिग्रीच्या खालचा असा समज असतो. पण ह्या डिप्लोम्याकरता मध्यप्रदेश तथा उत्तरप्रदेशातून M.Sc. झालेल्या शासकीय कर्मचा-यांना Govt. Deputation वर शिक्षणासाठी पाठवण्यात येत असे. आमच्या बॅचला असे किमान 5-6 विद्यार्थी होतेच. त्या प्रवेशाच्या भरवशावर आम्ही तेथून बाहेर पडल्यानंतर आपल्या राज्यात लगेच Reserch Assistant Awdm Lecturer / Assistant Professor अशा पदांवर कृषि खात्यात नोकरीला लागलो व सध्या सेवानिवृत्त होवून समाधानाचे जीवन जगत आहोत. </div>
<div style="text-align: justify;">
दिल्लीला IARI मध्ये आम्ही होस्टेलमध्ये रहायचो. हा कोर्स 2 वर्षाचा होता. विदर्भाचे म्हणजे नागपूर कॉलेजचे 2 वर्षाचे मिळून 10-15 विद्यार्थी असायचो. माझे आधीचे बॅचचे तेथे असलेले बुलढाणा जिल्ह्यातील मंत्री खेडेकर येथील पांडुरंग कोंडूजी खेडेकर हे माझे विशेष जवळचे होते व दुसरे के.एस.चिमा हे नागपूरचे 4 वर्षाचे काळात माझेशी एक शब्दही न बोललेले पुढे माझे जिवलग मित्र झाले. </div>
<div style="text-align: justify;">
खेडेकरांच्या परिचयाचे श्री भटकर नावाचे एक मेंबर ऑफ पार्लमेंट त्यावेळी दिल्लीला होते. त्यांचे राहण्याचे ठिकाणाला Parliament House म्हणत. तेथेच एम.पी असल्यामुळे पू. भाऊसाहेबांचेही वास्तव्य असायचे. आमचे होस्टेल पासून हे ठिकाण सुमारे 7-8 कि.मी असावे. माझे मित्र खेडेकर हे श्री भटकर साहेबांना अधून-मधून भेटायला जात असत. त्यांची सोबत असल्यामुळे पू. भाऊसाहेबांच्या भेटीच्या ओढीने मी सुद्घा खेडेकरांसोबत जायला लागलो. आम्ही दोघेही सायंकाळी सायकलने त्यांचेकडे जायचो, व भेट घेऊन त्यांचा जास्त वेळ न घेता परत यायचो. आमचा कोर्स सुरु झाल्यानंतर लवकरच भाऊसाहेब केंद्र शासनाचे कृषिमंत्री झालेत. </div>
<div style="text-align: justify;">
अशाच एका भेटीप्रसंगी भाऊसाहेबानंतर सोसायटीचे अध्यक्ष झालेले श्री बाबासाहेब घारफळकर यांना मी तेथे पाहिले होते. दुस-या एकाभेटीचे प्रसंगी भाऊसाहेबांनी मला विचारले-एवढ्या स्कॉलरशिपचे काय करशील?मला त्यावेळी एक रकमी वार्षिक रु.800 -स्कॉलरशिपचे मिळायची. मी म्हणालो सांगाना काय करु? भाऊसाहेब म्हणाले - दे रु.250 - सोसायटीला त्यांचे शब्द शिरसावंद्य मानून दुसरे भेटीचे वेळी मी रु. 300- घेऊन गेलो व त्यांना दिले त्यानंतरचे भेटीत भाऊसाहेबांनी मला 6.8.1951 ची क्र. 59 असलेली श्रद्धानंद सोसायटीला देणगी म्णून स्वीकारलेली रु 125- ची पावती आणून दिली व दुस-या भेटीत दुसरी एक पावती 28.2.1952 ची क्र. 343 रु. 150- ची मेंबर फी म्हणून स्वीकारलेली. ह्या दुस-या पावतीनुसार त्यांनी मला सोसायटीचे आजीव सभासदत्व दिले होते.त्याचा प्रत्यय मला पुढे अकोल्यास नोकरीत असताना येत होता. मला वार्षिक सभेचे निमंत्रण, अहवाल वगैरे 1962 पर्यंत येत असत. त्यानंतर पुढे माझ्या बदल्या होत गेल्या व मी सोसायटीला नवीन पत्ता न कळवल्यामुळे किंवा इतर कोणताही पत्र व्यवहार न केल्यामुळे ते अहवाल वगैरे येणे माझ्याच दुर्लक्षामुळे व निष्काळजीपणामुळे बंद झाला. आता तो विषयही माझ्यासाठी संपला आहे. </div>
<div style="text-align: justify;">
कधी कधी मला भाऊसाहेबांवर जातीयतेचा आळ आणलेला आढळतो. पण नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचे निवडणुकीकरता पू. भाऊसाहेबां विरुद्घ नागपूर हायकोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती श्री. पी.पी. देव यांच्यात लढत झाली होती, व त्यात श्री देव हे निवडून आले होते. आमचे कॉलेज शिक्षणाचे काळात सगळीकडे कोणत्या समाजाचा पगडा होता हे मी सविस्तर सांगितलेच आहे. त्याचाच परिणाम भऊसाहेबांच्या पराभवात झाला होता. पण भाऊसाहेबांचे मनात अशा जातीभेदाचा लवलेशही नव्हता. सौ.कुसुमावती देशपांडे यांना भाऊसाहेबांनी सोसायटीत मानाचे पद दिले होते, हे सर्वश्रुत आहे. एका व्याख्यानात व इतर वेळीही भाऊसाहेब जातीयवादी असलेच तर ते शेतकरी आणि विद्यार्थी या दोन जातीचे कैवारी होते, इतर कोणत्याही पोटजातीचे नव्हते हे मी ठासून सांगत आलेली आहे. ऑक्टोबर 1950 ते ऑक्टोबर 1952 या काळात दिल्लीचे शिक्षण आटोपून मी मुळगावी दिघीस परत आलो. तेथून निघण्यापूर्वी राजपाटावर जावून पू. महात्मा गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊनच, निघालो होतो. </div>
<div style="text-align: justify;">
पू. भाऊसाहेब इंग्लंडमध्ये बॅरिस्टर व्हायला गेलेत त्यावेळी त्यांचे सोबत बॅरिस्टर व्हायला गेलेली इतरही मंडळी होती त्यात सर्वश्री बागवे, एन.एम.देशमुख, एम.बी. तिडके, ई.टी.पाटील हे लोकही बॅरीस्टर होवूनच परतले होते. </div>
<div style="text-align: justify;">
एरंडगांवच्या बॅ. मोतीराम बाजीराव तिडके यांचे पत्नीची तब्येत त्यावेळी खूप वाईट होती त्यात त्यांच्या मुलींच्या लग्नाचा प्रसंग समोर होता. त्यांची पत्नी म्हणजे यवतमाळचे श्रीमंत अंबादास ऊर्फ बाबुराव भुमरेची बहीण त्यावेळी मी दिघीलाच नोकरीचे शोधात होतो. त्यावेळी तिडके ह्या त्यांच्या मित्राच्या मुलीकरता भाऊसाहेबांनी माझे नाव सुचवले होते. त्यानुसार तिडकेकडील कर्ती मंडळी माझेकडे दिघीला आलीत. माझे वडील, काका वगैरे सोबत त्यांची बैठक व जेवणखाण संपल्यानंतर मला त्यांचे सोबतच यवतमाळला भुमरेकडे घेऊन गेलेत. अहिल्याबाई सारख्या पेहेरावातल्या व रुबाबातल्या बाबुरावांच्या मातोश्री श्रीमती ताईसाहेब भुमरेंनी माझी विचारपूस केली. एरंडगांवच्या तिडके घराण्यातमाझी आत्या दिलेली असल्यामुळे लग्न जुळायला आडकाठी आली नाही. त्यानंतर शक्य तितक्या लवकर फेब्रुवारी 53 मधे माझा विवाह आटोपला. बहिणीची तब्येत गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे भुमरे साहेबांनीच लग्नाचा सारा खटाटोप स्वत:सांभाळून त्यांचे बंगल्यातील मोकळ्या जागतेच लग्न सोहळा संपन्न केला व लग्नानंतर एक महिन्याचे आतच सौ. कमलाबाई मोतीरामजी तिडकेंनी नागपूरला मेडीकल कॉलेज हॉस्पीटलमधे जगाचा निरोप घेतला. माझे लग्न मंडपात पू. भाऊसाहेब स्वत: हजर होते. भुमरे साहेबांनी स्वत:च्या 12000 एकरापैकी एक हजार एकर जमीन विनोबाजींच्या भूदान यज्ञात व तुकडोजी महाराजांचे उपस्थितीत दान केली होती. </div>
<div style="text-align: justify;">
लग्नानंतर चार महिन्यातच मी अकोल्यास नोकरीवर रुजू झालो, Research Assistant या पदावर. सेंट्रल गव्हर्मेंटच्या T.C.M (Technical Co-peration mission) असे त्या स्कीमचे नाव होते. माझे अधिकारी साहेब म्हणजे नागपूर कॉलेजचे केमेस्ट्रीच प्राध्यापक श्री. आर.सी. श्रीवास्तव, Agrl-Chemist to Govt.of M.P या पदाचेही काम पहायचे.</div>
<div style="text-align: justify;">
त्यावेळी बहुतेकांना कल्पना होतीच, की भाऊसाहेबांना अमरावतीच्या रुरल इन्स्टीट्यूटच्या परिसरात शासकीय कृषि महाविद्यालय स्थापण्याची खूप मनापासून इच्छा होती. पण राजकीय क्षेत्रात आपल्या अधिकाराचा वापर करुन कशी खेळी करण्यात येवू शकते याचा प्रत्यय मला आला. भाऊसाहेब कुठेतरी परदेश दौ-यावर असल्याची संधी साधून अकोल्याच्या राजकारणाचे काँग्रेसचे धूर्त कार्यकर्ते व म.प्र. शासनाचे अर्थमंत्री श्री ब्रिजलालजी बियाणी यांनी डाव साधला. पैसे पुरविण्याची किल्ली त्यांचेच हातात असल्यामुळे कसलीही अडचण त्यांना आली नाही. माझे साहेब श्रीवास्तव यांना Officer on Special Duty नेमून अकोल्यास कृषि महाविद्यालय उघडण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी नेमले. ते आल्यानंतर बियाणीजींच्या प्रभावाने आणि सहकार्याने मुंगीलाल बाजोरीया हायस्कूलच्या भव्य इमारतीच्या एका विंगमधे कॉलेज थाटण्याचे ठरले. दोन तीन दिवसातच मुख्यमंत्री श्री रवीशंकर शुक्ला यांचे हस्ते मुं.बा. हायस्कुलच्या प्रांगणात छोटेसे स्टेज उभारुन उद्घाटनाचा सोहळा बियाणीजींचे उपस्थितीत पार पडला.</div>
<div style="text-align: justify;">
श्रीवास्तव साहेब हे माझेही साहेब असल्यामुळे मी सुद्घा कार्यक्रमाला उपस्थित होतो. ही 1955 सालची गोष्ट आहे. त्यापुढे तत्काळ शिक्षक वर्गाच्या नेमणूका करण्यात आल्या व श्रीवास्तव साहेब म्हणून नियुक्त झालेत. अशा त-हेने भाऊसाहेबांच्या इराद्यावर पाणी फेरण्यात आले व त्यांना शक्य झाले तेव्हा अमरावतीला सोसायटीतर्फे चालवण्यात येणारे स्वतंत्र खाजगी कॉलेज कृषि महाविद्यालय उघडावे लागले. त्याचे पहिले प्राचार्य श्री एन.सी.देशमुख यांना नेमण्यात आले. ते पूर्वीच आर्टस् अँड कॉमर्स्कॉलेजचे प्राचार्य होते म्हणून हा अधिकच चार्ज होता. </div>
<div style="text-align: justify;">
मी अकोल्यास नोकरीत असतानाच, भाऊसाहेबांनी आपल्या मित्राच्या मुलीकरीता लग्नाची भेट म्हणून Farmers couples exchange या कार्यक्रमाअंतर्गत आम्हा पती पत्नींना अमेरिकेच्या दौ-याचा प्रोग्राम पाठवला होता. भाऊसाहेबांना मुलगी नसल्यामुळे ते माझे पत्नीलाच मुलगी मानत असत. अनंतरावांना भाऊबिजेचे प्रसंगी सौ.इंदिराने ओवाळल्याचे मी दोनदा पाहिले आहे. हा अमेरिकेचा दौरा कार्यक्रम हातात पडला त्यावेळी माझी पत्नी गरोदर असल्यामुळे मला तिकडे जाण्यास नकार द्यावा लागला. त्यानंतर लगेच भाऊसाहेबांनी रेवस्याचे श्री नारायणराव महल्ले व पत्नी सौ. स्नेहलता यांना माझे ऐवजी पाठवले व त्या प्रपोजलचा उपयोग करुन घेतला. तेथून परतल्यानंतर नारायणराव सांगत असत की माझे नावाचेच, निमंत्रण त्यांना अमेरिकेत मिळायची अशा भाऊसाहेबांना इतक्या जवळून पाहता येण हे माझे भाग्यचं.</div>
<div style="text-align: justify;">
शेवटी एक आठवण नमूद कराविशी वाटते. पू. भाऊसाहेबांचे दि. 10.4.65 रोजी दिल्लीला अचानक देहावसान झाले. प्रथेनुसार साधारण माणसाचा देखील मृतदेह त्याचे गांवी नेण्यात येतो. त्यानुसार म्हणा किंवा श्री शिवाजी शिक्षण संस्थतील त्यांच्या सर्व सहका-यांचे, विचारवंतांचे इच्छेनुसार पू. भाऊसाहेबांचा देह अमरावतीस त्यांच्या कार्य नगरीत आणून त्यांच्या अंत्यदर्शनांचा लाभ सर्वांना व्हावा व सर्व आप्तेष्टांच्या उपस्थितीत त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा ही सर्वसामान्यांची आंतरिक भावना असणे स्वाभाविक होते. परंतु हा निर्णय घेण्याचे मुख्य अधिकार पत्नी श्रीमती विमलाबाई देशमुख ह्यानांच असल्यामुळे सगळ्यांचे इच्छेचा निरस करुन अंत्यसंस्कार दिल्लीलाच करण्यात आले, व अस्थी मात्र लोकदर्शनासाठी नागपूरला व अमरावतीला पाठवण्यात आल्यात. श्रीमती विमलाबाई स्वत: उच्चशिक्षित विदुषी होत्या व स्वत:चे व्यक्तिमत्त्वाचे बळावर मेंबर ऑफ पार्लंमेंट राहिलेल्या होत्या, पण ह्या निर्णयामुळे त्या थोड्या हेकेखोरही होत्या हे सर्वांच्या लक्षात आले. </div>
<div style="text-align: justify;">
त्यानंतर श्रीमती विमलाकाकी नागपूरला मुलगा अनंतरावांसोबत स्थायिक झाल्यात. युनिव्हर्सिटी लायब्ररीचे मागचे बाजूस रोडवरच त्यांचा फ्लॅट होता. तेथे मी व माझी पत्नी दोघेही अधून मधून भेटत होतो. त्यांना कधी कधी मक्याचे भुट्टे आणून दिल्याचे आठवते. भाऊसाहेबांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा देत विनम्र अभिवादन करतो. </div>
<div style="text-align: justify;">
_____________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
श्री. प्रभाकर शेषराव महल्ले, रुख्मिणी नगर, अमरावती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-30606990789695414422014-12-21T07:15:00.003-08:002014-12-27T21:07:37.716-08:00मायेचा हात___प्रा.बी.के.राणे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
सन 1962 चा काळ डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देश मुख लोकसभेकरिता निवडणूक लढवित होते. एका शेतक-याचे पोटी जन्माला आलेला. इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर झालेला, गरिबीतून शिकलेला, म्हणून मी त्यांना ओळखत होतो. विशेष म्हणजे एवढे असूनही बहुजन समाजासाठी झटणारा. त्याग तसेच तपस्येच्या महान साधनेव्दारा लोकोव्दारासाठी जीवन समर्पण करुन स्वत:ला समाजकार्यात पूर्णपणे झोकून दिलेला एक कर्तृत्वान पुरुष अशी भाऊसाहेबांविषयी माणी त्यावेळी धारणा होती, साहजिकच त्यांचेकडे माझा ओढा होता. मी त्यांनी सुरु केलेल्या श्री शिवाजी महाविद्यालयातून नुकताच बी.ए.पास होऊन समाजाभिमुख भाऊसाहेबांसारखेच काही कार्य करण्याचे ठरविले होते. </div>
<div style="text-align: justify;">
निवडणुकीसंबंधाने भाऊसाहेबांचा कार्यक्रम अमरावती येथून 8,10 कि.मी. असलेला वडगाव माहोरे ह्या गावी होता. भाऊसाहेबांची सभा होती. मला ही बातमी समजल्यामुळे मी तेथे जाण्याचे ठरविले. अजून तेथे जाण्याचे दुसरेही एक कारण होते, ते म्ळणजे माझे मामा शंकरराव माहोरेंचे ते गाव. माझी परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे मी तसाच पायी निघाला होतो. रहाटगाव फाट्यावरुन 3,4 कि.मी. अंतर होते. तेवढ्यात भाऊसाहेबांची गाडी मागून येतांना दिसली. मला पायी जातांना पाहून थेडी पुढे नेऊन भाऊसाहेबांनी माझ्या लगतच गाडी उभी केली. एवढ्या रात्री 8,9 वाजता तू कुठे जातो? असे विचारले. माझी केविलवाणी स्थिती पाहून तू गाडीत बैस असे म्हणून पाठीवरुन मायेचा हात फिरविला. मला अतिशय आनंद झाला. तो एक प्रकारचा अशीर्वादच होता. श्री मामासाहेब लोंढे हेही भाऊसाहेबांसोबत होतेच. रस्त्याने गप्पा-गोष्टी झाल्या मी काय करतो. पुढे काय करणार इत्यादी विचारणा झाली. आपलयाच श्री शिवाजी महाविद्यालयातून मी बी.ए.पास झालो. बी.टी. केल्यावर नोकरी करावी. मी उतरलो. त्यावर भाऊसाहेब म्हणाले लवकर बी.टी. होताच1963 मध्ये खरोखरच श्री शिवाजी शिक्षण संस्थेत मला नोकरी मिळाली.</div>
<div style="text-align: justify;">
केवळ दहा मिनिटांचा सहवास. परंतु मी जणूकाही भारावल्यासारखा झालो. वडगाव माहोरेला पोहोचलो. माझ्या मामाचेच गाव. सगळे मोठ्या आश्चर्याने बघायला लागले. हा भाऊसाहेबांसोब कसा?गावकरी मंडळींनी कार्यक्रमाचे संचालन माझ्याकडे दिले. भाऊसाहेबांच्या भाषणात सुद्घा माझ्याबद्दल उल्लेख झालाच. गावांतील सर्व मला मान देऊ लागले. सर्वांनी सहकार्य केले. पुन्हा परत येतांना भाऊसाहेबांनीच चलतो का?विचारले. मी मात्र मुक्कामच केला. </div>
<div style="text-align: justify;">
सन 1964 मध्ये भाऊसाहेब मोर्शी येथील श्री शिवाजी विद्यालयाला भेट देण्यासाठी आले. कामाची भाऊगर्दी असल्यामुळे सर्कीटहाऊसवर आम्हा सर्वांना बोलाविले. मी श्री शिवाजी विद्यालयामध्येच शिक्षक होतो परिचय करुन घेत असतांना माझेकडे भाऊसाहेबांचे लक्ष गेले. मी परिचय देणार तेवढ्यातच वडगावच्या कार्यक्रमाचे संचालन करणारे तुम्हीच ना?इतकी जवळिक व ओळख कशी ह्यावरच मी चिंतन करीत राहिलो. श्री. अण्णासाहेब कानफाडे आमचे मुख्याध्यापक हा इंग्रजी शिकवितो असं. सांगताच मग चांगलाच निकाल लागेल. भाऊसाहेब लगेच आशिर्वादपर अभिप्राय देऊन मोकळे झाले. मी ह्याला आशीर्वाद ह्यासाठी म्हणतो की, त्यावर्षी हायर मॅट्रीक वर्ग 11 इंग्रजी विषयाचा निकाल 94%लागला. तरीही शंभर टक्के का नाही?असे अण्णासाहेब कानफाडेचेंही माझेवर प्रेम होतेच. माझ्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे मार्गदर्शन व सहानुभूती ह्यामुळेच मी चांगले अध्ययन करु शकलो. </div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या अल्पशा सहवासातील हा सुखद प्रसंग व आठवण सांगताना आजही डोळे पाणवतात. म्हणावेसे वाटते-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
दिव्यत्वाची जेथ प्रचिती </div>
<div style="text-align: justify;">
तेथे कर माझे जुळती</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आदरणीय, भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात माझी सेवानिवृत्ती व तिही एकसष्टी वर्षात हा एक मोठाच योगायोग म्हणावा लागेल. अशा त्या महात्म्याला माझे कोटी कोटी प्रणाम. </div>
<div style="text-align: justify;">
______________________________________</div>
<div style="text-align: justify;">
प्रा. बी.के.राणे, राठी नगर, अमरावती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-59015319816865838322014-12-21T07:13:00.004-08:002014-12-27T21:08:12.856-08:00काव्यपुष्पातील भाऊसाहेब ___प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
सामान्य माणसाचे जीवन स्वकष्टाने अमृतमय करणारे जनक्रांतीचे लोकमहर्षी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कल्पवृक्षाची स्थापना करुन ज्ञानाग्नी प्रज्वलित करुन, ज्ञानदीप चेतवून शेतीच्या दरात ज्ञानाची गंगा पोहोचविणारे थोर शिक्षण महर्षी, अस्पृश्यता निवारण बील मध्यप्रांत व-हाडाचे मंत्री असताना कायदे कौन्सिलमध्ये पास करुन घेणारे तसेच प्रत्यक्ष जीवनात आचरणातून अस्पृश्यता निवारण करणारे अस्पृश्योद्घारक, वैदिक वाड्मय धर्माचा उगम व विकास या प्रंबधाचे लेखन करणारे थोर लेखक, मातीमधून शास्त्राच्या फुलबागा फुलविणारे, रंजल्या गांजल्या कृषकांचे दैवत झालेले कृषिपंडित, शिक्षणाने केवळ उपजीविकेचे प्रश्नसुटत नाही तर जीवनातील जटील प्रश्न सोडविण्याची शक्ती प्राप्त होते अशी शिक्षणाविषयक विचारधारा असल्यामुळे संपूर्ण समाजाला विद्येची दालन मुक्त करणारे शिक्षणमहर्षी, प्रशंसनीय व बहुजनांकरिता कार्य करणारे मी विदर्भातील एकाच व्यक्तिला ओळखतो ती म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख असे गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ज्यांच्याविषयी काढले ते कर्मयोगी, धन,दौलत वैभव, समृद्घी, मान, सन्मान या सर्वांचा लोककल्याणासाठी त्याग करणारे, स्वप्रयत्नातून एका नव्या युगाची निर्मिती करणारे युग निर्माता डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना माझे विनम्र वंदन.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव फक्त लेखकांवरच नाही तर अनेक कवींवर सुद्घा पडला आणि विविध काव्यपुष्पांचा वर्षाव या कवींनी भाऊसाहेबाच्या प्रभावी व्यक्तिमत्वावर व कार्यकुशलतेवर केला. उदा. मा.राम शेवाळकर, स्व. सुदामजी सावरकर, कवी अनिल, मा. कृष्णा चौधरी, स्व. बजरंग सरोदे, कवी सोपानदेव चौधरी, कवी बाबा मोहोड</div>
<div style="text-align: justify;">
कवी विठ्ठल वाघ, कवी राज यालवीकर याशिवाय अशा अनेक कवींनी आपल्या काव्यसुमनातून भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व साकार करण्याचा प्रयत्न केला.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांना वंदन करताना सुप्रसिद्घ साहित्यिक व कवी राम शेवाळकर म्हणतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शतकाचे साहून शापे |</div>
<div style="text-align: justify;">
जी मने रापली होती |</div>
<div style="text-align: justify;">
आलास थेंब होऊनी |</div>
<div style="text-align: justify;">
तू अशा अभाग्यांसाठी ||</div>
<div style="text-align: justify;">
थरकाप तमाचा करण्या |</div>
<div style="text-align: justify;">
कोळसे पुन्हा धगमगले ||</div>
<div style="text-align: justify;">
ज्वाळांच्या रक्तफुलांनी |</div>
<div style="text-align: justify;">
तुज पाहिले वंदन केले ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संत साहित्याचे गाढे अभ्यासक स्व. सुदामजी सावरकर म्हणत असत.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी बहुजनांना दाखविलेला मार्ग हा खरा असून त्या मार्गावरुन त्यांनी मार्गक्रमण केल्यास बहुजनांचे अंधारमय जीवन प्रकाशमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच भाऊसाहेबांच्या कार्याची थोरवी आपल्या गीतात गाताना ते म्हणतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हे लोकमहर्षी युगपथदर्शी | </div>
<div style="text-align: justify;">
विजयी नाम तुम्हारा || </div>
<div style="text-align: justify;">
लो प्रमाण कोटी जनोका || </div>
<div style="text-align: justify;">
स्व. सुदामजी सावरकर भाऊसाहेबांच्या दलितोद्घाराच्या, गरीब जनतेच्या उद्घाराच्या कार्याचा उल्लेख करताना आपल्या गीतात म्हणतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हरसाल दिया लाखो कलियो को |</div>
<div style="text-align: justify;">
खिलने तुमने मौका || </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अज्ञान, अविद्या व अंधश्रद्घेमुळे स्वत:च्या समाजाचा कधीच विकास करु न शकणा-या लाखो लोकांना स्वत:चे जीवन उज्जव करण्याची संधी भाऊसाहेबांनी दिली. </div>
<div style="text-align: justify;">
श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करुन सरस्वतीचे मंदिर भाऊसाहेबांनी कसे उभारले याचे मोजक्या शब्दात वर्णन करताना वेद मुक्याचा या कवितेत कवी प्रा. डॉ. विठ्ठल वाघ म्हणतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानियाने उभारिले | सरस्वतीचे मंदिर ||</div>
<div style="text-align: justify;">
बहुजनांसाठी तुच | उघडिले द्बार ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
तर कवी मधुकर केचे यांनी भाऊसाहेबांचे जीवन व कार्य सार्थ शब्दात वर्णन केले आहे ते म्हणतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पंजाबराव नावाने |</div>
<div style="text-align: justify;">
तेजाब जन्मले होते ||</div>
<div style="text-align: justify;">
जखमाच्या संगे अमुचे |</div>
<div style="text-align: justify;">
जोडले तयाने नाते ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब गावागावातून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी सतत फिरत होते. दीन दलितांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी त्यांनी रात्रंदिन प्रयत्न केले. कवी प्राचार्य राज यावलीकर लिहितात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सारथी तू शिव रथाचा |</div>
<div style="text-align: justify;">
शिंपीत गेला ज्ञान |</div>
<div style="text-align: justify;">
बहुजनांसाठी केले विद्यादान |||</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी त्या काळात केलेला आंतरजातीय विवाह, विवाह प्रसंगी अस्पृश्य मुलांच्या हाताने दिलेला प्रीतीभोज, अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्याकरिता केलेला यशस्वी प्रयत्न हा त्यांचा परिवर्तनवाद समाजाला पुरोगामित्वाकडे नेणारा ठरला. कवी प्रा. श्रीकृष्ण राऊत सूर्याची भाषा या कवितेत म्हणतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सातपुड्याचा उंच कडा तू |</div>
<div style="text-align: justify;">
तू पूर्णा माई ||</div>
<div style="text-align: justify;">
तू मजुरांचा महादेव गा|</div>
<div style="text-align: justify;">
तू दलितांची आई ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शिक्षणसम्राट आज निर्माण होताना दिसतात पण भाऊसाहेब शिक्षणमहर्षी झाले. भाऊसाहेबाच्या शैक्षणिक कार्याची संजीवनी शिक्षण क्षेत्राला लाभली होती. हे सांगताना प्रा. डॉ. भोजराज चौधरी म्हणतात की, </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
समाज शेतकरी रचनेने शिल्पकार तुम्ही | </div>
<div style="text-align: justify;">
भाऊ शिक्षण क्षेत्रा लाभे, तुमची संजीवन ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी शिक्षणांच्या क्षेत्रात मुखी|| केलेल्या क्रांतीचा अगदी मोजक्या शब्दात उल्लेख करताना कवी सुधाकर मोहोड म्हणतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आकाशाच्या पाटीवरती| </div>
<div style="text-align: justify;">
धरित्रीच्या मातीवरती || </div>
<div style="text-align: justify;">
शिक्षणक्रांती रेखीत होता । </div>
<div style="text-align: justify;">
दख्खणचा कुणबी राजा || </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आपल्या प्रयत्नरुपी कर्तृत्वालाच देव समजणा-या भाऊसाहेबांना आराम नावाचा शब्दही माहीत नव्हता. ते जनसेवेसाठी सतत कार्य करीत राहिले. यत्नालाच देव समजणा-या भाऊसाहेबांविषयी कवी अनिल म्हणतात- </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
त्याने यत्नाला देव जाणला पूजला| </div>
<div style="text-align: justify;">
लहान लहान आरंभ करुन महान संघटना उभी केली || </div>
<div style="text-align: justify;">
डोंगर उपसत राहिला || </div>
<div style="text-align: justify;">
आराम त्याला माहित नव्हता | </div>
<div style="text-align: justify;">
काम करीत करीत तो कामी आला || </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख फार मोठे पुण्यवान पुरुष. त्यांनी आपल्या जीवनात स्वत:च्या कार्यकर्तृत्वाने फार मोठे पुण्य प्राप्त केले. म्हणून कवी कृष्णा चौधरी या पुण्याई विषयी भाऊसाहेबांनाच प्रश्न विचारतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कुणाची पुण्याई येऊन तू अवतरलास बुद्घाची, ख्रिस्ताची, गांधीची | </div>
<div style="text-align: justify;">
पोटाला भाकरी येऊन मानवतेचे अध्यात्म सांगणा-या मार्क्सची ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कवीच्या मते बुद्घाची समानता, ख्रिस्ताची दया, गांधीजीची सत्य व अहिंसा आणि कार्ल मार्क्सची मानवता भाऊसाहेबांनी सामान्य माणसाला आपल्या कर्मातून दिली.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे शिक्षण क्षेत्राप्रमाणेच कृषिक्षेत्रातील कार्य अनमोल आहे. कृषी, शिक्षण व संशोधन तसेच अन्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान किमान खर्चात जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांनी केला.शेतकर्यांना शोषणमुक्त केले.म्हणूनच कवी बजरंग सरोदे म्हणतात-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
उघडी नागडी शेतक-यांची पोरे केले सुखी | </div>
<div style="text-align: justify;">
मायेहूनि माय होऊनी घास भरविले मुखी||</div>
<div style="text-align: justify;">
वत्सलतेचा सागर होऊन प्रेम इथे वाटले | </div>
<div style="text-align: justify;">
म्हणून तुमचे आज पाहिजे गीत इथे गाइले |</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शिक्षणापासून कोसो दूर असलेला ग्रामतील शेतक-यांचा मुलगा शिक्षण घेऊ लागला तो भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेमुळेच. बहुजनांचे अंधारमय जीवन भाऊसाहेबांना प्रकाशित करायचे होते. त्यासाठी त्यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेकरीता स्वत:च्या बंगला गहाण ठेवला. भाऊसाहेबांच्या या त्यागी आणि परोपकारी वृत्तीचे वर्णन करताना कवयित्री प्रा. कविता डवरे म्हणतात- </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अस्वस्थ कुणाची मात्र| </div>
<div style="text-align: justify;">
तुज पाहवेना काळी रात्र| </div>
<div style="text-align: justify;">
सुख भोगाचे म्हणुनी ||</div>
<div style="text-align: justify;">
कधी न हाती धरिले प्याले |</div>
<div style="text-align: justify;">
तव कष्टाने जीवन आमुचे अमृतमय झाले|| </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या श्री.शिवाजी शिक्षण संस्थारुपी रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले पाहून कवी प्रा. गिरीश रा. खारकर म्हणतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
रोपातून वटवृक्ष झाला |</div>
<div style="text-align: justify;">
शिवाजी संस्थेचा आज ||</div>
<div style="text-align: justify;">
शिक्षणाने आम्हा तारले |</div>
<div style="text-align: justify;">
धन्य पंजाबराव ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कवी विष्णू सोळंके यांनी भाऊसाहेबांचा गुणगौरव सूर्याची उपमा देऊन केलेला आहे. सूर्य घराला आला या कवितेत ते म्हणतात.-</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अंधाराच्या कुशीत कैसा |</div>
<div style="text-align: justify;">
सूर्योदय हा झाला || </div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानाची ही घेऊन गंगा | </div>
<div style="text-align: justify;">
सूर्य घराला आला ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांची प्रेरणा येऊन कवी प्राद्य शरद पुसदकर यांचा म-हाटी तोरण फुलविण्याचा विचार अतिशय मोलाचा वाटतो ते भाऊसाहेब या कवितेते म्हणतात. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शिवबाच्या शिवारास भाऊ तू भूषण | </div>
<div style="text-align: justify;">
एक दिलाने फुलवू आता म-हाटी तोरण |</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे भाऊसाहेबांचे जीवन कृतीशील वर्णन करताना कवी अजय खडसे, </div>
<div style="text-align: justify;">
भाऊ तूच आम्हा या अभंगात म्हणतात की, </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मंदिर प्रवेश |</div>
<div style="text-align: justify;">
सत्याग्रह केला || </div>
<div style="text-align: justify;">
विचार दिसला |</div>
<div style="text-align: justify;">
कृतीतूनी||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या पंढरीचे वारकरी आम्ही आहोत म्हणून भाऊसाहेबांचे आम्ही भक्त, त्याचे कार्य पुढे नेण्याचा सतत प्रयत्न करु. भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर असे प्रेम. करणारे वारकरी प्रा. सतीश देशमुख आपल्या आम्ही वारकरी या अभंगात म्हणतात की, </div>
<div style="text-align: justify;">
आम्ही वारकरी | तुझ्या पंढरीचे |</div>
<div style="text-align: justify;">
भक्त राहू साचे | सदा म्हणे ||</div>
<div style="text-align: justify;">
बहुजनांच्या मायेचे आहा तेजस्वी हिरा </div>
<div style="text-align: justify;">
कर्मातून वाहे मानव धर्माचा वारा ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी कृषीविषयक प्रदर्शनी, हरितक्रांतीविषयक प्रकल्प राबवून शेतक-यांचे जीवन सुखमय केले, लवाद कायदा आणून कर्जमूक्ती मिळवून दिली आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करुन विद्येची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहचविण्याचा निश्चय वर्णन करण्याच्या संदर्भात श्री.एस.बी.उमाळे (माजी प्राचार्य)म्हणतात की, शिक्षण संस्था स्थापन करुनी निश्चय मनी एकच केला </div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख बहुजनांची माय कशी ठरली हे पोवाड्यात सांगताना कवयित्री प्रा. सौ कल्पना पी. देशमुख म्हणतात की, </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानगंगा घरोघरी नेली |</div>
<div style="text-align: justify;">
अज्ञानाची झापड दूर केली |</div>
<div style="text-align: justify;">
कष्टाच फिकीर नाही केली |</div>
<div style="text-align: justify;">
बहुजनाची माय जणू ठरली जी जी || </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
दिनांक 10 एप्रिल 1965 रोजी भाऊसाहेबा नावाच एक युग काळाच्या पडद्याआड गेलं आणि या युगानं येथील मना मनाला दुखात बुडविल. या दुखाचं वर्णन कवी दे. ग. सोटे यांनी संग्रामातील निखारा या कवितेते शब्दबद्ध केलं ते म्हणतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संग्रामातील एक निखारा |</div>
<div style="text-align: justify;">
तो ही चमकत विझूनी गेला ||</div>
<div style="text-align: justify;">
इतिहासाच्या पानाचाही |</div>
<div style="text-align: justify;">
आज अचानक वेग थांबला ||</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचे दर्शन अशा अनेक मान्यवर कवींच्या काव्यपुष्पातून घडविले. भाऊसाहेबांच्या या विविध कार्याचा आढावा घेतल्यास ते बहुजन सामाजातील प्रत्येक घटकांचा आधार बनले होते. </div>
<div style="text-align: justify;">
दिनांक 27 डिसेंबर 1898 रोजी जन्मलेले बहुजनोद्घारक भाऊसाहेब दिनांक 10 एप्रिल 1965 रोजी अनंतात विलीन झाले. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाला माझे कोटी कोटी वंदन!</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, नांदगाव कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-85196735649576436152014-12-21T07:10:00.002-08:002014-12-27T21:08:59.119-08:00भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार ___प्रा. अशोक रा. इंगळे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
जागतिकीकरणाच्या या पार्श्र्वभूमीवर विदर्भ आणि महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशावेळी कृषीक्रांतीचे जनक भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांची आठवण होणे अपरिहार्य आहे. कारण शेतक-यांच्या समग्र उत्थानासाठी हिरीरिने किंवा तळमळीने विचार करणा-या समाजक्रांतिकारकांमध्ये म. ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडक र, कर्मवीर भाऊराव पाटील आणि विदर्भरत्न भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमु, यांनी वेळोवेळी शेतकरी आणि शेती व्यवसायाच्या संदर्भत विचार व्यक्त केले आहेत. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेती राष्ट्राच्या विकासाचा आधार :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
माणसाप्रमाणेच समाजाच्या आणि राष्ट्राच्याही जीवनात शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यातही भारतासारख्या शेती प्रधान देशात तर अधिकच आहे, असे असून देखील शेती विकासाकडे स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतरही शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. सध्या विदर्भ आणि महाराष्ट्रात घडून येणार्या शेतकर्यांच्या आत्महत्येचा आकडा जरी पहिला तरी ते आपल्या सहज लक्षात येते. शेती आणि शेतकर्यांची दूरावस्था ही बाब भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुखांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी शेतकरी संघटित करण्याकडे जास्त भर दिला. त्यातूनच 1927 साली भाऊसाहेबांनी शेतकरी संघ स्थापन केला व सर्व प्रथम शेतकर्यांना संघटित करण्याचे मौलिक कार्य केले. शेतकर्यांना संघटित करुन भाऊसाहेबांनी शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून तो एक व्यवसाय आहे. राष्ट्राच्या विकासासाठी शेतकर्यांनी शेतीला व्यवसाय समजून कष्ट केले पाहिजेत. कारण राष्ट्राच्या एकूण उत्पन्नात 50%टक्के उत्पन्न हे शेती व शेतीसंबधीत व्यवसायातून निर्माण होते. त्यामुळे शेतकर्यांच्या मुलांनी शेती राष्ट्राच्या विकासाचा मुख्य आधार आहे असे समजून शेती करावी. कारण शेतकरी सुखी तर देश सुखी असा साधा सरळ विचार भाऊसाहेबांचा होता ते म्हणत Our culture is Agriculture कारण भारत हा कृषकांचा देश आहे. त्यांच्या घामावर शहरी माणसाचे जिणे आणि वैभव, परंतु त्या शेतकर्यांच्या घामाचं मोल भाऊसाहेबांशिवाय कुणी केले नाही. परंतु जागतिकीकरणामध्ये शेतकर्यांचे प्रश्न निष्ठेने समजून घेणारा नेता आज एकही नाही, असे खेदाने म्हणावे लागते. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आधुनिक आणि तांत्रिक शेती: </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भारतीय शेतकर्यांची दैववादी, निराशवादी मानसिकता बदलून त्यांना जागतिकीकरणातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांची जाण करुन देणे काळाची गरज झाली आहे. कारण जोपर्यंत शेतीकडे पाहण्याचा सामान्य शेतकर्यांचा दृष्टिकोन बदलत नाही तो पर्यंत शेतकर्यांचा आर्थिक विकास घडून येणे शक्य नाही. त्यासाठी भाऊसाहेबा डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती करताना आधुनिक आणि तांत्रिक शेतीचा वापर करावा असे म्हटले आहे. त्यासाठी भाऊसाहेबांनी कोलंबो प्लॅन प्रमाणे निरनिराळ्या देशात शेतकरी पाठविण्याची योजना आखली, तसे इंटर नॅशनल फार्म यूथ एक्सचेंज कार्यक्रम भरतात सुरु करुन बर्याच शेतकर्यांना दुसर्या देशातील शेतीची लागवड पद्घती पाहण्याची व प्रात्याक्षिक करण्याची संधी मिळवून दिली. (उदा. जपानी भात शेतीचा प्रयोग)आधुनिक आणि तांत्रिक शेती करताना अशा प्रकारच्या योजनांची आज अमंलबजावणी करण्याची नितांत गरज आहे. परिणामत: अशा प्रात्याक्षिकांमधून शेतकरी आधुनिक यंत्रे, उपकरणे यांचा कसा वापर करावा हे शिकतील, व त्यातून शेतीसाठी लागणारे पुढचे नियोजन ते करतील आणि त्यामाध्यामातून त्यांच्या वेळेची व श्रमाची बचत होईल. हा दृष्टिकोन भाऊसाहेबांचा आधुनिक शेतीसंबंधी होता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सहकारी शेती:</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सुद्घा सहकारी शेतीवर भर दिला. शेतकर्यांनी शेतीशी भावनिक नाते न ठेवता शेतीकडे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे त्यासाठी त्यांनी शेतीचे लहान लहान तुकड्यात होणारे विभाजन टाळून ती एकत्रित कशी करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी त्यांनी सहकारी शेती हाच त्यावर योग्य मार्ग आहे असे सांगितले. त्यामुळे शेतकर्यांचे दर एकरी उत्त्पन्न वाढेल तसेच उत्पादन मूल्य कमी होऊन राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. आज सहकारी शेती करण्याची नितांत गरज आहे. त्यादृष्टिने आपण प्रयत्न करुया म्हणजे भाऊसाहेबांचे स्वप्न साकार होईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेती व्यवसायाला प्रशिक्षणाची गरज :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब नेहमी म्हणत तुम्हला शेती जरी करावयाची असली तरी तुम्ही एम.ए. होऊन करा किंवा ऍग्रीकल्चर होऊन करा जेणे करुन तुम्हाला कुणी फसवणार नाही आणि तुम्ही उत्तम शेती करु शकाल, मला असे वाटते. भाऊसाहेबांच्या या विचारांची आज खरी गरज आहे. कारण आज शेतकर्याला शिक्षणाची गरज नाही आणि कोणीही ऐरागैरा योग्य रितीने शेती करु शकतो हा सर्वदूर पसरलेला चुकीचा समज आहे. हा दृष्टिकोन बदलवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण या चुकीच्या समजुतीमधूनच समाजात नैराश्य आणि वैफल्य पसरते आणि त्यातूनच मग सगळीकडे असफल झालेले लोक निराशेने, उदासिनतेकडे वळताना दिसतात किंवा आजच्या घडीला ते आत्महत्या करताना दिसतात. त्याचे कारण त्यांच्याजवळ ना शारीरिक क्षमता असते ना बौद्घीक कुवत, त्यामुळे इतर व्यावसायिक शिक्षाप्रमाणेच शेती व्यवसायाशी संबधित असणार्या सर्व सोयी, सुविधा नवनवीन पद्घती आणि अवजाराची माहिती असणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय हा स्थितीशील व्यवसाय आहे. याची जाणीव करुन देण्याची गरज आज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. तसेच आजच्या शिक्षणाची गंगा संशोधकाच्या प्रयोगशाळेतून थेट शेतात राबणार्या शेतकर्यांच्या पर्यंत पोहचली पाहिजे. तरच तो शेतकरी उत्तम व आधुनिक शेती चांगल्याप्रकारे करु शकतो. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्यांच्या हितासंबंधी विचार :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
म. ज्योतीराव फुले यांच्या प्रमाणे शेतकर्यांच्या हितासंबंधी अतिशय पोटतिडकीने भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांनी विचार मांडले आहेत. दि.3 सप्टेंबर 1994 रोजी शासनाने शेतकर्यांकडे केलेल्या दुर्लक्षासंबधी खेद व्यक्त करताना ते म्हणतात, सरकारच शेतकर्यांची अक्षम्य उपेक्षा करीत आहे. केवळ संख्या बळामुळे नव्हे तर श्रेष्ठतम कार्यामुळे या भारतभूमीवर शेतकर्यांना पूर्वापार प्राधान्य मिळत आले आहे. त्यामुळेच भारत शेतकर्यांचा देश म्हणून सर्वत्र प्रसिद्घ आहे व असा नित्य उद्घोषही केला जातो. हे शेतकरीच खर्या अर्थाने भारताचे स्वामी आहेत. पण तरी सुद्घा त्यांच्या कल्याणाची कुणालाच आस्था नाही. कामगार वर्ग व शेतकरी वर्ग यांच्या परिस्थितीचे तुलनात्मक दर्शन घडवून डॉ. पंजाबराव देशमुख म्हणतात, ज्या प्रचंड मानव समुहाच्या, कृषकांच्या घामावर आपण जगतो, विकास साधतो त्यांच्याकरिता अजून एकही कल्याणकारी अधिकारी नाही हे आश्चर्याने म्हणावे लागते. व आजची परिस्थिती सुद्घा यापेक्षा वेगळी नाही. आज ज्या शासकीय योजना आहेत. त्या सर्वसामान्य शेतकरी वर्गापर्यंत इथला भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग (काही सन्माननीय अपवाद वगळता)पोहचू देत नाही हे वास्तव आपण मान्य केले पाहिजे. यावरुन भाऊसाहेबांचा शेतकर्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती व्यापक होता हे कळू शकते. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संपत्ती करावरील विधेयक:</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संपत्ती करावरील विधेयक डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दि.6एप्रिल 1949 रोजी केलेल्या भाषणात शेतकर्यांच्या मालाला कमी भाव देण्याचे समर्थन करणार्यांवर सडकून टीका केली ते आपल्या भाषणात म्हणाले, शेतकर्यांनी उत्पन्न केलेल्या वस्तूंचे जास्त भाव दिले तर त्यामुळे पैशाची किंमत कमी होते म्हणून शेतकर्यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी होते म्हणून शेतकर्यांच्या उत्पादनाच्या किंमती कमी करणे हाच चलनवाढ रोखण्याचा मार्ग आहे, असे बेजबाबदार विधान पण ते योग्य नाही. वास्तविक भारतीय शेतकरी पूर्वी कधीही नव्हता इतका आज दरिद्री झाला आहे. त्यांच्या हाती जो काही पैसा येतो तो सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर खर्च होऊन जातो. पुष्कळदा तर त्याला आपल्या कुटुंबाच्या सर्व साधारण गरजादेखील भागवता येत नाहीत. उलट ज्यांची संख्या संपूर्ण देशात दोन हजारापेक्षाही कमी आहे, अशा गर्भश्रीमंत माणसाच्या हातात देशातील शेकडा 75 टक्कापेक्षा अधिक संपत्ती या मूठभर लोकांच्या हातात जनतेची अधिक पिळवणूक करण्याकरिता राहू न देता, जर देशाच्या औद्यागिक विकासार्थ उपयोगात आणली तर देशाची अधिक प्रगती साधून लोक कल्याण होऊ शकेल. असे अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिपादन भाऊसाहेबांनी या विधेयकाबाबत मांडले, त्यातून शेतकर्यांच्या प्रश्नांवर व त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर डॉ.पंजाबराव देशमुख किती जागरुक असत व शेतकर्यांच्या समग्र विकासाचा त्यांनी कसा ध्यास घेतला होता याची साक्ष पटते. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतकरी संघटित होण्याची गजर :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्यांनी स्वत:च्या हितासाठी व राष्ट्रीय विकास घडवून आणण्यासाठी संघटित झाले पाहिजे असे भाऊसाहेबांना नेहमी वाटत असे. शेतकर्यांच्या उद्घारासाठी व शेतकरी संघटित होण्यासाठी भाऊसाहेबांनी अनेक योजना राबविल्या. 1955 साली त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि त्यातून अनेक उपसंघटना स्थापन केल्या अ)राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ. ब) कृषक सहकारी भारतीय अधिकोष. क)आफ्रो-आशिया ग्रामीण पुर्नरचना संघटना. इ)अखिल भारतीय ताडगूळ महासंघ. ई)कृषी उत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा महासंघ इत्यादी संघटना करण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब म्हणत इंग्लडमध्ये National Farmers Union आणि National Farmers Union of scotland ह्या संघटना शेतकर्यांनी मिळनूच बनविल्या आणि त्या शेतकर्यांच्या हितासाठीच राबतात. त्याचप्रमाणे अमेरिका व कॅनडातही अशा संघटना आहेत. त्या संस्था केवळ तेथील शेतकर्यांच शेतीहीतच न पाहता आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीची काळजी घेतात. इंग्लड,अमेरिका व कॅनडाचा आदर्श घेऊन त्यांनी इथल्या शेतकर्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतही शेतकर्यांचे हीत जोपासणारी देशव्यापी संघटना असावी असे प्रतिपादन त्यांनी केले होते. पण दुर्दैवाने शेतकरी संघटित करण्याचे प्रयत्न त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आजही शेतकरी आणि कृषी व्यवसाय असंघटित आहे, त्याला संघटित करण्याची गरज जागतिकीकरणात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. शेतकरी आणि शेती व्यवसाय सुदृढ होईल. त्यादृष्टीने समाजातील शेतकरी नेत्यांनी व विचारवंतानी पुढे येणे काळाची गरज आहे, तरच भाऊसाहेबांचे स्वप्न साकार होईल व शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील. </div>
<div style="text-align: justify;">
एकंदरीत भाऊसाहेबांनी शेतकरी आणि शेतीविकासाचा जणू ध्यासच घेतलेला होता असे त्यांचे शेतीविषयक विचार समजून घेतल्यानंतर लक्षात येते. कार्ल मार्क्सने जगातील कामगारांनो एक व्हा हा संदेश दिला आणि जगातील कामगार संघटित झाले त्याप्रमाणे शेतकर्यांना संघटित करणारा एकमेव नेता म्हणजे भाऊसाहेब. अशा या महान शेतकरी पुत्राला त्यांच्या जयंतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रमाण. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
संदर्भ ग्रंथ-</div>
<div style="text-align: justify;">
1)लोकमहर्षी भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती. मंडळ मुंबई</div>
<div style="text-align: justify;">
2)स्मरणिका- शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी महोत्सव 1997-98.</div>
<div style="text-align: justify;">
__________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
- प्रा. अशोक रा. इंगळे, डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर मो. 9421747417</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-89807692400872371762014-12-21T07:07:00.004-08:002014-12-27T21:09:41.918-08:00समतेचे समर्थक___प्रा. व्ही. जी. पडघन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
पृथ्वी-तलावर सर्व मानव निर्सगत:च समान असताना माणसानेआपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक तर काही अजानता मानवामध्ये विविध भेद निर्माण केले. विशेषत: भारतामध्येच या भेदाची उत्पत्ती झाल्याचे दाखले पहायला मिळतात. आजही त्याचे उग्र स्वरुप पहायला मिळते. त्यामुळे देशाचे अतोनात अतोनात नुकसान झाले. अशिक्षितपणा, अंधश्रद्घा, कालबाह्य रुढी-परंपरा इत्यादीमुळे अनेक प्रकारचे भेदभाव भारतीय समाजामध्ये रुढ झालेत. प्रामुख्याने स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष, ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत इत्यादी.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांना विद्यार्थी असतानाच ह्या समस्येची जाणीव झाली असावी. विद्यार्थी दशेतच ह्या समस्येबाबत त्यांचया मनाची घडण होत गेली. त्यावर चिंतन, मनन होते गेले. पण वेळ आली नव्हती. कारण प्रथम शिक्षण पूर्ण करणे हे भाऊसाहेबांचे ध्येय होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा व त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा प्रभाव भाऊसाहेबांवर पडणे क्रमप्राप्त होते. महात्मा ज्यातीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा यांचया कार्याची जाणीव लोकमान्य टिळक, आगरकर तसेच महात्मा गांधीची स्वातंत्र्यांची चळवळ दृष्टिआड करणे शक्य नव्हते. लंडन येथील वास्तव्यात तेथील समता-स्वातंत्र्य आणि आर्थिक उन्नती पाहून कोसोदूर असल्याची जाणीव भाऊसाहेबांना होती. विलायतेतील सहा वर्षाच्या वास्तव्यात ज्ञान सामर्थ्य संपादन करुन 1926 मध्ये भारतात परत आले. त्यानंतर तन-मन-धनाने त्यांनी भारत देशाची सेवा केली.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे कार्य बहुविध असून त्यापैकी त्यांच्या भेदभाव निर्मूलन व समानता स्थापित करण्याच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अस्पृश्यता निर्मूलन कार्य :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्पृश्य-अस्पृश्यता या भेदान सर्व भारतभर उग्र स्वरुप धारण केले होते. संपूर्ण भारतभर अस्पृश्यता पाळली जात होती. त्याला वर्हाड प्रांत अपवाद नव्हता. अस्पृश्यता नष्ट करण्यात महाराष्ट्रामधील समाजसुधारकांनी सुरुवात केली होती. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, वि.रा.शिंदे यांचे कार्य मोलाचे होते. भाऊसाहेबांच्या समकालीन समाज सुधारकांमध्ये संत गाडगे बाबा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचे सामाजिक कार्य हाती घेतले होते. त्याच काळात भाऊसाहेबांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य हाती घेऊन त्या कार्याला सुरुवात केली होती. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी भाऊसाहेबांनी केलेले प्रभावी कार्य खालील प्रमाणे आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मंदिर प्रवेश सत्याग्रह :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अस्पृश्यांना देव-देवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करता येत नव्हता. त्यांना मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घ्यावे लागत होते. भाऊसाहेबांनी अस्पृश्यता तनवारणाचा मार्ग म्हणून नोव्हेंबर 1927 मध्ये अमरावतीतील अंबादेवीच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्याचे ठरविले. मंदिर प्रवेश हा प्रश्न फक्त धार्मीक नसून सामाजिक होता. म्हणून भाऊसाहेबांच्या पुढाकाराने विदर्भ प्रांतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. भाऊसाहेबांनी गावो-गावी जाऊन सत्याग्रहाचे महत्त्व सांगून प्रचार केला. त्यामुळे हजारो सत्याग्रही मंदिर प्रवेशाकरिता नियोजित तारखेला उपस्थित झाले होते. बहुजन समाजातील अनेकांचा अस्पृश्यांना मंदिर प्रवेशास विरोध होता. तसेच अमरावती मधील अंबादेवी पुराणमतवादी विश्वस्त मंडळाचाही विरोध होता. पण भाऊसाहेब सच्चे समाजसुधारक होते. त्यामुळे ते आपल्या मतावर ठाम होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब खापर्डे होते. भाऊसाहेबांनी सत्याक्रहाकरिता डॉ. बाबासाहेबांना बोलाविले होते. </div>
<div style="text-align: justify;">
मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, दादासाहेब खापर्डे यांनी अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्याविषयी आश्वासन भाऊसाहेबांना दिले. तशी तडजोड झाली. त्यामुळे तसे पत्र खापर्डे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाठवून येत्या तीन महिन्यात मंदिर अस्पृश्यासाठी खुले करुन देण्याबाबत कळविले त्यामुळे भाऊसाहेबांना सत्याग्रह तात्पुरता मागे घ्यावा लागला. भाऊसाहेबांच्याच कार्याचे फळ म्हणून अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एक पाणवठ्याची योजना :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पाणी पिण्यासाठी स्पृश्य -अस्पृश्य यांचया वेगवेगळ्या विहिरी होत्या. स्पृश्यांच्या विहिरीवर अस्पृश्यांना पाणी भरण्यास मनाई होती. प्रथम महात्मा फुल्यांना स्वत:च्या मालकीची विहीर अस्पृश्यांसाठी पाणी पिण्यांकरिता खुली केली तेच कार्य पुढे भाऊसाहेबांनी केले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि स्पृश्य-अस्पृश्य यातील भेदभाव कमी करण्यासाठी खुल्या केल्या. भाऊसाहेब बोलके सुधारक नव्हते तर ते कर्ते समाजसुधारक होते म्हणून त्यांनी अस्पृश्यांसाठी पिण्याच्या विहीरी खुल्या करण्यासोबतच स्वत:च्या खर्चाने अनेक विहीरी खोदून दिल्या. स्पृश्य-अस्पृश्य एकाच विहीरीवर पाणी भरत असलयाचा पहिला प्रयोग भाऊसाहेबांनी यशस्वी केला. त्यामुळे स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव कमी होऊन अस्पृश्यता कमी झाली. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
श्रद्घानंद छात्रालयाची स्थापना :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अस्पृश्यता एवढी भयंकर होती तसेच जाती विषमता होती. विविध जातीतील विद्यार्थी एका वसतिगृहामध्ये राहणे अशक्य होते. विविध जातीतील विद्यार्थी एका छात्रालयांमध्ये एकत्र आणणे म्हणजे विरोधकांच्यादृष्टीने धर्मबुडवेपणाच होता.जाती व्यवस्थेला विरोध म्हणजे धर्माला विरोध. त्याकाळी अनेक जातीसाठी स्वतंत्र छात्रालये होती. भाऊसाहेब देशमुखांनी स्पृश्य, अस्पृश्य भेद नष्ट व्हावा, अस्पृश्यता नष्ट व्हावी, खेड्यातील शेतकरी, शेतमजूर व अस्पृश्यांची मुले शिकावी याकरिता कमी खर्चात मोफत शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून श्रद्घानंद छात्रालय स्थापन केले. सर्वच जाती धर्मातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून जाती व्यवस्था व अस्पृश्यता नष्ट केली. भाऊसाहेबांच्या शैक्षणिक संस्थेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच पुढे वर्हाडातील अस्पृश्यता व जातीयता नष्ट करण्यात मोलाची भर घातली. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सहभोजन घडवून आणले: </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचा सहभोजनातून अस्पृश्यता नष्ट होऊ शकते ह्यावर गाढा श्रद्घा होती. त्यांच्या मते कायदेमंडळात कायदे करुन आणि पुढार्यांनी भाषणे देऊन अस्पृश्यता व जातियता नष्ट होणार नाही. भाऊसाहेब हे बोलके सुधारक नसून कृतिशील सुधारक होते. म्हणून त्यांनी झाडांच्या फांदयाना हात न घालता प्रत्यक्ष बुंध्यावरच त्यांनी घाव घातला. सहभोजनाचा पहिला प्रयोग त्यांनी श्रद्घानंद छात्रालयाच्या स्वरुपात केला. तसेच गावा-गावामध्ये अस्पृश्यांसहित सर्व जातीतील लोकांना एकत्र आणून सहभोजन दिले. त्यांच्या वडिलांच्या श्रद्घांच्या वेळी पारंपारिक श्रद्घेला फाटा देऊन पितर म्हणून अस्पृश्यांना निमंत्रित केले व त्यांनाच भोजन दिले. भाऊसाहेबांचे हे कार्य क्रांतिकारक , अंधश्रद्घेला फाटा देणारे व अभिनंदनीय ठरले. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब हे स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते. भारतामध्ये प्राचीन काळापासून स्रियांना पुरुषांकडून दुय्यम वागणूक मिळत होती. स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही स्त्री-पुरुष असामानतेची प्रथा सुरुच होती. भाऊसाहेबांसारख्या दुरदृष्टीच्या समाज सुधारकाला बाब खटकणारी वाटत होती. भाऊसाहेबांनी स्वत: स्रियांच्या उन्नतीकरिता व त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घेतला. स्त्री ही स्वतंत्र असली पाहिजे. स्रियांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला पाहिजे, म्हणूनच भाऊसाहेबांनी स्रियांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले. श्रीमती राधाबाई बुधगांवकर या तमाशा कलावंत बाईचा भाऊसाहेबांनी सत्कार केला.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या काकूंची विधवा बहीण राहत होती. त्यांची मुलांच्या वसतिगृहावर निरीक्षिका म्हणून नियुक्ती केली. स्वत:च्या पती विमलाताई मॅट्रीक होत्या. विवाहानंतर भाऊसाहेबांनी एल.एल.बी. शिकवले तसेच सौ.कुसुमावती देशपांडे ह्या स्त्री असल्यामुळे महाविद्यालयात प्राध्यापिका करिता सिलेक्शन कमिटीने नियुक्ती केली नाही. उमेदवाराची पात्रता असूनही फक्त ती स्त्री असल्यामुळे नाकारणे म्हणजे कुसूमावतीवर अन्यायच होता. भाऊसाहेबांनी स्वत: लक्ष घालून कुसूमावती बाईची नियुक्ती केली. त्यामुळे कुसूमावतींना न्याय मिळाला व स्त्री पुरुष समानता हे तत्व भाऊसाहेबांनी अंगिकारले. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ग्रामीण-शहरी भेद अमान्य :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबा स्वत: ग्रामीण व शेतकरी कुटुंबामधून आले होते. ग्रामीण जीवनाशी त्यांचा जवळून संबंध होता होता. शहरी लोकांच्या तुलनेत ग्रामीण लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. शेतकरी दिवस-रात्र राबून देखील त्यांच्या कुटुंबाला खायला पोटभर अन्न मिळत नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये मुलीचे लग्न किंवा इतर सामाजिक कार्य करावयाचे झाल्यास सावकाराकडून शेतकर्याची लुबाडणूक होत होती म्हणून भाऊसाहेबांनी ग्रामीण जीवन सुधारण्याकडे लक्ष दिले. </div>
<div style="text-align: justify;">
विषमता, शोषण, गरिबी, अज्ञान इत्यादी नाहीसे करण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे. करिता शाळा व महाविद्यालये काढून त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता चौदा कलमे ही प्रभावी उपाय योजना भाऊसाहेबांनी मांडली त्याला बर्याच प्रमाणात यश येऊन ग्रामीण जीवन सुधारण्यास मदत झाली. पण दुर्दैवाने पुढील काळात भाऊसाहेबांच्या चौदा कलमांचा शासनाला विसर पडला परिणामत: विदर्भातील शेकडो शेतकर्यांनी अलिकडे आत्महत्येचा मार्ग निवडून आपली जीवनयात्रा संपविली. भाऊसाहेबांनी त्याकाळी चौदा कलमे मांडून शेतकर्यांविषयी असलेली तळमळ व ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी केलेले कार्य दृष्टिआड करता येत नाही. </div>
<div style="text-align: justify;">
__________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
प्रा. व्ही.जी. पडघन, डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-32880089638438012452014-12-21T07:04:00.000-08:002014-12-27T21:10:27.262-08:00 बहुआयामी भाऊसाहेब ___बी.जे. गावंडे/ रजनी बढे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
बहुजन समाजाच्या उत्थानाच्या इतिहासात सर्वप्रथम नाव येते ते महात्मा ज्यातीबा फुले यांचे शेतकर्यांचा आसुड लिहून ज्योतिबांनी शेतकर्यांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला. दैन्य, कर्जबाजारी, शोषित, शेतकर्यांचे हुंकार व उसासे त्यांनी लिपीबध्द केले. या लिपीबद्घ, हुंकारात डॉ. पंजाबरावांना आपल्या जीवनध्येयाचे, जीवनकार्याचे प्रतिबिंब दिसले. ज्योतिबांच्या शिक्षणविषयक कार्याची प्रेरणा मिळाली, बहुजन समाजाच्या विकासाच्या मूलमंत्र शेती आणि शिक्षणात असल्याचे भाऊसाहेबांनी मनोमन स्वीकारले आणि एका नव्या युगाचा जन्म झाला. या युगाचे शिल्पकार होते डॉ. पंजाबराव देशमुख.</div>
<div style="text-align: justify;">
प्रात:स्मरण करुन स्फूर्ती घ्यावी असे विदर्भ भूमीतील नररत्न, महामानव डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख बहुजन समाजातून उदयाला आलेले व बहुजन समाजासाठी समर्पित झालेले जीवन होय.या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यास शब्दसामर्थ्य कमी पडल्यास नवल नाही. सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व साकार होऊ शकते याचे नाही. सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व साकार होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. इंद्रधनुष्यातील सप्तरंग भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वात सामावलेले होते. कृषिक्षेत्रात भाऊसाहेब अग्रणी, शिक्षणक्षेत्रात आघाडीवर, तर सहकार क्षेत्रात भाऊसाहेब स्पर्धा करणार्यांच्या पुढे होते. राजकारणात राहूनही राजकारणाच्या दुर्गंधीपासून अलिप्त असणारे भाऊसाहेब म्हणजे, चिखलातून उगवलेले कमळच होय.</div>
<div style="text-align: justify;">
27 डिसेंबर 1898 ला गीताजयंतीच्या दिनी अमरावती जिल्ह्यातील पापळ ह्या गावी कदम घराण्यात श्यामराव बापू देशमुख व आई राधाबाई यांच्या पोटी जन्म झाला. श्यामराव बापू सामान्य शेतकरी होते. आपल्या मुलाला शिक्षण द्यावे अशी त्यांची इच्छा होती. भाऊसाहेबांनी तिसरीपर्यंत पापळ येथेच शिक्षण घेतले. पापळ गावी चौथा वर्ग नसल्यामुळे तिसरा वर्ग पास झाल्यावर पुन्हा त्याच वर्गात प्रवेश घेतला. चवथी ते सातवी पर्यंतचे शिक्षण पापळ पासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या कारंजा लाड येथे घेतले. पुढील शिक्षण अमरावती येथे मॅट्रीकची परीक्षा 1915 साली उच्च श्रेणीत पास केली. आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे, अशी शामराव बापू ह्या स्वाभीमानी आणि दूरदृष्टीच्या कर्तव्यतत्पर शेतकर्याची इच्छा होती. आर्थिकस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी आपली शेती सावकाराकडे गहाण ठेवून कर्ज घेऊन भाऊसाहेबांना 1916 मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्यूसन कॉलेज पुणे येथे पाठविले. अनेक आर्थिक अडचणींवर मात करुन त्यांनी 1922 मध्ये बी.ए.ऑनर्स ही पदवी पुणे विद्यापीठातून मिळविली. आपल्या मुलाने फार मोठे होऊन केवळ आईवडिलांनाच मिळविली. आपल्या मुलाने फार मोठे होऊन केवळ आईवडीलांनाच मदत न करता वर्हाडातील सर्व गोरगरीब शेतकरी आणि ग्रामीण, पिडीत समाजाला मदत करावी यासाठी कर्जबाजारीपणची खंत न बाळगता उच्च शिक्षणासाठी 1923 ला इंग्लडला पाठविले. </div>
<div style="text-align: justify;">
1923 ला इंग्लंड येथे पोहोचल्यानंतर भारतातील एक बुद्घिमान शेतकर्यांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी आलेला आहे आणि तो गुणानुक्रमे पहिला आहे. म्हणून त्यांना 1923 पासून डनलॉप स्कॉलरशिप शासनाकडून मंजूर करण्यात आली. 1926 पर्यंत त्यांनी अनेक अडचणींचा सामना करुन लंडन येथील एडीनबर्ग विद्यापीठातून एम.ए.ची. उच्च पदवी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात वैदिक वाङमयातील धर्माचा उगम आणि विकास हा संशोधन प्रबंध सादर केला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने 1926 मध्ये त्यांना डी.फिल. ही पदवी बहाल केली. ह्याच कालखंडात भाऊसाहेबांनी कायदेशास्त्राचा अभ्यास करुन बार- अॅट-लॉ ही पदवी मिळविली. 1926 ला भाऊसाहेब भारतात परत आले. भाऊसाहेब भारतात परत आल्यावर वडिलांच्या आग्रहास्तव वकिली सुरु केली. परंतु भाऊसाहेबांचा पिंड शेतकर्याची दैनावस्था, त्यांच्या हालअपेष्टा, त्याचप्रमाणे त्यांची हलाखीची परिस्थिती व कर्जबाजारीपणा पाहून भाऊसाहेबांचे अंत:करण द्रवले आणि त्यांनी शेतकरी व ग्रामीण समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.</div>
<div style="text-align: justify;">
शेतकरी सुखी होण्याकरिता, त्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत ह्याकरिता वसतीगृहाची व व्यायाम शिक्षण संस्थेची स्थापना केली. श्रद्घानंद वसतीगृहामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील कष्टकरी होतकरु विद्यार्थ्यांना विनामूल्य राहण्याची, जेवण्याची व शिक्षणाची सुविधा 1926 ते 1965 पर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत तसेच कोणतेही शासकीय अनुदान उपलब्ध नसताना करुन दिली. या संस्थेच्या स्थापनेपूर्वी महाराष्ट्रात अशा शिक्षणाच्या सोयीची उपलब्धता केवळ महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थांनात माननीय व आदरणीय शाहू महाराजांनी सुरु केली होती. </div>
<div style="text-align: justify;">
शाहू महाराजांच्या या शैक्षणिक कार्य व संवर्धनाचा वसा शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुखांनी घेतला आणि अनेक गरीब विद्यार्थ्यांना श्री श्रद्घानंद अनाथलयाद्वारे शिक्षणाची दारे उघडी करुन ज्ञानाची गंगा प्रवाहीत केली. कर्मयोगी संत गाडगेबाबांचे सहाय्य मिळाले. ह्या वसतिगृहातून अनेक समाज भूषण व्यक्तिमत्त्वांची निर्मिती झाली. शेतकरी सुखी होण्याकरिता त्या गोरगरिबांची मुल शिकली पाहिजेत. ह्याकरिता 1928 मध्ये अमरावती जिल्हा जनपद सभेचे अध्यक्ष झाल्याबरोबर सर्वप्रथम जिल्ह्यात अनिवार्य शिक्षणाची सोय व्हावी म्हणून विरोधकांचे हृदय परिवर्तन करुन 18 पै. असलेला अधिभार 27 पै पर्यंत वाढविण्यात यश मिळविले. म्हणजे 50% करात वाढ करुन त्यांचा वापर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्याचा ठराव मंजुर केला. बहुजनांमधील अंधश्रद्घा, वाईट चालीरिती, रुढी परंपरा,नष्ट करुन त्यांना आधुनिक, वैज्ञानिक विचार प्रवाहात उभे करायचे असेल तर शिक्षण आवश्यक आहे. विद्यामृतानेच विद्यर्थ्यांत आणि विदर्भात नवचैतन्य निर्माण होईल. शिक्षित हाच समाजाच्या क्रांतीच नेतृत्व करु शकतो. हे त्यांनी हेरले होते. म्हणूनच भाऊसहोबांनी 1931-1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करुन बहुजन, ग्रामीण गरीब शेतकर्यांच्या मुला मुलींना सुशिक्षीत व संपन्न बनविण्याच्या जाणिवेतून वटवृक्ष उभा केला. शिक्षण संस्थेवर आर्थिक संकट आले असता स्वत:चा अमरावती येथील बंगला गहाण ठेवून अर्थप्रबंधन केले होते. हे सर्वांना माहीत आहे. 30 जानेवारी 1950 ला भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे 2011-12 ह्या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरु झाले आहे. </div>
<div style="text-align: justify;">
सर्वप्रथम पहिली शाळा खापर्डे बगिच्यात काढण्यात आली. तिला तट्टयाची शाळा म्हणून ओळखायचे. नंतर त्या शाळेचे स्थानांतर रेल्वे. स्टेशन जवहील जागेत करण्यात आले. श्री शिवाजी हायस्कूल, स्टेशन ब्रँच अमरावती ह्या नावाने आज ती ओळखली जाते. ह्या शाळेची भूमी डॉ. पंजाबराव व संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने झालेली आहे. त्या शाळेतून अनेक महान व्यक्ती घडल्या. त्यापैकी अमरावती शहर व परिसरातील नामवंत डॉक्टर व समाजभूषण मा.वा.पु. राऊत हे सुद्घा आहेत. तयांनी वर्ग 5 वा 6वी पर्यंतचे शिक्षण ह्याच शाळेत घेतले. महणजे शिक्षणाचा नया ह्याच शाळेत भक्कम झाला. त्या जोरावर पुढे मेनब्रँचमध्ये हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले व नागपूरला वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय शास्त्रातील उच्च शिक्षण इंगलंडला पूर्ण करता आले व एक नामांकित डॉक्टर म्हणून सतत 50 वर्षे रुग्णांची सेवा त्यांनी केली. भाऊसाहेबांबद्दल बोलताना ते म्हणाले की, गाडीत बसलयावरही जर त्यांना भेटायला कोणी आले तर ते गाडीतून उतरुन त्या व्यक्तीची भेट येत. चहापान करीत व मग निघून जात असे हे निगर्वी व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेबांचे बी.पी. तपासण्यासाठी मी दररोज बंगल्यावर जात असे परंतु अंत्यसमयी मी त्यांचे जवळ नव्हतो याची मला सदैव खंत राहील. भाऊसाहेबांच्या या संस्थेत मी सतत 20 वर्षापासून कोषाध्यक्ष आहे. हे मी माझे भाग्य समजतो थोड्या फार प्रमाणात का होईना त्यांच्या रुणातून उतराई होऊ शकलो. याचे मला समाधान आहे असे ते म्हणाले अशी समाज कार्य करणारी असंख्य माणसे भाऊसाहेबांमुळे घडली आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्त्री शिक्षण विषय कार्य :</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मुलींच्या आयुष्याचे सुखी स्वप्न रंगविताना त्यात शिक्षणांचे रंग भरायला विसरु नका असेच जणू भाऊसाहेब सांगत. या समाजव्यवस्थेत स्रियांचे शोषण अतिशय चिंताजनक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वैदिक धर्मग्रंथ हा हिंदू संस्कृतीचा आधारस्तंभ समजला जातो. या पार्श्र्वभूमीवरच त्यांनी ‘वैदिक साहित्यातील धर्माचा उगम व विकास’ या विषयावर संशोधन करुन शोषणाच्या मुळाचा शोध घेण्याच प्रयत्न केला. मनुष्याची निर्मिती ही कोणत्याही चमत्कारिक जगदात्म्याने केली नसून ते सरळसरळ उत्क्रांती क्रमाचे फळ आहे. साहजिक या सिद्घांतमुळे स्त्री-पुरुष भेदाभेदच नष् ट होतो. मग स्त्री ही शुद्र कशी ठरु शकते? असा प्रश्न भाऊसाहेब करतात. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कार्यात स्त्री-उत्थानाचा प्रयत्न निहित असलेला दिसतो. स्त्री-शिक्षणाचा खर्या अर्थाने विकास व्हावा म्हणून विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांनी केला. </div>
<div style="text-align: justify;">
नागपूरचे श्री.पी.बी. काळे आणि त्यांच्या सुविध पत्नी तत्कालीन खासदार अनुसया काळे यांच्याकडून त्यांच्या ट्रस्ट मधून 18 हजार रुपयांची देणगी भाऊसाहेबांनी मिळविली आणि यातून विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था केली भाऊसाहेबांनी आपल्या आयुष्यात स्रियांच्या संदर्भात कार्य केले. त्यापैकी हिंदू हायस्कूलवर स्त्री-शिक्षकांची नेमणूक केली. याच काळात कुसूमावती देशपांडेना शासकीय महाविद्यालयात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. श्रद्घानंद मुलींचे वसतीगृह स्थापन केले. विमलाताई सोबत जिजामाता मंडळ, शिवबालमंदिर याचे काम पाहिले. अमरावतीत कस्तुरबा कन्या शाळा, अशा अनेक मुलींच्या शाळांची स्थापना केली. आपल्या शिक्षणासाठी आपल्या आई वडिलांनी केलेला संघर्ष त्यांनी स्वत: अनुभवला होता. म्हणुनच आपल्या आयुष्यात त्यांनी ज्यांना शिक्षणाची आस व जिद्द आहे अशा होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना भरभरुन मदत केली. इंजिनिअरिंग खात्यात मोठ्या मानाच्या पदावर पोहोचलेल्या-दशरथ ढोरे नावाच्या एका गरीब विद्यार्थ्यांला जो श्रद्घानंद अनाथलयात एक वेळ जेवून अर्धपोटी राहून शिकत होता त्याला शिक्षणाची संधी दिली. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कृषी संस्कृती:</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भारत हे एक मोठे कृषिप्रधान राष्ट्र आहे. ह्या देशात सर्वात मोठा कृषक शेतकरी समाज आहे. शेतकरी तसेच कष्टकर्यांच्या मुलाबाळांचा विकास व उन्नतीकरिता खर्या अर्थाने आजीवन अहोरात्र झटणारा एखादाच नेता समाजसेवक केवळ डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख असतो.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी मानवी जीवनातील कृषी हीच आद्य व सर्वात श्रेष्ठ संस्कृती मानली आहे. या कृषी संस्कृतीनेच मानवी जीवनाची वस्तुनिष्ठ मूलतत्वे निर्माण केली आहेत. कृषी शिवाय मानवी जीवनाच्या विकासाचे व सभ्यतेचे सिद्घांत फोल आहेत. पृथ्वीवरील मानवी संस्कृती व सभ्यतेचा विकास कृषीतूनच झाला असे भाऊसाहेब मानत होते. महापुरुषांचे विचार समूह पातळीवर रुजविले पाहिजे. असे भाऊसाहेब मानत होते. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख कृषकांचे नेते होते. ते कृषी संस्कृतीचे उपासक होते आणि कृषिक्रांतीचे प्रणेते होते. भाऊसाहेबांनी बहुजन समाजाची शैक्षणिक प्रगती आणि शेतकर्यांची उन्नती ह्या दोन गोष्टींचा विशेष ध्यास घेतला. नवसमाजाची बांधणी करावयाची असेल तर शेती उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे भाव ठरवावे, शेतकर्यांना विमा योजना लागू करावी यासाठी आग्रह धरला. खेड्यातील भारत समृद्घ करावयाची असतील तर कृषक क्रांतीशिवाय तरणोपाय नाही. हे भाऊसाहेबांच्या कृषी विचाराचे सूत्र होते. </div>
<div style="text-align: justify;">
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेबांनी गाजविलेली यशस्वी कारकिर्द सर्वज्ञात आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून ते सलग तीन वेळा निर्वाचित झालेत. सन 1952 ते 1957 पर्यंत कृषिमंत्री आणि 1957 ते 1962 पर्यंत कृषिमंत्री व काही काळ सहकार मंत्री होते. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. शेतकर्यांच्या मुलांना सवलती मिळवून दिल्यात.1959-60 मध्ये जागतिक स्वरुपाची कृषी प्रदर्शनी दिल्ली येथे भरवून कृषी विज्ञानाचे प्रगत स्वरुप भारतीय नागरिकांना दाखवून दिले. ह्या कृषी प्रदर्शनाकरिता अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर व रशियाचे अध्यक्ष क्रुश्चेव्ह उपस्थित होते. जगातील इतर सर्व देशातून प्रतिनीधी या मेळाव्यास उपस्थित होते. त्यावेळी भाऊसाहेबांची संघटन शक्ती व कार्य पाहून कृषकांविषयी आस्था पाहून सर्व लोक आश्चर्यचकीत झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेन हॉवर इतके प्रभावित झाले होते की, यांनी वाशिंग्टनला परतल्यावर भाऊसाहेबांना पत्र पाठविले. </div>
<div style="text-align: justify;">
संपूर्ण ह्यातील भाऊसाहेबांनी बहुजनांचे, शेतकरी कष्टकरी, आबाल वृद्घांचे जीवन सुकर व्हावे म्हणून अहोरात्र परिश्रम घेतले. भाऊसाहेबांच्या ह्या बहुजनांच्या उत्थानाच्या चळवळीत वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांनी आपल्या किर्तनातून सर्व समाजातील धनिकांनी श्रद्घानंद अनाथालय वसतिगृहाला आर्थिक सहाय्य करण्याचे वेळोवेळी आवाहन केले व सक्रीय मदत केली. एका शेतकर्यांच्या मुलगा सर्व समाजातील शेतकर्यांच्या कष्टकर्यांच्या हिताकरीता शिक्षणाच्या माध्यामातून अहोरात्र झटतो आहे. याचा सार्थ अभिमान कर्मयोगी गाडगेबाबांना होता. जेव्हा भाऊसाहेबांचा समावेश कृषिमंत्री म्हणून पहिल्या मंत्रीमंडळात झाला ती भारतातील शेतकर्यांसाठी अभिमानाची व भाग्याची बाब होती. म्हणूनच वैराग्यमूर्ती गाडगेबाबांनी भाऊसाहेबांच्या अमरावतीच्या प्रथम आगमनाप्रसंगी गाडगेनगर चौकातील सर्व तरोटा स्वत: उपडून झाडूने मैदान स्वच्छ केले व भाऊसाहेबांची भेट येऊन त्यांना आशीर्वाद दिलेत. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
समाज परिवर्तनाची तळमळ:</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अस्पृश्यांसाठी बंद असलेले अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर सर्वासांठी खुले करण्यासाठी 1927 ला सत्याग्रह केला. मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करताना भाऊसाहेबांना मंदिरातील प्रतिमा, पूजा महत्त्वाची नव्हती तर माणसातील ईश्वर महत्त्वाचा वाटत होता. ईश्वराचे स्मरण करण्याचा अधिकार सर्वच प्राणिमात्रांना असताना काही ठराविक लोकांनाच मंदिरात प्रवेश का?हा प्रश्न त्यांना सतत भेडसावित होता. नेमक्या ह्याच मनोवृत्तीतून अस्पृश्यांसाठी बंद असलेले अमरावतीचे अंबादेवी मंदिर खुले करावे यासाठी सत्याग्रह केला. यातूनच त्यांची समाजपरिवर्तनाची तळमळ दिसून येते. </div>
<div style="text-align: justify;">
1947 ला त्यांची भारताच्या घटनासमितीवर निवड झाली. त्यांनी 1949ला घटना समिती समोर शेतकर्यांची कैफियत मांडली.</div>
<div style="text-align: justify;">
शेतकर्यांची सेवा करणे सोपे आहे. पण त्यासाठी, सोपे कायदे, साधे शिष्टाचार व सरळ माणसे हवीत. ते तीनही गुण अंगिकारलेला डॉ. पंजाबराव देशमुख हा कदाचित भारतात या युगातील एकमेव माणूस असावा ज्याने पद, प्रतिष्ठा व पैसा यांना तुच्छ लेखून आपला जीवन यज्ञ चेतविला. असे गौरवद्गार राष्ट्रपिता महात्मा गांधीनी भाऊसाहेबाबद्दल काढले होते. </div>
<div style="text-align: justify;">
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे भाऊसाहेबांचे आदर्श होते, भाऊसाहेबांनी 1954 साली अमरावती येथे तुकाराम महाराजांवर अभंगवृत्तातच लिहिलेल्या कवितेतून त्यांच्यातील साधर्म्याची कल्पना येते. (तुकाराम महाराजांनी अभंगवाणीतून समाजाचे प्रबोधन करुन प्रपंचासोबतच परमार्थ साधला, तर भाऊसाहेबांनी आपले संपूर्ण जीवन अहोरात्र समाजाच्या उत्थानाकरिता खर्ची घालून प्रत्यक्ष कृतितून परमार्थ साधला.)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
रोजनिशी लेख:</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या महामानवाच्या व्यक्तिमत्वात सामावलेला आणखी एक गुण म्हणजे एक प्रकारे स्वत:चे आत्मनिरीक्षण व आत्मपरिक्षण करणे होय. त्यात सातत्यता व प्रामाणिकणा हवा हे दोन्ही गुण भाऊसाहेबांमध्ये होते. रोजनिशी लिहिण्याची सवय त्यांना बालपणापासून होती. आपले हस्ताक्षर अधिक चांगले व्हावे असे त्यांना वाटे त्यासाठी पेनची नीब बदलण्याची सूचना स्वत:लाच करुन त्याची अमलबजावणी केली. दि.21.1.1918 ला रोजनिशीत त्यांनी लिहिले आहे. 'अक्षर सुंदर होऊ शकेल, पण लिहिलेला शब्द खोडण्यांचा दोष नव्यानेच उत्पन्न झाला आहे. हे बरे नव्हे' त्यांच्या रोजनिशी लेखनातून त्यांची साहित्याची आवड डोकावते, राजकारण, समाजकारणातून जर त्यांना वेळ मिळाला असता तर ते निश्चितच एक थोर साहित्यिक झाले असते. याची साक्ष अतिशय आनंदाच्या क्षणी लिहिलेल्या त्यांच्या रोजनिशीतील खालील वाक्यावरुन वाटते. </div>
<div style="text-align: justify;">
ते लिहितात, बा दु:खा! कधी कधी तू मला अगदी ग्रासून टाकतोस हे मला कबूल करणे भाग आहे. पण आज मात्र तुझी स्थिती अत्यंत करुणास्पद झाली आहे. हे पहा! तुझ काळठिक्कर केविलवाण तोंड ! आज तुझ्या सर्वच भांडवलाला आग लागलेली दिसते. </div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांचे आयुष्य अनेकांच्या कल्याणसाठीच होते. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश व सुगंध सर्वत्र पसरला होता. सार्या देशाची फिकीर भाऊसाहेबांनाच का ? असा प्रश्न अनेकांच्या मनात येई. पण ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला सहज काढता येईल. सूर्याला विचारवे, तू कोणासाठी वाहतेस ? तहानलेल्यांना जलतृप्ती दिल्याने तुला काय मोबदला मिळतो? वरुणराजाला तोच प्रश्न विचारावा. हिरवीगार सृष्टी फुलवून तुझ्यापदरी काय पडते? निकालाकाशात उगवणार्या शशीला हाच प्रश्न विचारुन पहा, देतो तुला हा स्वार्थी मानव?या सार्यांचे उत्तर एकच ! फुलांचा सुगंध कुणी घेवो अथवा न घेवो, तो मंदगतीने वाहणार्या वायुबरोबर आसमंतात दरवळत असतो. तद्बतच थोरांचे जीवन असते. थोरपुरुष समाजाचे दीपस्तंभ असतात. भाऊसाहेबांचा कीर्तीरुपी सुगंध सार्या भारतात सर्वत्र पसरला आहे. </div>
<div style="text-align: justify;">
10 एप्रिल 1965 ला रामनवमीच्या दिवशी रामाचे स्मरण करुन रामस्वरुपी विलीन झालेल्या मृत्युंजय भाऊसाहेबांच्या जीवनाची सांगता झाली, ती प्रेरणादायी ज्योत चेतवूनच. एक ज्योत विझली ती जणू अनेक ज्योतींना प्रकाशमय करुनच. </div>
<div style="text-align: justify;">
एका मध्यम उंचीच्या व्यक्तिने आपल्या कर्तृत्वाने जीवनातील श्रेष्ठतम उंची गाठली होती.</div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी जे बहुमोल विचार आणि कृतिशील आचार दिलेत त्याचे विस्तृतपणे संगोपन करणे, आचरणात आणणे हीच भाऊसाहेबांना खरी श्रद्घांजली ठरेल. </div>
<div style="text-align: justify;">
डॉ.पंजाबराव देशमुख भारतीय शेतकर्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे समर्थक होते. शेती व शेतकरी क्षेत्रात त्यांनी अथक कार्य केले. सार्वजनिक जीवनातील ते एक प्रभावशाली नेते होते. अशी आदरांजली भारताचे द्बितीय पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी वाहिली.</div>
<div style="text-align: justify;">
ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विदर्भाच्या हृदय सम्राटाला वाहिलेल्या गीतांजलीतील काही पंक्ती. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ज्ञानदीप हा विद्यार्थ्यांचा, वर्हाडचा हरपला |</div>
<div style="text-align: justify;">
अरे हा थोर पुरुष लोपला || धृ ||</div>
<div style="text-align: justify;">
अखिल विश्व कृषकांचा योजक, आम्हास का विसरला ?</div>
<div style="text-align: justify;">
समाजातूनी ध्वनी गर्जला|</div>
<div style="text-align: justify;">
________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
<div style="text-align: justify;">
<span class="Apple-tab-span" style="white-space: pre;"> </span></div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-8939821682214181584.post-20765423183560610272014-12-21T06:59:00.000-08:002014-12-27T21:11:25.037-08:00एक दीपस्तंभ _अनिल वि. चोपडे <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विदर्भाच्या मातीचे सुपुत्र म्हणून ज्यांना आदराने उल्लेख केला जातो, ते म्हणजे शिक्षण महर्षी व कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख. दिनांक 27 डिसेंबर 1898 हा दिवस भारताला महत भाग्याचा ठरला या दिवशी बहुजनांचा कैवारी पापळ या गावी शेतकरी कुटुंबात जन्माला आला. तो कैवारी म्हणजेच पंजाबराव देशमुख जो आपल्या स्वकर्तृत्वाने प्रकाशमय होऊन, लोकनेता बनून सर्वांचा लाडका झाला. गीाजयंतीच्या दिवशी या वैदर्भीय कृष्णाने जन्माला येऊन समाजद्रोही कंसाचा वध करुन दिल्लीचे तख्त मिळविले. शेतकर्याचा हा मुलगा भारताचा कृषिमंत्री होऊन शेतकरी सुखी व्हावा व शेतकर्यांची भावी पिढी सुशिक्षीत व्हावी याकरिता आपला देह चंदनासारखा झिजवू लागला.</div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे त्यांनी शेतकर्यांची अवस्था पाहिलेली व उपभोगलेली होती. भाऊसाहेबांच्या बालमनावर व सर्व परिस्थितीचे भेसूर चित्र कोरलेले होते. त्यामुळेच बहुजन व कष्टकरी समाजाला या तून बाहेर पडायचे असल्यास त्यांना शिक्षण देऊन सुसंस्कृत करणे आवश्यक आहे असे त्यांचे ठाम मत होते. समाजाला नुसते शिक्षित करुन चालणार नाही तर समाजात जबाबदार नागरिक कसे तयार होतील याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. कृषिशिक्षण, लोकशिक्षण तसेच अशिक्षित व अज्ञानी असूनही ज्यांच्यामध्ये अंगभूत कलागुण आहेत अशा सर्वांना योग्य संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. भाऊसाहेबांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी कसा असतो आणि कसा जगतो याचा त्यांना चांगला अनुभव होता. म्हणूनच त्यांनी शेतकर्यांचे जीवन उजळून टाकण्याची प्रतिज्ञा केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला समाजकार्यासाठी झोकून दिले. शेतकरी सुखी तरच जग सुखी हा मंत्र त्यांनी नुसता जपलाच नाही तर त्या दिशेने त्यांनी अभिजात कार्य सुरु ठेवले त्यांची बुद्घिमत्ता आणि संयमी स्वभाव यामुळे त्यांना अनेक संधी चालून आल्या. </div>
<div style="text-align: justify;">
सन 1928 मध्ये भाऊसाहेब अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाले. त्यांचे कार्य आणि लगन पाहून त्यांना सन 1952 मध्ये भारताचे कृषिमंत्री करण्यात आले आणि विदर्भाचा गौरव त्यांनी वाढविला सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले. शिक्षणाची गंगा मूठभर लोकांच्या हाता न राहता ती खेडोपाडी निरक्षरांपर्यंत पोहचविली आणि शिक्षणाचे दालन सर्वांसाठी खुले केले. सन 1932 मध्ये अमरावती नगरीत श्री.शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. खेडोपाड्यात विद्यालये, वसतिगृहे महाविद्यालये स्थापन केली. सन 1946 मध्ये अमरावतीला श्री शिवाजी महाविद्यालय सुरु केले. पुढे विज्ञान, कृषि, ट्रेनिंग कॉलेज, ग्रंथालय, क्रमाक्रमाने सुरु केली, आर्थिक दृष्टीने कमजोर असलेलया शेतकर्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळवून दिली. आर्थिक दृष्टीने कमजोर असणार्या बहुजन सामाजाच्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेऊन पोहचविले. आज त्यांच्या लौकिक भारतात झला आहे. भारतातील शेतकरी शेतमजूर भारताचा राजा व्हावा हीच त्यांची मनीषा होती. जगाचा पोशिंदा शेतकरी आज अर्धपोटी, अर्धनग्न असून तो आत्महत्येकडे वळत आहेत. शेतकरी सुखी तर देश सुखी हे शासनाचे धोरण शेतकर्यांच्या हिताचे राहिले नाही. ही खर्या अर्थाने लोकशाहीची विटंबनाच ठरली आहे. पायाला माती न लागू देता पंचतारांकित हॉटेलात बसून अनेक पुढारी दिल्लीचे आणि प्रांताचे राजकारण चालवितात हे आश्चर्यकारक होय, असे भाऊसाहेब म्हणत असत. </div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेब कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकर्यांच्या हिताचा कर्ज निवारण कायदा पास करुन अमलात आणला. भारत कृषक समाजाची स्थापना करुन त्यांनी पंजाब पासून तर सर्व प्रातांतील शेतकरी सेघटित केले. अनेक अधिवेशने व परिषदा दिल्लीत आणि भारतात भरविल्या. भारत हा जगाच्या मानाने कृषि क्षेत्रात फार मागासलेला देश आहे हे पटवून दिले. शेतकर्यांनी त्यांचया कार्यास उचलून धरले. </div>
<div style="text-align: justify;">
भाऊसाहेबांनी अस्पृश्यतेची कीड नष्ट करण्याचा प्रयत्न केला अणि त्यासाठी संघर्ष केला. असंख्य विद्यार्थ्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली भाऊसाहेब अनाथाचे नाथ झाले. कृषिमंत्री असताना परदेश दौरा करुन त्यांचे तंत्रज्ञान भारतात आणले. त्यांनी अमेरिका, नार्वे, जपान अशा अनेक देशांचा दौरा केला. भारतीय शेतकरी संघटित झाले आणि तरुण शिक्षित झाले तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. असा विचार भाऊसाहेबांचया मनात आला आणि त्या दिशेने अनेक अथक परिश्रम करुन आणि संतुलन कायम ठेवून भाऊसाहेबांनी सौजन्याने दर्श घडविले. म्हणूनच भाऊसाहेब खरे द्रष्टे पुरुष सिद्घ झाले. भाऊसाहेबांचे उभे आयुष्य म्हणजे कर्तृत्वाचा भव्य अन दिव्य साक्षात्कार होय. त्याग आणि सेवा हे त्यांचे ब्रीद होते. भाऊसाहेबांनी रंजल्या-गांजल्यांच्या सेवेलाच आपला धर्म मानला. ही सेवावृत्ती त्यांच्या जीवनात अखेरपर्यंत राहिली. लहानशा खेड्यात जन्म घेऊन गोरगरिबांची सेवा करण्यात त्यांनी जन्माची सार्थकता मानली. </div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अथक प्रयत्नामुळे देशाचा शेतकरी शिकला, तो दुबळा भोळा, व लाचार राहिला नाही. त्यांचे सत्व जागृत करुन त्याला स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास देणार्या शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार भाऊसाहेबांनी केला. त्यामुळेच पुढो हा शेतकरी आमदार, खासदार होण्याइतपत धीट झाला. इंजिनिअर झाला, डॉक्टर, संशोधक, शास्त्रज्ञ झाला. हे भाऊसाहेबांनी केलेल्या ज्ञान जागृतीच्या चळवळीचे बळ आहे. ही तयांच्या कर्तृत्वाच्या पुण्याईची शिदोरी पुढच्या अनेक पिढ्यांना पुरणार आहे. </div>
<div style="text-align: justify;">
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक असे बहुआमी व्यक्तित्व सर्वश्रृत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक तेजस्वी पैलू म्हणजे त्यांचे प्रकांड पांडित्य हा पैलू मात्र काही मूठभर लोकांनाच ज्ञात होता भाऊसाहेब उच्च शिक्षणासाठी विदेशात गेले. डॉ. भाऊसाहेबांनी वैदिक वाङमयातील धर्माचा उद्गम आणि विकास ह्या विषयावर पी.एच.डी. मिळविली होती. त्यांचे मार्गदर्शक होते. प्रा.ए.ए. मॅगडॉनल विश्वविख्यात भाषाशास्त्रज्ञ.भाऊसाहेबांचे वैशिष्ट्ये असे की, त्यांनी बॅरिस्टरची शेवटची परीक्षा व प्रबंधलेखन एकाच वर्षी केले. त्यांच्या या विलक्षण बुद्घीमत्तेचे व मेहनतीचे चिज झाले 25 जानेवारी 1925 रोजी लंडनच्या लिंकन इन मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांचा डी. फील. ही पदवी देऊन सन्मान केला. वैदिक वाङमयातील धर्माचा उद्गम आणि विकास ह्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी भाऊसाहेबांनी ऋग्वेद, सामवेद, यजर्वेद, अर्थवेद, असे चार वेद तसेच अरण्यके, ब्राह्मण्यके, श्रृतीस्मृती, गीता ह्यांचे सखोल अध्ययन केले. थोर विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेऊन त्यातून त्यांना गवसलेले सत्य त्यांनी आपल्या ग्रंथात प्रतिपादन केले. सत्य व कर्मावर आधारित धर्माची ओळख त्यांनी जगाला करुन दिली. </div>
<div style="text-align: justify;">
ज्याप्रमाणे संतांना माणसात देव दिसला, त्याचप्रमाणे भाऊसाहेबांना शेतकर्यांमध्ये देव दिसला. ज्ञानानेच अंधाराचा नाश होतो हे तत्त्व उराशी बाळगून ज्ञानाची गंगा खेडोपाड्यात नेण्याचे महान कार्य डॉ. भाऊसाहेबांनी केले आणि या कर्मयोगामुळेच ते अमर झाले. अशा या लहान नेत्याना मृत्यू दि. 10 एप्रिल 1965 रोजी दिल्ली येथील विलिंग्डन हॉस्पिटल मध्ये झाला. अशा ज्ञानयोगी, कर्मयोगी महामानवास विनम्र अभिवादन!</div>
<div style="text-align: justify;">
_________________________________________________</div>
<div style="text-align: justify;">
- अनिल वि. चोपडे विश्रामगृहाजवळ, अंजनगाव सुर्जी, </div>
<div style="text-align: justify;">
(शा.शिक्षक) नृसिंह विद्यालय, अचलपूर, जि अमरावती मो.नं 9850923376</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा प्रकाशित 'शिवसंस्था' त्रैमासिकाच्या 'डाॅ.पंजाबराव देशमुख' विशेषांकावरून साभार)</div>
</div>
संकेत श्रीकृष्ण राऊतhttp://www.blogger.com/profile/05620948881008833151noreply@blogger.com0